मुंबईत पोलीस भरतीचा पाचवा बळी

Last Updated: Wednesday, June 18, 2014, 08:11

पोलीस भरती प्रक्रियेत आणखी एका उमेदवाराचा मृत्यू. झालाय. गहनीनाथ लटपटे असं त्याचं नाव आहे. बीडचा रहिवाशी असलेला गहनीनाथ 14 तारखेला विक्रोळीमध्ये भरती प्रक्रिया सुरु असताना बेशुद्ध पडला होता. त्याचं मंगळवारी रात्री मुलुंडच्या प्लॅटिनम रुग्णालयात निधन झालं.

`कॅम्पा कोला`चा चौथा बळी; कारवाई स्थगित!

Last Updated: Monday, June 16, 2014, 19:38

`कॅम्पा कोला`वर मंगळवारी कारवाई होणार नाहीय. उद्याची कारवाई रद्द करण्यात आलीय. आता १९ जूननंतरच ही कारवाई होण्याची शक्यता आहे.

राहुल सपकाळ पोलीस भरतीचा चौथा बळी

Last Updated: Saturday, June 14, 2014, 14:49

मुंबईत पोलीस भरती दरम्यान चार उमेदवारांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडालीय. पोलीस भरतीचा चौथा बळी राहुल सपकाळ ठरला आहे. मृत्यू पोलिसांच्या ढिसाळ नियोजनामुळे हे मृत्यू झाले असले तरी भरती प्रक्रियेत कुठलीच उणीव नव्हती, असं पोलीस प्रशासनाचं म्हणणंय.

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:20

जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.

गुप्तधनासाठी बापानं दिला चिमुकलीचा बळी

Last Updated: Monday, June 9, 2014, 14:32

कर्नाटकातील फिरोजाबाद किल्ल्यातील गुप्तधन मिळावं यासाठी एका पित्याने आपल्या १५ महिन्यांच्या चिमुकलीचा बळी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. अंधश्रद्धेची बळी ठरलेल्या चिमुकलीच्या वडिलांसह सात जणांना अटक करण्यात आली आहे.

नागपुरात उष्माघाताचे 7 बळी

Last Updated: Sunday, June 8, 2014, 22:30

नागपुरात उन्हाचा प्रकोप वाढतच जातोय.  उष्माघाताचे आणखी ७ बळी गेले आहेत. उष्माघाताचे एकूण बळींची संख्या आता 19 झाली आहे.

विनोद कांबळीनं केलं पुन्हा एकदा लग्न

Last Updated: Monday, May 5, 2014, 17:02

माजी क्रिकेटर विनोद कांबळी यानं पुन्हा एकदा विवाह केलाय. आता त्याची पत्नी कोण? असा जर प्रश्न तुम्हाला पडला असेल... तर थांबा!

तीन वर्षीय मुलीकडून फायरिंग लहान भावाचा बळी

Last Updated: Tuesday, April 22, 2014, 12:36

अमेरिकेतील एक धक्कादायक घटना. अवघ्या 3 वर्षांच्या मुलीकडून चुकून बंदुकीची गोळी सुटली. या सुटलेल्या गोळीने तिच्याच दोन वर्षांच्या भावाचा जीव घेतला. या दुर्दैवी घटनेने कुटुंबीयांना धक्का बसलाय. ही घटना उताहमधील काचे काउंटीमध्ये घडली.

राष्ट्रवादीने सुरेश धसना बळीचा बकरा बनवला : मुंडे

Last Updated: Monday, March 3, 2014, 16:28

राष्ट्रवादीने सुरेश धस यांना बळीचा बकरा बनवल्याचं भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी म्हटलंय.

ठाणेकरांची मान शरमेनं खाली, `७४ खुन्यांना पुन्हा सेवेत घ्या`

Last Updated: Friday, February 21, 2014, 22:59

ठाणेकरांची मान शरमेनं खाली जावी, असा प्रकार आज ठाण्याच्या महापालिकेत घडला. शिळफाटा इमारत दुर्घटनेत बळी पडलेल्या ७४ जणांच्या नातलगांचे अश्रूही अजून सुकले नाहीत, तोच या प्रकरणातले आरोपी असलेल्या अधिका-यांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आलाय.

