जेव्हा प्रियंका चोपडा तापी नदीच्या पुलावरून उडी मारते...

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:25

तापीनदीच्या पुलावरून प्रियंका चोपडा खाली उडी मारतेय. पण हे सिनेमाचं शुटिंग आहे.

टोल वसुलीवरून कोल्हापुरात संतापाची लाट

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 13:31

सर्वोच्च न्यायालयानं कोल्हापूरातील टोल वसुलीवरील स्थगिती उठवल्यानंतर कोल्हापूरात संतापाची लाट पसरली आहे.

राज्यात तपमान वाढले, कोल्हापुरात 40 अंशावर पारा

Last Updated: Saturday, May 3, 2014, 08:41

राज्यातील इतर शहराप्रमाणं कोल्हापूर शहराचा पाराही चांगलाच वाढलाय. कोल्हापूरचा पारा 40 अंशावर पोहचला आहे. तर दुसरीकडे काही ठिकाणी पाऊस पडत असल्याने उकाड्यात वाढ झालेय. कोकण, सांगली-मिरज येथे तुरळक पाऊस झाला.

नागपूरचा पारा वाढला, उष्णतेच्या लाटा

Last Updated: Friday, April 25, 2014, 15:36

नागपूरमध्ये पारा 42 अंश सेल्सियसच्या वर पोहचालाय. येत्या काही दिवसात नागपूरसह विदर्भातल्या नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करावा लागण्याची शक्यता हवामान खात्यानं व्यक्त केलाय. त्यामुळे उष्णतेच्या वाढत्या तडाख्यापासून सांभळण्याची खबरदारी नागपूरकरांनी घेणं आवश्यक आहे.

मतदारांना पैसे वाटणाऱ्या शेकाप कार्यकर्त्याला अटक

Last Updated: Friday, April 18, 2014, 11:57

मावळ मतदार सघांत येणाऱ्या उरण तालुक्यात मतदानासाठी पेसे वाटप करणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाचे पक्षाचे कार्यकर्ते महादेव घरत यांना अटक करण्यात आलीय.

पक्के वैरी झाले सख्खे मित्र... आघाडीला फायदा?

Last Updated: Friday, April 11, 2014, 12:54

एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या समझोता झालाय.

सोनाक्षी कोणत्या प्रश्नावर आणि का संतापते?

Last Updated: Thursday, April 10, 2014, 13:20

सोनाक्षी आणि शाहीद कपूरचं नाव जोडलं जात असल्याने सोनाक्षी खूप चिंतेत आहे. तसेच सोनाक्षीबाईंना लग्नाचा प्रश्न विचारला की खूप राग येतो.

निवडणुकीची रणधुमाळी: लक्ष्मण जगतापांचा `वासुदेव` प्रचार!

Last Updated: Monday, April 7, 2014, 21:47

निवडणूक प्रचारात अनोखे फंडे वापरुन मतदारांपर्यंत पोहचण्याची शक्कल उमेदवार लढवतात. असाच एक प्रयोग मावळ लोकसभेचे शेकाप उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सुरु केलाय.

तामिळनाडू : सत्तापालट होणार?

Last Updated: Friday, April 4, 2014, 23:10

स्वतंत्र द्रविड नाडुची मागणी, हिंदीला विरोध, प्रत्येक निवडणुकीत सत्तापालट अशी काही तामिळनाडूच्या राजकारणाच्या वैशिष्ट्य राहिलीत. तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास नेमका कसा आहे, हे सांगणारा हा एक लेखाजोखा...

गर्भधारणेचा कालावधी कमी करतं जास्त तापमान

Last Updated: Thursday, April 3, 2014, 09:10

जर तुम्हाला गर्भवती आहे आणि आपलं बाळ पूर्णपणे निरोगी आणि सुदृढ असावं, असं आपल्याला वाटतं तर तापमान वाढण्याआधी तुम्ही कुठं थंडीच्या ठिकाणी राहा. कारण वाढलेलं तापमान तुमच्या गर्भधारणेचा कालावधी कमी करू शकतो. एका अभ्यासानुसार हे सांगण्यात आलंय की, जर चार-सात दिवस गर्भवती महिला ३२ अंश सेल्सियस किंवा त्यापेक्षा जास्त तापमानात राहत असेल, तर महिलेची डिलिव्हरी वेळेआधीच होण्याचं प्रमाण २७ टक्क्यांनी वाढतं.

