राज्य सरकारचा जीआर की फतवा, विद्यार्थ्यावर अन्याय

Last Updated: Monday, June 23, 2014, 22:30

पदवी महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रिया संपत आली आणि आता कुठं महाराष्ट्र सरकारला जाग आलीय. अल्पसंख्याक कॉलेजांमधील अल्पसंख्याकांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत सरकारनं नवीन जीआर काढलाय. त्यामुळं प्रवेशाचा घोळ आणखी वाढणार असून, ओपन कॅटेगरीतील विद्यार्थ्यांवर विशेषतः मराठी मुलांवर अन्याय होणार आहे.

1 जुलैपासून राज्यातल्या शाळांचा बेमुदत बंदचा इशारा

Last Updated: Monday, June 23, 2014, 18:09

1 जुलैपासून राज्यातल्या शाळा बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा शिक्षक परिषदेनं सरकारला दिला आहे. शिक्षकांना अतिरिक्त ठरवणारा जाचक आदेश मागं घेण्याची मागणीही या शिक्षक परिषदेची आहे. या प्रकरणी 27 जून रोजी हजारो शिक्षक मुंबईत मोर्चा काढणार आहेत.

सरकार आणि राज्यपालांमध्ये रंगलंय राजीनाम्यावरून शीतयुद्ध

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 18:32

केंद्र सरकार आणि यूपीए सरकारनं नेमलेल्या काही राज्यपालांमध्ये सध्या राजीनाम्यावरून शीतयुद्ध रंगलंय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहसचिव अनिल गोस्वामी यांनी पाच राज्यपालांना राजीनामे देण्याच्या सूचना केल्यात.

उत्तर प्रदेश, कर्नाटक, आसाम राज्यपालांचे राजीनामे

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 16:04

उत्तर प्रदेशचे राज्यपाल बी. एल जोशी यांनी आज आपला राजीनामा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे सोपवला आहे. उत्तर प्रदेशचे राज्यपाल यांच्या राजीनाम्या पाठोपाठ आता कर्नाटकचे राज्यपाल एच आर भारद्वाज आणि आसामचे राज्यपाल जे. बी. पटनायक यांनीही राजीनामे राष्ट्रपतींकडे सोपवले आहेत.

लक्ष द्या: दहावीच्या निकालाची खरी खुरी तारीख जाहीर

Last Updated: Friday, June 13, 2014, 22:22

अनेक दिवसांपासून दहावीच्या निकालाची तारीख काय याबद्दल अनेक वेगवेगळ्या बातम्या प्रसारीत होत होत्या. मात्र आता दहावीच्य़ा निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

ठाणे जिल्हा विभाजन तब्बल २८ वर्षांनंतर...

Last Updated: Friday, June 13, 2014, 15:09

ठाणे जिल्ह्याच्या विभाजनाची गरज प्रथम १९८५ साली तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केली होती. आज तब्बल २८ वर्षांनंतर ही मागणी पूर्ण होत आहे.

ठाणे जिल्हा विभाजनाला मंत्रिमंडळाचा ग्रीन सिग्नल

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:45

ठाणे जिल्हा विभाजनाचा निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यामुळे ठाण्याचे विभाजन होणार यावर आता शिक्कामोर्तब होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विधानसभेत याबाबत घोषणा करणार आहे.

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:25

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

खुशखबर! कार आणि एसटी होणार टोलमुक्त?

Last Updated: Saturday, June 7, 2014, 13:00

राज्यात टोल धोरणात लवकरच बदल करण्यात येणारेय. राज्यसरकार खासगी चारचाकी वाहनांवरील टोल पूर्णपणे माफ करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये. टोलमधून दिलासा देण्यासाठी राज्यसरकारकडून गांभीर्यानं विचार सुरू आहे. त्यामुळं निवडणुकांच्या तोंडावरच सरकारकडून सर्वसामान्यांना खुशखबर मिळण्याची शक्यता आहे.

शिवछत्रपतींचा राज्याभिषेक सोहळा, याची देही याची डोळा

Last Updated: Friday, June 6, 2014, 20:58

शिवछत्रपतींचा 341 वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात रायगडावर साजरा करण्यात आला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक सोहळा समितीतर्फे या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तारखेप्रमाणे साज-या होणारा हा नयनरम्य सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती.

