सुमित्रा महाजन यांचा लोकसभा अध्यक्षपदासाठी प्रस्ताव

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:35

मुळच्या कोकणातल्या चिपळूणच्या असलेल्या इंदूरच्या खासदार सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड जवळजवळ निश्चित झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महाजन यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवलाय.

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, कोकणात आनंदोत्सव

Last Updated: Thursday, June 5, 2014, 19:54

लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपच्या ज्येष्ठ खासदार सुमित्रा महाजन यांचं नाव निश्चित झालंय. त्यांच्या निवडीनं कोकणातील रत्नागिरीमधील चिपळूणमध्ये आनंदोत्सव साजरा होत आहे. कारण एका चिपळूणकर कन्येला लोकसभा अध्यक्षपदी बसण्याचा बहुमान प्रथमच प्राप्त होणार आहे. चिपळुणात लहानाची मोठी झालेली ही मराठी मुलगी लोकशाहीतील या मानही चिपळूणची सर्वोच्च मुलगी मोठ्या स्थानावर विराजमान होत आहे.

यंदा बिबट्यांच्या संख्या वाढली, पण...

Last Updated: Friday, May 30, 2014, 20:22

कोकणात बिबट्याची संख्या झपाट्याने कमी होत असल्याची आकडेवारी गेल्या काही वर्षात समोर येत होती. आता नव्याने जाहीर झालेल्या वनजीव गणणेत सकारात्मक चित्र समोर आलंय.

पुण्यातल्या 6 पर्यटकांना रत्नागिरीत जलसमाधी

Last Updated: Sunday, May 25, 2014, 18:06

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या आंजर्ले इथं पुण्यातल्या 6 पर्यटकांना जलसमाधी मिळालीय. हा आकडा वाढण्याचीही शक्यता आहे. हे सर्व पर्यटक पुण्याहून कोकणात फिरायला आले होते.

चिपळूणजवळ चार किलो `केटामाईन` जप्त!

Last Updated: Sunday, May 25, 2014, 12:51

रेव्ह पार्टीमध्ये नशेसाठी वापरला जाणारा ‘केटामाईन’ या अंमली पदार्थाचा साठाच मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण शहराजवळ जप्त करण्यात आलाय.

कोकण रेल्वेवर धावणार डबलडेकर एसी ट्रेन!

Last Updated: Sunday, May 18, 2014, 14:11

कोकण रेल्वे मार्गावरुन डबल डेकर रेल्वेची शनिवारी चाचणी घेण्यात आली. मुंबईवरुन सोडलेली ही रेल्वे गाडी कोकण रेल्वे मार्गावरून कशाप्रकारे धावू शकते याची चाचणी घेण्यात आलीय.

नारायण राणे देणार राजीनामा, रत्नागिरीत प्रतिक्रिया

Last Updated: Friday, May 16, 2014, 15:51

काँग्रेसचे नेते आणि उद्योग मंत्री नारायण राणे मुलगा नीलेश राणे यांचा पराभव दिसू लागल्याने राणे नाराज झालेत. त्यांनी पराभवाची जबाबदारी म्हणून राजीनामा देण्याची तयारी दर्शविली आहे. तशी माहिती त्यांनी रत्नागिरीत दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात राजरोसपणे वाळू उपसा

Last Updated: Monday, May 12, 2014, 10:17

रत्नागिरी जिल्ह्यात सध्या राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाकडे महसूल प्रशासन गांभिर्याने बघत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय.

चिपळूण बाजारपेठेत कपडा दुकानांना भीषण आग

Last Updated: Friday, May 9, 2014, 14:13

चिपळूणच्या बाजारपेठेतील कपडा दुकानाला भीषण आग लागलीय. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही आग लागलीय. बाजारपेठेतील अनेक दुकानं आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत. एका दुकानाला लागलेली आग मोठ्या वेगानं पसरतेय. अग्नीशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

रत्नागिरीत विचित्र अपघात, मुलीचा मृतदेह नेताना आई-वडील ठार

Last Updated: Friday, May 9, 2014, 08:08

आपल्या मुलीच्या भवितव्याच्या काळजीपोटी तिला रत्नागिरीत परीक्षा देण्यासाठी नेत असताना संगमेश्वर येथे मुलीवरच काळाने घातला. यावरच काळ न थांबता मुलीचा मृतदेह घरी घेऊन जाणाऱ्या या मुलीच्या आई-वडीलांवरही मृत्यूने झडप टाकली. रत्नागिरीतील विचित्र अपघाताने खेडमधील कुटुंबच उद्धस्त झालंय.

