राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

विहीर ढासळून 8 मजूर गाडले गेले, एकाचा मृतदेह हाती

Last Updated: Friday, June 20, 2014, 20:32

सोलापूरतल्या सांगोला तालुक्यात एक दुर्दैवी घटना घडलीय, दुष्काळ ग्रस्त भागात पाण्यासाठी आठ जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

बारामतीजवळच्या मुर्टी गावाची व्यथा, पवार साहेबांचं लक्ष कुठे?

Last Updated: Monday, November 4, 2013, 14:55

गेल्या तीन वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळं पिचलेल्या जनतेला यंदा पावसानं दिलासा दिला. मात्र आकाशातून पडलेलं पाणी केवळ कागदोपत्रीच साठवलं गेल्याचं चित्र अनेक भागात दिसतंय. पाझर तलाव आहेत, पण कोरडे... बारामतीजवळ असलेल्या मुर्टी गावाची ही व्यथा कमी-अधीक प्रमाणात अनेक ठिकाणी भेडसावतेय. याविरोधात एका अंध व्यक्तीनं आवाज उठवलाय.

... इथे येते देवाची प्रचिती!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 21:31

देव आहे किंवा नाही याबाबत मतभेद असू शकतात. मात्र पुणे जिल्ह्यातल्या पिंगोरी गावच्या लोकांना देव असल्याची प्रचीती आलीय...

मराठवाड्यासाठी खूशखबर... जायकवाडीचा पाणीसाठा वाढला!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 18:01

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्यातील जनतेसाठी एक चांगली बातमी आहे. जायकवाडीचा पाणीसाठा सध्या ३२.७९ टक्क्यांवर पोहोचला आहे. म्हणजे आज संध्याकाळपर्यंत हा पाणीसाठा ३३ टक्क्यांवर पोहोचण्याची शक्यता आहे.

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

कर्नाटकनं पाळला ‘पाणी’धर्म, दुष्काळग्रस्त `जत`ला दिलासा!

Last Updated: Monday, September 30, 2013, 12:12

दुष्काळग्रस्त जत तालुक्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. या परिसराला कर्नाटकचं पाणी मिळणार आहे. मुख्यमंत्री आणि वनमंत्री पतंगराव यांच्या प्रयत्नांना यश आलंय.

ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, September 29, 2013, 23:02

धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

विदर्भात ओला दुष्काळ, मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

Last Updated: Thursday, August 1, 2013, 17:53

विदर्भातल्या अतिवृष्टीमुळे मुख्यमंत्र्यांनी अखेर मदत जाहीर केलीय. अतिवृष्टीवरील चर्चेला उत्तर देताना मदत जाहीर केलीय. यंदा विदर्भात पावसानं अक्षरश: धुमाकूळ घातलाय.

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:24

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा...

Last Updated: Monday, July 22, 2013, 23:29

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं.

दुष्काळात पिंपरीच्या नगरसेवकांचा ब्राझिल दौरा!

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 20:12

पिंपरी-चिंचवडचे नगरसेवक जीवाचं ब्राझील करायला निघाले आहेत. राज्य दुष्काळानं होरपळतंय. पण पिंपरीतल्या असंवेदनशील नेत्यांना ब्राझीलचा दौरा महत्वाचा वाटतोय.

पाण्याच्या शोधात फिरणाऱ्य़ा हरिणाचा बळी

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 18:10

नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात पाण्याच्या शोधात फिरणा-या हरणाचा सहावा बळी गेलाय. दुष्काळामुळे जंगलातले पाण्याचे स्त्रोत आटत चाललेत.

राहुल गांधी आज मराठवाडा दौऱ्यावर...

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 12:56

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आज दुष्काळग्रस्त मराठवाड्याच्या दौर्‍यावर येत आहेत. या दौर्‍यात ते औरंगाबाद जिल्ह्यातील शेतकरी आणि मजुरांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहेत.

दुष्काळाने पळवली साखर!

Last Updated: Sunday, May 26, 2013, 19:14

राज्यात पडलेल्या भयाण दुष्काळाचा परिणाम साखर उत्पादनावरही दिसून आलाय. 2012-13 या संपलेल्या गळीत हंगामात साखरेच्या उत्पादनात 10 लाख मेट्रिक टनाने घट झालीय.

‘पाऊस पडू द्या, मग पेरणीचं पाहू`

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 09:18

दुष्काळामुळं पाण्याचे दुर्भिक्ष आणि पावसाच्य़ा बेभरवशीपणामुळं यंदा खानदेशातल्य़ा कापूस पट्ट्यात मान्सूनपूर्व पेरण्याच झालेल्या नाहीत.