राज्याचा अर्थसंकल्प ; मुख्य मुद्दे

Last Updated: Thursday, June 5, 2014, 17:59

राज्याचा बजेट अजित पवार यांनी सादर केला

काँग्रेसचा घोळ संपला, अमित देशमुख- अब्दुल सत्तारांचा शपथविधी

Last Updated: Monday, June 2, 2014, 13:37

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळावर अखेर पडदा पडलाय. आज सकाळी साडेनऊ वाजता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. यावेळी अमित देशमुख आणि अब्दुल सत्तार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. राज्यपाल के. शंकर नारायणन या दोन मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.

देशात तेलंगणा या 29व्या राज्याचा जन्म

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 07:28

देशात तेलंगणा या 29 व्या राज्याचा जन्म झालाय. या ऐतिहासिक क्षणी हैदराबादमध्ये तेलंगणावासियांनी जोरदार जल्लोष केला. ठिकठिकाणी फटाके फोडून, आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. यावेळी मिठाई आणि बिर्याणीचं वाटप करण्यात आलं.

काँग्रेस मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ, CM पुन्हा दिल्लीला

Last Updated: Sunday, June 1, 2014, 19:58

काँग्रेसमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरुच आहे. कॅबिनेट बैठकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण पुन्हा दिल्लीला रवाना होणार आहेत. दिल्लीत पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावावंर चर्चा होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराचा घोळ सुरूच

Last Updated: Sunday, June 1, 2014, 12:57

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत अजूनही काँग्रेसचा घोळ कायम आहे. मंत्रीमंडळाचा विस्तार आता पुन्हा पुढे ढकललाय. आज संध्याकाळी 4 वाजता शपथविधी होणार होता.

काँग्रेसकडून राज्य मंत्रिमंडळाचा आज होणार विस्तार

Last Updated: Sunday, June 1, 2014, 09:19

राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. आज संध्याकाळी चार वाजता काँग्रेसच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. मंत्रीपदांची नावं निश्चितीसाठी मुख्यमंत्री, माणिकराव ठाकरे आणि सोनिया गांधी यांची आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे.

राज्य सहकारी बँक घोटाळ्यात अजित पवारही दोषी!

Last Updated: Friday, May 30, 2014, 16:38

राज्य सहकारी बँकेला झालेल्या 1500 कोटी रुपयांच्या तोट्याला तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष याप्रकरणाची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी काढला आहे.

पुणे... राज्यातील सर्वांत मोठी महापालिका होणार?

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 21:01

पुणे महापालिका लवकरच राज्यातील सर्वात मोठी महापालिका होणार आहे. शहराला लागून असेलली ३४ गावं महापालिकेत समाविष्ट करण्याच्या प्रस्तावावर मुख्यमंत्र्यांनी सही केल्याची चर्चा आहे.

अमित देशमुखांची लागणार मंत्रीपदी वर्णी?

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 19:28

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या छोटेखानी विस्तार होण्याची शक्यता आहे. काँग्रेसनं मंत्रिमंडळात विस्तार करण्याचा निर्णय घेतल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. उद्या राजभवनवर काँग्रेसकडून अमित देशमुख यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती मिळतेय.

उद्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार, आव्हाडांना संधी?

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 15:35

राज्य मंत्रिमंडळाचा उद्या विस्तार होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड व आमदार शरद गावित यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर, शालेय शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांना डच्चू मिळणार असल्याचं समजतं.

मोदींच्या विजयात कोणती राज्य गेमचेंजर ठरली?

Last Updated: Monday, May 19, 2014, 09:42

भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदींच्या विजयात मोठा वाटा आहे तो काही राज्यांमध्ये भाजपनं मिळवलेल्या दणदणीत विजयाचा.. पाहूयात ही कोणती राज्य गेमचेंजर ठरली ती.