चक्क, महाराजांचा किल्ला लाखात विकला

Last Updated: Thursday, May 1, 2014, 15:05

शिवकालीन ऐतिहासिक यशवंतगडाची चक्क विक्री करण्यात आली आहे. हा प्रकार माहितीच्या अधिकारा उघड झाला आहे. हा किल्ला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरमधील नाटे येथे आहे.

लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

Last Updated: Thursday, April 17, 2014, 12:29

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

उद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे

Last Updated: Tuesday, April 15, 2014, 08:56

एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.

निलेश राणेंच्या पराभवासाठी शिवसेनेला मतदान करणार - केसरकर

Last Updated: Monday, April 14, 2014, 19:02

रत्नागिरी-सिंधुदुर्गात काँग्रेस उमेदवार निलेश राणेंचा पराभव करण्यासाठी दीपक केसरकर आणि समर्थकांनी कंबर कसलीय केसरकरांचा आता शिवसेनेला पाठिंबा दिलाय. निलेश राणेंचा पराभव करण्याचा निर्धार करत केसरकरांनी विनायक राऊत यांना पाठिंबा जाहीर केलाय. तसंच लढाई अजून संपलेली नसून जिल्ह्यातून गुंड हद्दपार झाले पाहिजे, असा सणसणीत टोला त्यांनी राणेंना लगावलाय.

कोकणात आज ठाकरे- पवार आमने सामने

Last Updated: Sunday, April 13, 2014, 08:51

आजचा दिवस कोकणासाठी झंजावाती असणार आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या आज कोकणात सभा होताहेत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज कणकवली आणि रत्नागिरीत जाहीर सभा होतीये.

ऑडिट मतदारसंघाचं : रत्नागिरी

Last Updated: Friday, April 4, 2014, 13:59

ऑडिट मतदारसंघाचं - रत्नागिरी

LIVE -निकाल रत्नागिरी-सिंधुदुर्ग

Last Updated: Friday, May 16, 2014, 18:46

प्रोफाईल मतदारसंघाचं : रत्नागिरी-सिंधुदुर्ग

राऊत, राणे आज भरणार अर्ज, राणेंचा राष्ट्रवादीला इशारा

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 09:25

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेस आणि शिवसेनेचे उमेदवार आज आपला अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळं दोन्ही उमेदवारांकडून शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. शिवसेनेचे विनायक राऊत दुपारी १२ वाजता नामांकन अर्ज दाखल करणार असून यासाठी शिवसेनेकडून संजय राऊत आणि भाजपचे विनोद तावडे उपस्थित राहणार आहेत.

पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 08:58

पुण्यातील तरुणाचा वेळास समुद्रात बुडून मृत्यू

जपाननं नाकारला रत्नागिरीचा हापूस!

Last Updated: Friday, March 14, 2014, 09:03

कोकणातली अर्थव्यवस्था ही आंब्यावर अवलंबून आहे. मात्र, यंदा अवकाळी पावसाने आंब्यावर मोठा परिणाम झालाय. त्यातच आंब्यावर कोकणातल्या वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आंब्याच्या निर्यातीवर झालाय.

असहाय्यतेचा फायदा घेऊन `ती`च्यावर वारंवार बलात्कार

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 10:00

रत्नागिरी तालुक्यातील फणसोप परिसरातील बांगलवाडीत एका अपंग मुलीवर वांरवार सामूहिक बलात्कार झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

बिबट्यानं वनरक्षकांवरच केला जीवघेणा हल्ला...

Last Updated: Monday, March 10, 2014, 21:41

रत्नागिरी तालुक्यातल्या धामणसे गावात दोन वनरक्षकांवर बिबट्यानं हल्ला केलाय. काल गावात बिबट्या आल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. त्यानंतर वनखात्यामार्फेत बिबट्याचा शोध सुरु होता.

नारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?

Last Updated: Saturday, March 8, 2014, 18:11

काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.