मतांचं विभाजन करण्यासाठीची अशी ही खेळी!

Last Updated: Thursday, March 27, 2014, 21:11

नावात काय आहे असं नेहमी म्हटलं जातं, पण निवडणुकीच्या रिंगणात नावाला बरंच महत्त्व असतं. एक सारखं नाव आणि आडनावाची उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरली तर बलाढ्य उमेदवाराला त्याचा फटका बसू शकतो. मावळ लोकसभा मतदार संघात एकाच नावानं असेच उमेदवार उभे राहिलेत. आता ते कोणी उभे केले? का केले? हे गुलदस्त्यात असलं तरी त्याचा फटका तुल्यबळ उमेदवाराला बसण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.

लक्ष्मण जगतापांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:01

लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

शेकाप आक्रमक, सेनेचा घरोबा तोडून विरोधात उमेदवार

Last Updated: Friday, March 14, 2014, 20:05

शेतकरी कामगार पक्षानं शिवसेनेबरोबरचा घरोबा तोडलाय. गेल्या काही निवडणुकांमधली एकमेंकांबरोबरची सहकार्याची भूमिका सोडून शेकापनं शिवसेनेच्या विरोधात उमेदवार जाहीर केलेत.

महाराष्ट्रात युती अभेद्य - राजीव प्रताप रूडी

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 13:27

युतीसंदर्भात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडींनी उद्धव ठाकरेंशी फोनवरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

विराट कोहली कोणत्या प्रश्नावर संतापतो?

Last Updated: Tuesday, February 18, 2014, 13:37

बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्माच्या लिप सर्जरीवरून विराट कोहली चांगलाच नाराज झाला आहे. या प्रश्नावरून विराट कोहली चांगलाच संतापला.

महाबळेश्वरची हुडहुडी मुंबापुरीत दाखल

Last Updated: Monday, January 13, 2014, 18:15

मुंबईतील तापमान महाबळेश्वर पेक्षाही खाली गेलं आहे. यामुळे मुंबईचं महाबळेश्वर झालंय. मुंबईचे किमान तापमान रविवारी १३.७ अंश सेल्सिअस एवढे नोंदवण्यात आलं. मात्र महाबळेश्वरचं किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअस एवढं होतं.

अबब! अमेरिका @ उणे ५२!

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 12:36

ध्रुवीय वादळाच्या तडाख्यामुळं निम्मी अमेरिका बर्फमय झालीय. उत्तर अमेरिकेत कॅनडाच्या सीमेवर असलेल्या मोंटाना राज्यात तर उणे ५२ अंश इतके तापमान नोंदवलं गेलंय. शतकातलं सर्वात थंड तापमान म्हणून हे नोंदवलं जाण्याची शक्यता आहे.

वीणा मलिकने बॉयफ्रेंडला वागवले स्पॉट बॉयप्रमाणे?

Last Updated: Monday, January 6, 2014, 19:01

पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक हिचा नुकताच दुबईतील बिझनेसमन असद बशीर खान यांच्याशी विवाह झाला. पण आता ती अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तिच्या पूर्वाश्रमीचा प्रियकर प्रशांत प्रताप सिंग याने अब्रु नुकसानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली आहे.

नगरमध्ये राष्ट्रवादी-मनसेचं साटंलोटं; दिल्लीच्या निकालातून धडा नाहीच

Last Updated: Monday, December 30, 2013, 13:18

नगरमध्ये सत्ता स्थापनेसाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं साटंलोटं जमून आलंय.

रत्नागिरी पालिकेत अकार्यक्षम प्रशासन आणि राज्यकर्ते

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:00

नगरपालिकेने शहराच्या विकासाचा गाडा हाकायचा....त्या नगरपालिकेसमोर डपिंगग्राऊटं असेल तर....आणि शहराला पाणिपुरवठा करणारं जल शुध्दीकरण केंद्र डपिंग्राऊंटजवळ असेल तर...नागरिकांच्या आरोग्याशी खेळणा-या रत्नागिरीतल्या नगरपालिकेतील प्रशासन आणि राज्यकर्त्यांच्या अकार्यक्षमतेवर हा खास रिपोर्ट.

