शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

Last Updated: Monday, June 23, 2014, 14:18

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

रायगडमध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पोलिसांचा लाठीमार

Last Updated: Wednesday, May 21, 2014, 19:35

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सकाळी वडखळ जवळील खाडी लगतच्या गावांतील शेतकरी, मच्छीमार महिला पुरुषांनी शिवसेनेच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार आणि जे एस डब्लू इस्पात कंपनी विरोधात प्रखरतेने रस्तारोको आंदोलन केले.

लोकसभा निवडणूक : राज्यात महायुतीचा 'झेंडा', राणे-भुजबळ पराभूत

Last Updated: Saturday, May 17, 2014, 17:36

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीचा अखेरचा टप्पा आज रंगतोय. अर्थातच, हा टप्पा आहे निकालाचा...

गारपिटग्रस्तांच्या यादीत खासदार जया बच्चन

Last Updated: Thursday, May 1, 2014, 13:56

फेब्रुवारी महिन्यात झालेल्या गारपिटीचा सिने अभिनेत्री आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांना फटका पडला आहे.

सरकारची मदत तुटपुंजी, शेतकरी संतापले

Last Updated: Thursday, March 20, 2014, 16:42

खूप वाट पहायला लावून अखेर सरकारनं गारपीटग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलं. पण हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार असून या मदतीतून साधा बियाणांचा खर्चही निघणार नाही, मग मशागत, खते, औषधे, मजुरी यांचा खर्च तर दूरच, आमची अशी चेष्टा का करता असा संतप्त सवाल राज्यभरातील गारपीटग्रस्त शेतकरी विचारत आहेत.

लक्ष्मण जगतापांनी घेतली राज ठाकरेंची भेट

Last Updated: Thursday, March 20, 2014, 17:01

लक्ष्मण जगताप आपल्या आमदारकीचा राजीनामा देणारेय. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं आव्हान स्वीकारुन ते राजीनामा देणारेत. आज कृष्णकुंजवर लक्ष्मण जगताप यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली.

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर

Last Updated: Wednesday, March 19, 2014, 22:25

शेकडो कोटींचं नुकसान झाल्यानंतर आणि अनेक शेतक-यांचे बळी गेल्यानंतर अखेर निवडणुकीच्या रणधुमाळीत रमलेल्या सत्ताधा-यांना जाग आली आहे.

आबांच्या तासगावमध्ये शेतकरी दाम्पत्याची आत्महत्या

Last Updated: Saturday, March 15, 2014, 20:28

अवेळी पाऊस आणि गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या गारपीटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाकडून मदत झालेली नाही. शेतीचे नुकसान आणि कर्जबारामुळे शेतकरी त्रस्त आहेत. सांगलीमधील तासगावमधील एका शेतकरी दाम्पत्याने गारपीटीने नुकसान झाल्यामुळे आत्महत्या केली.

'उमवि'च्या कुलगुरूंनी दिला शेतकऱ्यांना महिन्याचा पगार

Last Updated: Friday, March 14, 2014, 07:27

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुधीर मेश्राम यांनी गारपीट आणि अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदतीला हात भार लावला आहे.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

संतप्त शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या गाडीवर पेंड्या फेकल्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 19:18

बुलडाणा जिल्ह्यातच गारपीटग्रस्त शेतक-यांचा संताप मुख्यमंत्र्यांना अनुभवायला मिळाला. नुकसानग्रस्त शेतक-यांनी गाडीवर हरब-याच्या पेंडी फेकल्या आणि मुख्यमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

मुलीच्या लग्नाआधीच शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळलं

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 08:37

मराठवाडयात गारपीट लोकांच्या जीवावर उठलीय. आत्तापर्यंत गारपीटीनं २० पेक्षा जास्त बळी घेतलेत. २०० पेक्षा जास्त जनावरं मेलीत. या गारपीटीनं बसलेला मानसिक धक्काही जीवघेणा आहे. हाताशी आलेलं पीक गारपीटीनं नष्ट झालेलं पाहून वैजापूरच्या एका शेतकऱ्यानं पोरीच्या लग्नाच्या आधीच आत्महत्या करुन जीवन संपवल्यानं परिसरालाच धक्का बसलाय.

गारपीटीनं महाराष्ट्र थंड; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत ढग...

