सिंचन घोटाळ्यात ‘दादां’चे हात साफ!

Last Updated: Saturday, June 14, 2014, 17:55

कोट्यवधी रूपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

भिलाई वायू गळतीची उच्च स्तरीय चौकशी : केंद्रीय मंत्री

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:00

छत्तीसगढ राज्यातील दुर्ग जिल्ह्यात झालेल्या वायू गळतीमुळे अनेक जणांचे प्राण गेल्याची घटना भिलाई प्रकल्पात घडली. याच्या चौकशीसाठी उच्च स्तरीय समिती नेमण्यात येईल, असे केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी सांगितले.

कोल्हापुरात टोलविरोधात कृती समितीची ‘आर-या-पार’ची लढाई

Last Updated: Monday, June 9, 2014, 12:50

काही केल्या "टोल आम्ही देणार नाही‘, या निर्धारानं आंदोलन करणारे कोल्हापूरकर आज पुन्हा एकदा रस्त्यावर उतरणारेत. कोल्हापूर शहर जिल्हा टोलविरोधी कृती समितीनं टोलविरोधात ‘आर-या-पार’ची लढाई करत आज महामोर्चाची हाक दिलीय.

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:28

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

मुदगल समितीलाच `आयपीएल`ची चौकशी करण्याचे आदेश

Last Updated: Sunday, May 18, 2014, 12:36

आयपीएलमध्ये घडलेलं स्पॉट फिक्‍सिंग आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुदगल समितीच काम करेल, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसेच मुदगल समिती सदस्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

जीवघेणी ‘गोफणगुंडा’ची मध्ययुगीन प्रथा अखेर बंद!

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 15:39

कोपरगाव तालुक्यात कोकमठाण आणि संवत्सर या गावातील गोफणगुंड्याच्या लढाईची प्रथा अखेर बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय. मध्ययुगातली ही प्रथा बंद व्हावी, यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यासाठी मोठा पाठपुरावा केला होता.

कल्याण-डोंबिवली पालिकेत स्थायी समिती शिवसेनेकडे

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 12:57

कल्याण-डोंबिवली महापालिका स्थायी समितीसाठी आज निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी शिवसेनेचे दीपेश म्हात्रे विजयी झालेत. दरम्यान, मनसेच्या उमेदवारीमुळे या निवडणुकीत घोडेबाजाराला ऊत आला होता. फोडाफोडी करूनही मनसेला पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत राष्ट्रवादी तटस्थ राहिल्याने सेनेला फायदा झाला.

अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला वेगळ वळण

Last Updated: Tuesday, April 29, 2014, 19:27

कल्याण-डोंबिवली मनपाच्या नगरसेविका अर्चना कोठावदे यांच्या अपहण नाट्याला आता वेगळ वळण आलंय. अर्चना कोठावदे यांनी माझं अपहण झालं नसून मी सुखरूप असल्याचा खुलासा केलाय.

सत्ता शिवसेनेची, तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेकडे

Last Updated: Saturday, April 26, 2014, 11:05

लोकसभा निवडणुकीत एकमेकासमोर उभ्या ठाकलेल्या शिवसेना-भाजप,मनसे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या ठाणे महापालिकेतील दिग्गजांनी सत्तेसाठी पुन्हा एकदा अजब साटेलोटे केलं. ठाणे महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या चक्क मनसेच्या हवाली केल्याने ठाणेकरांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.

स्पॉट फिक्सिंगच्या चौकशीसाठी बीसीसीआयची नवी समिती

Last Updated: Sunday, April 20, 2014, 19:32

आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणी तपासासाठी नवी चौकशी समितीची नावं बीसीसीआयनं सुचवलीय. बीसीसीआयनं यासाठी तीन नावं सुचवलीत. यात रवी शास्त्री, माजी सीबीआय प्रमुख राघवन आणि जस्टिस पटेल यांच्या नावांचा समावेश आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे.

मराठा आरक्षणाला उशीर झाल्यास आंदोलन करू - मेटे

Last Updated: Thursday, February 27, 2014, 08:36

मराठा समाजाला आरक्षणाची शासनाने जरी घोषणा केली आहे. मात्र, आचारसंहिता लागू होण्याच्या आधी निर्णय अपेक्षित आहे. अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा इशारा रणसंग्राम संघटनेचे विनायक मेटे यांनी दिलाय.

राजकीय पक्षांतही `विशाखा समिती`ची गरज

Last Updated: Sunday, February 16, 2014, 23:27

कार्यालयाच्या ठिकाणी स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार थांबवण्यासाठी १९९७ साली सुप्रीम कोर्टाने विशाखा समितीची स्थापना करण्याचे आदेश प्रत्येक संस्थेला दिले.