बीग बी पुन्हा आजारी; चाहत्यांच्या प्रेमानं हेलावले!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 19:18

बीग बी अमिताभ बच्चन यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावलीय. त्यांना पोटाच्या संसर्गानं पुन्हा एकदा ग्रासलंय... त्यांना तापही भरलाय.

ठाण्यात अज्ञातांनी बाईक्स जाळल्या, राजकारणही तापलं!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:00

ठाण्यात वागळे इस्टेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रघुनाथनगर परिसरात सहा बाईक्स जाळल्याची घटना घडलीय. अज्ञात इसमांनी या बाईक्स पेटवून दिल्या. तसंच परिसरातील ‘आनंदस्मृती’ व्यायामशाळाही पेटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय.

वर्धा जिल्ह्यात डेंग्यूची साथ,५२ जणांना लागण!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 13:07

ऐन सणात वर्ध्यात डेंग्यूच्या साथीनं डोकं वर काढलंय. जिल्ह्यात तापानं दोन मुलांचा बळी घेतला तर आतापर्यंत २६१ जणांच्या केलेल्या रक्त तपासणीत ५४ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचं उघड झालंय. यातील सात रुग्ण जे जिल्ह्याबाहेरील असल्याची महिती आहे.

`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:30

विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.

चुनाभट्टीतल्या झोपडपट्टीत कोट्यावधींचा घोटाळा!

Last Updated: Sunday, August 4, 2013, 18:24

मुंबईच्या चुनाभट्टी इथल्या झोपडपट्टीतील रहिवाशांच्या नावे सरकारकडून घरे मिळवून अपात्र लोकांना भरमसाठ किंमतीत विकल्याचा आणि यामधून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप होतोय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी खेरवाडी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केलीय.

एड्सने झाली अनाथ मुले, स्मशानात राहण्याची वेळ!

Last Updated: Friday, July 26, 2013, 22:50

उत्तरप्रदेशातील प्रतापगडमध्ये चार निरागसमुलं गेल्या तीन महिन्यांपासून स्मशानात राहात आहेत..त्या मुलांच्या पालकांचा एड्समुळे मृत्यू झालाय..त्यामुळे गावकर-यांनी या मुलांना गावाबाहेर काढलंय..त्यामुळेच त्यामुलांवर स्मशानभूमीत राहण्याची वेळ आलीय..

डॉक्टर विनायक मोरेंच्या बदलीमागचं राजकारण!

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 21:17

पुण्यातल्या औंध जिल्हा रुग्णालयातल्या डॉक्टर विनायक मोरेंची तडकाफडकी बदली करण्यात आली. आमदार जगताप आणि मोरे यांच्या वादातून ही बदली झाल्याची चर्चा रंगू लागलीय. या बदलीमागचं राजकारण काय ते जाणून घेऊयात....

अबू सालेम हल्ला : मीरा बोरवणकर करणार चौकशी

Last Updated: Friday, June 28, 2013, 14:06

कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर तळोजा कारागृहात झालेल्या गोळीबार प्रकरणाच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेत. तुरूंग महाव्यस्थापक मीरा बोरवणकर या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.

अबु सालेम हल्ला : तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात !

Last Updated: Friday, June 28, 2013, 11:47

कुख्यात गँगस्टर अबू सालेमवर गोळीबार करण्यात आलाय़. यात तो जखमी झालाय. त्याच्या करंगळीला गोळी चाटून गेलीय. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या हल्ल्यानंत नवीमुंबईतील तळोजा जेलची सुरक्षा धोक्यात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय.

अब तक ४८!

Last Updated: Friday, May 24, 2013, 00:02

आग ओकतोय सूर्य ! भाजून निघतेय कातडी ! जनता झालीय हैराण ! राज्यात उष्णतेची लाट !

