Last Updated: Thursday, June 19, 2014, 18:08
जगदगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी देहूहून प्रस्थान ठेवलं. आज सकाळपासूनच मंदिर परिसरात वारकऱ्यांनी जय जय रामकृ्ष्ण हरी च्या गजरात वातावरण भक्तिमय झाले होते.
Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:47
महाराष्ट्र सरकारचा अजून एक अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आलाय. छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ पत्रं या पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांची चुकीची राजमुद्रा छापण्यात आलीय. हे पुस्तक महाराष्ट्र सरकारच्या पुराभिलेख संचालनालयामार्फत प्रकाशित करण्यात आलंय.
Last Updated: Friday, June 6, 2014, 20:58
शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.
Last Updated: Thursday, March 20, 2014, 10:50
छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी आज अधिकृतरित्या शिवसेनेत प्रवेश केला. तर अभिनेते महेश मांजरेकर यांचं नाव मनसेचे लोकसभेचे उमेदवार म्हणून यापूर्वीच जाहीर झालंय. आज शिवजयंतीच्या मुहूर्तावर अमोल कोल्हेंनी शिवसेनेत प्रवेश केला. आता हे दोन शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचं प्रतिनिधित्व करणार आहेत.
Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:51
औरंगाबादच्या शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळं औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाची समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.
Last Updated: Tuesday, March 4, 2014, 21:17
निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.
Last Updated: Wednesday, February 19, 2014, 21:34
पुणे महापालिकेत आज एक धक्कादायक आणि लज्जास्पद प्रकार घडलाय. शिवजयंती साजरी करणाऱ्या महापालिकेनं उत्सवादरम्यान शिवाजी महाराजांऐवजी चक्क संभाजी महाराजांचाच फोटो लावला.
Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:05
राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.
Last Updated: Sunday, January 5, 2014, 19:34
काही इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास केल्याची घणाघाती टीका नरेंद्र मोदींनी केली. रायगड किल्ल्यावर शिवप्रतिष्ठान संस्थेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. विशेष म्हणजे आजचं नरेंद्र मोदींचं भाषण अराजकीय होतं. शिवप्रतिष्ठान संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमाला तब्बल १५ हजारांहून अधिक शिवप्रेमींना गर्दी केली होती.
Last Updated: Friday, December 27, 2013, 18:55
ठाण्यात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी येणार असल्यानं आता ठाण्यातलं राजकारणं पुतळ्यांभोवती फिरु लागलय.
Last Updated: Thursday, October 31, 2013, 09:09
दिवाळीत किल्ला बनविणे हे लहानग्यांचे आवडीचे काम... मातीत खेळत धमाल मस्ती करत दिवाळीच्या आधी किल्ले तयार व्हावेत यासाठी बालचमुची धडपड सध्या सगळीकडचं सुरु आहे. अशीच धडपत सध्या कोल्हापूर शहरातील पेठा पेठात पहायला मिळत आहे. धगधगत्या इतीहासाची साक्ष देणाऱ्या शिवरायांचे रायगड, प्रतापगड, रागंणा,पन्हाळगड असे अनेक किल्ले लवकर उभे राहावते यासाठी सगळे मावळे कामाला लागले आहेत.
Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:22
फेसबुक ट्विटरवर रमणा-या सध्याच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्राशी ओळख व्हावी, त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी यासाठी ठाण्य़ाचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या जीवनगौरव या संस्थेनं शिवगौरव महोत्सवाचं आयोजन केले आहे.
Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:04
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. अरबी समुद्रात पुतळा उभारण्यास ग्रीन सिग्नल मिळाला आहे. महाराष्ट्र कोस्टल झोन व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यास तशी परवानगी दिलेय. तसेच ठाकरे यांचा स्मृती चौथरा उभारण्याचा मार्ग मोकळा झालाय.
Last Updated: Thursday, August 1, 2013, 11:22
पुण्यात जंगली महाराज रस्त्यावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांना आज एक वर्ष पूर्ण होतंय. स्फोटाच्या तपासाबाबत राज्याच्या सुरक्षा यंत्रणांची पाटी कोरीच आहे
Last Updated: Saturday, July 27, 2013, 16:54
शिवाजी महाराजांचं नाव घेतलं की मराठी माणसाचं ऊर अभिमानानं भरून येतं... महाराजांची कीर्ती जगात पोहोचावी, यासाठी अरबी समुद्रात त्यांचा भव्य पुतळा उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकारनं आखली आहे.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:28
पंढरपुरात आज विठ्ठल आणि रुक्मिणीची महापूजा करण्यात आली. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठ्ठलाची सपत्नीक पुजा केली. तर नामदेव वैद्य आणि गंगुबाई वैद्य हे यंदाचे मानाचे वारकरी ठरलेत.