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

आचारसंहिता शिथील, राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 10:01

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता शिथील झाल्यानंतर आज राज्यमंत्रीमंडळाची पहिली बैठक होत आहे. या बैठकीमध्ये गारपीट ग्रस्तांच्या मदतीबाबत तसंच राणे समितीच्या मराठा आरक्षण अहवालावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.८० टक्के मतदान

Last Updated: Friday, April 18, 2014, 07:32

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 16:56

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

संजय दत्त प्रकरणी केंद्राने राज्यावर डोळे वटारले

Last Updated: Monday, February 24, 2014, 19:10

केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. अभिनेता संजय दत्त याला वारंवार पॅरोलची सुटी का दिली जाते? अशी विचारणा केंद्राने राज्य सरकारला केली आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक

Last Updated: Sunday, February 23, 2014, 19:34

राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.

तेलंगणा विधेयकावर राज्यसभेत जोरदार आक्षेप

Last Updated: Thursday, February 20, 2014, 20:46

राज्यसभेत तेलंगणा राज्य निर्मितीचा मुद्दा जोरदार गाजला. विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचंड गदारोळात तेलंगणा विधेयक गुरुवारी दुपारी राज्यसभेत सादर केले. यावेळी विरोधक खासदारांनी तेलंगणा विधेयकाचा निषेध करत सभागृहात जोरदार गोंधळ केला.

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

Last Updated: Thursday, February 13, 2014, 15:49

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे. सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यात १.३२ लाख रिक्त पदे भरणार, कर्मचाऱ्यांचा संप मागे

Last Updated: Thursday, February 13, 2014, 11:27

राज्य कर्मचाऱ्यांनी आपला नियोजित संप मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांच्या आश्वासनानंतर मागे घेतला आहे. राज्य शासनाच्या सेवेतील १ लाख ३२ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन चव्हाण यांनी यावेळी दिले.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

आंध्र प्रदेशचे विभाजन, तेलंगणा नवे राज्य

Last Updated: Friday, February 7, 2014, 23:14

आंध्र प्रदेशचे विभाजन करून वेगळ्या तेलंगणा राज्याची निर्मिती करण्यासंबंधीच्या वादग्रस्त विधेयकाचा ठराव आज शुक्रवारी मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आला. त्यामुळे नवे तेलंगणा राज्य अस्तित्वात येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री किरण कुमार रेड्डी आणि मूळचे तेलंगणाचे नसलेले इतर काँग्रेस नेते यांचा तेलंगणाच्या निर्मितीला विरोध आहे.

अंगणवाडी सेविकांना पेन्शन लागू, आंदोलन मागे

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:51

राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मागण्या मंजूर झाल्यानं अंगणवाडी सेविकांनी महिनाभरापासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेतलंय. अंगणवाडी सेविकांना आता १ लाख रूपये पेन्शन देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.

राज्य सरकारचे कर्मचारी १३ फेब्रुवारीपासून संपावर

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 20:01

सरकारी कर्मचारी आणि अधिकारी 13 फेब्रुवारीपासून संपावर जाणारेत. 5 दिवसांचा आठवडा करावा, तसंच केंद्र सरकारप्रमाणे वेतन मिळावे अशी मागणी या कर्मचा-यांनी केलीय.

राज ठाकरेंच्या अटकेचं राज्य सरकारसमोर आव्हान

Last Updated: Wednesday, January 29, 2014, 13:41

राज्यात मनसेनं छेडलेल्या टोल आंदोलनप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज ठाकरेंवर हिंसेला चिथावणी दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या अटकेची शक्यता आहे.

`हिट अँड रन` प्रकरणात सलमानला दिलासा

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 13:55

`हिट अँड रन` प्रकरणात सलमान खानला राज्य सरकारकडून दिलासा मिळालाय. या प्रकरणाची फेरसुनावणी करण्याचा निर्णय सत्र न्यायालयानं दिला होता. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यास राज्य सरकारनं नकार दिलाय.

राज्यसभा निवडणूक : सात जागा, सात उमेदवार

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 12:58

राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची मुदत आज संपणार आहे. मात्र, त्यापूर्वीच या निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट झालंय.

आधी टोलवसुली, आता विरोध - भुजबळ

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:47

शिवनसेनेत असताना ज्यांनी टोलवसुलीला सुरूवात केली तेच आता टोलला विरोध करत आहेत, असा टोला आज राज ठाकरे यांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. टोल बंद झाले तर सरकारकडे निधी आल्यावरच रस्त्याची कामं करावी लागतील, असंही भुजबळ यांनी म्हटलंय.

