जेव्हा प्रियंका चोपडा तापी नदीच्या पुलावरून उडी मारते...

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 16:25

तापीनदीच्या पुलावरून प्रियंका चोपडा खाली उडी मारतेय. पण हे सिनेमाचं शुटिंग आहे.

मोदींचा प्लॅन ‘बकवास’ – मनेका गांधी

Last Updated: Thursday, May 15, 2014, 17:36

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा नदी जोड प्रकल्पाच्या योजनेला पक्षातूनच विरोध होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेता आणि खासदार मनेका गांधी यांनी खतरनाक आणि बकवास असल्याचे सांगितले आहे.

कर्नल निजामुद्दीन यांनी सांगितली, सुभाष बाबुंच्या मृत्यूची कहाणी

Last Updated: Friday, May 9, 2014, 13:10

वाराणसीमधील रोहनियाच्या प्रचार सभेत नरेंद्र मोदींनी ज्या व्यक्तीचे वाकून पाय धरले. ती व्यक्ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे सुरक्षा रक्षक आणि वाहन चालक राहिली आहे. कर्नल निजामुद्दीन असं त्यांचं नाव असून, ते वय 115 वर्षांचे आहेत. मोदींनी कर्नल निजामुद्दीन यांचा व्यासपिठावर सन्मान केला. तसेच व्यासपिठावर कर्नल निजामुद्दीन समोर वाकून त्यांचा आशिर्वादपण घेतला.

पिंपरी-चिंचवडमधील काही कंपन्यांकडून नदीत दुषित पाणी

Last Updated: Sunday, April 27, 2014, 22:42

पिंपरी चिंचवड मधल्या नद्यांच्या प्रदुषणाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना काही महिन्यापूर्वी कानपिचक्या दिल्या. पण त्याचा परिणाम महापालिकेवर होताना दिसत नाही.

गोदावरीत वीजेचा करंट सोडून जीवघेणी मासेमारी

Last Updated: Friday, February 21, 2014, 12:39

औरंगाबादच्या कायगाव टोक्यावर असलेल्या गोदावरी पात्रात धोकादायक पद्धतीने मासेमारी सुरू आहे. नदीच्या पाण्यात वीजेच्या तारा टाकून इथे मासेमारी केली जातेय. झी 24 तासच्या कॅमे-यात हा भयानक प्रकार उघड झालाय. यामुळे पर्यावरणाचं नुकसान होतंच आहे. पण नदीच्या पात्रालगत मानवी जिवितालाही धोका निर्माण झालाय.

नेपाळमधील बस अपघातात १४ ठार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 16:29

पल्पा जिल्ह्यातील पर्वत भागात आज गुरुवारी सकाळी भालूकोला नदीमध्ये बस नदीत कोसळल्याने झालेल्या अपघातात १४ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात सात जण जखमी झाले आहेत.

`पंचगंगा` प्रदूषणाला साखर कारखाने जबाबदार, बंदची नोटीस

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 18:29

पंचगंगा नदीचं प्रदूषण कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच चाललंय. याला जिल्ह्यातील अनेक साखर कारखाने जबाबदार आहेत. नुकत्याच केलेल्या तपासणीत पंचगंगा नदी प्रदूषणाला दालमिया दत्त असुर्ले पोर्ले हा साखर कारखाना जबाबदार असल्याचं समोर आलंय.

साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

Last Updated: Sunday, January 5, 2014, 22:52

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

Last Updated: Saturday, January 4, 2014, 08:11

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

Last Updated: Friday, January 3, 2014, 15:19

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

८७व्या मराठी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात

Last Updated: Friday, January 3, 2014, 14:58

सासवड नगरी. ८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सुरुवात होतेय. सासवडच्या क-हा नदीकाठी साहित्याच्या मेळ्याचं आयोजन करण्यात आलंय. शरद पवारांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उदघाटन होणार आहे. ८७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सासवड सज्ज होतंय. यानिमित्तान सासवडचा इतिहास पुन्हा जिवंत होणार आहे.