आयपीएल आणि महाराष्ट्रातला दुष्काळ!

Last Updated: Thursday, May 16, 2013, 18:40

आयपीएल म्हणजे इंडियन पाप लीग..क्रिकेटच्या या पाप लीगमुळे भारतीय क्रिकेटचं नुकसानंच झालंय. एकीकडे महाराष्ट्रात दुष्काळ असताना क्रिकेटला बदनाम करणा-या लीग गरजच काय असा प्रश्नही उपस्थित होतोय.

दुष्काळामुळे सापडलं पाण्याखालचं गाव!

Last Updated: Wednesday, May 15, 2013, 21:33

दुष्काळानं आज आवघा महाराष्ट्र होरपळतोय.... राज्यातली जनता पाण्यासाठी हवालदिल झालीय. पण या दुष्काळामुळे पुणे जिल्ह्यात पाण्याखाली गेलेलं एक गाव सापडलंय.

सलमान खानतर्फे बीडला १०० पाण्याच्या टाक्या

Last Updated: Wednesday, May 8, 2013, 18:35

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातल्या जनतेला अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात दिलाय. त्याच्या बिईंग ह्युमन या संस्थेनं पाठवलेल्या 100 पाण्याच्या टाक्या बीडमध्ये दाखल झाल्यात.

दुष्काळग्रस्तांच्या नरड्यावर ‘काँग्रेसचा हात’!

Last Updated: Tuesday, May 7, 2013, 10:57

दुष्काळग्रस्तांच्या पैशावर काँग्रेसचा प्रचार सुरु असल्याची धक्कादायक बाब उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आलीय.

दुष्काळग्रस्तांसाठी IPLचा सामना घ्यावा – वेंगसरकरांचा पुढाकार

Last Updated: Monday, May 6, 2013, 18:24

इंडियन प्रिमियर लीगच्या फायनल मॅचनंतर दुष्काळग्रस्तांसाठी आणखी एक फायनल मॅच खेळवावी मागणी भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन दिलीप वेंगसरकर यांनी केलीय.

राज ठाकरेंनी आझमींना खडसावले

Last Updated: Monday, May 6, 2013, 17:07

दुष्काळाच्या मुद्यावरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांच्यात टोला प्रतिटोल्याचे राजकारण सुरू आहे. राज ठाकरेंच्या दुष्काळी दौऱ्यावर तोंडसुख घेतले तर अबू आझमी हे बाहेरच्या राज्यातून आलेला लाचार असल्याचा प्रतिटोला राज ठाकरे यांनी लगावला.

दुष्काळाच्या सावटाखाली पैशाची उधळपट्टी

Last Updated: Sunday, May 5, 2013, 19:57

राज्यात दुष्काळाच सावट असताना अनेक ठिकाणी पैशाची उधळपट्टी मात्र सुरूच आहे. पुण्याजवळ खेड तालुक्यात निमगाव इथं सेना-भाजपच्या वतीन बैलागाड्यांच्या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं.

राज ठाकरेंची पुन्हा सत्ताधाऱ्यांवर टीका

Last Updated: Saturday, May 4, 2013, 20:09

यावर्षीचा दुष्काळ सरकारच्या नाकर्तेणामुळे आला असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली आहे. ते बीडमध्ये बोलत होते.

ठाकरे काका-पुतणे दुष्काळी दौऱ्यावर

Last Updated: Saturday, May 4, 2013, 14:37

दुष्काळग्रस्त भागाच्या दौ-यावरुन ठाकरे विरुद्ध ठाकरे असं चित्र पाहायला मिळतंय... ठाकरे काका-पुतणे दुष्काळग्रस्त भागात फिरतायत.

दुष्काळग्रस्तांसाठी सलमान खानचा मदतीचा हात

Last Updated: Friday, May 3, 2013, 18:22

दुष्काळात होरपळत असलेल्या मराठवाड्याला बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं मदतीचा हात पुढे केलाय. त्याच्या ‘बिइंग ह्युमन फाऊंडेशन’द्वारे सलमान मराठवाड्यात 2500 पाण्याच्या टाक्यांचं वाटप करणार आहे.