`राज` आदेशानंतर राज्यभरात `टोल`फोड!

Last Updated: Monday, January 27, 2014, 08:35

राज्यात पुन्हा एकदा टोलवरुन वातावरण तापलंय. टोल भरु नका असा आदेश राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसे कार्यकर्ते टोलविरोधात रस्त्यावर उतरलेत... राज्यात विविध ठिकाणी टोलनाक्यांवर तोडफोड झालीय...

काँग्रेस राज्यसभेचे उमेदवार जाहीर

Last Updated: Sunday, January 26, 2014, 22:25

राष्ट्रवादी आणि भाजपने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केल्यानंतर आज काँग्रेसने आपले राज्यसभेचे उमेदवार जाहीर केलेत. काँग्रेसने आधीच्याच उमेदवारांना उमेदवारी दिला आहे.

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

Last Updated: Sunday, January 26, 2014, 16:09

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

आठवलेंना जॅकपॉट... राज्यसभेसाठी उमेदवारी!

Last Updated: Saturday, January 25, 2014, 18:38

राज्यसभेसाठी रामदास आठवलेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. २८ जानेवारीला आठवले राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करतील.

राज्यसभेसाठी जावडेकरांचा पत्ता होणार कट?

Last Updated: Saturday, January 25, 2014, 07:19

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजप नेते आणि महाराष्ट्रातील विद्यमान मावळते खासदार प्रकाश जावडेकर यांचा पत्ता कटण्याची शक्यता वर्तवली जातेय.

चला इन्कम टॅक्स ऑफिसर होण्याची संधी!

Last Updated: Thursday, January 23, 2014, 13:10

मध्य प्रदेश पब्लिक सर्व्हिस कमिशननं योग्य उमेदवारांकडून इन्कम टॅक्स ऑफिसरच्या पोस्टसाठी अर्ज मागवले आहेत. २६३ जागांसाठी ही भरती होणार असून मध्य प्रदेश सरकारच्या विविध विभागांमध्ये ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी ४ फेब्रुवारी २०१४ पूर्वी हे अर्ज पाठवायचे आहेत. मध्य प्रदेश लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जाणार आहे.

राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला

Last Updated: Wednesday, January 22, 2014, 22:27

राज्यसभेच्या सात जागांसाठी येत्या 7 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन, तर शिवसेना-भाजपचा प्रत्येकी 1 उमेदवार सहज निवडून येणार आहे. परंतु सातव्या जागेसाठी चुरशीची निवडणूक रंगणार असून, एखाद्या उद्योगपतीच्या गळ्यात ही जागा पडेल, अशी चिन्हं सध्या तरी दिसतायत...

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:20

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

निवडणुकीच्या तोंडावर सरकारच्या डोळ्यासमोर ‘वीज चमकली’

Last Updated: Monday, January 20, 2014, 17:57

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. घरगुती, कृषी, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्रातल्या ग्रहकांना याचा फायदा होणार आहे.

पंढरपूरच्या बडव्यांना सुप्रीम कोर्टाचा चाप, मंदिर राज्यसरकारकडेच

Last Updated: Wednesday, January 15, 2014, 15:21

पंढरपूरचं विठ्ठल मंदिर राज्यसरकारकडंच राहणार असल्याचा महत्त्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय. बडवे आणि उत्पातांची याचिका न्यायालयानं फेटाळलीय.

राज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:47

सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.

राज्यसभेच्या सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला मतदान

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:19

महाराष्ट्र विधानसभेतून राज्यसभेवर पाठविण्यात येणार्याम सात जागांसाठी ७ फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे. निवडणूक आयोगानं सोमवारी या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला असल्यानं तेही या निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र राज्यपाल सचिव कार्यालयात नोकरीची संधी

Last Updated: Saturday, January 11, 2014, 21:25

महाराष्ट्राच्या राज्यपाल यांच्या सचिव कार्यालयात ३१ जागा रिक्त आहेत. यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०१४ आहे. चला लागा लगेच कामाला.