स्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय खेळाडू, धोनीचे नाव?

Last Updated: Tuesday, February 11, 2014, 11:12

गुरुनाथ मयप्पन स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी असल्याचा रिपोर्ट मुदगल समितीनं दिला असतानाच आयपीएल सट्टेबाजी आणि स्पॉट फिक्सिंगमध्ये सहा भारतीय प्लेअर्सचा सहभाग असल्याचा उल्लेखही मुदगल समितीच्या रिपोर्टमध्ये कऱण्यात आलाय.

अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:51

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणार?

Last Updated: Monday, February 3, 2014, 21:37

आगामी लोकसभा आणि त्याच्या पाठोपाठ नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्यात मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता आहे. मराठा समाजास शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये २५ टक्के आरक्षणाचा निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे.

महापालिकेकडून काहीतरी शिका... टोल रद्द करा; शेवाळेंची मागणी

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 12:37

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना टोलसंदर्भात पत्र लिहिलंय. `टोल रद्द करावा`, अशी मागणी शेवाळे यांनी पत्राद्वारे केलीय.

ठाणे उपमहापौर यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:14

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकरांनी नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात तक्रार दाखल केलीय.

ठाण्यात भाजप नेते पुन्हा आमने-सामने!

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 14:16

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर नवनियुक्त उपमहापौर मुकेश मोकाशी आणि भाजप गटनेते संजय वाघुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहेत.

भाजपची अशी ही बनवाबनवी...

Last Updated: Saturday, December 28, 2013, 10:02

ठाण्याचे माजी उपमहापौर मिलिंद पाटणकर यांनी आपण कर्नाटकात हवापालटासाठी आलो आहोत आणि कुटुंबीयांच्या संपर्कात आहोत, असं सांगितलं होतं. मात्र केवळ कुटुंबियच नव्हे, तर स्थानिक भाजप नेत्यांच्याही ते संपर्कात असल्याचे पुरावे झी मीडियाच्या हाती आलेत. त्यामुळे ठाण्यातील भाजपचे बनवाबनवीचे राजकाण पुढे आलेय.

टीएमसीत परिवहन समिती निवडणुकीत आघाडीची बाजी

Last Updated: Monday, December 23, 2013, 12:23

ठाणे महानगरपालिका परिवहन समिती निवडणुकीत आघाडीनं बाजी मारलीय. भाजपचे सदस्य अजय जोशी यांना आपल्या बाजूनं वळवण्यात आघाडीला यश आलंय. त्यांनी आघाडीला मत दिलंय.

हाणामारीनंतर आज परिवहन समितीची निवडणूक

Last Updated: Monday, December 23, 2013, 08:49

आज ठाणे परिवहन समितीच्या सभापतीपदाची निवडणूक होतीये... या निवडणूकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करण्यात आलीय.

आता, हेरिटेज समितीचीच होणार चौकशी!

Last Updated: Thursday, December 19, 2013, 15:25

शिवाजी पार्क हेरिटेज म्हणून जाहीर करणाऱ्या मुंबईतील हेरिटेज समितीचीच चौकशी करण्याची घोषणा नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत केली.

ठाण्यात मनसे स्टाईल आंदोलनाचा इशारा

Last Updated: Thursday, December 19, 2013, 14:00

ठाणे महानगरपालिकेबाहेर मनसेनं आज आंदोलन सुरु केलंय. ‘विक्रांत’ला पैसे देऊ नका ठाण्यातील मुलभूत प्रश्नांकडे लक्ष द्या, अशी भूमिका मनसेनं घेतलीये.

कोकण प्रश्नावर राणेंना भुजबळांचा पाठिंबा

Last Updated: Friday, December 6, 2013, 16:37

कोकणच्या इको झोनवर कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. इको झोनच्या निर्णयामुळे कोकणवासीयांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार होणं गरजेचं आहे, असं भुजबळ यांनी म्हटलंय. भुजबळ यांनी उद्योगमंत्री नारायरण राणे यांना पाठिंबा दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे काँग्रेसविरोधात राष्ट्रवादीही उतरल्याचे चित्र आहे.

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:08

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.

राणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 19:30

कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.

अकोल्यात त्रिशंकू तर धुळे, नंदुरबारवर काँग्रेसची सत्ता!

Last Updated: Monday, December 2, 2013, 20:18

अकोला, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेचे निकाल आज लागले. यापैकी अकोल्यात त्रिशंकू अवस्था असून प्रकाश आंबेडकरांच्या भारिप बहुजन महासंघानं सर्वाधिक २२ जागा जिंकल्यात.

