नाराज आठवले मोदींच्या शपथविधीला गैरहजर

Last Updated: Monday, May 26, 2014, 21:02

भारताच्या 15व्या पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतलीय. या शपथविधी समारंभाला 4000 निमंत्रित उपस्थित होते. सार्कच्या प्रतिनिधी राष्ट्राच्या प्रमुखांसह देशातील नेते, सेलिब्रेटीही उपस्थित होते. मात्र एनडीएचा घटक पक्ष असलेल्या आरपीआयचे रामदास आठवले हे मात्र शपथविधी समारंभाला गैरहजर राहिले.

सलमानची बहिण लवकरच चढणार बोहल्यावर...

Last Updated: Monday, May 12, 2014, 10:33

बॉलिवूडचा दबंग खानच्या ‘हिट अॅन्ड रन’ खटल्यातील अडचणी वाढल्या असल्या तरी तो आपल्या बहिणीसाठी भलताच खूश आहे. सलमानची छोटी बहिण आणि फॅशन डिझायनर अर्पिता लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याचं समजतंय.

सलमानची बहिण अर्पिता पडलीय प्रेमात

Last Updated: Monday, April 21, 2014, 17:09

अभिनेता अर्जुन कपूरनंतर आता सलमान खानची बहिण अर्पिताला नवा मित्र मिळालाय. अर्पिताच्या खास मित्राचं नाव आहे आयुष शर्मा... दोघांची मैत्री इतकी खास झालीय की आता चर्चा साखरपुड्यापर्यंत पोहोचलीय.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

पवारांच्या ताफ्यावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:44

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्याला अवकाळी पावसाने आणि गारपिटीने झोडपलंय. अहमदनगर जिल्ह्यात गारपीटग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार दौऱ्यावर आले होते.

निषेध... गारपिटग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा!

Last Updated: Monday, March 10, 2014, 20:23

गारपिटग्रस्त शेतकऱ्यांची राज्य सरकारनं क्रूर चेष्टा केलीय. मराठवाड्यात यंदाच्या दुष्काळामुळे कर्जवसुली थांबवण्यात आली होती. ही बंदी उठवत कर्जवसुली पूर्ववत करण्याचे आदेश देणारा निर्णय राज्य शासनानं घेतलाय.

कुंडली प्रेमाची - वृश्चिक रास

Last Updated: Friday, February 14, 2014, 12:04

कुंडली प्रेमाची - वृश्चिक रास

राज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?

Last Updated: Saturday, January 25, 2014, 07:19

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

आम्ही बापाचे बाप, रामदास आठवलेंचा राज ठाकरेंना टोला

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 13:56

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आम्ही ‘आप`चे बाप आहोत हे विधान केलं होतं. त्यावर उत्तर देत आयपीआयचे नेते रामदास आठवले यांनी उत्तर दिलंय. आठवले म्हणतात, आम्हाला ‘आप`चा बाप होऊन ‘पाप` करायचे नाही. तुम्ही ‘आप`चे बाप असाल, तर आम्ही बापाचे बाप आहोत.

राज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:47

सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.

रिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 20:59

लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.

रामदास आठवलेंना शिवसेनेचा एका जागेचा प्रस्ताव

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 07:31

शिवसेनेनं रिपाइं नेते रामदास आठवलेंची नाराजी दूर करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेनं रिपाइला लोकसभेची एक जागा सोडण्याची तयारी दर्शवलीय. खासदार संजय राऊत यांनी रामदास आठवलेंची मुंबईतल्या रंगशारदा हॉटेलमध्ये भेट घेतली.

महालक्ष्मीला निघालेल्या भाविकांच्या गाडीला अपघात

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 12:37

कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांवर काळानं घाला घातलाय. भाविकांची स्कॉर्पिओ गाडी रोडरोलरला धडकून भीषण अपघात घडला. कोल्हापुरातल्या शिरोळीजवळ हा अपघात घडला. अपघातात ४ जण जागीच ठार झालेत तर ५ जण जखमी आहेत.