मुंबई गोवा महामार्गावर मृतावस्थेत बिबट्या

Last Updated: Saturday, February 15, 2014, 11:59

रत्नागिरी जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आलाय. या बिबट्याला गाडीने धडक दिल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तटकरे-जाधव वाद केवळ चार भिंतीत मिटला, रत्नागिरीत वाद कायम

Last Updated: Friday, January 17, 2014, 15:11

कोकणातील राष्ट्रवादीच्या दोन मात्तबर नेत्यांमधला वाद राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी मिटवला खरा. पण या दोन नेत्यांच्या वादात ज्या कार्यकर्त्यांनी उड्या घेतल्या त्यांच्यातील वाद मात्र अजून मिटलेला दिसत नाहीय.

हप्ता मागणाऱ्या गुंडाना चोप, एकाचा मृत्यू

Last Updated: Friday, January 10, 2014, 13:59

रत्नागिरीतल्या खाऊ गल्लीत विक्रेत्यांकडे हप्ता मागायला गेलेल्या दोन गुंडांना विक्रेत्यांनी चोप दिलेला वासीन मोमीन उर्फ उंड्याचा मृत्यू झालाय... .

राज्यातील काही घडामोडी संक्षिप्त...

Last Updated: Saturday, December 28, 2013, 15:52

राज्यातील काही घडामोडींचा संक्षिप्त वेध...

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी

Last Updated: Thursday, December 26, 2013, 11:17

थर्टी फर्स्टसाठी कोकणात पर्यटकांची गर्दी होवू लागलीय. कोकणातले समुद्रकिनारे सध्या गजबजलेत. पर्यटकांमुळे हॉटेलचे दरही दुप्पटीने वाढलेत. यंदा पर्यटकांची सर्वाधिक पसंती तारकर्ली बीचला. तसेच रत्नागिरीलाही पसंती आहे. गणपतीपुळे येथेही अशी परिस्थिती आहे.

शाळेनेच केले जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत

Last Updated: Thursday, December 19, 2013, 21:59

रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमधल्या एसव्हीपीएम शाळेत जातीच्या आधारावर विद्यार्थ्याला बहिष्कृत करण्याचा धक्कादायक प्रकार गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. या प्रकरणी शाळा व्यवस्थापनाच्या विरोधात मुलाच्या पालकांनी आमरण उपोषण सुरु केलंय.

व्हील रॉड तुटला... रस्त्यावरच पलटली एसटी, ८ जखमी

Last Updated: Monday, December 2, 2013, 13:55

रत्नागिरी पावसजवळच्या वायंगणीमध्ये एसटी बस पलटी झालीय. या गाडीमध्ये बहुतेक शाळकरी मुले होती. त्यातली काही किरकोळ जखमी आहेत. मात्र, ८ प्रवासी गंभीर आहेत.

कुंभार्ली घाटात बसचा अपघात; तीन ठार

Last Updated: Monday, November 18, 2013, 07:51

रत्नागिरीत मिनी बसला भीषण अपघात झालाय. रत्नागिरीतल्या कुंभार्ली घाटात ही मिनी बस कोसळली. यात बसमधील तीन जण ठार तर सात जण जखमी झालेत.

सावर्डे गावाला वादळाचा तडाखा, अनेकांचे संसार उघड्यावर

Last Updated: Tuesday, November 5, 2013, 19:01

मुंबई-गोवा महामार्गावरच्या सावर्डे गावाला ऐन दिवाळीत वादळाचा मोठा फटका बसला. सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळाने अनेक घरांवरची छपरे उडाली आणि संसार उघड्यावर प़डले. अवघी पाच मिनिटे घोंघावलेल्या या वादळात शेकडो झाडे मुळापासून उन्मळून घरांवर तसेच रस्त्यांवर पडली. त्यामुळे सावर्डे परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. ऐन दिवाळीत आलेल्या या वादळामुळे प्रकाशाचा हा सण या गावक-यांसाठी अंधार घेऊन आलाय.

रत्नागिरीत वादळी वाऱ्याचा तडाखा

Last Updated: Monday, November 4, 2013, 23:39

रत्नागिरी जिल्ह्यात सावर्डे परिसराला वादळी वा-यांच्या जबर तडाखा बसलाय. अनेक भागात झाडं उन्मळून पडलेत. एका गाडीवर झाड पडल्यामुळे १ जण ठार तर पाच जखमी झालेत.