जिल्हा परिषद निवडणूक निकाल : धुळे, नंदूरबार, अकोला

Last Updated: Monday, December 2, 2013, 13:35

धुळे, नंदूरबार आणि अकोल्यातील जिल्हा परिषदेचं आज चित्र स्पष्ट होतंय. रविवारी जिल्हा परिषदेसाठी मतदान पार पडलं होतं. आज मतमोजणी होतंय.

धुळे, नंदूरबारमध्ये मतदान; काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने

Last Updated: Sunday, December 1, 2013, 16:21

धुळे, नंदूरबार आणि अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी आज मतदान होणार आहे. प्रशासकीय यंत्रणा नियुक्त ठिकाणी सज्ज करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट; पवारांची खेळी!

Last Updated: Sunday, November 24, 2013, 22:41

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारक समितीची निवड करताना शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांचा पत्ता कट केलाय.

वेस्ट इंडीज टेस्टसाठी भारतीय टीमची आज निवड

Last Updated: Thursday, October 31, 2013, 11:28

सचिनच्या निरोपाच्या मॅचसाठी आज टीम इंडियाची निवड केली जाणार आहे. म्हणजेच वेस्ट इंडीज टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया आज निवडली जाईल. मुंबईत होणाऱ्या या बैठकीत संदीप पाटील आणि कंपनीसमोर सर्वात मोठा प्रश्न आहे, तो बॉलर्सचाच.

डिझेल ५ रुपयांनी आणि LPG गॅस २५० रुपयांनी महागणार?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 17:42

सर्वसामान्य माणसाला पुन्हा एकदा महागाईचा फटका बसण्याची चिन्हं आहेत. डिझेलचे दर पाच रुपयांनी वाढवण्याची शिफारस किरीट पारीख समितीनं पेट्रोलियम मंत्रालयाला केली आहे.

निवडणुकीच्या तोंडावर... मुस्लिम आरक्षण?

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 20:21

मुस्लिम समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये तसेच शिक्षण क्षेत्रात किमान आठ टक्के आरक्षण ठेवण्याची महत्त्वपूर्ण शिफारस डॉ. महेमुदूर रहमान यांच्या अध्यक्षतेखालील अभ्यासगटानं केलीय. निवडणुकांच्या तोंडावरच असे अहवाल का सादर होतात, याचा हा आढावा...

मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफारस!

Last Updated: Tuesday, October 22, 2013, 17:52

सरकारी नोकरीत मुस्लिमांना आठ टक्के आरक्षण देण्याची शिफासर राज्य सरकारनं नेमलेल्या एका अभ्यासगटानं केलीय.

सिंचन घोटाळा: भाजपनं दिले गाडीभर पुरावे!

Last Updated: Monday, October 21, 2013, 13:47

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात आलेत. तब्बल १४ हजार पानांची कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्यात आलीयत. बैलगाडीमधून ४ बॅग्ज भरून हे पुरावे सादर केलेत.

तावडे, फडणवीस आज देणार सिंचन घोटाळ्याचे पुरावे

Last Updated: Monday, October 21, 2013, 10:41

महाराष्ट्रातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या चितळे समितीसमोर आज भाजपच्यावतीनं भ्रष्टाचाराचे पुरावे सादर करण्यात येणार आहेत.

राज्यातील घोटाळे आणि चौकशी समितीचा फार्स

Last Updated: Friday, October 18, 2013, 10:38

सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने चितळे समिती नेमलीय .मात्र या चौकशी समितीचा काही उपयोग होईल का, याबाबत साशंकताच आहे. कारण राज्याच्या स्थापनेपासून आजतागायत विविध घोटाळ्यांची आणि महत्त्वाच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी तब्बल ६० चौकशी आयोग स्थापन करण्यात आले होते. मात्र या आयोगांच्या अहवालावर सरकारनं कोणतीही कारवाई केली नसल्याचं जळजळीत वास्तव समोर आलंय.

टोल वसुलीला विरोध, कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी

Last Updated: Friday, October 18, 2013, 08:10

आयआरबी कंपनीच्या टोल वसुलीला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेला कोल्हापूर जिल्हा बंद १०० टक्के यशस्वी ठरला असल्ययाचा दावा करण्यात आला आहे. याबाबत कोल्हापुरकरांच्या भावना राज्य सरकारकडे पोहचवू असं आश्वासन जिल्हाधिका-यांनी दिलंय. मात्र टोल विरोधी समिती आपल्या मागण्यांवर ठाम असल्यानं हा प्रश्न आगामी काळातही धुमसत राहण्याची शक्यता आहे.

कोल्हापुरात पोलीस बंदोबस्तात टोल वसुलीचा प्रयत्न!