द. म. मुंबईसाठी जोशी आणि आठवलेंमध्ये रस्सीखेच

Last Updated: Saturday, August 10, 2013, 21:53

लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाची बोलणी सुरु होण्याआधीच रस्सीखेच सुरू झालीय. प्रतिष्ठेचा मानल्या जाणा-या दक्षिण मध्य मुंबईसाठी शिवसेनेनं उमेदवाराची चाचपणी सुरु करताच रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियानं या जागेवर दावा ठोकलाय.

आठवलेंना पुन्हा टाळलं, आरपीआय फणफणली!

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 14:36

मुंबईत आज संध्याकाळी होणाऱ्या शिवसेना-भाजपच्या आमदारांच्या संयुक्त बैठकीचं निमंत्रण न मिळाल्यानं रामदास आठवले नाराज झालेत.

`बाळासाहेबांच्या नावावर मनसेचं नाटक`

Last Updated: Tuesday, July 2, 2013, 15:43

`ईस्टर्न फ्रीवेला बाळासाहेब ठाकरे नाव देण्याची मागणी म्हणजे मनसेचं निव्वळ नाटक आहे` अशी टीका शिवसेना नेते आनंदराव अडसूळ यांनी केलीय.

‘फ्री वे’ अडवला… आरपीआय मनसेच्या वाटेवर?

Last Updated: Sunday, June 30, 2013, 15:18

मुंबईतल्या ‘ईस्टर्न एक्सप्रेस फ्री’वेच्या नामकरणावरून सध्या वाद सुरू आहे. ‘फ्री वे’ला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं, अशी मागणी करत रिपब्लिकन पक्षानं फ्रीवेवर आंदोलन केलं.

उदयनराजे! RPI कडून निवडणूक लढा- आठवले

Last Updated: Sunday, June 23, 2013, 07:27

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आगामी निवडणूक आरपीआयकडून लढवावी, असं आवाहन आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलंय.

महायुतीच्या सत्तेत रिपाइंचा उपमुख्यमंत्री- आठवले

Last Updated: Sunday, June 2, 2013, 10:50

2014च्या निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्यास उपमुख्यमंत्रीपद आरपीआयला देण्यात यावं, अशी मागणी रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी केलीये.

थीमपार्कला नाव बाळासाहेबांचं की बाबासाहेबांचं?

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 17:41

महालक्ष्मीच्या रेसकोर्सच्या जागेवरून राजकारण तापलं असतांना, आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी वेगळीच भूमिका मांडली आहे. रेसकोर्स नवी मुंबईत हलवा, त्याचा करार वाढवू नका, असं आठवले यांनी म्हटलंय.

कसा असतो वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा स्वभाव

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 15:37

तुमचे प्रभावी सद्गुण म्हणजे तुमच्या अंगी असलेला लढवय्या बाणा कोण्त्याही प्रसंगात न डगमगता संघर्षात्मक टक्कर देण्याची ताकत असते.

एक एप्रिलची बातमी चुकून छापली; सेनेची मिश्किल प्रतिक्रिया

Last Updated: Friday, March 8, 2013, 09:45

महायुतीत ‘मनसे’ सहभागी होणार या बातमीवर शिवसेना नेत्यांनी मात्र कानावर हात ठेवलेत.

‘एटीएम’मधला ‘टी' बळकट होणार?

Last Updated: Friday, March 8, 2013, 10:32

रामदास आठवले, उद्धव ठाकरे, आणि गोपीनाथ मुंडे अशी महायुतीचं ‘एटीएम’ म्हणून ओळखंल जात होते. मनसे महायुतीत सहभागी झाल्यास एटीएममध्ये आणखी एक ‘टी’ (ठाकरे) सहभागी होणार आहे. त्यामुळं या महायुतीतला ‘टी’ आणखी पॉवरफुल्ल होणार आहे.

महायुतीला मनसेचं ‘इंजिन’?