Last Updated: Friday, July 19, 2013, 07:26
अवघं पंढरपूर आज भक्तिरसात न्हाऊन निघालय. तहानभूक हरपून विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी तब्बल दहा लाख भाविक यंदा वैकुंठनगरीत दाखल झालेत. चंद्रभागेच्या तिरी लाखो वारक-यांचा मेळा जमला आहे.
Last Updated: Wednesday, July 17, 2013, 16:42
पंढरीच्या वाटेवर असणाऱ्या ज्ञानेश्वर महाराजांची पालखी, तुकोबांची पालखी आणि सोपान काकांची पालखीचं रिंगण एकाच ठिकणी म्हणजे बाजीराव विहीर परिसरात रंगलं.
Last Updated: Monday, July 15, 2013, 09:06
‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ म्हणत म्हणत दरमजल करत माऊलींची पालखी माळशिरसपर्यंत पोहचलीय इथल्या खुडूस फाटा इथं माऊलींच्या पालखीचं दुसरं गोल रिंगण रंगणार आहे. तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज माळशिरसजवळ उभं रिंगण पार पडेल.
Last Updated: Wednesday, July 10, 2013, 10:33
माऊलींच्या पालखी सोहळ्यातील पहिल्या उभ्या रिंगणाचा सोहळा मंगळवारी चांदोबाचं लिंब येथे पार पडला.
Last Updated: Monday, July 8, 2013, 12:29
आता पुढचे सहा दिवस माऊलींची पालखी सातारकरांचा पाहुणचार घेणार आहे. माऊलींचा आज दिवसभर लोणंदमध्येच मुक्काम असेल.
Last Updated: Thursday, July 4, 2013, 21:27
शिवरायांनी स्थापन केलेल्या राज्याचा गड म्हणजे, किल्ले राजगड...मात्र या राजगडाचीही इतर किल्ल्यांप्रमाणे दुरवस्था झालीय. राजगडाच्या पाल दरवाज्याच्या बाजूचा रस्ता पावसामुळे खचलाय.
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 11:10
विठ्ठलावर प्रेम, पंढरीच्या भेटीची आस किंवा केवळ उत्सुकता... अशा अनेक कारणांमुळे हौशे, नवसे, गवसे वारीमध्ये दाखल होतात..
Last Updated: Tuesday, July 2, 2013, 10:13
विठूरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेली ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सोमवारी पुण्यात दाखल झाली.
Last Updated: Monday, July 1, 2013, 14:40
विठुरायाच्या जयघोषात पंढरपूरच्या दिशेनं निघालेल्या ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आणि तुकाराम महाराजांची पालखी आज पुण्यात मुक्कामाला असेल.
Last Updated: Tuesday, June 25, 2013, 19:03
कोल्हापुरातलं राजर्षी छत्रपती शाहू महाराज याचं जन्मस्थान असणा-या लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणासाठी लागणा-या खाप-या दुप्पट किंमतीनं विकत घेतल्याचं त्याचबरोबर केलेलं काम दर्जाहीन होत असल्याबद्दलचं वृत्त झी मीडियानं दाखवलं होतं. या बातमीनंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.
Last Updated: Monday, June 24, 2013, 21:47
पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे. निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं..... ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे.
Last Updated: Friday, June 21, 2013, 16:43
मुंबईतील अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला केंद्रीय पर्यावरण खात्याने तत्वतः परवानगी दिली आहे, अशी माहिती केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन यांनी दिली.
Last Updated: Friday, June 21, 2013, 16:52
किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार होणारा 340वा शिवराज्याभीषेक सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. जोरदार वा-यापावसाची तमा न बाळगता हजारो शिवप्रेमी किल्ले रायगडावर पारंपारिक वेशभुषेत हजर होते.
Last Updated: Friday, June 21, 2013, 13:55
मालवणच्या किनारपट्टीवर एका घराच्या बांधकामासाठी खोदकाम करताना शिवकालीन तोफ साप़डली. गेल्या काही दिवसात अनेक शिवकालीन वस्तू सापडल्यानं वस्तुसंग्रहालयाची मागणी जोर धरु लागली आहे.
Last Updated: Friday, June 14, 2013, 17:18
इंदौरमध्ये एक आश्चर्यजनक घटना घडलीय. नैसर्गिकरित्या गर्भधारणा होऊन एका ६० वर्षीय महिलेनं एका बाळाला जन्म दिलाय. आश्चर्य वाटतयं ना? पण हे खरचं घडलयं.
Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:06
या भूमंडळाचे ठायी। धर्म रक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म राहिला काही। तुम्हांकरिता।।
Last Updated: Thursday, June 6, 2013, 11:01
रायगडावर आज शिवाजी महाराजांचा ३४० वा राज्यभिषेक दिन साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं
Last Updated: Saturday, May 18, 2013, 21:14
अवघ्या महाराष्ट्राचा धार्मिक सोहळा असलेल्या आषाढी वारीचा कार्यक्रम जाहीर झालाय. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान ३० जूनला होणार आहे. तर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान २९ जूनला होणार आहे.
Last Updated: Tuesday, May 14, 2013, 18:47
संभाजी महाराजांनी १६८४ मध्ये गोव्याच्या पोर्तुगीजांवर स्वारी केली होती. या घटनेची नोंद इतिहासात असेलही. मात्र याच घडामोडी तत्कालीन वृत्तपत्रात बातम्या म्हणून प्रसिद्ध झाल्या होत्या.
Last Updated: Wednesday, April 17, 2013, 21:40
शिवाजी महाराजांनी पुण्यातील लाल महालात शिरून शाहिस्तेखानाची बोटं तोडली होती. त्यांच्या या ऐतिहासिक पराक्रमाला 18 एप्रिलला 350 वर्षं पूर्ण होत आहेत.
Last Updated: Saturday, March 30, 2013, 17:59
नाशिकमध्ये नव्यानं बांधकाम झालेल्या उड्डाणपूलाला शिवाजी महाराजांचे नाव देण्यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन केलं. मराठा संघटनांनी आज आंदोलन करुन छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असा नामकरण फलक झळकावला.
Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:03
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक खडकावर उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. त्यामुळे समुद्रात स्मारक होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
Last Updated: Tuesday, February 26, 2013, 18:38
ऐन दुष्काळात नगरसेविकांनी केरळच्या टूरचा घाट घातलेला असताना औरंगाबाद महापालिकेचा आणखी एक कारनामा समोर आलाय. शहरातल्या जलवाहिनी प्रकल्प उभारण्यासाठी चक्क शिवरायांचे वस्तू संग्रहालय गहाण टाकण्याची वेळ आली आहे. शहरातल्या इतरही २४ मालमत्ता गहाण ठेवण्याची तयारी सुरू केली आहे.
Last Updated: Tuesday, February 19, 2013, 23:39
राज्यात अनेक ठिकाणी आज शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. लातूरमधल्या औसा तालुक्यातही मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Last Updated: Tuesday, February 19, 2013, 13:31
राजा शिवछत्रपती म्हणजेच `जाणता राजा` अशी... महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची शासकीय जयंती आज साजरी करण्यात येते आहे.
Last Updated: Friday, January 11, 2013, 16:32
साहित्य संमेलन आणि वाद असं राज्यात एक समीकरणच तयार झालं आहे. तरुण साहित्यापासून आणि संमेलनापासून दूर होताना दिसतायेत.
Last Updated: Tuesday, January 8, 2013, 07:32
या सिनेमातील बाजीप्रभूच्या भूमिकेसाठी अजय देवगणच्या नावाची चर्चा आहे तर शिवाजी महाराजांची भूमिका दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांना ऑफर करण्यात आली आहे. एकूणच अजय देवगण आणि रजनीकांत यांच्या अभिनयाला हॉलिवूडच्या तंत्रज्ञांचीदेखिल जोड मिळतेय.
Last Updated: Tuesday, December 25, 2012, 18:28
महापुरुषांच्या दुर्मिळ ठेवा आणि त्याचा वाद हे जणू आता समीकरण बनलंय. काही दिवसांपूर्वी सापडलेल्या एका ध्वनीमुद्रिकेतला आवाज लोकमान्य टिळकांचा नाही असं समोर आलं असताना आता शिवरायांच्या पत्राचा वाद उफाळून आलाय.
Last Updated: Wednesday, December 19, 2012, 21:14
राजर्षी छत्रपती शाहु महाराज हे महाराष्ट्राच्या सामाजिक,शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्रांतीचे अग्रदुत म्हणुन मान्यता पावलेले थोर राजे. पण अशा या थोर राजाचे जन्मठिकाण असणा-या कोल्हापूरातील लक्ष्मी विलास पॅलेसच्या सुशोभिकरणाचं काम निधी उपलब्ध असूनही संथ गतीनं सुरु आहे. त्यामुळं शाहु प्रेमीतुन संताप व्यक्त होतोय.
