21 जून पुन्हा ठरणार होता `काळा दिवस`, पण...

Last Updated: Tuesday, June 24, 2014, 09:08

21 जून हा राज्यासाठी पुन्हा एकदा काळा दिवस ठरतो की काय? अशी परिस्थिती काल म्हणजेच 21 जून 2014 रोजी निर्माण झाली होती

राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सुशीलकुमार सर्वात पुढे

Last Updated: Friday, June 20, 2014, 11:47

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

Last Updated: Thursday, June 19, 2014, 22:25

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

मुख्यमंत्र्यांचे राष्ट्रवादीला खडे बोल

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 17:16

आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं जास्त जागांची मागणी केल्यावर काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात.

मराठा आरक्षणाचा निर्णय 21 जूनला करणार जाहीर - राणे

Last Updated: Friday, June 13, 2014, 17:15

मराठा आरक्षणाचा निर्णय येत्या 21 जूनला जाहीर करण्यात येईल, असं ठाम आश्वासन उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत दिलं. मराठा आरक्षणाचा मुद्दा विधान परिषदेत उपस्थित करण्यात आला होता. त्याला उत्तर देताना राणेंनी ही माहिती दिली.

धक्कादायक, ४ महिन्यात ५६० शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 20:25

फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या 4 महिन्यांच्या कालावधीत 560 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी दरम्यान झालेल्या गारपिटीमुळे 85 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत अशी माहिती आज मदत आणि पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी दिली..

दादांना हवंय, सोशल मीडियावर नियंत्रण!

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 17:35

सोशल वेबसाईटवरून राष्ट्रपुरुषांची, इतिहासातील नेत्यांची बदनामी करण्याचं आणि त्यातून जनतेच्या धार्मिक भावनांना धक्का पोहचवण्याचं काही समाजविघातकांचं काम समोर आलंय.

देर आए, दुरूस्त आए - राज ठाकरे

Last Updated: Monday, June 9, 2014, 19:26

देर आए, दुरूस्त आए... अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज राज्यातील ४४ टोल नाके बंद झाल्यावर प्रतिक्रिया दिली. टोल आंदोलनाचे फलित काय, असा प्रश्न विचारणा-यांना उत्तर मिळाले, असाही टोला राज ठाकरे यांनी लगावला आहे.

मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

Last Updated: Sunday, June 8, 2014, 11:33

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला

Last Updated: Sunday, June 8, 2014, 09:51

मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.

पवारांना CM उमेदवार जाहीर केलं तरी फरक नाही - तावडे

Last Updated: Saturday, June 7, 2014, 17:52

शरद पवारांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार केलं तरी काहीही फरक पडणार नाही, त्यांचं आव्हान आता उरलेलं नाही, अशी प्रतिक्रिया दिलीय. विनोद तावडे यांनी. राष्ट्रवादीनं आधीच भ्रष्टाचाराला आळा घालायला हवा होता, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादीचंही अब की बार, शरद पवार!

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:58

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीही अस्वस्थ आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हतबल झालेत आणि आता थेट शरद पवारांनाच मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार करा, अशी त्यांची मागणी आहे. आता जितेंद्र आव्हाड यांनीही कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिळवलाय.

मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार, अधिकृत घोषणा

Last Updated: Saturday, June 7, 2014, 14:42

मुंबईत मेट्रो ट्रेन उद्यापासून धावणार आहे. मुंबई मेट्रोचे सीईओ अभय मिश्रा यांनी याबाबत आज अधिकृत घोषणा केलीय.

राज्याचा निराशाजनक अतिरिक्त अर्थसंकल्प

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:21

अत्यंत निराशाजनक असा राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प आज विधीमंडळात सादर करण्यात आला. उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत हा अर्थसंकल्प मांडला. निवडणुकांच्या तोंडावर राज्य सरकार सवलतींचा पाऊस पाडेल, अशी अपेक्षा होती. मात्र दिवाळखोरीत गेलेल्या सरकारने त्या आघाडीवरही उपेक्षाच केली.

राज्याचे अधिवेशन, चहापानावर विरोधकांचा बहिष्कार

Last Updated: Sunday, June 1, 2014, 20:29

राज्य विधीमंडळाचं उद्यापासून अधिवेशन सुरु होतोय. दरम्यान त्यानिमित्त ठेवण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला. हे जनतेनं नाकारलेलं सरकार असल्याची टीका यावेळी विरोधकांनी केलीय.