Last Updated: Friday, March 8, 2013, 08:31

राज्याच्या राजकारात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रभाव मोडून काढण्यासाठी शिवसेना-भाजप-आरपीआय महायुतीत मनसेला सहभागी करुन घेण्यावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

सावित्रीबाईंना श्रद्धांजली, भिडेवाड्यात पुन्हा शिकल्या मुली

Last Updated: Thursday, January 3, 2013, 22:17

महिलांसाठी पहिली शाळा सुरु करणा-या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती साजरी करण्यात आली. मात्र, पुण्यात रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मात्र सावित्रीबाईंना वेगळ्या पद्धतीने श्रद्धांजली वाहिली.

राज ठाकरेंनी प्रस्ताव दिला तर विचार करूः आठवले

Last Updated: Thursday, January 3, 2013, 21:24

महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीत यावी असं काही जणांना वाटत असलं तरी उद्धव ठाकरे आणि माझं मतंही महत्त्वाचं आहे, असं रामदास आठवले यांनी म्हंटल आहे.

`हज हाऊस`साठी `रिपाइं` मैदानात

Last Updated: Tuesday, December 18, 2012, 22:06

औरंगाबादेत आज हज हाऊसच्या प्रश्नाने आक्रमक वळण घेतलं. गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादेत मुस्लिम संघटनाचं ‘हज हाऊस’साठी आंदोलन सुरु आहे. त्यात आता आरपीआयने उडी घेतली आहे.

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

Last Updated: Monday, October 15, 2012, 17:02

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

सोयाबीनवर अळ्यांचा `लष्करी` हल्ला

Last Updated: Tuesday, September 18, 2012, 11:57

यवतमाळसह अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनवर तंबाखुची पाने खाणा-या अळीने हल्ला केलाय. तंबाखुची पाने खाणा-या अळ्या म्हणजेच लष्करी अळ्यांचा हा प्रादुर्भाव आहे.अळ्यांच्या आक्रमनामुळे पानांच्या जाळ्या होऊ लागल्याने सोयाबीन पीक धोक्यात आलंय.

...तर, राज यांना मुंबईतून हाकलवू- रामदास आठवले

Last Updated: Sunday, September 2, 2012, 16:32

राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बिहारमधील मराठी माणसाला कोणी हात लावला तर राज ठाकरेंनाच मुंबईतून हाकलून देण्याची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा आरपीआय अध्यक्ष रामदास आठवलेंनी दिलाय.

आरपीआय कार्यकर्ते आणि मनसैनिक आमने-सामने

Last Updated: Thursday, August 23, 2012, 16:57

आरपीआय कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मुंबईतल्या कृष्णकुंज निवासस्थानावर काढलेल्या मोर्चावेळी आरपीआय कार्यकर्ते आणि मनसे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्य हाणामारीवर उतरले.

अंबेडकर स्मारकावरून वाद सुरूच

Last Updated: Saturday, April 14, 2012, 21:15

इंदू मिल परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला विलंब लागत असल्याचा आरोप करत रिपब्लीकन सेनेनं आंदोलन केलं होतं. रिपब्लिकन स्मारकाचं प्रतिकात्मक भूमिपूजन करण्याचं जाहीर केल्यानं वाद निर्माण झाला होता.

सचिनच्या सत्काराला परवानगी नाकारली...

Last Updated: Thursday, April 12, 2012, 17:51

मुंबईत गेट वे ऑफ इंडियाजवळ रामदास आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टीनं आयोजित केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्टनं परवानगी नाकारली आहे.

आंबेडकर स्मारकासाठी RPIने रेल्वे रोखली

Last Updated: Saturday, March 17, 2012, 20:30

इंदू मिलच्या जागेवरुन आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली रेल्वे स्टेशनमध्ये रेल रोको केला. चर्चगेटकडे जाणारी रेल्वे अडवली. त्यामुळ काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

मंत्रालयात 'जय भीम'चा जागर

Last Updated: Monday, February 27, 2012, 19:06

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेची मागणी करत आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालयात घुसून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्र्यांच्या दालनाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे पोलिसांची धावपळ उडाली.