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडीचा घाईचा कारभार

Last Updated: Thursday, January 9, 2014, 21:48

लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना आता राज्य सरकारकडून सरकार काही महत्त्वाचे तसंच लोकप्रिय निर्णय झटपट घेण्याची शक्यता आहे. एकीकडे निर्णय होत नसल्याची ओरड सरकार मधले कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्री करत असताना आता सरकार गतीनं कामाला लागणार आहे. याची सुरूवातही झाली आहे.

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

राज्यात जिल्हा ठिकाणी सुरु होणार विमानसेवा

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 17:21

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझिलंडमध्ये सर्वाधिक प्रवास हा विमानाने केला जातो. कारण त्याठिकाणी डोंगराळ प्रदेश आहे. तसाच काहीसा प्रयोग हा आता महाराष्ट्रात करण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा मुख्यालये लवकरच विमानसेवेने जोडली जाणार आहेत. याबाबत चाचपणी सुरू आहे.

तरुणाईचं मन जिंकण्याची आदित्य ठाकरेवर जबाबदारी

Last Updated: Sunday, January 5, 2014, 21:09

राज्यासह देशात निवडणुकीचं वारं वाहू लागलंय. सर्वाधिक मतदार तरुण असल्यानं तरुणांचा विश्वास संपादन करण्यासाठी राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू झालीय.

सरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला

Last Updated: Thursday, January 2, 2014, 17:54

कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

‘महिला फ्लीट टॅक्सी`साठी परवाने मिळवणं झालं सोप्पं!

Last Updated: Thursday, January 2, 2014, 08:29

राज्य शासनानं आखलेल्या ‘महिला फ्लीट टॅक्सी’ योजनेची अंमलबजावणी लवकरच होण्याची चिन्हं आहेत. या योजनेसाठी महिलांना लिलाव पद्धतीनं परवाने देण्यात येणार आहेत. याविषयी निविदाही (टेन्डर) जारी करण्यात आलीय.

‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 21:15

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.

रिपाइंमध्ये अस्वस्थता, आठवलेंच्या पदरात नेमकं पडणार काय?

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 20:59

लोकसभा निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपल्या असतानाही जागावाटपाबाबत काहीही चर्चा होत नसल्याबद्दल महायुतीतल्या रिपाइंमध्ये अस्वस्थता आहे. महायुतीतून बाहेर पडण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर कार्यकत्यांचा दबाव वाढतोय.

सुशीबेन शहा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 20:14

अखेर राज्य महिला आयोगाला अध्यक्षा मिळाल्या आहेत. गेल्या साडे चार वर्षांपासून रिक्त असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी सुशीबेन शहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज मिळणार राज्य महिला आयोगाला अध्यक्ष?

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 11:14

गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर मंगळवारी संपणार आहे.

राज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...

Last Updated: Saturday, December 28, 2013, 15:52

राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...

काँग्रेसला निर्मला सामंत यांचा घरचा आहेर, सोनिया-राहुल गांधी टार्गेट

Last Updated: Friday, December 27, 2013, 09:39

राज्य महिला आयोगाचं गठन न करणारं महाराष्ट्र सरकार महिलांच्या प्रश्नाविषयी असंवेदनशील असल्याचा हल्लाबोल करताना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्य निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी टार्गेट केलं.

अशोक चव्हाणांवर कारवाईसाठी तावडेचे राज्यपालांना पत्र

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 17:42

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत फेरविचार करण्याची केली मागणी. आदर्श घोटाळा प्रकरणी सी बी आय ने दाखल केलेल्या अहवालात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण दोषी आढळले आहेत. हीच बाब आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील भ्रष्टचारची चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाने देखील अहवालात QUID PRO QUO असा शब्दोउल्लेख करीत नमूद केली आहे. असे असताना अशोक चव्हाण यांच्या विरुद्ध कारवाई करण्यास परवानगी न दिल्यास पुरोगामी महाराष्ट्रातील जनतेचा अपेक्षा भंग होईल.

लोकपाल विधेयक मंजुरीनंतर अण्णांचा केजरीवालांना चिमटा

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 18:39

लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर होताच नऊ दिवसांपासून सुरू असलेलं उपोषण अण्णांनी सोडलं. शाळेतल्या विद्यार्थिनीच्या हातून अण्णांनी ज्यूस घेतलं. त्यानंतर अण्णांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या राळेगणवासियांनी जल्लोष केला. या जल्लेषात स्वत: अण्णाही सहभागी झाले.

