Last Updated: Thursday, October 31, 2013, 12:48
दिवाळी जसजशी जवळ येतेय तशी बाजारपेठा फुलू लागल्या आहेत.. आकाशकंदील, पणत्या, रांगोळ्या आणि नव्या कपड्यांच्या खरेदीला उधाण आले आहे. मात्र, या दिवाळीनिमित्ताने अनेक बनावट पदार्थ बाजारात आले आहेत. त्यापासून तुम्ही सावधान राहिले पाहिजे. नाही तर ते तुमच्या जीवावर बेतू शकते. मिठाई, दुध याची भेसळ अनेक ठिकाणी दिसत आहे. आता तर अॅसिडयुक्त काजू बाजारात आले आहेत. त्यामुळे काजू घेताना सावधगिरी बाळगा.