दुष्काळग्रस्तांना मदत, मनसेचे बिसलेरीविरोधात आंदोलन

Last Updated: Thursday, April 25, 2013, 10:51

राज्याला दुष्काळाचे भयाण चटके बसत असताना बिसलेरीसारख्या पाणी विकणा-या कंपन्या राज्याचेच पाणी वापरुन कोट्यवधी रुपये कमावत आहे.

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला आशा भोसले धावल्या

Last Updated: Wednesday, April 24, 2013, 20:00

प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले यांनी दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घेतलाय. त्यांनी आर्थिक मदत केली आहे. आज आशा भोसले यांनी पाच लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केलाय.

यंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडणार!

Last Updated: Wednesday, April 17, 2013, 21:28

महाराष्ट्रात यंदा मान्सून सामान्य असणार आहे किंवा त्यापेक्षाही जास्त पडणार आहे. येत्या दोन महिन्यात दुष्काळी महाराष्ट्राचं चित्र बदलून हिरवंगार होण्याची शक्यता आहे.

ऐतिहासिक `पलंग बारव` दोनशे वर्षांनी कोरडा!

Last Updated: Sunday, April 14, 2013, 22:39

दुष्काळाची दाहकता जालन्यात आणखीच भीषण झाली आहे. दुष्काळामुळे विहिरी तर आटल्याच पण जालन्यात प्रसिद्ध असलेली दोनशे वर्षापूर्वीची पलंग बारवही या दुष्काळाचा बळी ठरली.

`अजितदादांचं वक्तव्यं चुकीचंच होतं`

Last Updated: Saturday, April 13, 2013, 15:27

‘अजित पवारांचे `ते` वक्तव्य चुकीचंच होतं, यापुढे अजितदादांनी जपून बोलावं’ असं म्हणत शरद पवारांनी टोचले अजितदादांचे चांगलेच कान टोचलेत.

शरद पवार म्हणतात...

Last Updated: Saturday, April 13, 2013, 15:22

ठाणे - ठाण्यात शरद पवार पत्रकारांना सामोरे गेले. पाहुयात यावेळ त्यांनी कोणकोणत्या विषयांवर आणि काय भाष्य केलंय...

आकांत : दुष्काळाला कंटाळून मोसंबीची बाग दिली पेटवून

Last Updated: Friday, April 12, 2013, 14:27

दुष्काळाच्या ग्रहणाला कंटाळून औरंगाबादमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या जीवापाड जपलेली मोसंबीची बाग पेटवून दिलीय. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सांजखेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडलीय.

मुंबई करणार दुष्काळग्रस्तांना मदत!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 13:26

मुंबई महापालिकेनं दुष्काळग्रस्त भागांना पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

गोपीनाथ मुंडेंनी घेतले उपोषण मागे

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 18:02

राज्यात दुष्काळाचे गहिरे संकट आहे. मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाचे उपनेते आणि खासदार गोपीनाथ मुंडे यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. आज मुंडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.

शेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी

Last Updated: Monday, April 8, 2013, 20:57

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

दुष्काळावर शेतकऱ्याची नामी शक्कल !

Last Updated: Thursday, April 4, 2013, 17:10

दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.

दुष्काळामुळे आदिवासी भिकेला...

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 15:47

दुष्काळामुळं येवल्यातील तळवाडे, शिवाजीनगर आणि ममदापूर भागात रोजगार राहिलेला नाही. रोजगाराचं दुसरं साधन नाही.

IPL : सामान्यांचं पाणी सामन्यांना!

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 09:46

महाराष्ट्रात दुष्काळानं थैमान मांडलय. दुष्काळग्रस्ताचे डोळ्यातलं पाणी तर केव्हाच आटलंय.

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीची कंजुषी!

Last Updated: Monday, April 1, 2013, 18:22

श्रीमंत असलेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं दुष्काळ निवारणासाठी केवळ 11 लाख 11 हजार 111 रुपयांचा निधी दिला आहे.

नाशिक मनपाकडूनच पाण्याची नासाडी!

Last Updated: Thursday, March 28, 2013, 22:08

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शहरात एक वेळ पाणी कपात सुरु आहे. मात्र आज चक्क पे एँड पार्क धुण्यासाठी महापालिकेनंच टँकर पाठवून पाण्याची नासाडी केल्यानं नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

देहविक्री करणाऱ्या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे

Last Updated: Monday, March 25, 2013, 18:29

दुष्काळग्रस्तांच्या मदतीला समाजाच्या सर्व थरातून मदत उभी केली जात आहे. दुष्काळात होरपळत असलेल्या महाराष्ट्राचं चित्र पाहून पूर्वी देहविक्री करणा-या महिला दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत.