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 17:07

गेल्या दोन दिवसांत महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या गारपीटीनं शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय. हातात आलेलं पीक त्यांच्या डोळ्यांदेखत उद्ध्वस्त झालंय.

स्ट्रॉबेरी खायचीय... मग चला की, कोल्हापूरला!

Last Updated: Saturday, February 15, 2014, 20:42

स्ट्रॉबेरी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं ते महाबळेश्वर... पण आता महाबळेश्वरमध्ये मिळणारी उत्कृष्ठ दर्जाची स्ट्राबेरी कोल्हापूरातसुद्धा पिकतेय. ऐकून चकीत झालात ना... होय पण हे खरं आहे.

`महायुती`च्या पाच पांडवांत शकुनीमामा?

Last Updated: Saturday, February 15, 2014, 18:09

पाच पांडव म्हणून एकत्र आलेल्या महायुतीमध्ये सध्या फूट पडण्याची दाट शक्यता निर्माण झालीय... याला कारण आहे ते माढा लोकसभा मतदारसंघाचं.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात शेतकऱ्यांचा गोंधळ

Last Updated: Thursday, February 13, 2014, 23:06

नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या कृषीसंबंधी कार्यक्रमात विदर्भातल्या शेतक-यांनी मोठा गोंधळ घातला. मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू झाल्यानंतर अकोला जिल्ह्यातला शेतकरी थेट उभा राहून कापसाच्या दरावरून घोषणा देऊ लागला.

राजू शेट्टींवर खुनाचा गुन्हा दाखल

Last Updated: Monday, February 10, 2014, 18:33

दीड वर्षांपूर्वी झालेल्या ऊस आंदोलनात जखमी झालेल्या कान्स्टेबलच्या मृत्यूप्रकरणी स्वाभिमानी पक्षाचे खासदार राजू शेट्टी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल झालाय.

गुहागरमधील एमआयडीसीला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 23:57

रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरच्या देवघर गावात एमआयडीसी भू संपादन अधिकारी गेले आसता ग्रामस्तानी तीव्र विरोध करीत भू संपादन प्रक्रिया बंद पाडली. याच वेळी MIDC अधिकारी आणि प्रांत अधिकारी यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याची होळी करत प्रस्तापित MIDC ला विरोध करीत कडवट आंदोलनाचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

राज्यसभेसाठी आज महायुतीचं विचारमंथन, जागावाटपाचं सूत्र ठरणार?

Last Updated: Tuesday, January 14, 2014, 09:47

सेना भाजप, आरपीआय आठवले गट आणि राजू शेट्टी यांची स्वाभिमानी सेतकरी संघटना यांच्यामध्ये महत्वपूर्ण बैठक आज मुंबईत रंगशारदा इथं संध्याकाळी होत आहे.

खासदार राजू शेट्टी यांनी `त्या` मुद्याला दिली तिलांजली

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 20:59

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी राज्यातील महायुतीबरोबर जाण्याचा निर्णय घेतलाय. पण खासदार राजू शेट्टी यांनी ज्या मुद्यावर शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्याशी फारकत घेतली, त्याच मुद्याला आता शेट्टींनी तिलांजली दिल्याचं स्पष्ट होतंय.

राजू शेट्टी जातीयवादीच, आव्हाडांची टीका

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 19:21

राजू शेट्टींच्या महायुतीतल्या समावेशावर राष्ट्रवादी काँग्रेसनं टीका केलीय. स्वाभीमानी शेतकरी संघटनेचा खरा चेहरा उघड झालाय. जातीयवादी पक्षांबरोबर जावून आपण जातीयवादी असल्याचं त्यांनी दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

स्वाभिमानी शेतकरी संघटना अखेर महायुतीत दाखल

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 19:04

महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या रूपाने तिसरा भिडू सामील झाला आहे. लोकसभेसाठी हातकणंगले आणि माढा मतदारसंघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात येणार आहे. राजू शेट्टी यांनी आज मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांचीही भेट घेतली होती.

शेतकरी नेते खासदार राजू शेट्टी मातोश्रीवर

Last Updated: Tuesday, January 7, 2014, 12:50

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी मातोश्रीवर पोहोचले आहेत. यामुळे महायुतीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा समावेश होईल का?, या चर्चेला उधाण येणार आहे.

‘आप’नं फेटाळला ‘स्वाभिमानी’चा प्रस्ताव!