Last Updated: Tuesday, December 18, 2012, 20:53
कोल्हापुरात शाहू मिलच्या जागी शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यास राज्य सरकारनं तत्वत: मान्यता दिली आहे. स्मारक उभारण्यासाठी समितीचीही स्थापना करण्यात आलीय.
Last Updated: Tuesday, December 18, 2012, 19:42
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित स्मारकाला विलंब का होतोय असा सवाल काँग्रेस आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी उपस्थित केलाय.
Last Updated: Tuesday, December 18, 2012, 09:44
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेला चौथरा विधीवत पूजा करुन शिवसैनिकांनी हटविला आहे.
Last Updated: Thursday, December 13, 2012, 18:23
निश्चयाचा महामेरू। बहुत जनासी आधारू। अखंडस्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।।
Last Updated: Saturday, December 1, 2012, 21:11
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. पार्कावर शिवाजी महाराजांचंच स्मारक असावं.
Last Updated: Tuesday, October 23, 2012, 14:27
नाशिकमध्ये आस्थेचा दरबार भरविणाऱ्या बाबानं अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतलीय. बाबाच्या भक्तांनीच बाबाविरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केलीय. त्यामुळे आता सुटका करुन घेण्यासाठी बाबाची धावपळ सुरू आहे.
Last Updated: Wednesday, August 1, 2012, 23:25
गेल्या काही वर्षापासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेला रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हटवलाय. त्यामुळं हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झालीय. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले असून इतिहासावरून पुन्हा - पुन्हा वाद का उफाळून येत आहे? आपण खरंच ऐतिहासिक वारसा जपतोय का?
Last Updated: Wednesday, August 1, 2012, 15:19
रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविला. संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हा पुतळा ह़टवलाय. या प्रकऱणी संभाजी ब्रिगेडच्या सात कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आला आहे.
Last Updated: Monday, June 18, 2012, 19:01
संत माऊलींच्या पालखीनं वाल्हेकडे सकाळी मार्गस्थ झाली. तर वरवंडहून निघालेल्या तुकाराम महाराजांच्या पालखीचा आजचा मुक्काम गवळ्याची उंडवडी इथं असणार आहे. या दरम्यान, तुकाराम महाराजांच्या पालखीनं छोटेखानी रोटी घाट पार केला.
Last Updated: Thursday, June 14, 2012, 10:25
संत ज्ञानेश्वर आणि संत तुकोबांची पालखी पुण्यात दाखल झालीये. पुणेकरांनी मोठ्या उत्साहानं या दोन्ही पालख्यांचं भव्य स्वागत केलं. यावेळी वारकऱ्यांच्या स्वागतासाठी, आदरातिथ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पुणेकर बाहेर पडले होते. रात्रभर भजन,किर्तनाने पुण्यनगरीत विठुरायाचा जयघोष झाला.
Last Updated: Tuesday, June 12, 2012, 20:36
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज पिंपरीत पार पडलं. गेल्या वर्षीपासून पिंपरीत रिंगण सोहळा सुरू झाला आहे. तिथीनुसार एक दिवस अधिक मिळाल्याने हा रिंगण सोहळा घेण्यात आला आहे. आषाढी वारीतला हा रिंगण सोहळा महत्वाचा मानला जातो.
Last Updated: Saturday, June 9, 2012, 20:40
अमित जोशी, देहू ‘तुका म्हणे माझे हेंचि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीने |’... तुकाराम महाराजांच्या याच ओव्यांमध्ये सध्या सगळं देहू रंगलं आहे. जेष्ठ सप्तमी म्हणजे १० जूनला जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे रवाना होत आहे.
Last Updated: Friday, June 8, 2012, 18:02
संत शिरोमणी श्री नामदेव महाराज पालखी सोहळा तथा पायीदिंडी आज नामदेवाचे जन्म स्थान असलेल्या नरसी नामदेव येथून पंढरपूरकडे प्रस्थान झाले. या सोहळ्याची सांगता ३ जुलै रोजी होणार आहे.
Last Updated: Thursday, June 7, 2012, 09:52
शिर्डीच्या साईबाबांप्रमाणेच आता शनि शिंगणापूर येथील जागृत आणि स्वयंभू मूर्ति असलेल्या शनि देवाला प्रथमच किमती वस्तूचं दान करण्यात आलं आहे. साडे चार किलो वजनाचा सोन्याचा मुखवटा एका शनि भक्ताने शनिदेवाला अर्पण केला आहे.
Last Updated: Thursday, May 31, 2012, 20:44
रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्याबाबत याहीवर्षी वाद निर्माण झालाय. राज्य सरकारने रायगडावरील जमावबंदी उठवावी, अन्यथा जमावबंदी धुडकावून शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करू असा इशारा शिवराज्यभिषेक महोत्सव समितीने दिला आहे.