दुष्काळासाठी असणारा पैसा जातो कुठे?- राज

Last Updated: Monday, March 25, 2013, 00:07

गेल्या काही सभांमधून राज ठाकरे अजितदादांना सातत्यानं लक्ष्य करत आहेत. अमरावतीतल्या सभेतही अजितदादांना लक्ष्य केलं. सिंचनकामांचे ७० हजार कोटी रुपये गेले कुठे ? असा सवाल त्यांनी केला.

पाण्यानंतर आता दुधाची टंचाई!

Last Updated: Sunday, March 24, 2013, 17:02

सांगली जिल्ह्यातील तीव्र दुष्काळाचा परिणाम पशुधनावर झाला आहे. चारा छावण्यांमुळे पशुधन काही प्रमाणात तगले असले, तरी दुध संकलनात मोठी घट झाली आहे. जिल्ह्यातील दुध संकलन तीन महिन्यात एक लाख लिटरने घटले आहे. मागील एका महिन्यातच 50 हजार लिटरनं दुध संकलन कमी झालं आहे.

... आणि इथं दुष्काळही हरला! (जागतिक जल दिन)

Last Updated: Friday, March 22, 2013, 09:08

मराठवाड्यातल्या औरंगाबाद जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत चाललीय. टँकरही पाण्याची समस्या सोडवू शकलेले नाहीत. अशा भीषण परिस्थितीत दौलताबाद ग्रामपंचायतीने जलफेरभरणाचा आगळावेगळा उपक्रम राबवून दुष्काळावर मात केलीय. जागतिक जल दिनी ‘झी २४ तास’चा हा खास रिपोर्ट...

पाण्याविना बिबट्यानं अन् हरणानं गमावले प्राण!

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 17:39

कडक उन्हाळा आणि दुष्काळाची वाढती भीषण दाहकता यामुळे पाण्याकरता वणवण भटकणाऱ्या गावकऱ्यांचं दृश्य काही नवीन नाही. मात्र, अशीच काहीशी परिस्थिती आता वन्य प्राण्यांचीही होताना दिसते य. पाण्याच्या शोधात एका बिबट्यानं तसंच एका हरणानं आपले प्राण गमावलेत.

बापूंच्या कार्यक्रमांवर बंदी, सरकारचे वराती मागून घोडे

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 19:05

आसाराम बापूंना अखेर राज्य सरकारने दणका दिला आहे. होळी संपेपर्यंत त्यांच्या होळीसंदर्भातील सर्व कार्यक्रमांना महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे. गृहमंत्र्यांनी विधीमंडळात यासंदर्भात घोषणा केली आहे. मात्र राज्य सरकारची ही कारवाई म्हणजे `वराती मागून घोडे` अशी झाली आहे.

पाण्यासाठी प्राण्यांची वणवण

Last Updated: Sunday, March 17, 2013, 23:59

दुष्काळाचे चटके माणसांबरोबरच प्राण्यांनाही बसू लागले आहेत. दुष्काळाने नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यात नागरिकांबरोबर भटकणारी हरणेही तहानली आहेत. कासावीस झालेल्या या हरणांचा विहिरीत पडून मृत्यू होत आहे.

वणीमध्ये राज ठाकरेंचं तुफान स्वागत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 21:16

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आज यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथे तुफानी स्वागत झालं. १५ ते २० हजार तरुण कार्यकर्त्यांच्या हजेरीत राज ठाकरे यांचे वणी येथे आगमन होताच कार्यकर्त्यांनी एकाच जल्लोष केला.

अवकाळी पावसाची अवदसा; राज्याला जोरदार फटका

Last Updated: Saturday, March 16, 2013, 16:40

दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या राज्याला कालपासून अवकाळी पावसानं चांगलाच दणका दिला. वीजांच्या कडकडाटासह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली.

पाण्याअभावी... मोरांचा तडफडून मृत्यू!

Last Updated: Saturday, March 16, 2013, 09:20

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यात सात मोरांचा पाण्याअभावी तडफडून मृत्यू झालाय.

राज्यातला दुष्काळ उसाच्या मळ्यांसाठी लागू नाही

Last Updated: Friday, March 15, 2013, 14:18

राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे, असं असतानाही पश्चिम महाराष्ट्रात ऊसाचे मळे मात्र फुललेले दिसत आहेत.

मनसे म्हणतंय... रद्दी द्या रद्दी!