कोकण रेल्वेच्या हुतात्म्यांना मानवंदना

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 10:02

कोकण रेल्वेने १४ ऑक्टोबरला कोकण रेल्वे स्मृती दिवसानिमित्ताने रेल्वेच्या निर्मितीच्यावेळी अभियंते आणि कामगारांना आपले प्राण गमवावे लागलेल्यांना मानवंदना दिली. हुतात्म्यांच्या स्मृतीस पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावर रत्नागिरी-रोहा स्पेशल गाडी

Last Updated: Saturday, September 21, 2013, 14:55

कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांची गर्दीपासून सुटका होण्यासाठी सुरू करण्यात आलेली स्पेशल गाडी दि. २२ सप्टेंबर पर्यंत चालवण्यात येत आहे. रत्नागिरी ते रोहा दरम्यान ही गाडी धावणार आहे. गर्दीमुळे ही गाडी सोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.

कोकणात जाणाऱ्यांच्या गर्दीनं महामार्ग फुलला

Last Updated: Monday, September 9, 2013, 16:43

गणपतीसाठी कोकणात जाण्याऱ्या वाहनांना गर्दी झाल्याचं चित्र आज सायन-पनवेल मार्गावर पाहायला मिळालं. कोकणात जाणाऱ्या गाड्यांना शनिवारपासूनच ही गर्दी दिसून येत आहे. त्यामुळं वाहनांच्या रांगा लागल्या असून वाहतूक धिम्यागतीनं सुरू आहे.

गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या बसला अपघात

Last Updated: Sunday, September 8, 2013, 09:33

कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या आराम बसला सावर्डे-आगावे जवळ भीषण अपघात झालाय. या अपघातात २० जण गंभीर जखमी झाले असून त्यातील १० जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

गणपती उत्सवासाठी कोकण रेल्वे गाड्यांना जादा डबे

Last Updated: Saturday, September 7, 2013, 07:21

गणपतीसाठी गावी जाणाऱ्यांची गर्दी पाहता कोकण रेल्वेच्या गाड्यांना जादा डबे जोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे वेटींगवर असणाऱ्यांना किमान प्रवास करणे शक्य होणार आहे.

रत्नागिरीत गतिमंद मुलीवर गँगरेप

Last Updated: Monday, August 26, 2013, 19:53

रत्नागिरीमध्ये एका गतिमंद तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं धक्कादायक प्रकरण आज उघडकीस आलं आहे. सहा नराधमांनी हे घृणास्पद कृत्य केलं असून पोलिसांनी त्यांना अटक केल्याचं समजतं.

कोकण रेल्वे मार्गावर आणखी विशेष गाड्या

Last Updated: Thursday, August 1, 2013, 12:33

कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने आणखी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत. बांद्रा-मडगाव-बांद्रा आणि अहमदाबाद-मडगाव-अहमदाबाद या दोन गाड्या दि. २ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. २१ सप्टेंबरपर्यंत त्या धावतील.

रायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:56

रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.

पाऊस झाला गूल; वाहतूक सुरळीत!

Last Updated: Thursday, July 25, 2013, 10:10

मुंबईकरांची दोन दिवस दाणादाण उडवणाऱ्या पावसानं सध्या तरी उघडीप घेतलीय. पावसानं विश्रांती घेतल्यानं रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील लोकलसेवा सुरळीत आहे. तसंच मुंबईत ट्रॅफिक अगदी तुरळक ठिकाणी दिसतंय.

कोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 14:11

कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 17:39

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

कोकणात अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 11:25

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.

कोकणात पूरस्थिती, विद्यार्थी गेला वाहून

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 16:10

कोकणात जोरदार वृष्टी होत असल्याने अनेक नद्यांना पूर आलाय. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूण, संगमेश्वर, राजापूर येथे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेय. तर पोलादपूर येथे १३ वर्षीय शालेय विद्यार्थी वाहून गेला.

कोकणात मुसळधार, रेल्वे-रस्ता वाहतुकीवर परिणाम

Last Updated: Wednesday, July 3, 2013, 09:03

गेल्या दोन दिवसांपासून कोकणात मुसळधार पाऊस होत आहे. याचा परिणाम मुंबई-गोवा रस्ता वाहतूक आणि कोकण रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे दरड कोसळ्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. दरम्यान, कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसाठी हेल्पलाईन सेवा सुरू केलेय.