Last Updated: Thursday, October 17, 2013, 18:01

कोल्हापुरात टोलला विरोध असतानाही आयआयरबी कंपनीच्या वतीने नऊ टोल नाक्यांवर पोलीस बंदोबस्तात टोल वसूल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आंदोलकांनी टोल नाक्यावरील कामगारांना हुसकावत टोल वसुली बंद पाडली.

सिंचन घोटाळा : पुरावे द्या, विनोद तावडेंना चितळे समितीचं पत्र

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 12:59

सिंचन घोटाळ्यासंदर्भातील पुरावे देण्यासंदर्भात चितळे समितीनं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडेंना पत्र पाठवले आहे. दरम्यान, मी सर्व पुरावे देणार आहे, अशी माहिती तावडे यांनी झी मीडियाला दिली.

श्रीनिवासन खूर्चीपासून वंचितच! पुन्हा चौकशीचे कोर्टाचे आदेश

Last Updated: Monday, October 7, 2013, 12:18

बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना बीसीसीआय अध्यक्षपदाचा पदभार अजूनही स्वीकारता येणार नाही. सुप्रिम कोर्टानं बीसीसीआयला नवी चौकशी समिती नेमण्याचा आदेश दिला आहे. त्यामुळं श्रीनिवासन यांना मोठा झटका सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

चितळे समितीची कार्यकक्षा अबाधित - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, October 5, 2013, 23:49

सिंचन प्रकल्पांविषयीच्या प्रस्तावांची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या डॉ. माधवराव चितळे चौकशी समितीची कार्यकक्षा यापूर्वीच निश्चित करण्यात आलीय, तिच्यात बदल करण्याचा प्रश्नच येत नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

खुशखबर! भाज्या स्वस्त होत आहेत…

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 08:46

बऱ्याच दिवसांनी नागरिकांना दिलासा देणारी चांगली बातमी मिळतेय. भाज्या स्वस्त व्हायला सुरुवात झालीय. त्यामुळे वाढलेल्या घरखर्चाला कंटाळलेल्या नागरिकांना थोड्या प्रमाणात प्रमाणात का होईना पण दिलासा मिळेल.

`दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक झालीच पाहिजे`

Last Updated: Saturday, September 21, 2013, 19:01

एक महिना उलटला तरी डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात पुणे पोलिसांना यश आलेलं नाही. डॉ. दाभोलकरांच्या मारेकऱ्यांना त्वरीत अटक करा, अशी मागणी करत अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी आज राज्यभर आंदोलन सुरु केलंय.

`चीनचा भारतीय जमिनीवर कब्जा नाही`

Last Updated: Friday, September 6, 2013, 20:16

भारताचा कुठलाही भूभाग चीनच्या ताब्यात जाऊ देण्याचा प्रश्नच नाही, असं सांगत संरक्षणमंत्री ए. के. अॅन्टोनी यांनी याबाबतची चर्चा निराधार असल्याचं म्हटलंय.

ऊस दराचा तिढा सुटणार!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:59

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.

स्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 11:05

स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

‘डबल डेकर’ बसला ठाणेकरांचा विरोध

Last Updated: Tuesday, July 9, 2013, 10:56

मुंबईत सध्या विरळाच दिसणाऱ्या डबल डेकर बस आता ठाण्याच्या रस्त्यांवर धावताना दिसणार आहे.

पंढरपुरात वारकरी दूर, व्हिआयपी `पास`!

Last Updated: Friday, June 21, 2013, 10:24

पंढरपूर मदिर समितीनं आषाढीला येणा-या लाखो वारक-यांचा विचार न करता व्हीआयपींच्या दर्शनाची सोय करत असल्याचं उघड झालंय.

`काँग्रेस मुक्त भारत निर्माण` हाच संकल्प- मोदी

Last Updated: Sunday, June 9, 2013, 18:13

आज गोव्यामध्ये जनतेसमोर केलेल्या भाषणात नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर हल्लाबोल करत `काँग्रेस हटाव`चा नारा दिला.

मोदींच्या नेतृत्वाखाली २०१४ची लोकसभा निवडणूक

Last Updated: Sunday, June 9, 2013, 14:38

भारतीय जनता पक्षाने २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचार प्रमुखपदी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावांची घोषणा करण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत.

लाख, दोन लाख म्हणजे काहीच नाही हो!

Last Updated: Saturday, June 1, 2013, 20:40

औरंगाबाद महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदी नारायण कुचे निवडून आलेत. ही निवडणूक जिंकण्यासाठी आपण कोणताही घोडेबाजार केला नाही, असा दावा त्यांनी केलाय.

‘पंतप्रधान तर सोनिया गांधींचंही ऐकत नाहीत’

Last Updated: Thursday, May 30, 2013, 20:10

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षेखालील ‘राष्ट्रीय सल्लागार समिती’तून (एनएसी) सामाजिक कार्यकर्त्या अरुणा रॉय यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतलाय. त्यांनी समितीतील आपल्या पदावरून राजीनामा दिलाय.