दिल्लीत नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र; भाजपचा जोर

Last Updated: Tuesday, May 27, 2014, 18:21

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी आता केवळ पाच महिने उरले असताना राज्यात महायुती कुणाच्या नेतृत्त्वाखाली निवडणुका लढवणार? असा प्रश्न निर्माण झालाय.

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचाच - उद्धव ठाकरे

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 14:02

केंद्रात एनडीएचे सरकार असले तरी महाष्ट्रात हे शिवसेना-भाजप आघाडीचे असेल. मात्र, मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच असेल, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. ‘एनडीए’च्या बैठकीनिमित्त उद्धव ठाकरे राजधानीत आले होते. त्यावेळी पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला.

राज ठाकरेंच्या घरासमोर ‘चिटपाखरू’ नाही

Last Updated: Tuesday, May 20, 2014, 19:13

निवडणुका म्हटलं की जिथे प्रचंड लगबग असायची..... कार्यकर्त्यांची गर्दी, प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींची व्हिज्युअल्स घेण्याची धडपड सुरू असायची..... कुणीही नेता त्या भागाच्या आसपास जरी फिरकला तरी ब्रेकिंग न्यूज व्हायची..... आता तिथं सारं काही शांत आहे..... आम्ही बोलतोय कृष्णकुंजबद्दल...... पाहुयात सध्या कृष्णकुंजवर काय सुरू आहे.....

मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल

Last Updated: Monday, May 19, 2014, 10:48

यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात दाखल झालाय. मान्सून सामान्यत: 20 मे रोजी अंदमान समुद्रात दाखल होतो. मान्सून वेळेआधी दाखल झाला असला, तरी तो केरळात नेहमीपेक्षा चार दिवस उशिराने पोहेचेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

उद्या निवडणूक झाली तर युतीची सत्ता

Last Updated: Sunday, May 18, 2014, 19:29

देशभरातल्या मोदी लाटेत महाराष्ट्रातही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची वाताहत झाली आहे. राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघांपैकी तब्बल 245 मतदारसंघांमध्ये महायुतीच्या उमेदवारांना आघाडी मिळालीय.

महाराष्ट्राची जबाबदारी अमित शहांवर येण्याचे संकेत

Last Updated: Sunday, May 18, 2014, 23:09

लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर नरेंद्र मोदींचं लक्ष आता महाराष्ट्र विधानसभेवर असणार आहे. याच कारणाने भाजपचे उत्तर प्रदेशचे प्रभारी अमित शहा आता महाराष्ट्रावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.

महाराष्ट्रातून युतीच्या 42 खासदारांची फौज, राजकीय गणिते बलदणार

Last Updated: Saturday, May 17, 2014, 12:15

नरेंद्र मोदींना दिल्लीच्या गादीवर बसवण्यासाठी महाराष्ट्रानंही मोलाचा हातभार लावलाय. 48 पैकी 42 खासदारांची फौज उभी करून महायुतीनं मोदींचं सिंहासन बळकट केलंय. तर सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मोदी लाटेचा एवढा जबर तडाखा बसलाय की, महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची गणितंच विस्कटून गेलीत.

लोकसभा निवडणूक : राज्यात महायुतीचा 'झेंडा', राणे-भुजबळ पराभूत

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:36

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...

राज्य सरकारची भरती, 1300 रिक्त पदे भरणार

Last Updated: Thursday, May 15, 2014, 08:58

राज्यात सध्या बेरोजगारांसाठी गुडन्यूज आहे. राज्य प्रशासनाने नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई पोलीस दलात जवळपास 3500 जागा भरण्यात येत आहेत. त्यासाठी ऑनलाईन अर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. आता तर मंत्रालयातील 448 आणि मुंबईतील इतर शासकीय कार्यालयांतील 852 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासंदर्भात राज्य शासनाने मंगळवारी आदेश काढला आहे.

मुख्यमंत्री होण्याची इच्छा नाही- सुप्रिया सुळे

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 21:38

महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची माझी इच्छा नाही. राज्यात अजितदादा हे सक्षम आहे, त्याचा प्रशाकीय अनुभव दांडगा आहे आणि तो भाषणही चांगलं करतो, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रीया सुळे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांचे नाव मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आणले आहे.