सीरियाच्या यादवीत १०,००० लहानग्यांचा बळी - यूएन

Last Updated: Thursday, February 6, 2014, 16:24

देशात सैनिकांकडून लहान मुलांचा अनन्वित छळ होत असल्याच्या वृत्ताला सीरिया सरकारनं नेहमीच नकार दिलाय. `यूएन`च्या अहवालानं मात्र या वृत्ताला दुजोरा दिलाय. सीरियामध्ये सुरू असलेल्या सरकार आणि विरोधात यांच्या यादवी संघर्षात लहान मुलांना बळी दिलं जातंय, हे या अहवालातून धडधडीतपणे समोर आलंय.

दुसरीतल्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य उघड

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 12:14

महिला, मुली लैंगिक अत्याचाराच्या शिकार होत असल्यामूळ असुरक्षित असल्याच म्हटलं जातं. मात्र, लहान मुलींसह आत्ता अल्पवयीन चिमुरडी मुलंसुद्धा लैंगिक विकृतीचे शिकार होऊ लागल्याचं उघड झालंय.

देवाला आपलंस करण्यासाठी बालकाचा नरबळी

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 13:50

मांत्रिकाच्या सहाय्याने देवाला खूष करण्यासाठी एक मन सुन्न करणारी घटना आसाम राज्यात घडलेय. सहा महिन्यांच्या आपल्या बाळाचा नरबळी दिला गेलाय. या घटनेने परिसरात हादरा बसलाय. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आलेय.

हुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या

Last Updated: Sunday, December 15, 2013, 22:06

हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.

वसईत महिलेचा नरबळी, मांत्रिकासह सहा जणांना अटक

Last Updated: Saturday, December 14, 2013, 20:12

ठाणे जिल्ह्यात धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्ह्यातील वसई येथे चक्क महिला नरबळी देण्यात आले आहे. या अघोरी प्रकारामुळे चीड व्यक्त होत आहे. महिला बळी देणाऱ्या मांत्रिकासह सहा जणांना पोलिसांनी अटक केले आहे.

विनोद कांबळीला `लिलावती`तून डिस्चार्ज!

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 13:55

माजी भारतीय क्रिकेटर विनोद कांबळीला मंगळवारी ‘लिलावती’तून डिस्चार्ज देण्यात आलाय.

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी लीलावतीत

Last Updated: Friday, November 29, 2013, 12:48

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत असून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.

'दोस्त दोस्त ना रहा'; विनोदचा सचिनवर इमोशनल अत्याचार

Last Updated: Wednesday, November 20, 2013, 20:36

‘सचिनला माझ्याविरूद्ध काही लोक भडकवत होते… यात त्यांना यश मिळाल्याचं सध्या दिसतंय’ असं खुद्द सचिनचा एकेकाळचा मित्र विनोद कांबळीने म्हटलंय.

... आणि सचिन बालमित्राला विसरला?

Last Updated: Tuesday, November 19, 2013, 10:50

निवृत्तीनंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं अंधेरीतल्या एका हॉटेलमध्ये जंगी पार्टी दिली. या पार्टीला क्रिकेट विश्व, बॉलिवूड आणि राजकारणातले अनेक दिग्गज हजर होते. मात्र या पार्टीत नव्हता तो सचिनचा बालमित्र... सचिननं त्याला आमंत्रणच दिलं नव्हतं... हा मित्र म्हणजे विनोद कांबळी...

विनोद कांबळीला परदेशी महिलेने म्हटले `ब्लॅक इंडियन `

Last Updated: Friday, October 25, 2013, 12:43

क्रिकेटपटू विनोद कांबळीला `ब्लॅक इंडियन ` म्हणून एका परदेशी महिलेने हिणवलं. बांद्रा येथे राहणाऱ्या विनोद कांबळीच्या सोसायटीमध्ये पार्किंगवरून या महिलेने वाद घातला.

चोराच्या फिशिंग हूकमुळे गेला महिलेचा बळी

Last Updated: Sunday, September 8, 2013, 18:56

फिशिंग हूकद्वारे चोरण्याचा प्रयत्न केला जात असतानाच बॅग खेचली गेल्यामुळे घोलपकर यांचा तोल गेला आणि खांबावर आपटून त्यांचा मृत्यू झाला.