स्पॉट फिक्सिंग : रवी शास्त्री चौकशी समितीचे अध्यक्ष?

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 15:29

चेन्नई सुपर किंग्जचा मुख्य कार्यकारी अधिकारी गुरुनाथ मयप्पन याचा या फिक्सिंगमधील सहभागाची चौकशी करण्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाकडून (बीसीसीआय) तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येणार आहे.

2G घोटाळ्या प्रकरणी चाकोंना हटवण्याची मागणी

Last Updated: Thursday, April 25, 2013, 15:39

2G घोटाळ्या प्रकरणी नेमलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष पी सी चाको यांना हटवण्याच्या मागणीसाठी समितीच्या १५ सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेतलीय.

राष्ट्रकुल घोटाळा : कलमाडींवर फौजदारी खटला दाखल करा!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 13:42

पुण्यात २००८ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेत ३३ कोटींचा घोटाळा झाल्याचं स्पष्ट झालंय. याप्रकरणी सुरेश कलमाडींच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कंजुषी!

Last Updated: Monday, April 1, 2013, 18:22

श्रीमंत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळ निवारणासाठी केवळ 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीत मनसेची तोडफोड

Last Updated: Monday, March 25, 2013, 16:40

इंडियाबुल्सच्या ऑफिसवर हल्ला केल्यानंतर मनसैनिकांनी अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हल्लाबोल केला आहे. मनसैनिकांनी कृषी उत्पन्न बाजार समितीत तोडफोड केली.

दोन टेस्टसाठी आज निवड, सेहवागचं काय होणार?

Last Updated: Thursday, March 7, 2013, 11:31

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडियाची आज निवड होणार आहे. सध्या खराब फॉर्मात असलेल्या वीरेंद्र सेहवागच्या भवितव्याबाबत निवड समिती काय निर्णय घेते याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

कुस्तीला `ऑलिम्पिक २०२०`मधून वगळलं!

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 09:44

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं (आयओसी) कुस्तीला २०२०च्या ऑलिम्पिक खेळांमधून बाहेरचा रस्ता दाखवलाय.

शिवसेनेच्या हुतात्म्यांना बेळगावात अभिवादन

Last Updated: Friday, February 8, 2013, 19:10

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आज बेळगावात कोनवाळ गल्ली इथे अभिवादनाचा कार्यक्रम करण्यात आला. १९६९ साली सीमाप्रश्नावर झालेल्या आंदोलनात शिवसैनिक धारातीर्थी पडले होते. तसंच बाळासाहेब ठाकरेंनाही तुरुंगवास घडला होता.

बलात्कार दोषींना फाशीच्या शिक्षेची सूचना टाळली; वर्मा समितीचा अहवाल

Last Updated: Thursday, January 24, 2013, 12:45

दोषींच्या शिक्षेत वाढ करून ती २० वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि सामूहिक बलात्कारासाठी आजीवन कारावास अशा शिक्षेचा सूचना या समितीनं केलीय. पण, बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यावर मात्र या समितीनं टाळाटाळच केलीय.

गाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री

Last Updated: Sunday, November 25, 2012, 15:57

कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.

२०१४ लोकसभा निवडणूक : राहुलवर जबाबदारीची धुरा

Last Updated: Thursday, November 15, 2012, 22:11

राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षात अखेर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेस समन्वय समितीचे ते अध्यक्ष असतील.

सरकारविरोधात राणेंचा कोकणात मोर्चा

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 00:03

माधव गाडगीळ समितीच्या शिफारशींमुळे कोकणात नव्या प्रकल्पांना मंजुरी मिळत नाही. त्यामुळे गाडगीळ समितीच्या शिफारशींविरोधात सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला.

ठाण्याच्या तिजोरीच्या चाव्या काँग्रेसकडे; फाटक विजयी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 12:50

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक पार पडली. यानिवडणुकीत आघाडी गटाचे उमेदवार रवींद्र फाटक यांनी बाजी मारलीय.

ठाण्याची निवडणूक स्थायी; पक्षांचं चित्त नाही ठायी

Last Updated: Tuesday, October 16, 2012, 09:42

ठाणे महापालिका स्थायी समितीची आज निवडणूक होतेय. या निवडणुकीत कोण बाजी मारतंय याकडं साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.

कुंबळे आयसीसीच्या समिती अध्यक्षपदी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 15:56

भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळे यांची आज सर्वसंमत्तीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. यापूर्वी या पदावर वेस्ट इंडिजचे महान खेळाडू क्लाइव्ह लॉईड हे होते.