Last Updated: Wednesday, January 1, 2014, 19:22

शेतकऱ्यांसंदर्भातल्या आमच्या अटी मान्य केल्या तर ‘आप’सोबत आघाडी करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केलं होतं. मात्र अटींवर आधारीत राजकारण ‘आप’च्या तत्वात बसत नसल्याचं सांगून राजू शेट्टींचा सशर्थ आघाडीचा प्रस्ताव आम आदमी पार्टीनं फेटाळून लावलाय.

शेतकऱ्याला दोन पैसे मिळाले पोटात का दुखतं - पवार

Last Updated: Tuesday, December 24, 2013, 14:11

कांदा उत्पादक शेतक-याला दोन पैसे मिळाले तर इतरांच्या पोटात का दुखतं, असा सवाल केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी केलाय. बिसलेरी २० रुपयांना घेताना त्रास होत नाही का ? असे पवार यांनी म्हटले.

येवल्यातील सामान्य शेतकऱ्याची मुलगी झाली पायलट

Last Updated: Wednesday, December 18, 2013, 20:05

जिद्द असेल तर कितीही बिकट परिस्थितीवर मात करुन आकाशाला गवसणी घालता येते हे नाशिक जिल्ह्यातल्या निर्मला खळेनं दाखवून दिलंय. घरच्या अडचणीवर मात करुन ही ग्रामीण भागातली मुलगी आज पायलट झालीय. तिच्या या आकाश भरारीचा पाहू या या स्पशेल रिपोर्ट.

गोंदियात पारंपरिक पिकाला फाटा देत आंब्याची नर्सरी

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 17:59

गोंदिया सारख्या धान उत्पादक क्षेत्रात पारंपरिक पिकाला फाटा देत एका शेतकऱ्याने आंब्याची नर्सरी तयार केलीय. या नर्सरीत जवळपास आठ जातीच्या आंब्यांच्या रोपांवर ते कलम करतात. आंब्या व्यतिरिक्त ते सर्सरीत चिकू, अशोक, मिर्ची, फणसाच्या झाडांची देखील कलम कलम करतात. एवढच नव्हे तर केळीच्या बागेतून ते लाखोंचा नफा कमवत आहेत.

पोलिसांनी महिला आणि शेतक-यांना झोडपले

Last Updated: Sunday, December 8, 2013, 15:19

सांगली जिल्ह्यातल्या खंबाळे गावात एमआयडीसीसाठी जबरदस्तीने जमिनीची मोजणी प्रक्रिया सुरु करण्यात आली.. यावेळी महिला आणि शेतक-यांना पोलिसांकडून मारहाण करण्यात आली.खानापूर तालुक्यातील खंबाळे गावात एमआयडीसी मंजूर आहे. सुमारे पावणे पाचशे एकर जमीन या प्रकल्पात जाणार आहे.

... आणि अजित पवार माधव भंडारींवर भडकले

Last Updated: Sunday, December 1, 2013, 20:52

शेतकरी संघटनांच्या आंदोलनामुळं सहकारी साखर कारखानदारी मोडीत निघेल अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:49

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.

बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Last Updated: Friday, November 29, 2013, 12:19

जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी हजारो शेतकऱ्यांची सरकारी योजनेच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक केल्याचा प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला आहे. तर या प्रकरणी दोषी असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी सत्ताधारी राका पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

बटाट्याचे भाव कडाडले, मुंबईकरांचे वडापाव तोंडचे पाणी पळवणार

Last Updated: Wednesday, November 6, 2013, 21:58

कांदा आणि टोमॅटोच्या पाठोपाठ आता बटाटाही ग्राहकांना रडवणार आहे. केंद्र सरकारने काद्याच्या किमान निर्यात दरात भरगोस वाढ केल्याने देशातून होणारी कांदा निर्यात पूर्णपणे ठप्प होणार आहे. एका टनाला ७१४७२ रुपये अशी विक्रमी दर देत कांदा उत्पादक शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. दरम्यान, बटाटा आणखी महाग झाल्यास मुंबईकरांचा आवडता वडापाव आणि बटाटा वडाही तोंडाचे पाणी पळवण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचा ठेचा भाकर मोर्चा

Last Updated: Sunday, November 3, 2013, 23:04

विविध मागण्यांसाठी बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांनी ठेचा भाकर आंदोलन केलं. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला सरकारकडून दिला जाणार हमीभाव अत्यंत कमी आहे.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 18:33

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

एक रुपयांत शेतकऱ्यांना पोटभर जेवण!