आली हो, राजापूरची गंगा

Last Updated: Wednesday, June 26, 2013, 16:07

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे ९१ दिवसांत गंगेचा पुनरागमन झाले आहे. दर तीन वर्षांनी गंगा अवतरते. मात्र, वर्षभराच्या विक्रमी वास्तव्यानंतर निर्गमन झालेल्या गंगेचे दोन दिवसांपूर्वीच आगमन झाले आहे.

कोकण रेल्वेला पावसाचा तडाखा, रूळावर माती

Last Updated: Tuesday, June 25, 2013, 14:26

विलवडे रेल्वे स्थानकाजवळ दरड कोसळल्याने कोकण रेल्वेची वाहतूक सुमारे दीड तास खोळंबली होती. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा तडाखा विलवडे स्थानकाला बसला. पावसामुळे रूळावर माती आणि दगड आल्याने वाहतूक बंद पडली.

खेडजवळ झालेल्या अपघातात ११ जागीच ठार

Last Updated: Monday, June 24, 2013, 15:16

रत्नागिरीत खेडजवळच्या दाबिळ गावाजवळ डंपर आणि क्वालीस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ११ जणांचा जागीच मृत्यू झालाय.

भास्कर जाधव ओसाड गावाचा पाटील – रामदास कदम

Last Updated: Thursday, June 20, 2013, 22:18

शिवसेनेचे उपनेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यावर जोरदार टीका केली. भास्कर जाधव हे ओसाड गावाचे पाटील आहे. शिवसेना हीच भास्कर जाधावांची ओळख आहे. त्यांना कितीही मोठे केले तरी पुढे कोण विचारणारे नाही, असे मत कदम यांनी यावेळी व्यक्त केले.

26/11 नंतरही सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 20:36

रत्नागिरीत भरकटत आलेलं श्री जॉय या बार्जच्या अपघातामागं सरकारी यंत्रणेचा भोंगळ कारभार जबाबदार असल्याचं समोर आलंय. सागरी सुरक्षेचा पर्दाफाश करणारा झी मीडियाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट...

भरकटलेल्या जहाजाचं गुढ उकललंय!

Last Updated: Tuesday, June 11, 2013, 13:55

रत्नागिरीतल्या समुद्रात भरकटलेल्या जहाजाचं अखेर गुढ उकललंय. इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं हे जहाज रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरच्या समुद्रात विसावलंय. रविवारी हे जहाज समुद्रात दिसल्या नंतर अनेक अफवा उठल्या होत्या. मात्र आता या जहाजात संशयास्पद असं काहीच नसल्याचं स्पष्ट झालंय.

कोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान

Last Updated: Sunday, June 9, 2013, 10:22

मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

देवरूखमध्ये जगभरातील गणरायाची रुपं

Last Updated: Monday, April 29, 2013, 15:43

जगभरात आढळणाऱ्या गणरायाची विविध रुपं रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरूखमध्ये बघायला मिळताहेत. एक फेरफटका मारूयात देवरूख कॉलेज ऑफ आर्ट अॅण्ड डिझाईनचा.

दाभोळ वीज प्रकल्प रिलायन्सच्या घशात जाणार?

Last Updated: Friday, March 29, 2013, 13:21

दाभोळचा ‘रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर’चा वीज प्रकल्प रिलायन्स ग्रुपला देण्याच्या हालचालींना वेग आलाय.

खेड अपघातानंतर सरकारला जाग, तरीही त्रुटी

Last Updated: Wednesday, March 20, 2013, 13:53

मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरी करण्याच्या प्रस्तावाकडे राज्य तसेच केंद्र सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. खेड येथे जगबुडी नदीत खासगी बस कोसळून ३७ ठार तर १५ जण जखमी झालेत. या अपघातानंतर सरकारला जाग आलेय. महामार्गाच्या चौपदरीकरणाचे कामाचा पाठपुराव करण्याचे आश्वासन सरकारला द्यावे लागले तर ट्रॉमा केअर सेंटरचा तातडीने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

अपघात : मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा संसदेत

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 13:57

मुंबई-गोवा महामार्गावर खेड येथे पहाटे खासगी बसला अपघात झाला. या अपघातात ३७ जण ठार तर १५ जण जखमी झालेत. या महामार्गावरील अरूंद रस्त्यांमुळे अपघातांत वाढ होत आहे. हाच मुद्दा धरून मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरी करणाचा मुद्दा शिवसेनेचे खासदार अनंत गिते यांची उचलून धरला.