जेलमध्ये जाण्याच्या कल्पनेने संजयला भरला होता ताप

Last Updated: Thursday, May 16, 2013, 17:31

अभिनेता संजय दत्त अखेर टाडा कोर्टात हजर झाला. संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्याला शरण होण्याची मुदत दिली गेली होती. शरण होण्यापूर्वी संजय दत्त प्रचंड अस्वस्थ झाला होता. तुरुंगात जायच्या कल्पनेने त्याला ताप भरला होता.

फिव्हर असताना पोलार्ड ठरला गोलंदाजांचा कर्दनकाळ

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 16:30

आक्रमक ख्रिस गेलचा कित्ता मुंबई इंडियन्सचा किरॉन पोलार्ड यांने ‘दे घुमाके’ करत काल गिरवला. तो तापाने फणफणत असताना मुंबई इंडियन्स टीमच्या विजयासाठी धाऊन आला आणि फोर, सिक्सचा धुमधडाका वानखेडवर दाखवून दिला.

ठाण्याचा पारा वाढलाय, पक्षी हैराण

Last Updated: Sunday, May 12, 2013, 10:13

पारा दिवसेंदिवस वाढतच चाललाय. ठाण्यामध्ये जवळपास ४० डिग्रीपर्यंत तापमान गेलंय.याचा मोठा फटका मुक्या पशू पक्ष्यांवर होताना दिसतोय.

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक अडचणीत!

Last Updated: Friday, May 3, 2013, 22:20

ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांच्या दोन टॉवरमधले चार अनधिकृत मजले पाडण्यासाठी मुंबई हायकोर्टाने ठाणे महानगरपलिकेला हिरवा कंदील दाखवलाय.

मुंबईत तापमान ३५ अंश सेल्सियसवर!

Last Updated: Monday, April 29, 2013, 18:56

गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत दिवसाच्या तापमानात वाढ होत आहे. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत.

राज्याचा पारा वाढला, बसतायेत चटके

Last Updated: Monday, April 29, 2013, 12:08

मोसमातल्या रेकॉर्डब्रेक तापमानाची नोंद चंद्रपुरात झालीय. चंद्रपुरात पारा ४७ पूर्णांक ६ अंशांवर गेलाय. प्रचंड उकाड्यामुळं नागरिक हैराण झालेत. शनिवारी चंद्रपूरचे तापमान ४३ अंश सेल्सियस होतं.

विराट कोहली मुंबईकरांवर भडकला

Last Updated: Monday, April 29, 2013, 11:06

सध्या क्रिकेटच्या मैदानावर आयपीएल -६ ची धूम आहे. त्यातच ख्रिस गेलचं वादळ चर्चेचा विषय ठरला असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघाचा कर्णधार विराट कोहली एकदम चर्चेत आलाय. मात्र, तो चांगल्या कारणाने नाही. त्याचा क्रिकेट प्रेक्षकांनी हुर्यो उडविल्याने तो चांगलाच भडकलाय.

... आणि पुन्हा एकदा चढला जयाबाईंचा पारा!

Last Updated: Thursday, March 21, 2013, 10:10

खासदार रेखा यांचं संसदेत आगमन झालं तेव्हा माझ्यावर कॅमेरे का रोखले गेले, असा प्रश्न विचारणाऱ्या जयाबाई बुधवारी पुन्हा एकदा तापल्या. यावेळी मात्र त्यांचा पारा पत्रकारांमुळे नाही तर एका खासदारामुळेच चढला होता.

मनपाच्या मानवताशून्य कारभाराने इतिहासतज्ज्ञांचा मृत्यू

Last Updated: Thursday, March 14, 2013, 20:54

पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या मानवता शून्य कारभाराचं अतिशय संतापजनक उदाहरण समोर आलं आहे. ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ प्रतापराव अहिरराव यांनी शहरात इतिहास संशोधन मंडळाची स्थापना केली. पालिका त्यांना या कामात मदत करेल अशी त्यांची अपेक्षा होती...

विद्यार्थ्यांना वेठीस धरणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 15:29

प्राध्यापक संघटना अनेक केंद्रांवर प्रॅक्टिकल परीक्षा बंद पाडत आहेत. त्यामुळं विद्यार्थ्यांना मनस्ताप होतोय. विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिकल बंद पाडणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाईची मागणी युवासेनेनं केलीय.