सर्वपक्षीय संमतीनेच रिपाइंचा महापौर शक्य- आठवले

Last Updated: Monday, February 27, 2012, 21:11

काँग्रेसच्या भूमिकेमुळे नाशिकमध्ये आरपीआयचा महापौर करुन सत्तास्थापनेचा राष्ट्रवादीचा फॉर्म्युला बारगळल्याची चिन्हं दिसत आहेत. छगन भुजबळ यांनी आठवलेंना आरपीआयचा महापौर करण्याची ऑफर दिली होती. भुजबळांनी त्यासाठी सेना, भाजपची मदत मिळवून द्या, असं आठवलेंना सांगितलं होतं

काँग्रेसच्या पवित्र्याने भुजबळांची कोंडी

Last Updated: Thursday, February 23, 2012, 16:31

नाशिक महापालिकेत महापौरपदासाठी रामदास आठवलेंच्या रिपाइं उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचं स्पष्टपणे राष्ट्रवादीला सांगण्यात आल्याचं वृत्त आहे. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे छगन भुजबळांना मोठा हादरा बसला आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या होर्डिंगवर आठवलेंची हरकत

Last Updated: Monday, February 6, 2012, 14:38

ठाण्यामध्ये राष्ट्रवादीच्या होर्डींगवर आरपीआयचा उल्लेख आहे. त्यावरुन रामदास आठवले यांनी हरकत घेतली आहे.

विक्रोळीत शिवसेना विरुद्ध आरपीआय !

Last Updated: Saturday, February 4, 2012, 22:25

शिवसेना, भाजप आणि आरपीआयचे नेते महायुतीचे गोडवे गात असले तरी विक्रोळीत या महायुतीला भगदाड पडलं आहे. शिवसेनेवर नाराज असलेल्या आरपीआयनं थेट शिवसेनेसमोरच आरपीआयचा उमेदवार उभा केला आहे.

'निवडून आल्यानंतर मी पक्ष सोडणार नाही'

Last Updated: Thursday, February 2, 2012, 12:14

मुंबई महापालिका निवडणुकांत उमेदवारी अर्ज भरतानाच सर्व पक्षांना बंडखोरीनं ग्रासल आहे. मात्र रामदास आठवलेंच्या रिपब्लीकन पक्षाला निवडणूकीनंतरच्या बंडाची भिती आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतर कुणी पक्षांतर करू नये यासाठी तसं प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याचं पक्षनेतृत्वानं ठरवलं आहे.

महापौर राज नव्हे, RPI ठरवेल - आठवले

Last Updated: Tuesday, January 31, 2012, 12:03

काल महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तसचं पत्रकार परिषदेत दावा देखील केला की 'मुंबईचा महापौर हा मीच ठरवेन'. त्यांच्या वक्तव्यावर आरपीआय नेते रामदास आठवले यांनी राज यांना उत्तर देत, सांगितले की मुंबईचा महापौर राज ठाकरे नाही तर, आरपीआय ठरवेल.

तर महायुती तोडू – आरपीआय

Last Updated: Sunday, January 29, 2012, 23:18

पुण्यात आरपीआयनं महायुती तोडण्याचा इशारा दिलाय. भाजपच्या आडमुठेपणामुळे युती तुटू शकते, असा इशारा रिपाइंचे जिल्हाध्यक्ष परशुराम वाडेकर यांनी दिलाय.

नाशिकमध्ये युतीला भगदाड

Last Updated: Thursday, January 26, 2012, 19:25

नाशिकमध्ये महायुती फुटली आहे. शिवसेना भाजपमधील नेत्यांच्या वादामुळे महायुतीत फुट पडल्याचं सांगण्यात येत आहे. नाशिकमध्ये आता बहुरंगी लढत होऊन शिवसेना-रिपाइं विरुद्ध भाजपचा सामना रंगणार, अशी चिन्हं दिसत आहेत.

पुण्यात आरपीआय अस्वस्थ...