बस नदीत कोसळली; ३७ जण ठार, १५ जखमी

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 11:36

प्रवाशांनी भरलेली एक खासगी बस नदीत कोसळून भीषण दूर्घटना घडलीय. या अपघातात ३७ जण ठार झालेत तर १५ जण गंभीर जखमी आहेत.

एसटीचा २३ एप्रिलपासून बेमुदत संप

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:21

एसटी कामगारांच्या मागण्यांकडे राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने संतप्त झालेल्या कामगार संघटनेनं संपाची हाक दिलीय. एसटी कामगार संघटनेने २३ एप्रिलपासून बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलाय आहे. शनिवारी येथे झालेल्या राज्यस्तरीय अधिवेशनात हा निर्णय घेतला.

राज्याला रत्नागिरी वीज प्रकल्प डोईजड

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 17:46

पूर्वीचा बुडीत निघालेला दाभोळ प्रकल्प नव्या नावाने सुरू करण्यात आला. आता हाच रत्नागिरी गॅस वीज निर्मितीचा प्रकल्प हा केंद्र सरकारकडे हस्तांतरीत करण्याचा राज्य सरकार गांभीर्याने विचार करत आहे.

ट्रॅकवरून वीज निर्मिती, अनोखा प्रयोग

Last Updated: Sunday, March 3, 2013, 12:58

विनायक बंडबे. वीज निर्मितीचा अनोखा प्रयोग यशस्वी केलाय. पाण्याअभावी राज्यातले वीज निर्मिती संच बंद पडत असताना त्याला पर्याय म्हणून त्यांनी अनोखी शक्कल लढवलीय. रेल्वे ट्रॅकसारख्या ट्रॅकवरून वीज निर्मितीचा त्यांनी यशस्वी प्रयोग केलाय.

जैतापूर प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख

Last Updated: Tuesday, February 12, 2013, 13:13

कोकणातील राजापूर येतील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी संपादित करण्यात आलेल्या जागेसाठी प्रकल्पग्रस्तांना हेक्टरी २२.५ लाख रूपये रक्कम देण्यात येणार आहे. याबाबत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पाठपुरावा केला.

`हापूस`पासून वाईन, कृषी विद्यापीठाची किमया

Last Updated: Monday, January 21, 2013, 14:37

कोकणचा राजा अशी हापूस आंब्याची ओळख. आपल्या मधुर चवीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेल्या हापूसवर आता प्रक्रिया होणार असून हापूस आंब्यापासून वाईन तयार होणार आहे.

`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 12:40

महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.

साताऱ्यात येतो, लक्ष्मण माने काळे फासाच - कोत्तापल्ले

Last Updated: Monday, January 14, 2013, 13:05

मी चिपळूणमध्ये आलोय ते त्वेषाने आलोय. मला धमकी दिली हे योग्य नाही. धमकी दिल्याची खंत आहे. मी साताऱ्यात जाणार आहे. तेथे जाऊन लक्ष्मण माने यांना सांगणार आता माझ्या तोंडाला काळे फासा, असे प्रति आव्हान समारोप भाषणात संमेलनाचे अध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांनी दिले.

संमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ

Last Updated: Sunday, January 13, 2013, 21:18

चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.

.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे

Last Updated: Sunday, January 13, 2013, 16:32

सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.

‘झी २४ तास’ साहित्य जागर

Last Updated: Tuesday, January 8, 2013, 20:41

साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.

साहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 06:54

चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.

महामानवाच्या `आंबावडे` गावची ही दूरवस्था...

Last Updated: Thursday, December 6, 2012, 13:41

बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करणाऱ्यांची चढाओढ लागलीय. कोट्यवधी पददलितांचा उद्धार करणाऱ्या महामानवाचं मूळ गाव मात्र विकासांपासून कोसो दूर राहिलंय. आंबेडकरांच्या स्मारकाकडेही कुणाला लक्ष द्यायला वेळ नाही.

सी गल्स पाहायचेत, चला कोकणात!