महापौरांचा प्रताप, लग्नात महापौरांचे चोपदार

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 17:24

सांगलीचे महापौर इद्रीस नायकवडी त्यांच्या मुलाच्या शाही विवाहामुळं वादात सापडले असतानाच त्यांच्या मुलाच्या लग्नात मनपा कर्मचा-यांना जुंपल्याची धक्कादायक बाब उघड झालीये.

तीन नेत्यांच्या वाढदिवसामुळे पिंपरीत फ्लेक्सचा महापूर

Last Updated: Sunday, February 17, 2013, 20:07

तीन मातब्बर नेत्यांच्या वाढदिवासामुळे पिंपरी चिंचवड शहरातलं राजकारण ढवळून निघालं. एकापाठोपाठ आलेल्या या वाढदिवसांनी शहरात सर्वत्र फ्लेक्सचा पूर आला होता. वर्तमानपत्रांची पानं जाहीरातींनी भरुन गेली होती. मात्र या वाढदिवसांनी सामन्य जनतेला काय मिळालं हा प्रश्न कायम आहे.

पवारांच्या सूचना डावलून आमदारांचा `दिखाऊपणा` सुरूच...

Last Updated: Saturday, February 16, 2013, 13:52

राज्य दुष्काळाच्या वणव्यात होरपळत असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांचं राजेशाही थाटात लग्न सोहळे आणि वाढदिवस साजरा करणं सुरूच आहे.

मोकाट लाचखोर

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 23:21

सरकारी अधिका-यांची लाच घेतल्याची प्रकरणं सतत उघडकीस येत असतात...तसंच सतत दुर्लक्षित होत असतात हे दिसून आलंय माहितीच्या अधिकाराखाली...

आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 16:24

भोपाळमध्ये आणखी एका काळ्या कुबेराचा पर्दाफाश झालाय. मध्य प्रदेशचे मुख्य वनसंरक्षक वसंत प्रताप सिंह यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकलाय. या छाप्यात तपास अधिका-यांच्या हाती मोठं घबाड लागलय.

संमेलनात नवोदितांना जास्त संधी - उषा तांबे

Last Updated: Monday, January 14, 2013, 11:32

यंदाच्या साहित्य संमेलनात वेगळे प्रयोग केले गेले. विदेशी लेखकांना आणलं, मुलांसाठी कार्यक्रम आणि नवोदितांना जास्त संधी दिली, असा दावा अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांनी केला.

साहित्य संमेलनात `मराठी` समृद्धीसाठी ठराव

Last Updated: Sunday, January 13, 2013, 23:34

८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप वाजले. या संमेलनात जवळपास सात ठराव मांडण्यात आले. यात मराठी भाषा आणि मराठी शाळा संर्वधनासाठी प्रयत्न करावेत. तर बेळगाव सीमा प्रश्न आणि मराठवाड्याचा पाणी प्रश्न निकाली काढण्यासाठी ठोस उपाय-योजना करण्याचे सूचविण्यात आलेय.

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 13:05

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

८६व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

Last Updated: Friday, January 11, 2013, 16:32

साहित्य संमेलनाचा उत्साह चिपळुणात ओसंडून वाहतोय.. यातच चिपळुणकरांनी एक वेगळा अनुभव घेतला.. रस्त्यावर अचानक फ्लॅशमॉब करण्यात आला.

मुंबईत गारठा, १० अंशावर थंडीचा पारा

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 18:14

मुंबईत यंदाच्या वर्षी भरपूर थंडी पडलीय. मुंबईकरांना स्वेटर बाहेर काढावे लागलेत. मुंबईत चक्क दहा अंशापर्यंत पारा खाली आलाय.ऋतूचक्रानुसार मुंबईत हिवाळा दरवर्षी येतो. पण यंदाच्या हिवाळ्यानं मुंबईकरांना चांगलंच गारठून टाकलंय.

आंदोलनकर्त्यांचा संताप पाहून शीला दीक्षित माघारी...