सीरियात रासायनिक हल्ला; १३०० पेक्षा जास्त बळी

Last Updated: Thursday, August 22, 2013, 09:21

दमिश्कमध्ये विरोधकांवर अगदी जवळून करण्यात आलेल्या रासायनिक हत्यारांच्या साहाय्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात १,३०० जणांचा बळी गेलाय

ठाण्यात कुपोषणाने १४० बालकांचा मृत्यू

Last Updated: Friday, August 2, 2013, 14:32

ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचं धगधगतं वास्तव उघड झालंय. यंदाच्या वर्षी ठाणे जिल्ह्यात तब्बल १४० बालकांचा मृत्यू झालाय. तर १० हजाराच्या वर बालकं कुपोषणग्रस्त आहेत.

पुण्यातील खड्ड्यांचे दोन बळी!

Last Updated: Friday, July 26, 2013, 20:43

पुण्यातल्या खड्ड्यांमुळे अखेर ज्याची भीती होती, तेच झालंय. पुण्यात खड्यांनी दोघांचा बळी घेतलाय. खड्यांमुळे झालेल्या अपघातात गुरबचनसिंग राजपाल आणि प्रशांत मासळकर यांचा मृत्यू झालाय. तर, राजपाल यांचा मुलगा गंभीर जखमी आहे.

नको नको रे पावसा...

Last Updated: Saturday, July 20, 2013, 19:39

राज्यात सर्वदूर पावसानं हजेरी लावली आहे. चंद्रपूर, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात वरुणराजा धो धो बरसतोय. चंद्रपूरला पावसाचा सर्वाधिक फटका बसला असून चौघांचा यांत बळी गेलाय..

भंडाऱ्यामध्ये अन्नपाण्यावाचून मायलेकींचा भूकबळी

Last Updated: Tuesday, July 16, 2013, 21:05

प्रगतीशील महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना भंडारा जिल्ह्यातल्या लाखांदूर तालुक्यात घडलीय. लाखांदूर तालुक्यात अन्न न मिळाल्यानं मायलेकींचा तडफडून मृत्यू झालाय. अन्न सुरक्षेसा विधेयकासाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावणारं सरकार या भूकबळीची गंभीर दखल घेणार का हा प्रश्न कायम आहे.

जगातला प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी!

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 16:40

जगभरात प्रत्येक दिवशी २० हजार मुलांच्या पोटात अन्नाचा कणही जात नाही आणि ते भूकेला बळी पडतात. दरवर्षी १ अब्ज ३० कोटी टन खाद्य पदार्थाची नासाडी होते आणि जगातील प्रत्येक सातवा व्यक्ती उपाशी झोपतो... ही सत्य परिस्थिती नुकतीच एका अहवालाच्या माध्यमातून प्रकर्षानं समोर आलीय.

अपहरण झालेल्या सपनाचा नरबळीच!

Last Updated: Wednesday, May 29, 2013, 20:33

गेल्या सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे.

तेंडुलकर-कांबळीचा विक्रम वाळवीनं पोखरलाय

Last Updated: Wednesday, February 27, 2013, 22:15

सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शारदाश्रमकडून खेळतांना ही ६६४ रन्सची रेकॉर्ड पार्टनरशीप केली होती. या मॅचमध्ये सचिन तेंडुलकरनं नॉट आऊट ३२६ रन्स आणि विनोद कांबळीनं नॉट आऊट ३४९ रन्सची इनिंग खेळली होती. मात्र, या दोघांचा हाच विक्रम वाळवीनं पोखरलाय.

मुंबईत ८ वर्षाच्या मुलाचा घेतला बिबट्याने बळी

Last Updated: Sunday, January 27, 2013, 16:02

सौरव हा आठ वर्षांचा मुलगा घराबाहेर मित्रासोबत आला असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला करत त्याला जंगलाकडे उचलून नेले.

महाराष्ट्रात दुष्काळाचे दशावतार!

Last Updated: Friday, January 11, 2013, 23:05

राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चाललीय.. जवळपास ६ हजार २५० हून अधिक गावांना दुष्काळाचे चटके सहन करावे लागतायत. मराठवाड्यात तर दुष्काळाने शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलंय.

`हिवाळ्यात`च दुष्काळानं जिल्हा उघड्यावर!