पाहा प्रमुख राज्यांविषयी वाहिन्यांचे अंदाज

Last Updated: Monday, May 12, 2014, 23:23

लोकसभेच्या मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर, वाहिन्यांवर एक्झिट पोल्स आणि सर्वेचे वारे वाहू लागले आहेत.

पाहा महाराष्ट्रामध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?

Last Updated: Monday, May 12, 2014, 20:41

लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने महाराष्ट्रात एनडीएला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं म्हटलं आहे.

महाराष्ट्रात 84 व्हीआयपींच्या सुरेक्षासाठी 812 पोलीस

Last Updated: Monday, May 12, 2014, 12:07

महाराष्ट्रात 84 व्हीव्हीआयपी लोकांच्या सुरक्षेसाठी एकूण 812 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आलंय.

गडचिरोलीत नक्षली हल्ला; 7 जवान शहीद

Last Updated: Sunday, May 11, 2014, 15:18

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरूंग स्फोटात नक्षलविरोधी दलाच्या कामांडरसह सात जवान शहीद झालेत तर दोन जण गंभीर जखमी झालेत.

राज्य मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत; फिल्डींग सुरू!

Last Updated: Friday, May 9, 2014, 10:58

लोकसभा निवडणूक निकालानंतर राज्य मंत्रिमंडळामध्येही फेरबदल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत... मंत्रिमंडळातील या फेरबदलांमध्ये कुणाचा पत्ता कट होणार आणि कुणाची वर्णी लागणार, याबाबतची जोरदार चर्चा सध्या रंगलीय.

राज्यात टाटा समूहाची हजारो कोटींची गुंतवणूक

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 10:45

महाराष्ट्रातून नॅनो प्रकल्प गुजरातमध्ये घेऊन गेलेल्या टाटा उद्योग समूहाने पुन्हा महाराष्ट्रात गुंतवणूक करण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्रात टाटा समूह पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यासाठी संपूर्ण आराखडा तयार करावा लागेल.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला `अभ्यासक्रम बंद`चे ग्रहण

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 10:26

जागतिक मंदीचा फटका उद्योगांसोबतच महाविद्यालयांनाही बसतोय. जळगावातील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला याचा नुकताच प्रत्यय आलाय.

`एअरटेल`ची थ्रीजी सेवा ग्राहकांसाठी पुन्हा एकदा हजर!

Last Updated: Monday, May 5, 2014, 13:49

‘एअरटेल’च्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे... एअरटेल लवकरच, आठ शहरांत पुन्हा एकदा थ्रीजी सेवा सुरु करणार आहे. त्यामुळे, या शहरांतील ग्राहकांना थ्रीजी सेवेचा म्हणजेच गतीशील इंटरनेट सेवेचा लाभ मिळू शकेल.

कोकण रेल्वे अपघात, मृतांची आणि जखमींची नावं

Last Updated: Sunday, May 4, 2014, 22:39

गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी रेल्वे अपघात झाला त्या ठिकाणाला भेट दिलीय. अपघातग्रस्तांना राज्य सरकारकडून योग्य प्रकारची मदत केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.

गुजराती विधानावर उद्धव ठाकरे यांचे घुमजाव

Last Updated: Friday, May 2, 2014, 20:42

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विधानावर घुमजाव केले आहे. सामना दैनिकातून गुजराती समाजावर केली होती टीका. त्यानंतर उद्धव यांनी गुजराती वक्तव्यावर पत्रक काढले. यात म्हटलंय, शिवसेनाप्रमुखांना अपेक्षित असलेला चमत्कार घडवून आणूया. मराठी - गुजराती समाजाची एकजूट अखंड ठेवूया.

मोदींसाठी एकत्र येता, मग महाराष्ट्रासाठी का नाही: उद्धव ठाकरे

Last Updated: Thursday, May 1, 2014, 17:46

गुजराती समाजाचा पंतप्रधान व्हावा यासाठी गुजराती माणूस एकत्र येतो

महिलेची छेड काढणाऱ्या पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक

Last Updated: Monday, April 28, 2014, 12:35

बोरीवली पोलिसांनी आज पाच नेव्ही अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलीय. या पाच नेव्ही अधिकाऱ्यांवर वांद्र्यातील पबमध्ये महिलेची छेड काढल्याचा आरोप आहे.