आलमट्टी धरणाची उंची वाढवणार, राज्याला महापूराचा धोका?

Last Updated: Sunday, December 1, 2013, 21:39

कृष्णा नदीच्या पाणी वाटपाच्या दुसऱ्या लवादानं आलमट्टी धरणाची उंची वाढविण्यास मान्यता दिलीय. याच लवादनं २०१०ला आलमट्टी धरणाची उंची ५१९ मीटरवरून ती ५२४ मीटरपर्यंत वाढविण्यास कर्नाटकाला परवानगी दिली होती. तो निर्णय लवादनं पुन्हा उचलून धरलाय.

राज्याच्या मुख्य सचिवपदी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती

Last Updated: Saturday, November 30, 2013, 21:36

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.

हिमनदीतल्या बोटीवरचं भिडले नादाल-जोकोविच...

Last Updated: Monday, November 25, 2013, 21:21

टेनिसविश्वात अव्वल स्थानी असलेल्या सर्बियाच्या नोवाक जोकोविच आणि स्पेनच्या राफएल नादालमध्ये एका अनोख्या ठिकाणी लढत रंगली होती.

वडिलांनीच फेकले गोदावरी नदीत ६ वर्षांच्या मुलीला

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 11:42

नाशिकमधून धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये वडिलांनीच आपल्या ६ वर्षांच्या मुलीला गोदावरी नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना घडलीय. तब्बल २ महिन्यांनी ही घटना उघडकीस आलीय. त्या मुलीचा गुन्हा फक्त एवढाच की ती मुलगी जन्मतःच अंध होती.

सातपुड्यातल्या आदिवासींचं अस्तित्वच नष्ट होणार?

Last Updated: Saturday, November 9, 2013, 12:14

नर्मदा नदीतलं पाणी तापीच्या खोऱ्यात आणण्यासाठी सातपुड्याच्या डोंगररांगांमध्ये सात बंधारे निर्माण करण्याची योजना जलसंपदा विभागानं तयार केलीय.

श्रुतिका स्केटिंग मास्टर, लिम्काबुकमध्ये विक्रमाची नोंद

Last Updated: Friday, November 8, 2013, 16:41

श्रुतिका चंदवानी ही मूळची कोल्हापूरची. श्रुतिका (२२) ही स्केटिंगमध्ये मास्टर होती. तिच्या विक्रमाची नोंद लिम्काबुकमध्ये करण्यात आली आहे.

श्रुतिकानं सांगितलं मी कोल्हापूरला येतेय, पण...

Last Updated: Thursday, November 7, 2013, 07:18

पुण्यातून पाच दिवसांपूर्वी गायब झालेल्या चौघांपैकी एक तरुण, चिंतन बूच याचा मृतदेह सापडलाय. नीरा नदीमध्ये त्याचा मृतदेह सापडलाय. पुणे पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. मात्र अन्य दोन तरुण आणि एका तरुणीबाबत काहीही माहिती मिळालेली नाही. दरम्यान, श्रुतिकानं आदल्याच दिवशी नोकरीचा राजीनामा दिला होता. आणि दुस-या दिवशी घरी येणार, असं कोल्हापूरला घरच्यांना कळवलं होतं. पण दुस-या दिवळी श्रुतिका पोहोचलीच नाही.

‘त्या’ तरुणांपैकी चिंतन बुचचा मृतदेह नदीत सापडला

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 12:59

पुण्यातल्या गायब झालेल्या तरुणांपैकी चिंतन बुच या तरुणाचा निरा नदीत मृतदेह सापडलाय. चार दिवसांपूर्वी पुण्याहून निघालेले चार तरुण अचानक बेपत्ता झाले होते. त्यात एका तरुणीचाही समावेश आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. इतर तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.