Last Updated: Friday, January 11, 2013, 20:34

दुष्काळानं होरपळलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांवर आता आणखी एक संकट ओढवलंय. सातबाऱ्यावर कर्जाची थकबाकी दिसत असल्यानं नवीन पीक कर्ज मिळणं अवघड झालंय. दुष्काळाचा सामना करण्यासाठी बळीराजावर घरची इभ्रतच गहाण ठेवण्याची वेळ आलीय.

दिल्ली गारठली, युपीत थंडीचे ९२ बळी

Last Updated: Monday, December 31, 2012, 13:00

थंडीमुळं राजधानी दिल्ली चांगलीच गारठली. गोठवणाऱ्या थंडीचे उत्तर प्रेदशमध्ये आतापर्यंत ९२ बळी गेले आहेत. थंडी कायम असल्याने तपमानात घट होण्याची शक्यता आहे.

दिल्ली गँगरेप : आंदोलनाचा पहिला बळी, जखमी पोलिसाचा मृत्यू

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 09:32

राजधानी दिल्लीत गेल्या आठवड्यात पॅरा मेडिकलच्या एका तरुणीवर चालत्या बसमध्ये झालेल्या पाशवी सामूहिक बलात्काराच्या घटनेच्या विरोधार्थ इंडिया गेटवर आंदोलन सुरूच आहे.

बालिकेचा दिला जात होता नरबळी, चौघांना अटक

Last Updated: Monday, November 26, 2012, 23:42

यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव गावक-यांनी उधळून लावलाय. त्याप्रकरणी 4 आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आलीए.

दारू ठरतेय महिलांच्या मृत्यूचे कारण?

Last Updated: Saturday, October 20, 2012, 18:24

दारू सेवन करणाऱ्या पुरूषांच्या तुलनेत महिलांच्या मृत्यूच्या प्रमाणात अधिक वाढ झालीय. जर्मनीतील संशोधकांनी असा निष्कर्ष काढलाय की सामान्य महिलांच्या तुलनेत मद्यपान करणाऱ्या महिलांचं प्रमाण ४६० टक्के अधिक झालयं.

ट्रेनमधून खाली पडून २ ठार, २ जण गंभीर जखमी

Last Updated: Thursday, October 11, 2012, 13:18

मध्य रेल्वे मार्गावर चालत्या रेल्वेमधून चार जण खाली पडले. यापैंकी एकाचा मृत्यू झालाय तर तीन जणांची प्रकृती गंभीर आहे. सायन-माटुंगा रेल्वे मार्गावर ही दुर्दैवी घटना घडलीय.

नवी मुंबईत मेट्रोचा एक बळी

Last Updated: Monday, September 17, 2012, 16:34

नवी मुंबईत खारघर येथे मेट्रो रेल्वेसाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झालाय. गोविंद चव्हाण अस मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

विदर्भात पावसाचे २० बळी

Last Updated: Thursday, September 6, 2012, 10:43

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून पावसानं थैमान घातलंय. पावसामुळं २० जणांचा बळी गेलाय. विदर्भातल्या बहुतांश नद्यांना पूर आला असून अनेक धरणं भरून वाहू लागली आहेत.

इराण भूकंपात २५० जणांचा मृत्यू

Last Updated: Sunday, August 12, 2012, 12:18

इराणच्या वायव्य भागाला शनिवारी सायंकाळी भूकंपाचे दोन जोरदार धक्के बसले. या भूकंपामुळे २५० जण ठार, तर २००० जण जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ नोंद करण्यात आली आहे.

पुण्यात हुंडाबळी, पती आणि सासू-सासरे अटक

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 18:51

माहेरहून पैसे आणण्याच्या कारणावरून महिलेला पतीनं दरीत ढकलल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. सुनीता शेवते असं या दुर्दैवी महिलेचं नाव आहे.

नवी मुंबईत 'स्वाईन फ्लू'चा पहिला बळी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 15:45

‘स्वाईन फ्लू’नं मुंबईत पुन्हा एकदा धडक दिलीय. नवी मुंबईत स्वाईन फ्लूचा पहिला बळी गेल्याचं सिद्ध झालंय.