नोकरीची संधी: राज्यात चौदा हजार पोलिसांची भरती

Last Updated: Monday, April 28, 2014, 09:10

पोलीस दलात नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात राज्यात पोलीस भरतीप्रक्रिया सुरू होणार आहे.

राज्यात वैशाखाआधीच `वणवा`

Last Updated: Saturday, April 26, 2014, 22:23

निवडणुका पार पडल्यानंतर राजकीय वातावरण काही अंशी थंड झालं असलं तरी राज्यात तपमानाचा पारा चांगलाच चढलाय. वैशाखाआधीच वणवा पेटलाय की काय? असं वातावरण सध्या पसरलंय.

राज्यात आजपासून तीन दिवस लोडशेडींग सुरु...

Last Updated: Friday, April 25, 2014, 10:36

राज्यात पुन्हा लोडशेडींगचे संकट उद्धभवणार आहे. आजपासून तीन दिवस हे भारनियमन असणार आहे. अकोला ते औरंगाबाद या उच्चदाब वाहिनीची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शुक्रवार ते रविवारदरम्यान राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होणार आहे.

मुंबईत १९९१नंतर विक्रमी मतदान

Last Updated: Thursday, April 24, 2014, 21:32

गेल्या निवडणुकीत १९ मतदार संघात झालेल्या एकूण मतदानापेक्षा यावेळी एकूण ११ टक्क्यांनी मतदान वाढले आहे. गेल्या निवडणुकीत एकूण ४५ टक्के मतदान झाले होते यंदा ही आकडेवारी अंदाजे ५६ टक्क्यांपर्यंत गेली आहे.

राज्यात अंदाजे सरासरी 56 % तर मुंबईत 53 % मतदान

Last Updated: Friday, April 25, 2014, 08:49

लोकसभा निवडणुकांच्या रणसंग्रामात आज राज्यात तिस-या टप्प्यातल्या मतदानाला सुरुवात झालीय. राज्यात 19 तर देशभरात 117 मतदारसंघात मतदानाला सुरुवात झालीय.

राज्यातल्या तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 20:09

२४ तारखेला लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातलं तिसरा टप्प्यातलं मतदान होत आहे. यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी सहा वाजता संपला. उत्तर महाराष्ट्र, मुंबई, कोकणातली एक जागा आणि ठाणे जिल्ह्यातल्या एकूण १९ जागांवर २४ तारखेला मतदान होणार आहे. एकूण 338 उमेदवारांचं भवितव्य या मतदानानं निश्चित होणार आहे.

उत्तरभारतीयांना पुन्हा मारीन - राज ठाकरे

Last Updated: Monday, April 21, 2014, 21:49

उत्तर भारतीय माझ्या मराठी मुलांच्या तोंडातील घास हिसकवून घेत असतील तर पुन्हा मारीन असे सज्ज दम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज लालबाग येथील मेघवाडी सभेत दिला.

मुख्यमंत्री अपघातात थोडक्यात बचावले

Last Updated: Sunday, April 20, 2014, 13:05

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण एका अपघातात थोडक्यात बचावले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाहन ताफ्याला मालाडला शनिवारी रात्री अपघात झाला.

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

Last Updated: Saturday, April 19, 2014, 18:56

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

लोकसभा निवडणूक - यांनी बजावला मतदानाचा हक्क

Last Updated: Thursday, April 17, 2014, 12:29

राज्यात मतदानाचा उत्साह आहे. आतापर्यंत चांगले मतदान झाले आहे. सरासरी 19 ते 22 टक्क्यांपर्यंत मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह दिसून येतोय. 16 लाख 47 हजार मतदार आहेत. भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांनी चिंचणी येथे तर, कॉंग्रेसचे उमेदवार प्रतीक पाटील यांनी सांगलीतून मतदानाचा हक्क बजावला.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात सरासरी ६१.८० टक्के मतदान

Last Updated: Friday, April 18, 2014, 07:32

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या १९ मतदारसंघांमध्ये ३५८ उमेदवारांचं भवितव्य आज ठरणार आहे.

हुश्श... राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या प्रचारतोफा थंड!