Last Updated: Wednesday, October 16, 2013, 07:51

एक रुपयांत शेतक-याना पोटभर जेवण... हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल... खामगावची कृषी उत्पन्न बाजार समितीने हे करुन दाखवलंय..

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 09:24

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

पावसाळा संपत आला तरी मराठवाडा तहानलेलाच

Last Updated: Monday, September 30, 2013, 18:28

पावसाळा सरत आलाय मात्र मराठवाड्याची तहान अजूनही भागलेली नाहीये.. राज्यातील सर्वच भागातील धरणं ओसंडून वाहताय.. मात्र मराठवाड्याची तहान भागवणारे जायकवाडी अजूनही तहानलेले आहे..

ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

Last Updated: Sunday, September 29, 2013, 23:02

धुळे जिल्ह्यातल्या न्याहळोद गावात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका 56 वर्षीय शेतक-यानं आत्महत्या केलीये. मधुकर कोळी असं त्यांचं नाव आहे. कर्जबाजारीपणा आणि नापीकीचं संकट समोर दिसत असल्याने विष पिउन त्यांनी जीवन यात्रा संपवली आहे.

ही मनसेवर नामुष्की आहे का?

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 13:52

नाशिक शहराचा प्रारुप विकास आराखडा अखेर रद्द करण्यात आलाय. आक्रमक विरोधक आणि शेतकऱ्यांपुढं सत्ताधारी मनसेला अखेर माघार घ्यावी लागली. पालिकेच्या महासभेत ११ तासांच्या मॅरेथॉन चर्चेनंतर महापौरांनी प्रारूप आराखडा रद्द करण्याची घोषणा केलीय.

कलावतीला घ्यायचीय राहुल गांधींची भेट!

Last Updated: Tuesday, September 24, 2013, 11:47

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आज विदर्भ दौऱ्यावर येतायत. त्यामुळं या दौऱ्यात त्यांच्या भेटीची आस यवतमाळमधील शेतकऱ्याची विधवा कलावती हिला लागलीय. नागपूर दौऱ्यात काँग्रेसच्या युवराजांना भेटण्याची इच्छा तिनं व्यक्त केलीय.

काँग्रेसचा गड काबीज करण्यासाठी राष्ट्रवादीची फिल्डींग

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 12:28

काँग्रेसचे नेते पी. के. पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे काँग्रेसचा गड असलेला नंदुरबार जिल्हा काबीज करण्याकडे राष्ट्रवादीनं आगेकूच केली. खुद्द राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्यानं बिगर आदिवासींचं ध्रुवीकरण करण्यात राष्ट्रवादीला यश आलं.

शेतात आढळला चंदनाचा साठा!

Last Updated: Thursday, September 12, 2013, 20:32

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व इंदापूर तालुक्यातील बाभूळगावी एका शेतकऱ्याच्या शेतात मोठ्या प्रमाणावर चंदनाचा साठा आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

‘पोळा’ सणावर महागाईचं सावट!

Last Updated: Thursday, September 5, 2013, 10:10

पोळा.. बळीराजासाठी सगळ्यात महत्वाचा सण... यंदा मात्र महागाई आणि अतिवृष्टीमुळं हा सण कसा साजरा करावा असा प्रश्न बळीराजाला पडलाय. शेतकऱ्यांसाठी अतिशय जिव्हाळ्याचा, पारंपारिक आणि लोकसंस्कृतीचा वारसा असलेल्या पोळा सणावर यंदा महागाई आणि ओल्या दुष्काळाचं सावट आहे.

कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांदा!

Last Updated: Friday, August 16, 2013, 19:56

कांद्याने सध्या सगळ्यांचाच वांदा केलाय... कांद्याच्या किंमती भडकल्यानं ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आलंय... मागणी जास्त आणि पुरवठा कमी यामुळं कांद्याची भाववाढ झाल्याचं तर्कशास्त्र कृषीमंत्री शरद पवार मांडतायत...

मावळ घटनेला २ वर्षं पूर्ण!

Last Updated: Thursday, August 8, 2013, 19:55

मावळ गोळीबाराची घटना 9 ऑगस्ट 2011 ला घडली. त्याला उद्या 2 वर्ष पूर्ण होत आहेत. हे आंदोलन घडण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या.