`कानडी` दडपशाही... कार्यकर्त्यांची धरपकड

Last Updated: Thursday, October 11, 2012, 09:30

बेळगावमध्ये कानडी दडपशाहीनं कळस गाठलयं. मराठी भाषकांचा विरोध डावलून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या विधानभवनाचं उद्घाटन होतयं.

आज बेळगाव विधानभवनाचं उद्घाटन... विरोध शिगेला

Last Updated: Thursday, October 11, 2012, 09:06

कर्नाटक सरकारनं बेळगावात बांधलेल्या विधानभवनाचं आज उदघाटन होणार असून या कार्यक्रमाला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. मात्र, या उदघाटन कार्यक्रमास राष्ट्रपतींनी येऊ नये, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीबरोबर शिवसेनेनंही केलीय.

कलमाडी, राजा यांची संसदेत पुन्हा वर्णी

Last Updated: Thursday, October 4, 2012, 10:19

भ्रष्ट्राचाराचे आरोप असणाऱ्या नेत्यांवर केंद्र सरकारने पुन्हा मर्जी दाखवली आहे. ए. राजा आणि सुरेश कलमाडी यांची नव्याने स्वतंत्र स्थायी समित्यांवर नियक्ती केली आहे.

संदीप पाटील निवड समितीचे नवे अध्यक्ष

Last Updated: Thursday, September 27, 2012, 15:49

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या आज होणा-या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बीसीसीआयच्या सिलेक्शन कमिटीत फेरबदल करण्यात आलेले आहे.

‘...तर टोल नाही, टोला देणार’

Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:41

काहीही झालं तर टोल देणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम असणाऱ्या कोल्हापूरकरांच्या संतापात आणखी भर पडलीय.

अजूनही स्थायी समिती नाहीच, ठाणेकर संतप्त

Last Updated: Saturday, August 18, 2012, 09:36

ठाणे पालिकेच्या स्थायी समितीसाठी राजकारण्यांमध्ये सुरु असलेल्या स्पर्धेमुळं सामान्य जनतेचे हाल होत आहेत. निधी अभावी अनेक कामं रखडली आहेत. त्यामुळं संतप्त ठाणेकरांनी नेत्यांना आंदोलनाचा इशारा दिलाय.

नगरसेवक होणार 'मालामाल'

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 19:06

मुंबई महापालिकेचे नगरसेवक मालामाल होणार आहेत. प्रत्येक नगरसेवकाला आता महिन्याला २५ हजार रुपये मानधन म्हणून मिळणार आहेत. सोबतच लॅपटॉप आणि एण्ड्रॉइड फोनचीही सुविधा आता नगरसेवकांना महापालिकेकडूनच मिळणार आहे.

'अनुदान नको; हवीय फक्त मान्यता'

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 14:37

राज्यातल्या विविध जिल्ह्यांतील १०० मराठी माध्यमाच्या शाळांना मान्यता द्यावी या मागणीसाठी आज मराठी अभ्यास केंद्र आणि शिक्षण हक्क समन्वय समिती आझाद मैदानात दुपारी दोन वाजता आंदोलन करणार आहे.

आवक घटली, भाज्या कडाडल्या...

Last Updated: Saturday, July 14, 2012, 12:20

पावसानं ओढ दिल्यानं मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसांपासनं भाज्यांची आवक कमी झालेली दिसून येत आहे. भाज्यांचे भाव १० ते १५ टक्क्यांनी वाढलेले दिसतात.

एमआरआय मशिन घोटाळा: कारवाई कधी?

Last Updated: Tuesday, June 19, 2012, 11:49

मुंबई महापालिकेत एमआरआय मशीन खरेदीत घोटाळयाची बातमी ‘झी 24 तास’वर दाखवल्यावर महापालिकेनं त्याची दखल घेतली आहे. महापालिकेनं 80 कोटीच्या नवीन वैद्यकीय साहित्याची MRP किंमत तपासूनच व्यवहार करावा, अशी सूचना स्थायी समिती अध्यक्षांनी केलीय.

प्रशासनाचा व्यर्थ अर्थसंकल्प...

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 20:21

पिंपरी-चिंचवडमध्ये ज्या अर्थसंकल्पाची अंमलबजावणी तीन महिन्यापूर्वीच सुरु झालीय तो अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. महापालिकेचा अर्थसंकल्प २,८६२.५४ कोटी रुपयांचा असणार आहे. विशेष म्हणजे हा अर्थसंकल्प प्रशासनानं सादर केल्यामुळं त्यामध्ये नगरसेवकांची कोणतीही भूमिका नव्हती.