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 09:34

राज्यातल्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग अशा एकूण १९ मतदारसंघांमध्ये उद्या म्हणजेच गुरुवारी मतदान होतंय.

राहुल गांधी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर

Last Updated: Saturday, April 12, 2014, 19:49

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौ-यावर येत आहेत. त्यांची लातूर, शिर्डी, पुणे आणि हिंगोली येथे जाहीर सभा होणार आहेत.

राज-गडकरी मैत्री, पुण्यात मुंडे गटाला तडाखा

Last Updated: Friday, April 11, 2014, 16:46

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवार देण्यामागे भाजपमधील एका गटाचाच सहभाग असून, त्याबद्दलची नाराजी तेथील कार्यकर्त्यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथ सिंह; तसेच अन्य नेत्यांपर्यंत पोचवली आहे.

मुख्यमंत्री बनण्याची मुंडेंची सुप्त इच्छा उघड!

Last Updated: Friday, April 11, 2014, 13:26

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनायचं, हे आम्ही नाही तर खुद्द मुंडेंनी पुण्यातल्या सभेत म्हटलंय.

राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान

Last Updated: Thursday, April 10, 2014, 22:48

विदर्भात मतदारांचा संमिश्र प्रतिसाद मिळालाय. सरासरी सुमारे ५५.७० टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, सायंकाळी गर्दी वाढल्याने काही ठिकाणी ६.३० वाजेपर्यंत मतदान सुरु होते. राज्यात पहिल्या टप्प्यात ६२.३६ टक्के मतदान झाले. या ठिकाणी सुरक्षा रक्षकांनी नक्षल्यांचे हल्लेही परतविलेत. काही ठिकाणी नावे नसल्याने गोंधळ दिसून आला.

एका महिन्यात तीन ड्राय डे; तळीरामांची पंचाईत

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 16:18

लोकसभा निवडणुका टप्प्याटप्प्यानं सुरु झाल्यात... महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक तीन टप्प्यांत पार पडणार आहेत. यादरम्यान राज्यात तीन टप्प्यांत ड्राय डे घोषित करण्यात आलाय.

राज ठाकरे - मोदींवर प्रेम, उद्धवशी दुरावा नवीन समीकरण

Last Updated: Friday, April 4, 2014, 19:04

आपला चुलत भाऊ उद्धव ठाकरे याच्याशी मतभेद झाल्यानंतर २००७मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) या राजकीय पक्षाची स्थापना राज ठाकरे यांनी केली. जरी हा पक्ष स्थापन केला तरी चुलते बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो.

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:30

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.

शरद पवार : घड्याळाच्या काट्याची दिशा कोणाकडे?

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:12

लोकसभेची रणधुमाळी सुरू झाली असली तरी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भूमिका अजूनही अस्पष्ट दिसून येत आहे.

बाळासाहेबांचं कार्य पुढं चालू ठेवा, मोदींचं आवाहन

Last Updated: Sunday, March 30, 2014, 13:36

अमरावतीमध्ये आज नरेंद्र मोदींची तोफ धडाडली. आनंदराव अडसूळांच्या प्रचारासाठी मोदी आज अमरावतीमध्ये दाखल झाले होते. यावेळी शेतकरी आत्महत्यांवरून मोदींनी राज्यसरकार आणि शरद पवारांना चांगलच धारेवर धरलं.

महाराष्ट्राचा निम्मा संघ `भारत श्री` च्या अंतिम फेरीत

Last Updated: Tuesday, March 25, 2014, 23:42

इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनच्या वतीनं बालेवाडीत सातव्या `भारत श्री` स्पर्धेचं आयोजन पुण्यात करण्यात आलं आहे.

काँग्रेसचा माणिकराव ठाकरेंना धक्का, मोघेंना उमेदवारी

Last Updated: Friday, March 21, 2014, 22:57

काँग्रेसने लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ एकच उमेदवार जाहीर केला. मात्र, नांदेडचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना धक्का काँग्रेस देणार की त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देणार याकडे लक्ष लागले आहे.