कॅम्बोडियात अज्ञात आजारानं घेतले 61 बळी

Last Updated: Thursday, July 5, 2012, 15:28

इंडो-चायनाच्या पश्चिम भागातील कॅम्बोडिया या देशात एका अज्ञात आजारानं एकच खळबळ उडालीय. या अज्ञात आजारामुळे आत्तापर्यंत 61 मुलांना आपला जीव गमवावा लागलाय, अशी माहिती जागतिक आरोग्य विभागानं (WHO) नं दिलीय.

मी बळीचा बकरा - छगन भुजबळ

Last Updated: Sunday, June 24, 2012, 19:36

मंत्रालयात लागलेल्या आगीबाबत मुख्यामंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदार धरून छगन भुजबळ यांना टीकेचं लक्ष्य केलं होतं. मात्र छगन भुजबळ यांनी झी 24 तासशी बोलताना सर्व आरोप फेटाळत कुणीतरी बळीचा बकरा लागतो असा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. तसंच मंत्र्यालयावर सामान्य प्रशासनाची हुकूमत असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवलंय.

पावसाचा दणका; एक बळी, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Monday, June 18, 2012, 10:48

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. देवगडमध्ये पावसाच्या पाण्यात दहा वर्षाचा मुलगा वाहून गेलाय. तर मालवणमध्ये एका घरावर माड पडून एकजण जखमी झालाय. तर अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीज पुरवठा खंडित झाला आहे. मुंबई आणि ठाण्यातही पाऊस चांगला झाला. तर पावसाचा परिणाम रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवर झाला आहे. कल्याण बदलापूर हा हायवे ४ तास ठप्प होता. कोकण रेल्वे उशिराने धावत आहे.

हुंडाबळीच्या गुन्हेगारांना जन्मठेपच

Last Updated: Monday, June 11, 2012, 13:45

हुंडाबळीसारख्या गुन्ह्यासाठी जन्मठेपेपेक्षा कमी शिक्षा देणं योग्य ठरत नाही असं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या खंडपीठानं स्पष्ट केलंय.

चिमुकलीचा बलात्कार की करणीचा बळी?

Last Updated: Wednesday, May 23, 2012, 17:12

गोव्यातील ‘केपे’ या ठिकाणी तीन वर्षाच्या चिमुरडीची हत्या झाल्याचं समोर आलंय. मुळची मुंबईची असलेली सीमा खान गोव्यात सुट्टीमध्ये नातेवाईकांकडे आली असताना ही घटना घडलीये.

राज्यात अवकाळी पावसाचे २० बळी

Last Updated: Friday, May 11, 2012, 11:14

अवकाळी पावसाने मराठवाडा आणि पश्‍चिम विदर्भाला चांगलेचे झोडपून काढले. वादळवार्‍यासह आलेल्या पावसाने बीड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद, जालना, जळगाव, पुणे आणि बुलडाणा जिल्ह्यात २0 जणांचे बळी घेतले आहेत. वादळ आणि विजांच्या कडकडाटासह झालेल्या तुफान पावसाने गुरुवारी खान्देशातही थैमान घातले.

रेल्वे बळींना दोन लाख, अधिकाऱ्यांवर गुन्हे

Last Updated: Thursday, April 19, 2012, 18:19

मुंबईतील लोकलमधल्या गर्दीनं तिघांचा बळी घेतला आहे. रेल्वेचा खोळंबा हा आता प्रवाशांच्या जीवावर उठला आहे. सिग्नलचा खांबाची धडक लागल्याने एक जण बाहेर फेकला गेल्या. त्याच्याबरोबर १७जणही रेल्वेबाहेर कोसळले. हे सर्वजण जखमी झालेत. नाहूर स्टेशनजवळ ही घटना घडली आहे. लोकल अपघातातील मृतांच्या वारसांना १५ हजारांची तोकडी मदत देणाऱ्या रेल्वेने ही मदत वाढवून दोन लाख रूपयांपर्यंत देण्याचं जाहीर केले आहे. दरम्यान, अधिकरी आणि कर्मचाऱ्यांवर कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला

Exclusive- मेगा हाल

Last Updated: Tuesday, April 24, 2012, 13:19

खोट्या प्रतिष्ठेनेच घेतला मुलींचा बळी

Last Updated: Monday, April 9, 2012, 22:50

जळगावातील खोट्या प्रतिष्ठेचा बळी ठरलेल्या मनिषा धनगर हत्येप्रकरणी, तिच्या वडील आणि काकांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तर मनिषाच्या आजीला ४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्वाईन फ्लू आलाय परत, घेतला 'दुसरा बळी'

Last Updated: Thursday, April 5, 2012, 11:29

नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचा प्रादूर्भाव वाढत चालला असून स्वाईन फ्लूमुळे दुसरा बळी गेला आहे. १ एप्रिलला जिल्हा रूग्णालयात दाखल झालेल्या भारत ठाकूरचा बुधवारी मृत्यू झाला होता.