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 23:28

पुण्यात महायुतीचं जागावाटप रखडल्यानं आरपीआयमध्ये अस्वस्थता आहे. त्यातच अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्यास रामदास आठवलेंकडं जाण्याची भूमिका आरपीआयच्या स्थानिक नेत्यांनी घेतली .

पुण्यात महायुतीच्या जागावाटपाचा तिढा कायम

Last Updated: Monday, January 16, 2012, 17:26

पुणे महापालिकेसाठी शिवसेना भाजप आरपीआयची महायुती होणार असली तरी जागावाटपाचा तिढा मात्र अजुनही सुटलेला नाही

महायुतीची घोषणा अन् आठवलेंची चौफेर फटकेबाजी

Last Updated: Friday, January 13, 2012, 17:13

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना, भाजप आणि रिपाइंच्या जागावाटप अखेर निश्चित झाल्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली. मुंबईतील दादरच्या शिवसेना भवनात महायुतीच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार, रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले, सेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी उपस्थित होते.

महायुतीची झाली खरी, आठवले नाराज तरी!

Last Updated: Thursday, January 12, 2012, 18:19

मुंबई महापालिकेसाठी महायुतीची घोषणा काही वेळात होणार असली तरी आरपीआयचे नेते रामदास आठवले अजूनही नाराज आहेत. ३० ऐवजी २९ जागांवर समाधान मानल्यानंतर आता काही विशिष्ट वॉर्डासाठी आग्रह धरून त्यांनी दबावतंत्र निर्माण करण्याची खेळी खेळली आहे.

युतीचं चाललयं तरी काय?

Last Updated: Wednesday, January 11, 2012, 14:50

आघाडीचा मुंबईतील जागा वाटपाचा तिढा सुटला तरी महायुतीच्या चर्चेचं गुऱ्हाळ आजही सुरुच राहणार असल्याचं चित्र आहे. त्यामुळं आज ११ जानेवारीला होणारी महायुतीच्या जागांची अधिकृत घोषणा तुर्तास तरी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

महायुतीतील जागा वाटपाचा तिढा कायम

Last Updated: Monday, January 9, 2012, 12:36

रामदास आठवले ३० जागांवर ठाम राहिल्याने महायुतीतील जागा वाटपाचा तिढा अद्याप कायम आहे. महायुतीच्या जागा वाटपात शिवसेना-भाजपने आठवलेंच्या रिपाईला २९ जागांचा प्रस्ताव दिला. रिपाईच्या कोट्या संदर्भातही वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळांनी रिपाईच्या कोट्यातील पाच जागा मिळाव्यात अशी मागणी केली आहे. तसंच ढसाळांनी रामदास आठवलेंना या संदर्भात निर्णय घेण्यासाठी ११ जानेवारी पर्यंतची मुदत दिली आहे

नामदेव ढसाळांचा इशारा

Last Updated: Monday, January 9, 2012, 15:20

शिवसेना, भाजप आणि रिपाई यांच्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर रिपाईच्या वाट्याला आलेल्या जागांबाबत वादाला तोंड फूटलं आहे. नामदेव ढसाळ यांनी आमच्या रामदास आठवले यांना आमच्या जागांबाबत ११ तारखेपर्यंत निर्णय घ्या असा निर्वाणीचा इशारा दिला.

महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब

Last Updated: Monday, January 9, 2012, 15:46

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागा वाटप जाहीर झालं आहे. महापालिकेच्या एकूण २२७ जागांपैकी शिवसेनेला १३६ तर भाजपला ६२ आणि आरपीआयला २९ जागा देण्यात आल्या आहेत. रामदास आठवलेंनी ३० जागांची अपेक्षा व्यक्त केली होती तर सेना-भाजपने २५ जागांची तयारी दर्शवली होती. अखेरीस आरपीआयच्या वाट्याला २९ जागा आल्या आहेत.

आठवले घेरणार पंतप्रधानांना ?