Last Updated: Friday, March 15, 2013, 10:31

दुष्काळात होरपळणा-या जनतेला मदत करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावलेत. यासाठी नवनवीन कल्पना ते राबवताना दिसतायत. मुंबईत मनसेच्या लोकप्रतिनिधीने राबविलेल्या संकल्पनेनं तर अनेकांच्या भुवयाच उंचावल्यात...

दुष्काळ निवारणासाठी सरकारच्या नव्या घोषणा

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 19:43

राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात 25 टक्के निधीची तरतूद करण्यात आली आहे. सध्या राज्यात 2400 टँकर्सनी पाणीपुरवठा होतोय. येत्या काही काळात ही संख्या पाच हजारांवर जाण्याची शक्यता आहे.

दुष्काळासाठी केंद्राची १२०७ कोटीची मदत जाहीर

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 11:15

राज्यातल्या दुष्काळाग्रस्तांसाठी १२०७ कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिल्लीत या पॅकेजची घोषणा केली.

दुष्काळग्रस्तांच्या समस्येवर तोडगा निघू शकेल?

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:08

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झालंय. दुष्काळानं होरपळलेल्या जनतेचे, शेती करपून गेलेल्या शेतकऱ्यांसह अनेकांचे डोळे लागलेत ते याच अधिवेशनाकडे...

अर्थसंकल्पीय अधिवेशन दुष्काळावरून गाजणार

Last Updated: Monday, March 11, 2013, 09:25

राज्याच्य़ा विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होतंय. अनेक विषयांमध्ये सरकार अपयशी ठरल्याचं भांडवल विरोधक करणार असल्यानं हे अधिवेशन वादळी ठरणार, हे स्पष्ट आहे. राज्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे.

सांगलीमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या?

Last Updated: Sunday, March 10, 2013, 16:57

दुष्काळग्रस्त सांगली जिल्ह्यात शेतक-याच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. बोरगी गावातील विजयकुमार बरडोल या शेतकऱ्यानं विष पिऊन आत्महत्या केली आहे.

‘योजनांचा सुकाळ, राज्यात मात्र दुष्काळ’

Last Updated: Friday, March 8, 2013, 14:07

दुष्काळावर राज्यसभेत उत्तर देताना केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सरकारी योजनांवर खापर फोडलंय.

दुष्काळग्रस्त भागांना मनसेची मदत

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 21:46

दुष्काळग्रस्त भागात तातडीने चारा छावण्या उभारण्याचे आदेश, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिका-यांना दिले आहेत. औरंगाबाद,. जालना, बीड, सोलापूरमध्ये दुष्काळग्रस्त भागात तातडीने मदत यंत्रणा कार्यरत होणार आहे.

विहिरींना पाणी न लागल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 12:39

महाराष्ट्रात भीषण दुष्काळ जाणवत आहे. या दुष्काळाला नागरिक त्रस्त झाले आहेत. हा दुष्काळ आता जीवावर उठला आहे. पाणी नसल्याने दोन विहिरी खोदूनही पाणी न लागल्यानं निराश झालेल्या औरंगाबादेतल्या एका शेतक-यानं आत्महत्या केलीये.

मराठवाड्यात दुष्काळ, आश्वासनांचा पाऊस

Last Updated: Tuesday, March 5, 2013, 18:40

मराठवाड्यात तीव्र दुष्काळ असताना, आश्वासानांचा मात्र पाऊस पडताना दिसतोय. गेल्या महिनाभरात शरद पवारांपासून ते राज ठाकरेंपर्यंत सर्वच सत्ताधारी आणि विरोधकांनी मराठवाड्याचा दौरा केलाय. मात्र या दौ-यांत दुष्काळग्रस्तांना पदरात पडलीय फक्त निराशाच....

दुष्काळग्रस्त गावात आनंदाचे झरे!

Last Updated: Monday, March 4, 2013, 10:53

मावळच्या कुशीत वडेश्वरच्या डोंगरावर विसावलेली सटवाईवाडी. पावसाळ्याचे दिवस वगळता आठही महिने पाचवीला पुजलेली पाणीटंचाई... पण आज या गावचं चित्र पालटलय. टाटा मोटर्सच्या सुमंत मुळगावकर फौंडेशनने वर्षभरापूर्वी एका जिवंत झ-याचा आधार घेत तळे खोदायला सुरुवात केली. गावक-यांनीही श्रमदान केले. अन् बघता बघता तळे उभे राहिले…

छगन भुजबळ दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर

Last Updated: Sunday, March 3, 2013, 23:50

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..