ऊस दराचा तिढा सुटणार!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:59

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.

कोल्हापुरात खतांची कृत्रिम टंचाई, शेतकरी हवालदील

Last Updated: Saturday, June 15, 2013, 21:55

कोल्हापुरात वरुणराजा बरसण्यास सुरुवात झालीय... शेतीच्या कामांनाही वेग आलाय.. मात्र शेतक-यापुढं उभं राहिलंय मोठं संकट... व्यापा-यांनी खतांची कृत्रिम टंचाई निर्माण केल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय..

शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक

Last Updated: Thursday, May 16, 2013, 07:29

उस्मानाबादमध्ये शेतक-यांच्या संतापाचा उद्रेक झालाय. शासकीय चारा छावणी बंद झाल्यानं संतप्त शेतक-यांनी रास्तारोको आंदोलन केलं..

हर्षवर्धन पाटील यांच्या कारखान्याला शेतकऱ्यांचा विरोध

Last Updated: Tuesday, May 14, 2013, 22:08

सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सोलापुरातल्या साखर कारखान्याला, मोहोळ तालुक्यातल्या 20 गावातल्या शेतक-यांनी विरोध केलाय.

शेतकऱ्याचा मुलगा जेईईचा टॉपर

Last Updated: Thursday, May 9, 2013, 15:19

शेतकऱ्यांच्या मुलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमावलेले आहे हे आपण नेहमी ऐकतो. पण या शेतकऱ्याच्या मुलाने केली आहे वेगळीच कमाल.

अजित पवारांच्या ‘सूSSSSराज्या’ला हायकोर्टाचा दणका!

Last Updated: Wednesday, April 10, 2013, 14:17

ज्या उजनी धरणाच्या पाण्यावरून हे ‘सु’नाट्य रंगलंय त्याचबद्दल उच्च न्यायालयानं नागरिकांच्या बाजूनं निर्णय देत सत्ताधाऱ्यांना एकप्रकारे जमिनीवर आणलंय.

शेतकरी मागतोय सरकारकडे आत्महत्येची परवानगी

Last Updated: Monday, April 8, 2013, 20:57

राज्यात दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. गावात पाणी नसलं तरी या दुष्काळानं मात्र मराठवाड्यातल्या शेतक-यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे.

दुष्काळावर शेतकऱ्याची नामी शक्कल !

Last Updated: Thursday, April 4, 2013, 17:10

दुष्काळामुळे बळीराजाची उरलीसुरलेली पिकंही करपून जात आहेत. मात्र सोलापुरातल्या एका शेतक-यानं यावर एक नामी शक्कल शोधून काढली आहे.

कर्जमाफीचा घोटाळा

Last Updated: Tuesday, March 19, 2013, 09:42

केंद्र सरकारच्या कर्जमाफी पाठोपाठ राज्य सरकारनंही आपली कर्जमाफी जाहीर केली होती.. आणि गंमत म्हणजे, केंद्र सरकारच्या कर्जमाफी घोटाळ्यानंतर आता राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा समोर आलाय..

राज्य सरकारच्या कर्जमाफीतही घोटाळा!

Last Updated: Monday, March 18, 2013, 18:13

केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेतही मोठा घोटाळा झाल्याचं झी 24 तासनं उघड केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागल तालुक्यात केवळ एका संस्थेत 52 लाखांच्या कर्जमाफीत तब्बल 42 लाख रुपये अपात्र लाभधारकांनी लाटल्याचं पुढं आलंय.

ऊर्जा प्रकल्पासाठी शेतकऱ्यांवर जबरदस्ती

Last Updated: Sunday, March 10, 2013, 19:11

अहमदनगर तालुक्यातील गर्भगिरी परिसरात उभारलेल्या पवन ऊर्जा प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनी इनरकॉन इंडिया कंपनीने शेतक-यांच्या इच्छा नसतानाही खरेदी केल्या. तसंच जे शेतकरी या कंपनीला विरोध करतात त्या शेतक-यांना कंपनीचे गुंड मारहाण करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत.

`कॅग` रिपोर्टची घेतली रिझर्व्ह बँकेने दखल

Last Updated: Thursday, March 7, 2013, 20:04

कर्जमाफी प्रकरणी कॅगचा रिपोर्ट संसदेत सादर झाल्यानंतर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं याची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी प्रकरणी आरबीआयनं देशातील बँकांच्या अध्यक्षांना एक पत्र पाठवलं आहे.

