शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

Last Updated: Monday, June 23, 2014, 14:18

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

जळगाव जिल्ह्यात वादळाने केळी बागा भूईसपाट

Last Updated: Thursday, June 12, 2014, 19:41

जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, मात्र या पावसामुळे चार जण ठार झाले आहेत.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा डाळिंब बागांना फटका

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

नाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 22:25

शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.

आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:28

अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.

'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:27

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 19:18

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ

Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:06

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.

गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 23:57

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 12:50

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.

शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 14:11

कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 20:05

जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.

गोंदियात पारंपरिक पिकाला फाटा देत आंब्याची नर्सरी

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 17:59

गोंदिया सारख्या धान उत्पादक क्षेत्रात पारंपरिक पिकाला फाटा देत एका शेतकऱ्याने आंब्याची नर्सरी तयार केलीय. या नर्सरीत जवळपास आठ जातीच्या आंब्यांच्या रोपांवर ते कलम करतात. आंब्या व्यतिरिक्त ते सर्सरीत चिकू, अशोक, मिर्ची, फणसाच्या झाडांची देखील कलम कलम करतात. एवढच नव्हे तर केळीच्या बागेतून ते लाखोंचा नफा कमवत आहेत.

पोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:19

सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Last Updated: Friday, November 29, 2013, 12:19

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 18:33

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 09:24

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:28

काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.

१०१ महिलांनी मोदींना लिहिली रक्ताने पत्रं!

Last Updated: Monday, July 8, 2013, 20:16

गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना १०१ महिलांनी रक्ताने पत्रं लिहून पाठवली आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी हा पत्रप्रपंच करण्यात आला आहे.

‘एनटीपीसी’ची दादागिरी चालणार नाही!

Last Updated: Tuesday, June 4, 2013, 19:42

सोलापुरातल्या होटगी परिसरात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असणाऱ्या एनटीपीसी प्रकल्पाचं बांधकाम अवैध असून या बांधकामाला ग्रामपंचायतीनं हरकत घेतलीय.

भ्रष्टाचाराविरोधात शेतकऱ्यांनीच थोपटले दंड!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 17:24

ज्या भागात भौगोलिक परिस्थितीमुळे सिंचन प्रकल्प राबवण्यात अडचणी आहेत त्या भागात पर्यायी योजना राबवून सिंचनक्षेत्र आणि पर्यायाने शेतीविकास करण्याची शासनाची महत्वाकांक्षी योजना आहे.

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 09:18

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 22:08

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

शेतकऱ्यांना चक्क पोलिसांच्या गाड्यांमध्ये कोंबल

Last Updated: Thursday, April 25, 2013, 19:16

नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्ये इंडियाबुल्सच्या खासगी रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाला विरोध करणा-या शेतकऱ्यांवर सरकारी यंत्रणांचा आसूड पडतोय.

कर्जमाफीचा घोटाळा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 09:42

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

Last Updated: Monday, March 18, 2013, 18:13

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

Last Updated: Sunday, March 10, 2013, 19:11

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

Last Updated: Thursday, March 7, 2013, 20:04

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.

शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:02

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

अर्थसंकल्प : कृषी विकासासाठी काय मिळाले?

Last Updated: Thursday, February 28, 2013, 16:19

यंदाच्या बजेटमध्ये शेती विकासाठी भरीव तरतूद करण्यात आलीय. देशातील कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्यासाठी ३ हजार ४१५ कोटी रूपयांची तरतूद केली आहे. आज केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी २०१३-२०१४चा अर्थसंकल्प सादर केला.

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

Last Updated: Sunday, December 30, 2012, 21:18

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

Last Updated: Saturday, November 17, 2012, 16:02

ऊस आंदोलनादरम्यान सांगलीत झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणी चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलाय.

शेतकऱ्यांचा वाली कोण?

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:13

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 10:11

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

कांदा उत्पादकांना वाव, कांद्याला चांगला भाव

Last Updated: Thursday, October 25, 2012, 15:31

गेल्या काही दिवसांत अनेक संकटांचा सामना करणाऱ्या कांदा उत्पादकांसाठी दिलासादायक बातमी आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नवीन कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे.