वर्धात वणा नदीत बोट बुडाली

Last Updated: Friday, August 9, 2013, 10:43

वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये वणा नदीत बोट उलटल्यानं झाल्यानं अपघातामध्ये आठ जणांना जलसमाधी मिळालीय. तर पाच जण बेपत्ता आहेत. पावसामुळे मदत कार्यात अडथळा येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

२१ अधिकाऱ्यांना दणका, आधी मराठी शिका! मगच...

Last Updated: Wednesday, July 31, 2013, 10:43

महाराष्ट्रात राहणाऱ्यांना आणि काम करणाऱ्यांना मराठी येणे आवश्यक आहे, ही काही राजकीय पक्षांची मागणी योग्य आहे. हे आता अधोरेखीत झाले आहे. राज्यात प्रशासकीय काम करणाऱ्या २१ आयपीएस अधिकाऱ्यांना मराठी न आल्याने त्याचा फटका बसला आहे. आधी मराठी शिका मगच पगार, असे स्पष्ट बजावत या अधिकाऱ्यांना दणका दिलाय.

ठाण्यात पावसाचा बळी, २५ गावांचा संपर्क तुटला

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59

ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.

२४ जुलै... जांभूळपाड्याचा ‘तो’ दिवस आणि आज!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 09:28

२६ जुलै म्हटलं की मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकतो. अगदी त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातल्या जांभूळपाडावासियांसाठी २४ जुलै काळरात्र ठरली.

पुरानंतर..उपाशीपोटी `ते`गोठवणाऱ्या थंडीत

Last Updated: Thursday, June 20, 2013, 18:32

उत्तराखंडच्या प्रलयानंतर आता तिथं हाहाकार उडालाय. देशभरातील हजारो पर्यटक सध्या उत्तराखंडमध्ये जागोजागी अडकून पडलेले आहेत. गोठणाऱ्या थंडीत, अनेक ठिकाणी जेवणा-पाण्याविना त्यांना रहावं लागतय.

गंगेचा प्रकोप, हजारोंचा जीव मुठीत

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 19:21

उत्तराखंडात पावसा तडाखा आणि गंगेचा प्रकोप अनेकांच्या जीवावर बेतलाय. अजून हजारो जण आपला जीव मुठीत घेऊन मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतला.

उत्तराखंडमध्ये ठाण्यातील महिलेचा मृत्यू

Last Updated: Wednesday, June 19, 2013, 18:46

उत्तराखंड राज्यात पुराचा महाप्रलय पाहायला मिळालाय. हजारो लोक बेपत्ता झाले आहेत. तर १३८च्या वर बळींचा आकडा पोहोचलाय. अनेक गावे उद्धवस्थ झाली आहेत. महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील एका महिलेचा उत्तराखंडमध्ये मृत्यू झाला आहे.

उत्तरकाशीत पुराचे ७३ बळी, ७३,००० बेघर

Last Updated: Tuesday, June 18, 2013, 16:32

उत्तर भारतातील उत्तराखंड राज्यात पावसाने हाहाकार माजवलाय. कोसळत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आल्याने आतापर्यंत ७३ जणांचे बळी गेलेत. तर ७३,००० पेक्षा जास्त लोक बेघर झालेत.

नदीजोड प्रकल्पाला सुरूवात

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 17:40

भारतात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी नदीजोड प्रकल्पाची चर्चा झाली. हा प्रकल्प राबविण्याची संकल्पना मांडण्यात आली. मात्र, पुढे काय झालं ते राज्यकर्त्यांनाच माहित. मात्र, चीनने एक पाऊल पुढे टाकत नदीजोड प्रकल्पाचे उद्घाटनही केलं.

सरबजीतची मुलगी बनली नायब तहसीलदार!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 15:47

पंजाब सरकारनं सरबजीतची मुलगी स्वप्नदीप कौर हिला नायब तहसीलदार या पदावर रुजू करून घेतलंय.

उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू

Last Updated: Monday, April 15, 2013, 07:25

कल्याणमधील उल्हासनदीत तीन बालकांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. मांजर्ली गावात ही घडली.

... जेव्हा नदीलाही लागते आग!

Last Updated: Friday, March 29, 2013, 10:04

पाण्यामध्ये आग लागली... असं आपण कथा-पुराणांमध्ये ऐकलंय. मात्र झारखंडच्या धनबादच्या टर्कीतांड गावातल्या कतरी नदीतल्या पाण्यामध्ये आग लागलीय

मुळा नदीच्या पात्रात हजारो मासे मृत्यूमुखी

Last Updated: Thursday, March 21, 2013, 19:07

पिंपरी-चिंचवडमध्ये वाकड इथे मुळा नदी पात्रात आज सकाळच्या सुमारास हजारो मासे मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. पालिका कर्मचा-यांनी मासे तपासणीसाठी पाठवले आहेत. पण या घटनेनंतर पुन्हा एकदा नदी प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय.

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 13:53

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:57

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:36

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.

गोदावरीचं पाणी आरोग्यास धोकादायक?

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 20:49

नाशिकमधून वाहणारी गोदामाई म्हणजे नाशिकची ओळख...मात्र आता तिच गोदावरी ओळखली जाते ती तिच्या प्रदुषणाबद्दल...पण याबद्दल प्रशासन काहीच करताना दिसत नाही

... आणि पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडावर पडलं!

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 15:20

हेग स्थित आंतरराष्ट्रीय पंचायत न्यायालयानं किसनगंगा हाइड्रो इलेक्ट्रिकल प्रोजेक्टच्या संदर्भात भारताच्या बाजूनं निर्णय दिलाय... त्यामुळे पाकिस्तानला तोंडावर पडावं लागलंय.

घंटागाडी पडली मागे, आता `रोबोटिक मशीन्स`चा घाट!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 09:35

गेले कित्येक महिने प्रदूषणात अडकलेली गोदावरी आता कुठे मोकळा श्वास घेतेय आणि हे शक्य झालं महापालिकेच्याच पाण्यावरची घंटागाडी या प्रकल्पातून... त्याचं यश दिसत असतानाच महापालिकेनं नवा घाट घातलाय रोबोटिक मशीन्स खरेदीचा...

हिरण्यकेशीच्या नदीपात्रात सापडली ११ मृत अर्भकं...

Last Updated: Monday, January 28, 2013, 15:43

बेळगावजवळच्या संकेश्वर इथल्या हिरण्यकेशी नदीच्या पात्रात ११ मृत अर्भकं आढळली आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

मंगळावर वाहत होती नदी!

Last Updated: Monday, January 21, 2013, 17:06

मंगळ ग्रहावर एकेकाळी १,५00 किमी लांब आणि सात किमी रुंदीची महाकाय नदी वाहन होती, असे दर्शविणारी विस्मयकारी छायाचित्रे गेल्या शुक्रवारी ‘युरोपियन स्पेस एजन्सी’च्या (ईएसए) ‘मार्स एक्स्प्रेस’ या यानाने पाठविली आहेत. एजन्सीने पाठविलेले हे यान मंगळाच्या सतत प्रदक्षिणा करीत असते.

राज्यातील आठ नद्या प्रदूषित

Last Updated: Monday, October 29, 2012, 21:36

पिंपरी-चिंचवडमधील पवना, इंद्रायणी आणि पुण्यातील मुळा, मुठा या नद्यांची गणना देशातील सर्वाधिक प्रदूषित नद्या म्हणून झाली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं अर्थात सीपीसीबीन नुकत्याच तयार केलेल्या अहवालात देशातील सर्वाधिक ३६ प्रदूषित नद्यांत राज्यातील आठ नद्यांचा समावेश आहे. पालिका प्रदूषण रोखण्यासाठी काय करतेय असा सवाल उपस्थित केला जातोय.