शेतकरी कर्जमाफीवरून लोकसभेत गोंधळ

Last Updated: Wednesday, March 6, 2013, 20:02

शेतक-यांच्या कर्जमाफीत झालेल्या घोटाळ्यावरून आजही विरोधकांनी संसदेत जोरदार गदारोळ केला. दोषींवर कडक कारवाई करण्य़ाची मागणी विरोधकांनी केली.

मावळ प्रकरणी पोलिसांना २४ लाख रुपये?

Last Updated: Monday, January 21, 2013, 20:30

मावळ आंदोलनादरम्यान पुरवण्यात आलेल्या पोलिस बंदोबस्तापोटी पिंपरी-चिंचवड महापालिकेनं पोलिसांना 24 लाख रुपये देण्याचं मंजूर केलंय. एवढंच नाही तर पुढंही बंदोबस्तासाठी पैसे लागले तर ते देण्याची तरतूदही करण्यात आलीय. त्यामुळं या योजनेसाठी महापालिका आणि पर्यायने राष्ट्रवादी काँग्रेस किती आग्रही आहे हे पुन्हा सिद्ध झालंय.

विदर्भात थंडी, शेतकरी आनंदी

Last Updated: Sunday, December 30, 2012, 21:18

गेल्या काही दिवसांत विदर्भात थंडीचा कडाका वाढला आहे. जवळपास सर्वच जिल्ह्यांत पारा दहा अंशाचा खाली घसरल्यानं ही थंडी रब्बी पिकांसाठी पोषक मानली जाते. त्यामुळं थंडीतही शेतक-यांच्या चेह-यावर समाधानाचे भाव आहे.

विधानसभेवर भाजपचा ब्लॅक मार्च

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 15:15

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं भाजपनं विदर्भातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी मोर्चेबांधणी केलीय. त्यासाठी गोंदिया आणि वर्ध्यातून रॅली काढण्यात आल्या. तर विधानसभा परिसरात भाजपच्या नेत्यांनी काळे झेंडे घेवून राज्यकर्त्यांचा निषेध केला. आज मंगळवारी नागपूर विधानसभेवर भाजप मोर्चा धडक देणार आहे.

कोल्हापूरला शेतकऱ्यांना गूळ कडू

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 18:24

गूळ व्यापा-यांच्या मनमानीमुळं शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कोल्हापूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत गुळाचे भाव जाणिवपूर्वक पाडले जात असल्याचा आरोप शेतक-यांनी केलाय. गुळाचे भाव 2500 रुपयांपर्यंत कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.

१० महिन्यात १५२ शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 19:53

दुष्काळाच्या छायेत आसणा-या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्येचं दुष्टचक्र सुरु झालयं. गेल्या 10 महिन्यात 152 शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत.

ऊस आंदोलन पेटणार, ३००० रूपयेच द्या – जोशी

Last Updated: Thursday, November 22, 2012, 10:07

उसाची पहिली उचल २५०० रुपयाची अमान्य करून तीन हजार रुपये हा एक रक्कमी दर मिळण्यासाठी वेगवेगळ्या पातळीवर आंदोलन सुरु राहणार असल्याची घोषणा शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केली. सांगली आयोजित करण्यात आलेल्या ऊस परिषदेत ते बोलत होते.

शेतकरी नेते एकवटले; अश्रू झाले अनावर!

Last Updated: Saturday, November 17, 2012, 16:02

ऊस आंदोलनादरम्यान सांगलीत झालेल्या पोलीस गोळीबार प्रकरणी चंद्रकांत नलावडे या शेतकऱ्याचा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी केलाय.

शिवसैनिकांना त्रास नको... ऊस आंदोलकांचा 'रास्ता रोको' स्थगित

Last Updated: Saturday, November 17, 2012, 15:33

‘ऊस दराच्या आंदोलनाचं स्वरुप आम्ही बदलतोय, ऊस आंदोलक रास्ता रोको करणार नाही’ अशी ग्वाही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलीय.

राजू शेट्टींना जामीन मंजूर पण...

Last Updated: Friday, November 16, 2012, 13:35

ऊसदर आंदोलनप्रकरणी खासदार राजू शेट्टी यांना बारामती जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केलाय. पंधरा हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांनी जामीन देण्यात आलाय. पण, यावेळी न्यायालयानं शेट्टी यांनी तीन तालुक्यात प्रवेश बंदीही केलीय.