Last Updated: Tuesday, May 1, 2012, 08:50
वाढत्या उन्हाचा झळ सामान्यांप्रमाणे मुक्या जनावरांनाही बसते. त्यामुळं दिवसेंदिवस संख्या कमी होणाऱ्या प्राण्यांची काळजी घेणं गरजेचं झालंय. यासाठी नागपुरात एक विशेष सोय करण्यात आलीय.
Last Updated: Monday, April 23, 2012, 11:35
महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी अभूतपूर्व घटना नुकतीच हिमालयातील माऊंट एव्हरेस्टच्या पायथ्याशी असलेल्या गोरक्षेप (उंची १७000 फूट) या ठिकाणी घडली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांनी एव्हरेस्ट सर केले. यासाठी पुणे करांनी पुढाकार घेतल्याने ते शक्य झाले.
Last Updated: Wednesday, April 11, 2012, 13:04
शिवरायांची शौर्यगाथा सर्वांनाच माहिती आहे. पण त्याच शौर्याची साक्ष देणारे पुरावे पुरात्तत्त्व विभागाला रायगडावर सापडलेत. शिवरायांच्या राज्यात वापरल्या जाणाऱ्या वस्तू आणि वेगवेगळ्या शस्त्रांचे अवशेष रायगडावरच्या साफसफाई दरम्यान हाती लागले आहेत.
Last Updated: Tuesday, April 10, 2012, 12:52
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी असो वा मेघडंबरीतील पुतळ्याचा विषय असो प्रत्येक वेळी किल्ले रायगड चर्चेत राहिला. गेल्या चाळीस वर्षांपासून असलेला किल्ले रायगडावरील शिवरायांचा पुतळा आता पुन्हा चर्चेत आलाय.
Last Updated: Friday, April 6, 2012, 11:13
१६४६ ते १६७९ या कालावधीत शिवाजी महाराजांनी मोडी लिपीत लिहिलेल्या २८ मूळ पत्रांचं देवनागरी लिपीत भाषांतर करण्यात आलंय. या पत्रांच्या भाषांतरामुळं ती इतिहास संशोधकांना आणि सर्वसामान्य नागरिकांनीही समजू शकणार आहेत.
Last Updated: Thursday, March 22, 2012, 18:40
रोहित गोळेगुढी विजयाची उभारू... असं आज म्हटलं जातं मात्र ह्या विजयाची खरी गुढी उभारली ती शिवपुत्र संभाजी महाराज यांनी... शिवाजी महाराजांनी दिलेली शिकवण शंभुराजानी शेवटपर्यंत लक्षात ठेवली. स्व-धर्मासाठी त्यांनी आपले प्राणही अर्पण केले.
Last Updated: Wednesday, March 21, 2012, 14:12
अजिंक्यतारा किल्ल्याच्या डागडुजीसाठी १० कोटींचा विकासनिधी राज्य सरकारनं मंजूर केला होता. चार वर्षांपूर्वी तत्कालीन अर्थमंत्र्यांनी घोषणा करुनही निधी अद्याप कागदावरच असल्यानं सातारकरांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Last Updated: Thursday, March 15, 2012, 19:55
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकानी अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मुद्द्यावरुन गोंधळ घातला. दरम्यान, समुद्रातील छत्रपतींच्या स्मारकाबाबत सरकार कटीबद्ध , असल्याचे सांगून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गोंधळ कमी करण्यासाठी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
Last Updated: Wednesday, March 14, 2012, 19:53
अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्याचा प्रस्तावाला पर्यावरण मंत्रालयाच्या विरोधामुळे बारगळलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे. आता स्मारकासाठी नवी जागा किनारपट्टीवर शोधण्याचा प्रयत्न सुरु आहे.
Last Updated: Sunday, January 22, 2012, 13:09
एव्हरेस्ट शिखराच्या बेस कॅम्पवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाणार आहे. पुण्यातल्या गिरीप्रेमी संस्थेच्या वतीनं १६ मार्चला २० जण एव्हरेस्ट मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. या मोहिमेअंतर्गत गिरीप्रेमींचं पथक शिवरायांचा पुतळा विराजमान करणार आहेत.
Last Updated: Thursday, December 22, 2011, 08:14
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे दिग्दर्शित 'जाणता राजा' हे महानाट्य पुन्हा एकदा बघण्याची संधी मुंबईकरांना मिळालीय.२० ते २५ डिसेंबरदरम्यान या महानाट्याचं आयोजन शिवाजी पार्कमध्ये करण्यात आलंय.
आणखी >>