Last Updated: Saturday, January 7, 2012, 16:06

इंदू मिल प्रश्नावर आरपीआयमध्ये श्रेयाच्या लढाईवरुन वाद सुरु असताना आज आरपीआयचे नेते रामदास आठवले वरळी इथं जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. आठवले यांनी वरळी इथं आपण इंदू मिल प्रश्नाबाबत कसे प्रयत्न केले याचा पाढाच वाचला.

RPI ला २५ जागा देण्यावर शिक्कामोर्तब

Last Updated: Thursday, January 5, 2012, 19:39

महायुतीतील घटक पक्ष असलेल्या आठवलेंच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला २५ जागा देण्यावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झाला असून याबाबत रामदास आठवले यांनी समाधान व्यक्त केले आहे.

RPIच्या नेत्यांना मस्ती चढली आहे- नामदेव ढसाळ

Last Updated: Friday, January 6, 2012, 09:59

आरपीआयच्या नेत्यांना मस्ती चढली आहे असं जळजळीत विधान नामदेव ढसाळ यांनी केलं आहे. यापुढे दलित पँथर आरपीआयमध्ये राहणार नाही अशी घोषणाही ढसाळांनी केली. तसंच माझी नाराजी शिवसेनेवर नाही असंही त्यांनी सांगितलं.

महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटणार ?

Last Updated: Thursday, January 5, 2012, 17:30

शिवसेना, भाजपा आणि रामदास आठवलेंची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या तीन पक्षांच्या महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. सेना आणि भाजपाने आठवलेंच्या रिपाईला २५ जागा सोडण्याचा प्रस्ताव दिला आहे. तर रामदास आठवलेंनी ३० जागांची मागणी केली आहे.

निवडणूक आयोगाविरोधात आठवले कोर्टात

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 13:39

जि.प. आणि नगरपालिका यांच्या निवडणुक कार्यक्रमामुळे आरपीआय गटाने विरोध करत कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आरपीआय गट आता या कार्यक्रमाविषयी कोर्टात याचिका दाखल करणार आहे.

आरपीआय करणार आज रेलरोको

Last Updated: Monday, December 19, 2011, 04:01

डॉक्टर बाबासाहेब आंबोडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाला इंदू मिलची सर्व साडे बारा एकर जागा मिळावी यासाठी रिपब्लीकन पक्षाचे कार्यकर्ते आज रेलरोको करणार आहेत. डोंबिवलीत रेल्वे स्थानकात सकाळी ११ वाजता रिपाइं कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

आरपीआयचा 'राडा', इंदू मिलवर फिरवणार 'गाडा'

Last Updated: Thursday, December 15, 2011, 11:28

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी दादरमधल्या इंदूमिलची केवळ ४ एकर जागा देण्याच्या सरकारच्या प्रस्तावाविरोधात आज रिपब्लिकन कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

आरपीआयची मुख्यमंत्री कार्यालयावर धडक

Last Updated: Wednesday, December 7, 2011, 14:17

इंदू मिलच्या जागेसाठी आता आरपीआयच्या आठवले गटाच्या कार्यकर्त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यालयावर धडक मारलीय. मुख्यमंत्र्यांच्या केबिनसमोर या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केलीय.

डॉ. आंबेडकर स्मृती स्मारकासाठी आंदोलन

Last Updated: Sunday, December 4, 2011, 07:16

दादरमधल्या हिंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं स्मृती स्मारक उभारण्यासाठी जागा द्यावी यासाठी ६ डिसेंबरला रिपब्लिकन सेना आंदोलन करणार आहे.

मुंबईत आरपीआयला 25 ते 30 जागा ?

Last Updated: Monday, November 28, 2011, 17:33

महापालिकेवर निळा-भगवा फडकविणार

Last Updated: Saturday, October 22, 2011, 15:17

अर्जुन डांगळे
दसरा मेळावा हा शिवसेनेचा कार्यक्रम असल्याने रामदासजी आठवलेंना बोलावले नाही, अशी बोंब मारणाऱ्यांना याची माहिती नसावी, असेच वाटते. काही अपवादात्मक परिस्थिती शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला भाजपचे काही नेते आले असतील.