पवार साहेब दुष्काळ आहे IPLच्या मॅचेस बंद करा- राज

Last Updated: Sunday, March 3, 2013, 10:05

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला. शरद पवार कायम पोरकट म्हणून मला हिणवतात म्हणून त्यांच्यासाठी काही पोरकट प्रश्न मी आणले आहेत.

दुष्काळ निवारणासाठी राज ठाकरे पुढे सरसावले....

Last Updated: Friday, March 1, 2013, 15:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा सध्या महाराष्ट्र दौरा सुरू आहे. त्यांच्या ह्या दौऱ्यात त्यांनी राजकीय नेत्यांवर केलेल्या टीकांमुळे त्यांचा हा दौरा चांगलाच रंगतो आहे.

दुष्काळावर राष्ट्रवादी काँग्रेसची बनवाबनवी

Last Updated: Monday, February 25, 2013, 23:57

दुष्काळग्रस्तांना मदत उभारण्यासाठी राष्ट्रवादी दुष्काळग्रस्त सहायता अभियान सुरू केलंय. यासाठी एक पुस्तिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पुस्तिकेत छापण्यात आलेली दुष्काळग्रस्तांची छायाचित्रे आफ्रिकेतल्या देशांमधील वापरण्यात आल्याचं उघड झालंय.

राष्ट्रवादीचे हसे, पवारांचे ऐकतोय कोण?

Last Updated: Sunday, February 24, 2013, 14:56

चक्क शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसविले गेलेत. त्यामुळे शरद पवारांचे ऐकतो कोण? राष्ट्रवादीचे बोटचेपे धोरण. चारा छावणी जनावरांची न राहतात ती माणसांचीच झालीय, हे तेथील दृश्यांवरून दिसून येत आहे. भर उन्हात जनावरांबरोबरच माणसांची फरपट होत आहे. देशाचे कृषीमंत्री यांच्याच मतदार संघात दुष्काळ आहे. त्याकडे त्यांनी लक्ष दिलेले नाही, असे येथे पाहिल्यावर दिसते. पवारांनी एका दिवसाचा पगार दुष्काळांसाठी दिला, तो पुरतो का?

सांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:25

राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

युवक काँग्रेसची संवाद यात्रा

Last Updated: Monday, February 18, 2013, 21:24

राज्यातील दुष्काळी परीस्थिती समजून घेण्यासाठी युवक काँग्रेसच्या वतीने बुलढाणा ते सांगली अशी ही संवाद यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेचा प्रवास सध्या अहमदनगर जिल्ह्यातून सुरु आहे.

दाणापाण्याचा घोर, स्थलांतर करती मोर

Last Updated: Monday, February 18, 2013, 17:55

अवघा महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतोय. सगळीकडं पाण्यासाठी वणवण सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील मोराच्या चिंचोलीची परिस्थितीही वेगळी नाही. पाण्याच्या दूर्भिक्षामुळं इथल्या मोरांवरही स्थलांतरीत होण्याची वेळ आली आहे.

पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह

Last Updated: Monday, February 18, 2013, 14:04

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.

दुष्काळही आणि अवकाळी पाऊसही

Last Updated: Thursday, February 14, 2013, 21:21

राज्यात एकीकडे दुष्काळाची धग वाढत असताना उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरु आहे. जळगाव जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी जोरदार पाऊस पडला आहे.

विठुरायाचं देवस्थान दुष्काळग्रस्तांना मदत करणार का?

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:44

पंढरपूरचा विठुराया प्रचंड श्रीमंत... भक्तांच्या प्रेमाची श्रीमंतीही त्याला भरभरुन मिळाली आहे आणि पैशानंही अतिशय श्रीमंत देवस्थान. आजच्या घडीला विठ्ठलाच्या खजिन्यात 70 ते 80 कोटी सहज आहेत.

शाही विवाह : जाधव यांनी मागितली माफी

Last Updated: Thursday, February 14, 2013, 16:43

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही थाटात विवाह केला. राज्यात दुष्काळ असताना लग्नात पैशाची उधळपट्टी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कानउघडणी करताच जाधव यांनी माफी मागून आपल्या कुवतीप्रमाणे दुष्काळग्रस्तांना मदत करणार असल्याचे स्पष्टीकरण दिले.