Last Updated: Saturday, December 29, 2012, 15:15

दिल्लीच्या मुख्यमंत्री शिला दीक्षित यांनी या आंदोलनकर्त्यांना सामोरं जाण्याचा निर्णय घेतला होता. पण, संतापलेल्या लोकांच्या विरोधामुळे त्यांना आपला बेत रद्द करावा लागला.

विजय चौकाचा झाला `तहरीर चौक`

Last Updated: Saturday, December 22, 2012, 19:43

दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणात दिल्लीकरांचा संताप शिगेला पोहचलाय. आज सायंकाळी पाच वाजल्याच्या सुमरास पुन्हा एकदा आंदोलक आणि पोलिसांमध्ये पुन्हा झटापट झाली.

कसाबचा प्रवास... पन्नास करोड ते पन्नास रुपये

Last Updated: Wednesday, November 21, 2012, 18:17

अजमल कसाब याला जेलमध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी आत्तापर्यंत महाराष्ट्र सरकारनं पन्नास करोड रुपयांचा खर्च केला होता. पण, महत्त्वाची बाब म्हणजे याच कसाबच्या फाशीच्या शिक्षेसाठी लागलेत अवघे ५० रुपये...

सेना आमदार सरनाईक अडकले पाणीचोरीच्या आरोपात?

Last Updated: Thursday, November 1, 2012, 23:47

ठाण्यातल्या विहंग व्हॅलीच्या पाणीचोरीवरुन पालिका आयुक्त आणि शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यात चांगलीच जुंपलीय.

शरद पवार म्हणाले, दादांचा ‘ताप’ गेला, बरे झाले!

Last Updated: Sunday, October 14, 2012, 17:17

अजितदादांचा ताप एका दिवसात गेला, ते बरे झाले आणि लगेच ते कामालाही लागले, हेही चांगलेच आहे , असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी लगावला.

पांढरेंपाठोपाठ प्रकल्पग्रस्ताचाही दणाणला आवाज...

Last Updated: Monday, October 1, 2012, 12:40

जळगाव जिल्ह्यातील निम्न प्रकल्प बांधकामाच्या दर्जाबाबत प्रकल्पग्रस्तांनी शंका उपस्थित केलीय. हे बांधकाम निकृष्ट असून त्याच्या चौकशीची मागणी प्रकल्पग्रस्तांनी केलीय. विशेष म्हणजे याच प्रकल्पाच्या गुणवत्तेविषयी सरकारला पत्र पाठवलंय.

'फ्रेंडशीप डे'च्या निमित्ताने...

Last Updated: Saturday, August 4, 2012, 15:54

दीपाली जगताप
काहीतरी लिहावं असं खूप दिवसांपासून वाटत होतं...ब्लॉग लिहण्याइतके आपण काही मोठे झालेलो नाही असा विचार करण्यातच खूप दिवस गेले. पण मग मला फ्रेंडशीप डे चा मुहूर्त मिळाला.

प्रतापगडावरील सूर्य बुरुज ढासळतोय

Last Updated: Friday, July 13, 2012, 07:43

राज्यातले ऐतिहासिक गड किल्ले ही इतिसाहाची साक्ष देणारी आणि तरुण पिढीसाठी नेहमीच स्फूर्तीदायक राहिलीत. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतच त्यांनी उभारलेल्या गड किल्ल्यांची दूरवस्था झालीय. या भर पडली आहे ती प्रतापडाची. प्रतापगडीवरील सूर्य बुरुज ढोसळतोय.

शेट्टी हत्या : प्रताप दीघावकर यांची चौकशी

Last Updated: Friday, June 1, 2012, 15:01

पुणे जिल्ह्यात आरटीआय कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्या प्रकरणात सीबीआयनं आज तत्कालीन पोलीस अधीक्षक प्रताप दीघावकर यांची चौकशी केली.

नागपूरचा पारा @ 46.6

Last Updated: Thursday, May 31, 2012, 11:14

वाढत्या तापमानामुळे दिवसा होरपळण्याची पाळी नागपूरकरांवर आली असताना आता संध्याकाळी देखील उकाड्यानं नागपूरकर हैराण झालेत.बुधवारी नागपूरचं तापमान 46.6 डिग्री सेल्सियस होते.