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

Last Updated: Monday, October 15, 2012, 17:02

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:24

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

वर्ध्यातील शेतकरी सुखावले

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 10:35

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी मात्र वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखाण्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखल देत अवघ्या तालुक्यातील शेतक-यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

वर्मांचं तर्कशास्त्र : महागाईचा लाभ शेतकऱ्यांना

Last Updated: Monday, August 20, 2012, 13:35

महागाईमुळं सर्वसामान्य शेतकऱ्यांचा फायदा होत असल्याचा अजब शोध त्यांनी लावलाय. इतकंच नाहीतर महागाईमुळं आपल्याला आनंद झाल्याचंही त्यांनी म्हटलंय.

उदयनराजेंविरुद्ध शेतकऱ्यांना हवाय न्याय

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 21:18

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

कांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा

Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:54

नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

नाशिकमध्ये शेतकऱ्यांचा 'रास्ता रोको'

Last Updated: Friday, May 18, 2012, 16:26

नाशिकमधल्या येवल्यात आज शेतक-यांना बियाणं वाटण्यात येणार होतं. पण या रांगेत शेतकऱ्यांपेक्षा व्यापा-यांचे दलालच पुढे होते. त्यामुळे सहाजिकच शेतक-यांचा उद्रेक झाला. अखेर जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:07

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

सांगलीमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 22:17

सांगलीतल्या वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत तुफान हाणामारी झाली आहे. एकेकाळी सहकाराचा मानबिंदू मानल्या जाणाऱ्या वसंतदादा शेतकरी कारखान्यात सर्वसाधारण सबेत खुर्च्यांची फेकाफेक केली.

रायगडमधील शेतकऱ्यांची फसवणूक

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 15:21

रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. एका व्यापाऱ्यानं जादा दराचं आमीष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधींचं धान्य गोळा केलं. मात्र कुठलाही मोबदला न देता हा व्यापारी कुटुंबासह फरार झालाय. पोलिसांकडून काहीही कारवाई होत नसल्यानं शेतकरी संतापले आहेत.

भारत कृषक समाजाचं कृषी प्रदर्शन माहितीपूर्ण

Last Updated: Tuesday, January 17, 2012, 09:01

कृषी विस्तार, विकास तसचं पूरक व्यवसायाबद्दलची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी म्हणून भारत कृषक समाजाने जळगावात नुकतचं कृषी प्रदर्शन पर पडलं. या प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या १५० स्टॉल्सच्या माध्यामातून हजारो शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शनाचा लाभ घेता आला.

नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

Last Updated: Monday, January 9, 2012, 13:06

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवरील इनव्हर्टर

Last Updated: Friday, January 6, 2012, 17:47

लोड शेडिंगच्या काळोखात शेतकऱ्यांना दैनंदिन जीवनात उपयोगी पडणारं इनव्हर्टर आता सौर ऊर्जेवर चार्ज करता येणार आहे. मराठवाडा कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी या विषयी शेतकऱ्यांना मौलिक मार्गदर्शन केलं आहे.

कांदा शेतकऱ्यांना रडवणार?

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 21:51

गेल्या महिनाभरापासून कांद्याचे दर घसरत असल्यानं नाशिक जिल्ह्यातला शेतकरी धास्तावलाय. सरासरी दर अडीचशे असला तरी किमान दर दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत खाली आलाय.

कापूस शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसली पानं

Last Updated: Saturday, December 24, 2011, 08:45

सरकारने कापूस उत्पादकांना सरकारची मदत जाहीर. धान आणि सोयाबीनला प्रति हेक्टरी दोन हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टर चार हजार रुपये देऊन बोळवण करण्यात आली आहे. २५ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांच्या मानगुटीवर विमानतळाचं भूत

Last Updated: Wednesday, December 14, 2011, 12:26

एकीकडं ‘जय जवान, जय किसान’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडं शेतकऱ्यांची जमीन हिरावून घ्यायची. असा दुटप्पीपणा सरकारकडून नेहमीच केला जातोय. विमानतळासाठी ओसाड जमीन न घेता बागायती शेतजमीन संपादित केली जात आहे.