आकाशवाणीत विविध पदांसाठी 10 हजार जागांची भरती

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 10:59

केंद्रीय सूचना आणि प्रसारण राज्य मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनीष तिवारी यांनी गुरूवारी लोकसभेत एक प्रश्नावर लिखित उत्तर देताना सांगितले की, आकाशवाणीमध्ये विविध श्रेणीच्या पदांसाठी सुमारे १० हजार जागा रिकाम्या आहे.

लोकपाल विधेयक आज संमत होण्याची शक्यता

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 09:57

लोकपाल आणि जादूटोणा विरोधी विधेयक आज संमत होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सुरु केलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर लोकपाल विधेयकाला तातडीनं मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय.

राज्यसभेत लोकपालवर मतदान? शिवसेनेचा विरोध

Last Updated: Sunday, December 15, 2013, 20:29

संसदेच्या या अधिवेशनातच लोकपाल विधेयक संमत करावं, त्यासाठी गरज पडल्यास अधिवेशनाचा कार्यकाळ वाढवावा लागला तरी वाढवावा असं आवाहन अण्णा हजारे यांनी केलंय. आज अण्णांनी राळेगणसिद्धीमध्ये पत्रकार परिषद घेतली.

‘काँग्रेस’चा हात ‘आम आदमी पक्षा’ला साथ!

Last Updated: Friday, December 13, 2013, 22:02

दिल्लीत काँग्रेसनं आम आदमी पार्टीला पाठिंबा दिलाय. दिल्लीच्या नायब राज्यपालांना याबाबतचं पत्र काँग्रेसनं आज रात्री सादर केलं.

लोकपाल विधेयक राज्यसभेत, विधेयक मंजूर होणार?

Last Updated: Friday, December 13, 2013, 07:50

लोकपाल विधेयक मंजुरीसाठी सरकार आज राज्यसभेत मांडण्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक शुक्रवारी म्हणजे आज चर्चेला आणवं अशी मागणी केलीय. दरम्यान, भाजपने विरोध केलाय तर राष्ट्रवादीने पाठिंबा दिला आहे.

पंतप्रधानपदाचा उमेदवार पक्ष ठरवेल- सोनिया

Last Updated: Sunday, December 8, 2013, 19:09

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीचे मुद्दे वेगळे असतात. तरीही चार राज्यांमधील निकाल म्हणजे आमच्यासाठी जनतेने दिलेल्या सूचनाच आहेत. पराभवामुळे निराश नक्कीच आहोत; पण हा निकाल आम्ही स्वीकारत आहोत, अशा शब्दात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पराभव स्वीकारला आहे.

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद

Last Updated: Thursday, December 5, 2013, 21:08

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.

ऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:50

ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.

राणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 19:30

कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.

जोशी भेटले मोदींना, राज्यसभेवर डोळा!

Last Updated: Tuesday, December 3, 2013, 22:35

शिवसेनेचे माजी खासदार डॉ. मनोहर जोशी यांनी आता पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावलीय. जोशीसरांनी आज भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची गांधीनगरमध्ये जाऊन सदिच्छा भेट घेतली.

राज्याच्या मुख्य सचिवपदी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती

Last Updated: Saturday, November 30, 2013, 21:36

राज्याच्या मुख्य सचिवपदी ज्येष्ठ सनदी अधिकारी जे. एस. सहारिया यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया निवृत्त झालेत. बांठिया यांच्या जागी जे. एस. सहारिया यांची मुख्य सचिवपदी वर्णी लागलीय.

लॉटरीची लाखोंची बक्षीसं पडून... दावेदारच नाहीत!

Last Updated: Monday, November 25, 2013, 19:55

लॉटरी लागल्यामुळे रातोरात कोट्यधीश झाल्याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील. पण लॉटरी लागल्यानंतर ही लाखो रुपयांची बक्षिसं घेण्याला कोणीच आलं नाही

राज्यात थंडीची लाट, पुणे-जळगावात थंडीचा मुक्काम

Last Updated: Friday, November 22, 2013, 18:07

राज्यात मुंबईसह पुणे, जळगावमध्ये थंडीची चाहूल आहे. पुण्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. तर जळगावात सध्या ११ डिग्री सेल्सिउस तापमानाची नोंद करण्यात आलीय. मुंबईत सकाळी चांगलाच गारवा आहे.

‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने’ची आज सुरुवात

Last Updated: Thursday, November 21, 2013, 09:26

राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेची सुरुवात आज नागपुरात होणार आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या योजनेची सुरुवात करणार असून त्या निमित्तानं होणारी सोनियांची सभा यशस्वी होण्यासाठी प्रदेश काँग्रेसनं कंबर कसलीय. तर दुसरीकडं हा कार्यक्रम म्हणजे निवडणूक स्टंट असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.

भारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव

Last Updated: Monday, November 18, 2013, 10:40

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.

सचिन `खासदार` सोनियांमुळेच - राजीव शुक्ला

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 18:04

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीच राज्यसभेत नियुक्ती करण्यासाठी सचिनचे नाव सुचविले होते. बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी ही माहिती दिली. सचिन २००वी कसोटी खेळून नवृत्त होणार असला तरी सरकार निवृत्तीनंतर त्याला `भारतरत्न` हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्याबाबत विचार करू शकते, असे संकेतही शुक्ला यांनी दिले आहेत.

आयुष संचालनालयात नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, November 13, 2013, 10:48

महाराष्ट्र राज्याच्या आयुष संचालनालयात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई, नागपूर, नांदेड आणि उस्मानाबाद येथील महाविद्यलये, रूग्णालये येथे गट-क ची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहेत.

नवी मुंबई विमानतळजमीन संपादनाचा मार्ग मोकळा

Last Updated: Tuesday, November 12, 2013, 07:50

नवी मुंबई विमानतळाच्या उभारणीसाठी प्रकल्पग्रस्त आणि राज्य सरकार यांच्यात जमीन अधिग्रहण आणि मोबदल्यावर एकमत झाले. यामुळे विमानतळाच्या जमीन अधिग्रहणाचा मार्ग सोमवारी मोकळा झाला.

एसटीचा प्रवास महागला, ९ नोव्हेंबरपासून भाडेवाढ

Last Updated: Thursday, November 7, 2013, 20:06

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ ९ नोव्हेंबरपासून लागू होणार आहे. पहिल्या १२ किमीपर्यंत ही भाडेवाढ नाही. ही भाडेवाढ १ आणि २ रूपये टप्प्यानुसार असणार आहे.

गेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नाही!

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 18:07

गेल्या साडेचार वर्षांपासून महिला आयोगाला अध्यक्षच नसल्याचं गाऱ्हाणं सामाजिक संघटनांच्या निर्भया समितीने आज राज्यपाल के. शंकरनारायण यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर घातलं.

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

Last Updated: Thursday, October 24, 2013, 11:20

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

उत्पादन शुल्क विभागात लिपिक – टंकलेखक पदाची भरती

Last Updated: Thursday, October 24, 2013, 08:51

महाराष्ट्र राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने लिपिक – टंकलेखक पदाच्या रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. रिक्त ५८ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. सरळसेवा भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

सरकारी कर्मचाऱ्यांची महिन्याच्या शेवटीही दिवाळी!

Last Updated: Sunday, October 20, 2013, 15:47

यंदा दिवाळी नोव्हेंबर महिन्यात असली तरी राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी मात्र ऑक्टोबर महिन्यातच सुरू होणार आहे. कारण...

जनतेच्या पैशांचा चुराडा, मंत्र्यांनी विमानवर उडविले ६ कोटी

Last Updated: Saturday, October 19, 2013, 15:20

महागाई आणि करांच्या ओझ्यामुळे सामान्य जनता दबली असताना जनतेचा पैसा मात्र मंत्र्यांकडून बेपर्वाईने खर्च केला जात आहे. आपल्या आरामदायक प्रवासासाठी मंत्र्यांनी तीन वर्षांत तब्बल कोट्यवधी रुपये केवळ विमान प्रवासावर उडवले आहेत. याचा आकडा तीन वर्षांत ६ कोटी २८ लाखावर गेलाय.