'पंतप्रधानांबद्दल आदर, पण चौकशी व्हायलाच हवी'

Last Updated: Wednesday, May 30, 2012, 18:48

भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले तर सार्वजनिक जीवनातून संन्यास घेण्याची घोषणा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केल्यानंतर टीम अण्णानं या आरोपांच्या स्वतंत्र चौकशीची मागणी केलीय. इतकंच नाही तर, हे आरोप खोटे ठरले तर आपल्याला खूप आनंद होईल, असंही टीम अण्णानं म्हटलंय.

रिक्षाभाडंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार?

Last Updated: Thursday, May 24, 2012, 12:11

रिक्षासाठी किमान भाडे ३४ रुपये करण्याची मागणी मुंबई ऑटो रिक्षामेन्स युनियनचे नेते शरद राव यांनी केलीय.

साई संस्थानाच्या विश्वस्तांची उधळपट्टी

Last Updated: Thursday, April 12, 2012, 14:45

शिर्डीतील साई संस्थानच्या तिजोरीचा अध्यक्ष-विश्वस्त आणि कार्यकारी अधिकाऱ्यांकडूनच गैरवापर होत असल्याचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. संस्थानच्या विश्वस्तांनी मोबाईल बिलावर हजारो रुपयांची उधळपट्टी केल्याचं उघडकीस आलंय.

जगदीश शेट्टीच्या निवडीनंतर राष्ट्रवादीत हलचल

Last Updated: Saturday, April 7, 2012, 23:19

पुण्यातील पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे जगदीश शेट्टी यांची निवड झालीय. नवनाथ जगताप यांच्या माघारीने ही निवड बिनविरोध झाली. शेट्टी हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आहेत. तसंच शहराध्यक्ष आझम पानसरे यांच्या गटातले मानले जातात. शेट्टी यांना राष्ट्रवादीच्याच आमदारांचा विरोध असल्यानं निवडीत चुरस होण्याची शक्यता होती. मात्र जगताप यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं शेट्टी यांचा मार्ग सुकर झाला.

ठाणे स्थायी समिती निवडणूक रेंगाळलेलीच

Last Updated: Thursday, April 5, 2012, 08:55

ठाण्यातील महापौर निवडणूकीची रणधुमाळी संपली तरी अजून स्थायी समितीची निवडणूक रेंगाळली आहे. त्यातच सत्ताधारी शिवसेना महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आघाडीला समसमान पाठिंबा आहे.

शिर्डी संस्थानाला हायकोर्टाचा पुन्हा दणका

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 13:56

शिर्डी संस्थानाला हायकोर्टानं पुन्हा दणका दिलाय. तत्कालीन विश्वस्त मंडळ आणि आजी माजी नगराध्यक्षांना घोटाळ्यासंदर्भात स्पष्टीकऱण देण्याचे आदेश हायकोर्टानं दिलेत. स्पष्टीकरण देण्यासाठी हायकोर्टानं तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

कल्याणात स्टॅडिंग, सेना आणि मनसेत अंडरस्टॅडिंग?

Last Updated: Tuesday, April 3, 2012, 15:42

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या निवडणुकीत मनसेने तटस्थ राहत शिवसेनेचा मार्ग मोकळा करुन दिला. त्यामुळेच शिवसेनेचे मल्लेश शेट्टी स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले आहेत.

महालक्ष्मी मंदिरात दानपेटी बसवण्यावरुन वाद

Last Updated: Sunday, April 1, 2012, 15:47

महालक्ष्मी मंदिरातल्या दानपेटीवरून देवस्थान समिती आणि पुजा-यांमधले वाद नवीन नाहीत. देवस्थान समितीनं जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिक्षकांच्या उपस्थितीत मंदिरात दोन दानपेट्या बसवल्या.

शिर्डीच्या नव्या ट्रस्टला स्थगिती

Last Updated: Friday, March 30, 2012, 16:21

शिर्डी संस्थानच्या नव्या विश्वस्त मंडळाच्या निवडीला औरंगाबाद खंडपीठानं स्थगिती दिलीय. औरंगाबाद खंडपीठानं विश्वस्त मंडळाच्या नेमणुकीसंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश 2010 मध्ये दिले होते.

स्थायीसाठी घाई, राज भेटीला तीन सेना आमदार!

Last Updated: Thursday, March 29, 2012, 19:04

ठाणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे तीन आमदारांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. स्थायी समितीच्या निवडणुकीत आम्हांला गृहीत धरण्यात आल्याने आम्ही काँग्रेस राष्ट्रवादीला पाठिंबा देत असल्याचे राज यांनी स्पष्ट केल्यानंतर सेनेमध्ये धावपळ सुरू झाली.

आता माझी सटकली - राज ठाकरे

Last Updated: Thursday, March 29, 2012, 16:51

महाराष्ट्र नवनिर्माण सेनने ठाणे महापालिकेच्या स्थायी समितीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. हा नाशिकचा वचपा नाही असं यासंदर्भात राज ठाकरे म्हणाले आहेत.