`स्वाभिमानी`नं रोखल्या शिवसैनिकांच्या गाड्या

Last Updated: Thursday, November 15, 2012, 19:19

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं ऊस दरवाढीसाठी सुरू केलेलं आंदोलनही अजून थंड झालेलं नाही. या आंदोलनाचा फटका शिवसैनिकांना बसू नये, यासाठी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आवाहन केलंय.

शेतकऱ्यांचा वाली कोण?

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 17:13

एकीकडं ऊस दर आंदोलनावरुन पश्चिम महाराष्ट्र पेटला असताना राज्याचे मंत्री आहेत कुठे? ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचे राजकारण सुरु आहे. त्यांनाच वाऱ्यावर सोडून दिलंय. राज्याच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री पश्चिम महाराष्ट्रात असले तरी इथल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मात्र कोणीही वाली नाही. मुख्यमंत्री, आरआर पाटील, जयंत पाटील, पतंगराव कदम, हसन मुश्रीफ, हर्षवर्धन पाटील असे दिग्गज मंत्री पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व करतात. मात्र ज्यांच्या जीवावर मंत्रिपदाच्या खुर्ची मिळवलीय, त्यांचा महत्वाचा प्रश्न सोडवण्यासाठी या मंत्र्यांना वेळ नाहीय.

शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांची जामिनावर सुटका

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 13:25

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी जामिनावर सुटका झाल्यानंतर लगेचच पवार काका-पुतण्यांना टार्गेट केलं. ऊसदर आंदोलन पवार काका-पुतण्यांनी पेटवल्याचा आरोप सदभाऊंनी केलाय. राजू शेट्टींवर जातीयवादी टीका केल्यानं पवारांचे खरे रुप समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय.

ऊस पेटला, पोलिसांची जीपच पेटवली

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 12:34

ऊस दरवाढीसाठी करण्यात आलेले आंदोलन अधिकच पेटत आहे. आज कोल्हापूर जवळील दिंडनेर्ली फाट्याजवळ पोलिसांची जीप आंदोलनकर्त्या जमावाने पेटविली. त्यामुळे ऊस आंदोलन भडकण्याची परिस्थितीवरून शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, सुरू करण्यात आलेली एसटी सेवा पुन्हा काही तासाच बंद करण्यात आलीय.

प. महाराष्ट्रातील बंद एसटी सेवा सुरु

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 11:10

ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 10:11

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

खासदार राजू शेट्टींची दिवाळी जेलमध्ये

Last Updated: Tuesday, November 13, 2012, 09:39

ऊसाला ३००० रूपये दर देण्यासाठी छेडण्यात आलेल्या आंदोलनाला गालबोट लागले. आंदोलन करणाऱ्यांनी जाळपोळ आणि तोडफोड केल्याने पोलिसांनी गोळीबार केला. त्यातच ऊसदरासाठी आंदोलन सुरु करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि खासदार राजू शेट्टी, सदाभाऊ खोत, सतीश काकडे यांच्यासह इतर सहा जणांना चौदा दिवसांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, देण्यात आली. त्यामुळे त्यांची दिवाळी जेलमध्ये साजरी होत आहे.

...नाही तर गाठ आमच्याशी आहे- राजू शेट्टी

Last Updated: Sunday, October 28, 2012, 08:07

चालू गळीत हंगामातील उसाला पहिला हप्ता तीन हजार रुपये देऊन मागील हंगामातील थकीत चुकती केल्याशिवाय ऊस तोडू देणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय.

शेतकऱ्यांसाठी शासनाचा वैरण विकास कार्यक्रम

Last Updated: Tuesday, October 23, 2012, 09:13

दुष्काळी तालुक्यामध्ये चारा टंचाईच्या समस्येला तोंड देण्यासाठी राज्य आणि केंद्र शासनाने वैरण विकास कार्यक्रमावर जोर दिला आहे. धुळे जिल्ह्यातील सहा हजार शेतकऱ्यांना मका, ज्वारी अशा वैविध्यपूर्ण वैरण पिकांचं बियाणं मोफत देण्यात येत आहे. या उपक्रमामुळे चाऱ्याची समस्या बऱ्याच अंशी सुटण्यास मदत होणार आहे.