बिबट्याने घेतला बालकाचा बळी

Last Updated: Wednesday, April 4, 2012, 17:23

नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यात बिबट्यानं एका वर्षाच्या मुलाला भक्ष्य बनवलं. निफाड तालुक्यातल्या जुने शिवरे शिवारात ही घटना घडली आहे. दुर्गेश गोसावी असं मरण पावलेल्या बालकाचं नाव आहे.

नक्षली हल्ल्यात जास्त बळी- आबा

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 12:57

गडचिरोलीत झालेल्या नक्षली हल्ल्याबाबत गुप्तचर यंत्रणांकडून कोणतीही माहिती नसल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. स्थानिक पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांमध्ये योग्य समन्वय असल्याचा दावा त्यांनी केला.

राज्यात थंडीचा पहिला बळी

Last Updated: Thursday, February 9, 2012, 12:20

राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आतापर्यंत थंडीचा राज्यात एक बळी गेला आहे. दरम्यान, येत्‍या २४ तासात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्‍याची शक्‍यता हवामान खात्‍याने व्‍यक्‍त केली आहे.

नवी मुंबईत हुंडाबळी

Last Updated: Thursday, January 26, 2012, 21:24

हुंड्यासाठी सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईतल्या ऐरोलीत घडली आहे. पूनम कौर असं या महिलेचं नाव आहे.

हुंड्यासाठी पत्नीला जाळणाऱ्या कुटुंबास जन्मठेप

Last Updated: Saturday, January 7, 2012, 20:49

हुंड्यासाठी पत्नीला जिवंत जाळणाऱ्या पती, सासू आणि जावेला नांदेड कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजय सौंदते त्याची आई सोनाबाई आणि बहिण इमलबाई असं या तिघा आरोपींची नावं आहेत.

आचरेकर सरांच्या वाढदिवशी सचिनची उपस्थिती

Last Updated: Monday, December 5, 2011, 05:45

सचिनला बालपणी क्रिकेटचे धडे देणारे आचरेकर शनिवारी ७९ वर्षांचे झाले. यावेळी सचिनने खास उपस्थिती लावून आचरेकर सरांना दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिन, विनोद कांबळी, प्रवीण आमरे यावेळी उपस्थित होते.

कांबळीचे वक्तव्य बेजबाबदारपणाचे- शरद पवार

Last Updated: Saturday, November 19, 2011, 15:46

विनोद कांबळीने १९९६ साली झालेल्या वर्ल्ड कप सेमी फायनल मॅच फिक्सिंग संदर्भात केलेलं वक्तव्य बेजबाबदारपणाचं असल्याची प्रतिक्रिया आयसीसीचे अध्यक्ष शरद पवारांनी व्यक्त केली आहे. सचिन तेंडूलकर आणि सौरव गांगुली यांचे याबाबतीत काय म्हणणं आहे यावर मी विश्वास ठेवेन असं पवार म्हणाले. मला प्रामाणिकपणे असं वाटतं की कांबळीने केलेले वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याचं पवार म्हणाले.

वीजेचा झटका शेतकऱ्यांना मोठा फटका

Last Updated: Friday, November 4, 2011, 07:46

सरकारच्या कृपेमुळे राज्यातला शेतकरी वीजेअभावी रडकुंडीस आला आहे. 16 ते 18 तास लोडशेडिंग होत असल्यानं शेतक-यांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मिळणाऱ्या वीजेच्या झटक्यांमुळे शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर जळाले आहेत तसेच शेतकऱ्यांचं उभ पीक वाळून चालल्याने नाकर्त्या सरकारच्या विरोधात आंदोलनचा इशारा औरंगाबाद जिल्ह्यातील शेतक-यांनी दिला.