ट्रॅकवर झाडं कोसळलं, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:16

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कसं असेल गडकरींचं रस्ते विकास धोरण?

Last Updated: Thursday, May 29, 2014, 20:35

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सर्व केंद्रीय मंत्र्यांकडून पुढील 100 दिवसात काय काम करणार आहात, याची माहिती सादर करण्यास सांगितली आहे.

पाहा पंतप्रधान मोदींच्या समोरील मोठी आव्हानं

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 18:14

पंतप्रधान पदी नरेंद्र मोदींच्या समोर भारतीय अर्थव्यवस्थेळा रूळावर आणण्याचं मोठं आव्हान आहे. मागील 10 वर्षात जीडीपी दर 5 टक्क्यांहून खाली आले आहेत. जो की एक रेकॉर्ड आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक प्रचारादरम्यान जनतेत आशा निर्माण केलीय आणि आता त्यांच्यासमोर सर्व आव्हानं दूर करण्याचंच मोठं आव्हान आहे.

रेल्वे ट्रॅकला तडा, ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 10:08

ट्रान्सहार्बरची वाहतूक विस्कळीत झाली होती. तुर्भे - कोपरखैरणे दरम्यान रेल्वे ट्रॅकला तडा गेल्याने सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला. यामुळे वाहतूक एक तास बंद होती. रेल्वे वाहतूक बंद अल्याने सकाळच्या वेळी प्रवाशांचे हाल झालेत.

बेशिस्त वाहतुकीमुळे राज्यात अपघातांचं प्रमाण वाढलं

Last Updated: Friday, May 9, 2014, 10:06

राज्यात रस्ते अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. बेशिस्त वाहतुकीला कुणीही लगाम लावतांना दिसत नाहीय.

दिंडोशी फ्लायओव्हर किमान महिनाभर बंद

Last Updated: Monday, May 5, 2014, 10:52

पश्चिम उपनगरातील वाहतुकीची वर्दळ असलेला दिंडोशी फ्लायओव्हर पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. शनिवारपासून दुरुस्तीचे काम सुरू झाले असून, किमान महिनाभर फ्लायओव्हर बंद असेल.

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत

Last Updated: Monday, May 5, 2014, 07:59

तब्बल 18 तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरळीत झालीय. नागोठणे इथं झालेल्या दिवा - सावंतवाडी पॅसेंजरला झालेल्या अपघातानंतर ही वाहतूक विस्कळीत झाली होतीय.

भायखळ्याचा पूल 15 दिवसांसाठी बंद!

Last Updated: Friday, May 2, 2014, 18:25

भायखळ्याचा पूल काही दिवसांसाठी बंद करण्यात आलाय. पुलाच्या डागडुजीच्या कामामुळे हा पूल बंद करण्यात आलाय.

कोकण रेल्वेची वाहतूक सुरू...

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:40

तब्बल वीस तासांनंतर कोकण रेल्वेची वाहतूक सुरू झालीय. मालगाडीचे डबे काढण्याचे काम पूर्ण झाले असून मांडवी एक्सप्रेस गोव्याकडे रवाना करण्यात आलीय.

मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा सुरळीत सुरू

Last Updated: Friday, March 21, 2014, 09:40

टिटवाळा आणि आंबिवली दरम्यान लोकल ट्रेनचे पाच डबे घसरल्यामुळे कालपासून मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता पूर्ववत सुरू झाली आहे.

लोकलचे डबे घसरल्याने वाहतुकीत झालेले बदल

Last Updated: Thursday, March 20, 2014, 19:45

सीएसटीकडे जाणाऱ्या लोकलचे ५ डबे टिटवाळा ते आंबिवली दरम्यान निसटले, आणि कल्याण- कसारा, कसारा-मुंबई लोकलसेवा ठप्प झाली

पोलिसांची नाकाबंदी, मनसेचे १४ पदाधिकारी अटकेत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 09:11

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आज राज्यभरात होणा-या रास्ता रोकोच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मनसेच्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची धडरपकड सुरु केलीय. तर मुंबई-कोल्हापूर बायपासवर चांदणी चौकात रास्तारोको केलाय. निफाड हायवेवर आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नाशिक टोल नाक्यावर पोलिसांची नाकाबंदी करण्यात आलेय.

आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 08:43

मनसे टोल आंदोलनाचा शहर वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन टोल नाक्यांवर होणार आहे.

राज ठाकरेंना अटक, आरसीएफ पोलीस ठाण्यात राज

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 16:13

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.

वाहतूक संघटनेचा 'मनसे' रास्तारोको, २७ लाख वाहनं बंद

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 15:39

मनसेच्या रास्तारोकोला काही वाहतूक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यात ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसचाही समावेश आहे. यामुळे १२ फेब्रुवारी रोजी तब्बल २७ लाख वाहनं रस्त्यावर धावणार नाहीत, असं या संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे.

एसटी १ हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खड्डयात

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 21:43

राज्यातील ग्रामीण वाहतूक व्यवस्था आजारी पडण्याची शक्यता आहे. कारण एसटी एक हजार कोटी रूपयांच्या तोट्याच्या खोल खड्ड्यात गेली आहे.

प्रजासत्ताक दिनी `मेगाब्लॉक`लाही सुट्टी!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 22:19

प्रजासत्ता दिनानिमित्त शासकीय परेड सोहळा पहिल्यांदाच मुंबईत मरीन ड्राईव्ह इथं पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत अनेक बदल करण्यात आलेत.

...तर ट्रॅफिकमुळे घरी पोहचायला लागतील २ दिवस !

Last Updated: Friday, December 20, 2013, 09:05

तुम्ही एखाद्या दिवशी मुंबई मध्ये प्रचंड ट्रॅफिक जाममध्ये अडकलात आणि घरी पोहचायला जर 2 ते 3 दिवस लागले तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण मुंबई मध्ये रोज वाढणा-या शेकडो वाहनांमुळे भविष्यामध्ये ही परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट....

पुण्यातील वाहतूक बेशिस्तीला बसणार चाप

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 11:54

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. पुण्याच्या एखाद्या नो एन्ट्रीच्या गल्लीत गाडी घुसवलीत किंवा आजूबाजूला पोलीस नाही असं बघून नो पार्किंगमध्ये गाडी लावलीत, तर आता ते तुम्हाला चांगलंच महागात पडणार आहे. कारण गल्लीत दबा धरुन बसलेले वाहतूक पोलीस एकदम तुमच्यासमोर येतील आणि चलन फाडतील आणि हे सगळं होणार आहे पोलिसांच्या `ऑपरेशन अचानक` अंतर्गत.

वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या मुंबईकरांनो सावधान...

Last Updated: Friday, November 1, 2013, 15:59

वाहतुकीचे नियम मोडणा-या मुंबईकरांनो सावधान... आता नुसताच दंड भरुन सुटका नाही

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:10

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:03

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.

पावसामुळे मुंबापुरीला ब्रेक !

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:16

मुंबई दिवसभर मुसळधार पावसाचा फटका सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही लोकल लाईन्सला बसला...त्यामुळे लोकलने प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले...दिवसभर पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे रस्ते वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला.

पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Sunday, June 16, 2013, 10:06

शनिवारी रात्रीपासून कोसळणाऱ्या पावासाचा पुणे-मुंबई रेल्वे वाहतुकीला फटका बसलाय. आकुर्डी ते चिंचवड दरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याने वाहतुकीवर परिणाम झाला. डेक्कन क्वीन चिंचवड येथे थांबविण्यात आली होती.

सिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:35

मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 19:58

वडाळा ते जीटीबी दरम्यान हार्बर मार्गावर लोकलचा डबा रुळावरून घसरल्याने हार्बरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. आज सायंकाळी चार वाजता ही घटना घडली.

अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकखाली चिरडून पोलीसाचा मृत्यू

Last Updated: Friday, February 8, 2013, 20:42

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचा ट्रक खाली चिरडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना डहाणुजवळ घडली आहे. सुभाष गायकवाड असं या अधिका-याचं नाव आहे.

मनसेचा 'वेस्टर्न एक्सप्रेस हायवे'वर राडा

Last Updated: Thursday, January 31, 2013, 16:42

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यानी वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर रस्ता रोको केला. यावेळी आंदोनलकांनी गाड्याची तोडफोड केली.

राज ठाकरेंनी केली वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त

Last Updated: Thursday, January 10, 2013, 17:37

मनसे वाहतूक सेनेची सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. वाहतूक सेनेबाबत अनेक तक्रारींनतर सर्व पदे बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सिग्नल यंत्रणेत बिघाड... मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Last Updated: Friday, December 14, 2012, 17:36

मुलुंड स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अर्ध्या तासानं उशीरा होत आहे.

स्कूल व्हॅनचा अपघात; चार चिमुकले ठार, नऊ जखमी

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:18

अमरावतीत एका स्कूल व्हॅनला भीषण अपघात झालाय. अपघातात तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला तर दहा विद्यार्थी जखमी झालेत. दोन मुलांना किरकोळ जखमा झाल्यात.

मध्य रेल्वेची वाहतूक सुरळीत

Last Updated: Sunday, November 25, 2012, 13:01

दिवा येथे मालगाडीचा डबा घरसल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. मुंबईकडे येणाऱ्या गाड्या १५ ते २० मिनिटांने धावत होत्या. दरम्यान, ही वाहतूक सुरळीत झाली आहे.

हार्बर रेल्वेची वाहतूक पूर्ववत

Last Updated: Thursday, November 22, 2012, 10:40

हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीजी ते वडाळा स्टेशन दरम्यान रूळ तुटल्याने हार्बरची लोकल वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. छत्रपती शिवाजी टर्मीनसकडे येणाऱ्या सर्व गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान हार्बर रेल्वेची वाहतूक मेन लाईनवरून सुरू ठेवण्यात आली होती. आता वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

ट्रेनी मारून नेताहेत वेळ, प्रवाशांच्या जीवाशी खेळ

Last Updated: Friday, July 20, 2012, 18:27

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या २०० मोटरमनने अचानक संप पुकारल्यानंतर प्रशासनाने शिकाऊ मोटरमनच्या हातात लोकल देऊन मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला आहे. दर अर्धा तासाने एक लोकल सोडण्यात येत असून याचा संपूर्ण ताबा शिकाऊ म्हणजे ट्रेनी मोटरमनच्या हातात आहे.

बस आली धावून...

Last Updated: Friday, July 20, 2012, 17:46

जिथं जिथं गरज असेल तिथं तिथं ज्यादा बसेस सोडण्यात येतील असं बेस्ट प्रशासनानं जाहीर केलंय. तसंच एसटी महामंडळानंही या परिस्थितीत प्रवाशांना दिलासा देण्याचा प्रयत्न सुरु केलाय.

गेल्या वर्षीही ६० मोटरमनने केला होता संप!

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:41

गेल्या वर्षी सहकाऱ्याला बडतर्फ केल्याच्या निषेधार्थ मुंबईतील पश्चिम रेल्वेचे ६० मोटारमन अचानक संपावर गेले होते. त्यामुळे चर्चगेटहून एकही गाडी सुटू शकली नव्हती. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले होते.