आदर्श घोटाळा : राज्य सरकारकडून कारवाईसाठी चौकशी आदेश

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 16:56

आदर्श इमारत चौकशी आयोगानं दिलेल्या अहवालानुसार कारवाई करण्याचे आदेश राज्य सरकारनं मुंबई जिल्हाधिका-यांना दिलेत. त्यानुसार या इमारतीतील सभासदांवर कारवाई करण्यास सुरुवात झालीये.. सर्व १०३ सदस्यांनी सादर केलेल्या पुराव्याच्या आधारावर आदर्श इमारतीत कोण आणि कसे सभासद झालेत याबाबत आदर्श चौकशी आयोगानं कारवाईची शिफारस केली होती. त्याआधारे ही कारवाई सुरु केल्याचं बोलंल जातय.

राहुल नार्वेकर करणार अखेरचा जय महाराष्ट्र?

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:25

शिवसेनेच्या राहुल नार्वेकरांनी माघार घेतल्यामुळं विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मात्र, नार्वेकर यांनी शिवसेनेला जोरदार दे धक्का दिलाय. त्यांनी सेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीची वाट धरली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेनेचे शिवबंधन धागा तुटला आहे.

महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा भाजपनं बंदोबस्त करावा- उद्धव

Last Updated: Thursday, March 13, 2014, 15:36

`महायुती अभेद्य असून भाजप अन्य कोणत्याही मार्गानं जाणार नसल्याचं नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंह यांनी शिवसेनेला आश्वस्त केलंय. त्यामुळं इतरांनी त्यावर बोलण्याची गरज नाही,` असं सांगत, `महायुतीत बिब्बा घालणाऱ्यांचा बंदोबस्त भाजपनं करावा,` असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठणकावलंय.

कमळाबाईंसाठी सेनेचं `टेंगूळ आख्यान`, गडकरींवर टीकास्त्र

Last Updated: Thursday, March 13, 2014, 11:57

सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजपवर टीका केलीय. `टेंगूळ आख्यान` या मथळ्याखाली आलेल्या अग्रलेखात भाजप-मनसे जवळीकीवर टीकास्त्र सोडलंय. दुश्मनांचे डोके फोडण्याऐवजी भाजप सध्या स्वतःच्या डोक्यात काठी मारुन टेंगूळ आणत असल्याची टीका यात करण्यात आलीय.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

आपच्या बेशिस्तीनं मुंबईकर त्रस्त!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 15:32

आम आदमी पक्षाचे समन्वयक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची मुंबईतली रिक्षातली सवारी आणि लोकलवारी चांगलीच चर्चेची ठरली. केजरीवाल सकाळी साडे दहाच्या सुमारास दिल्लीहून विमानानं आले. त्यानंतर त्यांनी थेट रिक्षातून अंधेरी स्टेशन गाठलं. त्यांच्यासह त्यांचे कार्यकर्तेही रिक्षातूनच आले खरे मात्र यावेळी त्यांनी सर्व वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवल्यानं काही काळ वाहतुकीची समस्या निर्माण झाली होती.

गजानन बाबर यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:16

शिवसेनेचे खासदार गजानन बाबर यांनी अखेर जय महाराष्ट्र केला आहे. ते नाराज असल्याने सेनेला रामराम केलाय. बाबर हे मनसेच्या मार्गावर असल्याचे बोलले जात आहे.

सेनेला अभिजीत पानसे यांचा जय महाराष्ट्र

Last Updated: Saturday, March 8, 2014, 14:40

शिवसेनेचा आणखी एक मोहरा गळला आहे. अभिजीत पानसे यांनी सेनेला जय महाराष्ट्र केलाय. पानसे उद्या मनसेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात जाहीर प्रवेश करणार आहे.

महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यातील बिग फाइट

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 17:23

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील तिसऱ्या टप्प्यात १९ मतदार संघांचा समावेश आहे... पाहुयात, तिसऱ्या टप्प्यातील महाराष्ट्रातील बिग फाइट...

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील `बीग फाईटस्`

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 16:45

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे.. पाहुयात, दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती...

महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यातील `बीग फाईटस्`

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 16:22

लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर झालंय. महाराष्ट्रात तीन टप्प्यांमध्ये निवडणूक पार पडणार आहे. पाहुयात... पहिल्या टप्प्यातील महाराष्ट्रातील बिग फाइट

महाराष्ट्रातील निवडणुकीचे वेळापत्रक

Last Updated: Wednesday, March 5, 2014, 15:28

लोकसभा निवडणूक कधी होणार याची उत्सुकता संपली आज निवडणुकीची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील तिन्ही टप्प्यांतील निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

शिवाजी महाराजांच्या नाववर सरकारचा जोगवा

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 21:17

निवडणुका तोंडावर आल्यानं आता राज्य सरकार जागं झालंय. मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी मराठा आरक्षणाचा अहवाल सरकारने स्वीकारला तर दुसरीकडे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाबाबत सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे उमेदवार जाहीर

Last Updated: Thursday, February 27, 2014, 15:56

महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. यामध्ये दोन विद्यमान सदस्यांना पुन्हा राष्ट्रवादीने संधी दिली आहे.

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २० मार्चला निवडणूक

Last Updated: Wednesday, February 26, 2014, 08:38

महाराष्ट्र विधानसभेकडून विधान परिषदेवर निवडून गेलेले नऊ सदस्य नवृत्त होत असल्याने त्या जागा भरण्यासाठी येत्या २० मार्च रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने मंगळवारी केली.

प्रमुख मुद्दे : `अर्थसंकल्प २०१४-१५`

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 15:01

विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:25

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ

Last Updated: Sunday, February 23, 2014, 23:36

अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. राज्यातील 2 लाख 6 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गाजणार, विरोधक आक्रमक

Last Updated: Sunday, February 23, 2014, 19:34

राज्याचे उद्या सोमवारपासून सुरू होणारं चार दिवसांचं अर्थसंकल्पीय अधिवेशन अनेक मुद्यांनी गाजणार असल्याची चाहूल अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच लागलीय. कारण विरोधकांनी पत्रकार परिषद घेऊन आदर्श घोटाळा, टोल, वीज आणि एलबीटीच्या मुद्यांवरून सरकारला घेरणार असल्याची घोषणाच केलीय.

`फँड्री`नं ओलांडली भाषेची सीमारेषा!

Last Updated: Thursday, February 20, 2014, 17:36

नागराज मंजुळे दिग्दर्शित आणि झी टॉकिज प्रस्तुत `फँड्री` सिनेमाने उंच भरारी घेतलीय. महाराष्ट्रात मिळत असलेल्या तुफान यशानंतर `फँड्री` हा सिनेमा आता महाराष्ट्राबाहेरही रिलीज होणार आहे.

सचिनच्या सन्मानासाठी समितीची स्थापना

Last Updated: Thursday, February 13, 2014, 15:49

मागील वर्षी क्रिकेटाला अलविदा करणाऱ्या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा सन्मान महाराष्ट्र शासन करणार आहे. सचिनच्या सन्मानासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांचा सहभाग असलेल्या सात सदस्यीय समितिची स्थापना करण्यात आली आहे.

...असं होतं महाराष्ट्रभर मनसे आंदोलनाचं चित्र!

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 17:39

मनसेच्या आजच्या आंदोलनात राज ठाकरे यांच्या अटक आणि सुटकेनंतर दादर आणि डोंबिवलीत कडकडीत बंद पाळण्यात आला.

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री विभागात नोकरीची संधी

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 15:28

शासकीय मुद्रण, लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, महाराष्ट्र राज्य या विभागात वरिष्ठ लिपिक, विक्रेता/विक्रेती, वाहन चालक, चपराशी, सफाईगार/मजदूर, स्वच्छक आणि कर्मशाळा परिचर या संवर्गातील रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र टोलमुक्त होणार नाही - भुजबळ

Last Updated: Wednesday, February 12, 2014, 11:21

मनसेचं टोल आंदोलन सुरू असतांना सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी संतापजनक वक्तव्य केलं आहे.

राष्ट्रवादीच्या `जेरी`नं आणलं `टॉम`ला जेरीस!

Last Updated: Monday, February 10, 2014, 20:09

राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा जागावाटपाचा तिढा अखेर सुटलाय. दोन्ही पक्षांनी २६-२२ फॉर्म्युलावर एकमतानं शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलंय.

मुख्यमंत्री म्हणतात, आधी `मी` आणि मग `आप`

Last Updated: Sunday, February 9, 2014, 18:57

राज्याचे मुख्यमंत्री मिस्टर क्लीन पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या गाडीचा लाल दिवा काढला, हा आप इफेक्ट आहे, असा अनेकांनी अर्थ काढला.