एसटीत भरणार २००० चालकांची पदे

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 09:36

बेरोजगार तरुणांना खूशखबर आहे. एस.टी.त चालकांची तब्बल दोन हजार पदे भरण्यात येणार असून याबाबतची जाहिरात महिनाभरात निघणार आहे. ही भरती केवळ कोकणसाठी स्वतंत्र असणार आहे. याबाबचा निर्णय राज्य परिवहन महामंडळाने घेतला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ!

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 08:48

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.

राज्य सरकारनेच केली पुणे मनपाच्या गैरव्यवहारांची पोलखोल

Last Updated: Tuesday, October 8, 2013, 20:09

पुणे महापालिकेतले अनेक गैरव्यवहार आजवर उघड झाले आहेत… कधी एनजीओंनी, कधी आरटीआय कार्यकर्त्यांनी तर कधी, माध्यमांनी हे गैरव्यवहार उघडकीस आणलेत… आता मात्र राज्य सरकारनंच पुणे महापालिकेतला एक गैरव्यवहार चव्हाट्यावर आणलाय.

रिपाईला तीन जागा सोडण्याची युतीची तयारी

Last Updated: Friday, October 4, 2013, 19:53

महायुतीतील तिसरा पार्टनर असलेल्या रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षासाठी लोकसभेच्या तीन जागा सोडण्याची तयारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दाखवलीय.

पाच राज्यांमध्ये निवडणूका जाहीर, 'NOTA' ईव्हीएमवर

Last Updated: Friday, October 4, 2013, 17:45

दिल्ली, राजस्थान, मिझोराम, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या पाच राज्यांत निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुका जाहीर केल्यात. या निवडणुकीत पहिल्यांदाच ईव्हीएम मशीनवर `नन ऑफ द अबाऊव्ह` हे बटन असणार आहे. याचाच अर्थ याच निवडणुकांपासून राईट टू रिजेक्ट लागू होईल.

महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै

Last Updated: Tuesday, October 1, 2013, 13:39

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.

देशातील विकसित राज्यांत महाराष्ट्र पाचवा

Last Updated: Thursday, September 26, 2013, 23:53

देशातल्या विकसित राज्यांच्या यादीत गोव्यानं सर्वात वरचा क्रमांक पटकावलाय. तर केरळनं दुसरा स्थानावर झेप घेतलीय. या यादीत महाराष्ट्राचा पाचवा क्रमांक आहे.

शशी थरूर उवाच- स्वामी विवेकानंद करायचे मद्यपान!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 13:21

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानानं नव्या वादाला तोंड फोडलंय. रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद मद्यपान करत असल्याचं खळबळजनक वक्तव्य शशी थरूर यांनी केलं असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे.

नरेंद्र मोदींचा हरियाणातून `श्रीगणेशा`

Last Updated: Sunday, September 15, 2013, 15:00

भारतीय जनता पार्टीकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषणा झाल्यानंतर आज पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांची हरियाणाच्या रेवार इथं जाहिर सभा होतेय.

‘ति’च्यासाठी राज्यसरकारची `मनोधैर्य योजना` मंजूर

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 15:09

बलात्कार, लैंगिक अत्याचार सारख्या भीषण प्रसंगाला सामोरं जावं लागलेल्या दुदैर्वी महिलांचं आयुष्य नव्यानं उभं करण्यासाठी राज्यसरकानं ‘मनोधैर्य योजना’ तयार केलीय. या योजनेला कॅबिनेटनं आज मंजूरी दिलीय.

फ्रेंडशीप, व्हॅलेन्टाईन्स डेवर राज्य सरकारची बंदी!

Last Updated: Friday, September 6, 2013, 19:18

रेव्ह पार्ट्यांचं मूळ महाविद्यालयांतील फ्रेंडशिप डे आणि व्हॅलेन्टाईन्स डेमध्ये असल्याचा शोध राज्य सरकारनं लावलाय. त्यामुळे यंदा राज्यातील विद्यापीठांना असे ‘डेज’ साजरे न करण्याबद्दलच्या सूचना धाडण्यात आल्यात. पण, यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची चांगलीच निराशा झालीय.