दुष्काळातून बाहेर काढ, राणेंचं भराडीदेवीला साकडं

Last Updated: Thursday, February 14, 2013, 18:16

आपलं जे राजकीय यश आहे, ते भराडी देवीच्या आशिर्वादामुळे आहे, असं उद्योगमंत्री नारायण राणे यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधवांना शरद पवारांचा घरचा आहेर

Last Updated: Thursday, February 14, 2013, 13:37

दुष्काळात लग्नसोहळ्यावर पैसा उधळणाऱ्यांना पक्षात स्थान नाही, असा घरचा आहेर नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.

पाहा... दुष्काळात करपणाऱ्या जनतेच्या मंत्र्यांचा थाट!

Last Updated: Thursday, February 14, 2013, 08:20

एकीकडं दुष्काळानं महाराष्ट्र होरपळत असताना दुसरीकडं कोकणातील राष्ट्रवादीचे नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधवांनी मात्र आपल्या मुला-मुलींच्या लग्नावर लाखो रुपयांचा चुराडा केलाय.

नाशिकमध्ये गारांचा पाऊस, पिकांचं नुकसान

Last Updated: Monday, February 11, 2013, 21:47

राज्यात विविध ठिकाणी अचानक पावसानं दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमध्ये गारांचा पाऊस पडला आहे. तर कर्जत, खालापूर आणि लोणावळ्यातही सरी बरसल्या आहेत.

मंत्र्याचे दुष्काळी दौरे भंपकपणा - राज ठाकरे

Last Updated: Monday, February 11, 2013, 16:07

मंत्र्यांनी दुष्काळ भागात दौरे काढून काय साधले आहे. ना दुष्काळग्रस्तांना दिलासा मिळाना ना आधार. राजकीय नेते आणि मंत्र्यांनी केलेले दुष्काळी दौरे हे भंपकपणा आहे, अशी बोचरी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी येथे केली.

मंत्र्यांचे दौरे मराठवाड्याला पुरेसे?

Last Updated: Sunday, February 10, 2013, 18:45

दुष्काळ जाहीर करायलाच उशीर झालाय. अशातच आता राजकीय नेत्यांनी दुष्काळाचं राजकारणही जोरात सुरु केलंय. मात्र, दुष्काळग्रस्तांचे डोळे लागले आहे ते सरकारी मदतीकडे.

'दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्रापुढे पसरणार हात'

Last Updated: Sunday, February 10, 2013, 17:26

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी आपण केंद्राला साकडं घालणार आहोत, असं आश्वासन केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मराठवाड्याला दिलंय. ते जालन्यात बोलत होते.

आबा देणार आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळनिधीला

Last Updated: Friday, February 8, 2013, 17:36

राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी आपलं एक महिन्याचं वेतन दुष्काळ निधीसाठी देऊन एक नवा पायंडा पाडलाय. ५७ हजार रुपयांचं वेतन त्यांनी मुख्यमंत्री सहाय्य निधीला दिलं आहे.

भयंकर! पोटच्या गोळ्यालाच मारून भरलं पोट…

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 13:05

उत्तर कोरियात पडलेल्या दुष्काळानं आपल्याच पोटच्या गोळ्याला मारून खाण्याची वेळ नागरिकांवर आलीय. भूकेचा कहर या नागरिकांवर असा काही कोसळलाय की, कबरीमध्ये पुरलेल्या आपल्या नातेवाईकांचे मृतदेहही उकरून काढून या नागरिकांना खावे लागत आहेत.

सहकारमंत्र्यांनी ४० गावांचं वीज-पाणी हडपलं...

Last Updated: Friday, January 18, 2013, 16:34

दुष्काळग्रस्त गावांसाठी सोडलेल्या उजनी धरणाच्या पाण्यावर सहकारमंत्र्यांच्याच साखर कारखान्यानं डल्ला मारल्याचं समोर आलंय.

सरकारकडून मराठवाड्यावर पुन्हा अन्याय

Last Updated: Thursday, January 17, 2013, 19:03

मराठवाडा दुष्काळानं होरपळतोय. मात्र तरीदेखील सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय होत असल्याचं दिसून येतंय. मराठवाड्यात जनावरांसाठी 11 तर अहमदनगरमध्ये 173 चारा छावण्या आहेत. त्यामुळे सरकारकडून असा दुजाभाव का होतोय? असा प्रश्न शेतक-यांकडून विचारला जातोय.

महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!

Last Updated: Friday, January 11, 2013, 23:05

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.. जवळपास ६ हजार २५० हून अधिक गावांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतायत. मराठवाड्यात तर दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंय.