यासिन भटकळ आता महाराष्ट्र एटीएसच्या कस्टडीत

Last Updated: Thursday, February 6, 2014, 12:19

इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य यासिन भटकळची महाराष्ट्र एटीएसनं कस्टडी घेतलीये. २८ ऑगस्ट २०१३ला यासिनला इंडो-नेपाळ सीमेवरुन अटक करण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली पोलीस, हैद्राबाद पोलीस आणि आता महाराष्ट्र एटीएसनं यासीन भटकळची कस्टडी घेतलीये.

आता एटीएम मशिन रात्रीची बंद राहणार

Last Updated: Thursday, February 6, 2014, 11:44

रात्री-अपरात्री तुमच्यावर एटीएममधून पैसे काढण्याची वेळ आली, तर तुमची पंचाईत होऊ शकते. `एनी टाईम मनी` आणि `२४ तास केव्हाही पैसे काढा`, असं म्हणत उभी राहिलेली ही एटीएम सेंटर्स आता रात्री बंद राहण्याची शक्यता आहे.

चला नोकरीची संधी: एसटीची भरती प्रक्रिया सुरू

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 11:59

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं विविध प्रवर्गात उमेदवारांची भरती प्रक्रिया हाती घेतलीय. त्या अनुषंगानं एसटीतर्फे जाहिरात आणि सूचना प्रसिद्ध करण्यात आलीय. उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करायचे असून अर्जाची नोंदणी करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी २०१४ ही आहे.

रणजी : महाराष्ट्राचा डाव ३०५ धावांत आटोपला

Last Updated: Thursday, January 30, 2014, 17:20

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत शेवटचे पाच बळी अवघ्या 33 धावांत गमाविल्याने कर्नाटकविरुद्धच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राचा पहिला डाव 305 धावांतच आटोपला.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:41

काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.

राज्यातील ४४ पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक

Last Updated: Sunday, January 26, 2014, 16:09

राज्य पोलीस दलातील ४० अधिकार्‍यांना राष्ट्रपती पोलीस विशेष गुणवत्ता व पोलीस उल्लेखनीय सेवा पदक पुरस्काराने गौरविण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला गृह मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले होते.

राज्यात अनेक भागात पाऊस

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:51

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयात नोकरीची संधी

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:32

महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील ध्वनीयंत्रणा चालक तथा यांत्रिक या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. एकूण रिक्त १४ पदे भरण्यात येणार आहे.

बंगालचा धुव्वा उडवून महाराष्ट्राने रणजीची फायनल गाठली

Last Updated: Monday, January 20, 2014, 18:44

रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्रने धडक मारली आहे. महाराष्ट्राने बंगालचा दहा विकेट्सनी धुव्वा उडवून अंतिम सामन्यापर्यंत मजल गाठली आहे, महाराष्ट्राने यापूर्वी दोनदा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. तर अंतिम फेरी गाठण्याची महाराष्ट्राची ही अवघी पाचवी वेळ आहे.

नोकरीची संधी - राज्य गृह विभाग न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय

Last Updated: Thursday, January 16, 2014, 09:01

महाराष्ट्र शासन गृह विभागाच्या न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई, यांच्यावतीने रिक्त जागांसाठी गट - क व गट - ड या संवर्गातील पदांच्या सरळसेवा भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

सत्तेत आल्यावर 'टोलमुक्त महाराष्ट्रा'चं महायुतीचं आश्वासन

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 19:36

‘राज्य सरकारनं महाराष्ट्र टोलमुक्त करावा अन्यथा सत्तेत आल्यावर आम्हीच महाराष्ट्राला टोलमुक्त करू’ असं आश्वासनंच महायुतीच्या नेत्यांनी आज बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिलं.

कोल्हापुरात शिवसेनेचं ‘टोल’फोड, आज बंदची हाक

Last Updated: Monday, January 13, 2014, 08:05

टोलवसुलीच्या विरोधात आज शिवसेनेनं कोल्हापूर बंदची हाक दिलीय. कोल्हापूरकरांच्या संतापाचा पुन्हा उद्रेक झाला. टोलविरोधी आंदोलनला रविवारी हिंसक वळण लागलं. कोल्हापुरातील फुलेवाडी आणि शिरोली टोलनाक्यांची शिवसैनिकांनी आणि संतप्त नागरिकांनी तोडफोड केली.