Last Updated: Wednesday, November 28, 2012, 09:22

कोकणात सध्या परदेशी पाहुण्यांचं आगमन झालंय. गुलाबी थंडीचा आनंद घेत हे परदेशी पाहुणे समुद्रकिनाऱ्यावर मुक्तपणे विहार करताना दिसत आहेत. कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी ही आनंदाची पर्वणीच ठरलीय.

बंटी बबलीच्या घरातलं `घबाड` पाहून पोलिसही थक्क!

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 19:04

`स्टॉक गुरू` या शेअर मार्केट कंपनीच्या नावे लाखो लोकांची फसवणूक करणाऱ्या उल्हास खैरे या महाठगाच्या घरात पोलिसांना अलिबाबाची गुहाच सापडली आहे.

साहित्य संमेलन : स्वागताध्यक्ष पदावरून वाद

Last Updated: Tuesday, November 20, 2012, 16:50

८६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला लागलेलं ग्रहण सुटण्याची काही चिन्ह दिसत नाहीएत. या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे. तर ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी तटकरेंच्या नावाचं समर्थन केलंय.

कोकण रेल्वे मार्गावर रात्री विशेष गाडी

Last Updated: Saturday, November 17, 2012, 22:19

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर अखा महाराष्ट्रासह देश शोकसागरात बुडाला आहे. कोकणातील शिवसैनिकांसाठी मुंबईत येणाऱ्यासाठी मडगाव ते मुंबई खास रेल्वे सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. ही रेल्वे रात्री दहावाजता मडगाववरून सुटेल.

बबली-बंटीने लाखोंना ११०० कोटींना गंडविले

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:54

सहा महिन्यांत पैसे दुप्पट देण्याचे आमिष दाखवून देशभरातील तब्बल दोन लाख लोकांना गंडा घालणार्याप नागपुरातील एका जोडप्याला रत्नागिरीत पोलिसांनी अटक केली आहे. बबली-बंटीच्या अटकेनंतर तब्बल ११०० कोटींचा गंडा घातल्याचे उघड झाले आहे. या बबली-बंटींने आणखी किती जणांना गंडविले त्याची माहिती अजून पोलिसांनी उघड केलेली नाही.

कोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 10:39

कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.

रत्नागिरीत कुपोषणाचे १५२ बालकं बळी

Last Updated: Friday, October 12, 2012, 20:49

रत्नागिरी जिल्ह्यात कुपोषणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. गेल्या 9 महिन्यांत तब्बल 152 बालकं कुपोषणानं दगावल्याचं समोर आलंय.

असुर्डे रेल्वे स्थानकाबाबत बैठक

Last Updated: Tuesday, September 11, 2012, 17:31

कोकण रेल्वेमार्गावर संगमेश्वर तालुक्यात असुर्डे येथे रेल्वे स्थानक उभारण्याच्या मागणीबाबत दोन दिवसांत बैठक बोलविण्यात आली आहे. काँग्रेसचे खासदार नीलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असुर्डे येथील ‘रेल रोको’ करण्यात आले होते.

बाप्पा आले घरी...

Last Updated: Wednesday, August 22, 2012, 12:04

टिळक पंचांगानुसार काल संपूर्ण कोकणात गणेशोत्सवास सुरुवात आली आहे. अनेकांनी मंगळवारी आपल्या लाडक्या गणरायची आपल्या घरी प्रतिष्ठापना केली. यामुळे कोकणातील वातावरण मंगलमय झालंय.

गणपतीपुळ्यात सात जणांचा बुडून मृत्यू

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:27

गणपतीपुळे येथील समुद्रात बुडालेल्यांपैकी आणखीन दोन पर्यटकांचे मृतदेह सापडले. त्यामुळे गणपतीपुळे समुद्रात बुडून मृत्यू पावलेल्यांची संख्या सात झाली आहे.

खासगीकरणातून रत्नागिरीत आंग्रे पोर्ट

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 11:45

महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर रत्नागिरीपासून जवळच असलेल्या जयगड किल्ल्याच्या आडोशाला खासगीकरणातून आंग्रे पोर्ट उभारण्यात आले आहे. देशातील बहुदा हा पहिलाच खासगी करणाचा प्रयत्न आहे. या बंदराचे अक्षय तृतियेला उद्घाटन करण्यात आले.