वाहतुकीचा खेळखंडोबा

Last Updated: Friday, July 20, 2012, 21:46

आसनगाव – कसारा वाहतूक बंद, एक्सप्रेस गाड्या रद्द

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:38

गोंदिया विदर्भ एक्‍सप्रेसला झालेल्‍या अपघातानंतर मध्‍य रेल्‍वेची वाहतूक आसनगाव ते कसारा या स्‍थानकांदरम्‍यान पूर्णपणे ठप्‍प झाली आहे. ही वाहतूक आज सायंकाळपर्यंत बंदच राहणार आहे. तर लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. अन्य गाड्यांच्या मार्गात बदल कऱण्यात आला आहे.

रेल्वे वाहतूक खोळंबली, २०० मोटरमन अचानक रजेवर

Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55

मुंबई पश्चिम रेल्वेची लोकल वाहतूक कोलमडली आहे. अचानक १०० मोटरमन हे रजेवर गेले आहेत. त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक खोळंबली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मनमानीविरोधात मोटरमन हे रजेवर गेले आहेत.

माल वाहतूकदार संपावर...

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:45

मालवाहतूकदारांनी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद पुकारलाय. मालवाहतूक गाड्यांसहीत शालेय बसेस आणि सर्व अवजड वाहनांना वेग नियंत्रक लावण्याच्या निर्णयाविरोधात मंगळवारी मध्यरात्रीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय मालवाहतूकदार संघटनेनं घेतलाय.

भाडं नाकारलं... तर खबरदार!

Last Updated: Saturday, July 14, 2012, 11:22

एकीकडे सार्वजनिक वाहतुकीला त्रासलेले पुणेकर रिक्षावाल्याकडूनही हैराण आहेत. भाडं नाकारून प्रवाशांची सर्रास अडवणूक केली जातेय. अशा भाडं नाकारणाऱ्या रिक्षांवर यापुढे कडक कारवाई होणार आहे.

पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:48

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.

'म.रे.'ने केला खोळंबा, रेल्वे वाहतूक ठप्प

Last Updated: Friday, June 8, 2012, 08:33

कल्याण-कसारा रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. कल्याणजवळ रेल्वे रूळाला तडा गेल्यामुळे रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. लांबपल्ल्याच्या गाड्या कल्याणजवळ खोळंबल्या आहेत.

ठाण्याच्या वाहतुकीचा मार्ग बदलला

Last Updated: Saturday, May 26, 2012, 12:09

ठाण्यातील वाहतूक कोंडी सोडविण्याकरता ठाण्यातील नौपाडा वाहतूक शाखेच्या वतीनं रोटरी पद्धतीने वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र ठाणेकरांनी या पर्यायावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय.

नक्षली बंद : गडचिरोलीत वाहतूक ठप्प

Last Updated: Thursday, May 17, 2012, 14:03

नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या एक दिवसीय बंद दरम्यान गडचिरोलीच्या दुर्गम भागात वाहतूक ठप्प होती. बाजारपेठही बंद होती. नक्षलवाद्यांनी पत्रके आणि बॅनर टाकण्यात आली आहेत.

नाशिक वाहतूक पोलिसांची बसचालकांवर कारवाई

Last Updated: Thursday, January 5, 2012, 10:15

नाशिक वाहतूक पोलिसांनी क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या बसचालकांवर कारवाई केली असून रस्ता सुरक्षा सप्ताहाअंतर्गत वाहनचालकांचं प्रबोधन करण्यात येत आहे.

मोटारगाड्यांनी व्यापली मुंबापूरी

Last Updated: Thursday, December 8, 2011, 16:41

अशोक दातार
देशात वाहतुकीचे धोरण निश्चित करताना ते कार केंद्रीत आहे. आज जगभरातील देश अधिकाअधिक लोकांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने प्रवास करावा यावर भर देतात. त्यासाठी बस रॅपिड ट्रान्सिट सिस्टिमला (बीआरटी) प्राधान्यक्रम देतात. दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका आणि चीनमध्ये तर ७९ शहरांमध्ये वाहतुकीसाठी ही व्यवस्था अवलंबण्यात आली आहे. रेल्वे प्रमाणे बसचा विचार करा असं सूत्र त्यामागे आहे.