यांत्रिक पद्धतीने पिकांची लागवड

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:36

आपल्या राज्यातील शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळत नसल्याने अशा प्रकारच्या यंत्र परवडणारी नसली, तरी मजूर टंचाईची समस्या पाहता शेतकरी गटांना किंवा गावपातळीवर यंत्रांची गरज उद्या भासणारच आहे.

शेतकऱ्यांना वीज कंपनीचा 'शॉक'

Last Updated: Friday, December 2, 2011, 14:37

कापसाच्या हमीभाव वाढीचा गुंता अजूनही न सुटल्याने अद्यापही कापूस खरेदी केंद्र सुरुच न झाल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या शेतकऱ्यांना आता वीज कंपनीने शॉक दिला आहे.

पवनेचं पाणी पुन्हा पेटणार?

Last Updated: Thursday, December 1, 2011, 17:13

बंद पाईपलाईन योजनेचा विरोध करताना मावळमधल्या शेतक-यांनी पवनेचं पाणी अक्षरशः पेटवलं. त्याची धग पुरती कमी झालेली नाही, तेवढ्यातच आता पुन्हा हा मुद्दा पेटण्याची चिन्हं आहेत.

शेतकरी विधवाही कापूस आंदोलनात

Last Updated: Friday, November 25, 2011, 10:11

यवतमाळच्या केळापूरमध्ये विदर्भातल्या शेतकरी विधवा रस्त्यावर उतरल्या होत्या. राहुल गांधींनी भेट घेतलेल्या कलावती आणि केबीसीतील विजेत्या अपर्णा मालेकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकरी विधवांनी रस्त्यावर उतरत कापूस दरवाढीच्या प्रश्नाचा निषेध केला.

पुन्हा एकदा शेतकऱ्याची आत्महत्त्या

Last Updated: Tuesday, November 22, 2011, 13:53

धुळे जिल्ह्यातील विंचूर गावातील प्रकाश खैरनार या शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली आहे. वातावरणातील बदलामुळे पिकांपासून उत्पादन मिळत नसल्यानं शेवटी प्रकाश खैरनार यांनी आपली जीवनयात्रा संपवली.

कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, November 16, 2011, 03:12

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

शेतकऱ्यांचं आत्महत्त्या सत्र सुरूच

Last Updated: Friday, November 11, 2011, 13:38

विदर्भात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच आहे. गेल्या ७२ तासांमध्ये पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

गडकरींच्या मदतीला कलावतींचा नकार

Last Updated: Thursday, November 10, 2011, 06:26

काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी यांनी भेट दिल्यानंतर प्रकाशझोतात आलेल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या शेतकरी विधवा कलावती बांदुरकर यांना आता भजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी १लाख रुपयांची मदत जाहीर केली. मात्र कलावतींनी ही मदत नाकारलीय.

विदर्भातील शेतकरी विधवांची आदर्श भाऊबीज

Last Updated: Tuesday, November 1, 2011, 06:28

आधार हरवलेल्या शेतकरी विधवांना सहानूभूती देण्यासाठी दिनदयाळ मंडळाने ११४ कुटुंबांना दत्तक घेत बहिणीचं नात घट्ट केलंय. यवतमाळात सामुहिक भाउबीजेचा कार्यक्रम घेऊन मंडळाने त्यांच्यातील नीरसपण घालविण्याचा प्रयत्न केलाय.

नाशिकच्या बागायतदारांवर महावितरणची 'वीज'

Last Updated: Tuesday, October 25, 2011, 12:40

नाशिकच्या द्राक्ष बागायतदारांच्या तोंडचं आणि बागेचं देखील पाणी पळालं आहे आणि त्याला महावितरणचे भारनियमन कारणीभूत ठरलं आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कृषिपंपांसाठी सध्या फक्त आठ तासच वीज पुरवठा होत आहे.