दुषित गोदावरी, प्रशासन आधांतरी

Last Updated: Saturday, June 2, 2012, 17:53

गोदावरीच्या पाणवेलींचा गुंता दिवसेंदिवस वाढत चाललाय. महापौरांनी पहाणी दौरा केला. स्थायी समिती सभापतींनी पाणवेली काढण्याचं आश्वासन दिलं. पालकमंत्री छगन भूजबळ यांनी अधिका-यांना खडे बोल सुनावत तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेत. एवढं होऊनही प्रशासनाकडून कुठलीही हालचाल दिसत नाही.

भीमानदीत अवैध वाळू उपसा

Last Updated: Friday, June 1, 2012, 20:38

सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळूचे १० ते १२ ट्रक गावक-यांनी अडवले. मोहोळ तालुक्यातल्या अर्धनारी गावातल्या गावक-यांनी ही कारवाई केली आहे.

गोदामाईची व्यथा

Last Updated: Thursday, May 10, 2012, 23:54

नाशिकचा अभिमान असणारी गोदामाई सध्या तिचं सौंदर्यच हरवून बसलीय. गेल्या अनेक वर्षांपासून ही नदी पानवेलींच्या विळख्यात सापडलीय. वेळोवेळी आवाज उठवूनही प्रशासनावर म्हणावा तसा परिणाम झालेला नाही.

मुरबाडी नदी प्रदुषित

Last Updated: Thursday, May 10, 2012, 19:16

मुरबाड तालुक्यातल्या अनेक गावांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागतंय. त्याचवेळी मुरबाडकरांचा हक्काचा पाण्याचा स्त्रोत म्हणजे मुरबाडी नदी मोठ्या प्रमाणात प्रदुषित झालीय.

मुलगी नको... नदीमध्येच फेकून दिली

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 13:57

कन्या भ्रूणहत्या रोखण्यासाठी सरकारी पातळीवर आणि अनेक सामाजिक संस्थांकडून प्रयत्न होत असले तरी जळगाव जिल्ह्यातील रावेरमध्ये नागझिरी नदी पात्रात सात महिन्यांच्या एका मुलीचं मृतावस्थेतील अर्भक सापडलं आहे.

विरार परिसरात वाळू 'तापणार' ?

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 16:14

वसई-विरार परिसरात वाळू उपशावरून संघर्ष पेटण्याची चिन्ह आहेत. वैतरणा खाडीतून अवैध रेती उपशावर कोणतीच कारवाई होत नसल्याचा विरोधात नारंगी बंदरातल्या तब्बल ५ हजार रेती उत्पादकांनी तहसीलदार कचेरीवर मोर्चा काढून सेक्शन पंप बंद करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील नदीला डेब्रिजची 'मिठी'

Last Updated: Saturday, December 3, 2011, 03:39

मुंबईतील मिठी नदीजवळ साचलेले डेब्रिज काढा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने १0 दिवसा दिवसांची मुदत दिली आहे.

पवनेचं पाणी पुन्हा पेटणार?

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:13

बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.

'धारीवाल'ने धरली वर्धा नदी वेठीला!

Last Updated: Wednesday, November 9, 2011, 07:58

धारीवाल कंपनीनं वर्धा नदीच्या पात्रात इन्टेक वेल बांधणीचं काम सुरु केलं असून यामधून अनिर्बंध पाणी उपसा करण्याचा घाट घातला आहे. विहिर उभारणीसाठी नदीचा किनारा अवैध्यरित्या तोडण्यात आल्यानं आसपासच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे.

लाकडी पुलाने घेतले ३१ बळी

Last Updated: Saturday, November 5, 2011, 13:24

पश्चिम बंगालमधील दार्जिलिंगपासून २६ किमी अंतरावर असलेल्या बिजनबाडी येथील नदीवरील लाकडी पूल शनिवारी रात्री कोसळल्याने ३१ जणांचा मृत्यू झाला, तर १००हून अधिक जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.