तापी घोटळ्यात सुरेश बोरोलेंना अटक

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 18:38

जळगाव जिल्ह्यातल्या तापी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी सुरेश बोरोले यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मुरबाडमध्ये जळगाव स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. ५०कोटींहून अधिक अपहार केल्याचा आरोप बोरोले यांच्याविरोधात आहे

दुष्काळावर ढोबळेंची मुक्ताफळं...

Last Updated: Tuesday, May 29, 2012, 12:45

राज्यात एवढा गंभीर दुष्काळ नाही, मात्र माध्यमांनीच दुष्काळाला मोठं केल्याची मुक्ताफळं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी उधळलीत. ढोंबळेंच्या या वक्तव्याचा विरोधी पक्षनेत्यांनी चांगलाच समाचार घेतलाय.

शिर्डी रेल्वे प्रवाशांना चोरांमुळे मनस्ताप

Last Updated: Monday, May 7, 2012, 11:06

विद्युत वाहक तारा चोरणाऱ्या चोरट्यांच्या प्रतापामुळे सर्वसामान्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागल्याची घटना नुकतीच घडली. दादरहून शिर्डी-साईनगर रेल्वे स्थानकावर पुणताम्बा नजीक हि घटना घडली.

वाढतं तापमान कमी करतंय उंची

Last Updated: Monday, February 27, 2012, 11:39

ग्लोबल वॉर्मिंगमुळे मानवाची उंची कमी होऊ शकते. शास्त्रज्ञांनी सुमारे पाच कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या पहिल्या घोड्यांची उत्पत्ती आणि त्यांच्या विकासावर घडणारा परिणाम यांचा अभ्यास करून हा इशारा दिला आहे.

हिंमत असेल तर राजीनामा द्यावा - सरनाईक

Last Updated: Saturday, January 21, 2012, 17:54

मुंबईत काल झालेल्या 'आनंद नाट्या'मुळे शिवसेनेला कृषीमंत्री शरद पवारांनी चांगलाचा धक्का दिला, त्यामुळे आज मातोश्रीवर ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीनंतर बोलताना प्रताप सरनाईक यांनी आनंद परांजपेंचा चांगलाच समाचार घेतला. '

'हा मराठी माणसाचा अपमान'- सरनाईक

Last Updated: Friday, November 25, 2011, 18:09

शरद पवार म्हणाले की माझे राजकीय वैर असू शकतं पण चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत माझे कुणाशीही वैयक्तिक वैर नाही. महाराष्ट्रात सर्वत्र या घटनेचा निषेध होतो. शिवसेनाप्रमुखांनीही पहिल्यांदाच बाहेर येऊन स्पष्ट शब्दात या हल्ल्याचा निषेध केला आहे. महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाचा अपमान होणारी घटना दिल्लीत घडली आहे. शरद पवार हे महाराष्ट्राचे सर्वोच्च नेते आहे. महाराष्ट्राला जेंव्हा मदतीची गरज भासते तेंव्हा दिल्लीत राज्याच्या समस्या सोडवणारे पवार हे एकमेव नेते आहेत.

पिंपरी-चिंचवडच्या नेत्यांची 'अश्मयुगा'कडे वाटचाल

Last Updated: Sunday, November 6, 2011, 09:47

पिंपरी चिंचवडमध्ये महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईनं अक्षरश: पातळी सोडली आहे. आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेना नेते श्रीरंग बारणे यांच्यातली राजकीय लढाई शिवराळ पातळीवर पोहचली आहे.

भाजपाचा 'भीम' विजय, राष्ट्रवादीचा 'दादा' पराजय

Last Updated: Monday, October 17, 2011, 11:27

पुणे खडकवासला पोटनिवडणुकीत भाजपाचे भीमराव तापकीर यांनी राष्ट्रवादीच्या हर्षदा वांजळे यांचा ३६२५ मतांनी पराभव केला. हा भाजपाचा ‘दे धक्का’ राष्ट्रवादीला पर्यायाने उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री अजित पवार यांना ‘शॉक ‘ देणारा ठरला आहे.