साईंच्या दरबारात राजकारणीच संस्थानिक

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 21:45

हायकोर्टाच्या बडग्यानंतर शिर्डीच्या साई संस्थानचं नवं विश्वस्त मंडळ राज्य सरकारनं जाहीर केलं. परंतु नव्या चेहऱ्यांच्या विश्वस्त मंडळात जुनाच राजकीय फॉर्म्यूला आणत राज्यकर्त्यांनी पुन्हा एकदा आपली राजकीय सोयच पाहिली आहे.

शिर्डी साईसंस्थान विश्वस्तांची नवी यादी

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 08:25

मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिलेल्या डेडलाईन संपण्यासाठी काही तासच शिल्लक असताना सरकारनं शिर्डीच्या साईसंस्थानच्या विश्वस्तांची यादी जाहीर केली आहे. नवी विश्वस्तांची यादी जाहीर करताना संस्थानचे अध्यक्ष जयंत ससाणे यांना अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे.

शिर्डी संस्थान समितीला दणका

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:04

शिर्डी संस्थानची समिती बरखास्त करुन येत्या १५ दिवसांत नवीन समिती स्थापन करा, असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठानं सरकारला दिलाय. १५ दिवसांत राज्य सरकारनं ही समिती नेमली नाही, तर साई संस्थानाची सूत्र ३ सदस्यीय समितीकडे जाणार आहेत. दररोज एक कोटी रुपयांचं उत्पन्न असलेल्या शिर्डी संस्थानच्या विश्वस्तांना हा दणका मानण्यात येत आहे.

'सेहवाग का नाही'?... अन् श्रीकांत चिडले?

Last Updated: Wednesday, February 29, 2012, 17:08

एशिया कपसाठी आज टीम इंडिया जाहीर करण्यात आली. वीरेंद्र सेहवाग, जहीर खान आणि उमेश यादव यांना विश्रांतीच्या नावाने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील खराब कामगिरी करणाऱ्या सेहवागच्या जागी विराट कोहलीला उपकर्णधार पद बहाल करण्यात आले आहे.

मिनी विधानसभेसाठी मतदानाला सुरुवात

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 12:37

मिनी विधानसभा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी आज राज्यातील मतदार आपला कौल देतील. राज्यात २७ जिल्हा परिषदा आणि ३०५ पंचायत समित्यांसाठी निवडणुकांसाठी मतदानाला सुरवात झाली आहे.

पुण्यात महापौर विरूद्ध स्थायी समिती अध्यक्ष

Last Updated: Monday, February 6, 2012, 23:50

पुण्यात प्रभाग ३९ ब मधली महापौर मोहनसिंग राजपाल विरुद्ध स्थायी समिती अध्यक्ष गणेश बीडकर यांच्यातही लढत चुरशीची ठरणार आहे. उमेदवारांबरोबरच या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नक्षलवाद्यांकडून भामरागड सभापतींची हत्या

Last Updated: Saturday, January 28, 2012, 11:42

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षलवाद्यांनी धुडगूस घातला आहे. भामरागड पंचायत समितीचे सभापती बहादुरशहा आलम यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकारामुळे नक्षलवादी पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सिंधुदुर्गात ८० मतदान केंद्र संवेदनशील

Last Updated: Wednesday, January 18, 2012, 16:46

सिंधुदुर्गात १०४६ पैकी एकूण ८० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्वाधिक ३३ मतदान केंद्रे कुडाळ तालुक्‍यात आहेत.

नाशिकः कांदा व्यापाऱ्यांची मनमानी

Last Updated: Monday, January 9, 2012, 13:06

नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव घसरले असतानाच व्यापा-यांनी खरेदी-विक्री बंदचं हत्यार उगारलं आहे. कोट्यवधींची थकबाकी असलेल्या लेव्ही वसुलीच्या नोटीसा व्यापा-यांना जिल्हाधिका-यांनी बजावल्या आहेत. त्यामुळं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्या आजपासून बंद ठेवण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतला.

सीमाभागातल्या मराठी जनतेला न्याय मिळेल...

Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:53

पी.के.पाटील-महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष
राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. सीमा भागातील मराठी बांधवांनी गेली ५६ वर्षे झालेल्या अन्यायाच्या विरोधात तीव्र आंदोलन केलं आहे. या आंदोलनात दोन पिढ्या बरबाद झाल्या हे विसरून चालणार नाही. गेली पन्नास वर्षाहून अधिक काळ ही चळवळ थांबली नाही. सीमा भागातील मराठी बांधव शांततेच्या मार्गाने आपल्या न्याय मागणीसाठी हा लढा देत आहेत.