`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!

Last Updated: Friday, January 11, 2013, 20:34

दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.

दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून ७७८ कोटींची मदत जाहीर

Last Updated: Friday, January 11, 2013, 15:41

राज्यातल्या दुष्काळ निवारणासाठी केंद्राकडून 778 कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अर्थमंत्री पी चिदम्बरम नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोन्टेकसिंग अहलुवालिया यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.

शीतपेयांचं पाणी शेतीकडे वळणार!

Last Updated: Monday, January 7, 2013, 18:23

राज्यातील भीषण दुष्काळावर मात करण्यासाठी शीतपेयासाठी देण्यात येणारं पाणी थांबवून हे शेतीसाठी देण्याकरता कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठवणार आहेत.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

दुष्काळामुळे लांबली गावांमधली लग्नं

Last Updated: Thursday, January 3, 2013, 18:56

मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती भयाण आहे. मुलींच्या लग्नासाठीही लोकांकडे पैसे नाहीत. त्यामुळं यावर्षी होणारं लग्न आता पुढं ढकलण्याची वेळ जालना जिल्ह्यातील शेतक-यांवर आली आहे.

दुष्काळाने घेतला लहानग्याचा बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 20:51

दुष्काळानं परिसीमा गाठली आहे. दुष्काळ आता थेट जीवावरच उठलाय. औरंगाबाद जिल्ह्यात लाडसावंगी गावात दुष्काळानं एका 13 वर्षीय मुलाचा बळी घेतलाय.

कृषीमंत्री म्हणतात, दुष्काळामुळं उडाली झोप

Last Updated: Friday, December 28, 2012, 22:35

माणसांना जगवायचं कसं हा सर्वात मोठा प्रश्न आहे… यंदाचा दुष्काळ गंभीर आणि झोप उडणारा’ असल्याचं भीषण वास्तव केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी मांडलंय. राष्ट्रवादीच्या मुंबईतल्या हायटेक कार्यालयाच्या उदघाटन सोहळ्यात ते बोलत होते.

बुलढाण्याला पाणीपुरवठा करणारं धरण कोरडं

Last Updated: Wednesday, December 26, 2012, 20:03

बुलढाणा शहराला पाणी पुरवठा करणारं येळगाव धरण 100 टक्के कोरडं झाल्यानं डिसेंबर महिन्यातच शहरात तीव्र पाणी टंचाई जाणवू लागलीय. शहरात 20 ते 22 दिवसांआड पाणी पुरवठा होतोय. त्यामुळे महिला वर्गावर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आलीय.

`झी २४ तास`नं चारा छावणीची `बोगसगिरी`केली बंद

Last Updated: Thursday, November 29, 2012, 09:51

सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळ निवारणाच्या कामात गोलमाल सुरू असल्याबाबतचं वृत्त `झी २४ तास`नं प्रसारित केल्यानंतर जिल्हा प्रशासनानं याची गंभीर दखल घेतली आहे.

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:13

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

‘केंद्राकडे मदत कशी मागतात हेही माहित नाही?’

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 16:33

राज्याच्या दुष्काळाच्या नियोजनावर केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी टीका केलीय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. त्यामुळं पाणी पिण्यासाठी राखून ठेवण्याचा सल्ला पवारांनी दिलाय.

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती बदलणार

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 21:31

यावर्षी महाराष्ट्रासह देशातल्या अनेक राज्यात दुष्काळी स्थिती आहे. मात्र सप्टेंबरमध्ये दुष्काळाची स्थिती काही प्रमाणात दूर होण्याची शक्यता आहे. परतीचा मान्सून जोरदार बरसेल असा विश्वास हवामान खात्यानं व्यक्त केलाय. पावसावर विपरीत परिणाम करणा-या एल निनोची निर्मिती होणार नाही असंही हवामान खात्याचा अंदाज आहे.

केंद्राच्या मदतीतही ‘दुष्काळ’! राज्य सरकार तोंडावर...

Last Updated: Sunday, August 26, 2012, 10:46

दोन दिवस पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिगटाशी झालेल्या चर्चांमध्ये प्रस्ताव ठेवण्यात आले. मात्र, त्यावर तातडीने निर्णय झालेला नाही. त्यामुळे दुष्काळग्रस्तांच्या पदरी निराशा आलीय. यातून राज्य सरकारचा आततायीपणा पुन्हा एकदा समोर आलाय.