`झेंडूची फुले` शेतकऱ्यांच्या साथीला

Last Updated: Monday, October 22, 2012, 09:19

पावसाअभावी फुलांचं उत्पादन घटल्यानं आवक कमी झाली पर्यायी यंदा फुलांना चांगला दर मिळतोय. दसरा आणि दिवाळीतही शेतक-यांना चांगले दर मिळण्याची शक्यता निर्माण झाली असून दुष्काळात शेतक-यांना झेंडुनं चांगली साथ दिलीय. जळगांव जिल्ह्यातील शेतक-यांना झेंडुला ३० ते ४० रुपये दर मिळाल्याने इथला शेतक-यांचे प्रयत्न यशस्वी झालेत.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 08:48

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

पुण्यात आजचा दिवस आंदोलनांचा

Last Updated: Monday, October 15, 2012, 17:02

पुण्यामध्ये आजचा दिवस आंदोलनांचा होता. मनसेनं पाण्यासाठी, आरपीआयनं गॅस दरवाढीविरोधात तर शेतकरी संघटनेनं शेतमालाची निर्यातबंदी उठवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केलं.

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:24

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

वर्ध्यातील शेतकरी सुखावले

Last Updated: Wednesday, September 5, 2012, 10:35

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी मात्र वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखाण्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखल देत अवघ्या तालुक्यातील शेतक-यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

सन्मान... बळीराजाच्या सख्याचा!

Last Updated: Friday, August 17, 2012, 17:00

बळीराजाचा जिवाभावाचा मित्र म्हणजे बैल... शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं दैवतच... बैलांचा सन्मान, कौतुक सोहळ्याचा सण म्हणजे पोळा... ग्रामीण भागातल्या मोठ्या उत्साहानं हा सण आज साजरा होतोय.

कडू कांदा; शेतकऱ्यांचा वांदा!

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 07:58

वरूणराजाचं आगमन लांबल्यानं नाशिकचा कांदा महागण्याची शक्यता आहे. पेरण्या लांबल्याने पोळ कांद्याचं पीक सप्टेंबरपर्यंत येणार आहे. त्यामुळे सध्या शेतात साठवलेला कांदा बाजारात कमी पडणार आहे.

उदयनराजेंविरुद्ध शेतकऱ्यांना हवाय न्याय

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 21:18

सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बेधडक स्वभावाचा प्रत्यय पुन्हा आला. विवेक पंडित यांनी साता-यात महसूल खात्याच्या चुकीच्या धोरणाबाबत आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या अन्यायाविरोधात मोर्चा काढला होता.

शरद पवारांनी व्यक्त केली चिंता

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 22:35

काही दिवसांपूर्वी पावसाची फारशी चिंता करण्याची गरज नसल्याचे सांगून दिलासा देणा-या कृषी मंत्री शरद पवारांनी आता मात्र महाराष्ट्र, कर्नाटकातील कमी पाऊस ही चिंतेची बाब असल्याचं म्हटलंय.

कष्ट अन् विज्ञानानं घडवला चमत्कार...

Last Updated: Tuesday, July 10, 2012, 10:13

गरज ही शोधाची जननी असते त्यामुळेच बदल होतो आणि मग विकास... शेतीक्षेत्रात ही अशीच घोडदौड सुरु आहे. मात्र, आता शेतकऱ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळे शेतकऱ्यांची गती वाढतेय. सांगली जिल्ह्यातही असाच एक बदल शेतकऱ्यांनी घडवून आणलाय.

विदर्भातील शेतकऱ्यांसाठी पॅकेज बंद

Last Updated: Wednesday, June 13, 2012, 11:04

विदर्भातील वाढत्या आत्महत्यांची दखल घेऊन केंद्र सरकारनं अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ आणि वर्धा या सहा जिल्ह्यांसाठी विशेष आर्थिक पॅकेज जाहीर केलं होतं. या पॅकेजअंतर्गत शेतक-यांना गेल्या सहा वर्षांपासून 50 टक्के अनुदानावर बी-बियाणं आणि खतांची खरेदी करता येत होती.

आघाडी सरकारमुळे शेतकऱ्यांचा जीव जाणार ?

Last Updated: Tuesday, June 5, 2012, 16:14

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेल्या शह-काटशहाचा फटका राज्यातील जिल्हा बँकांना आणि पर्यायानं शेतकऱ्यांना बसू लागला. त्यामुळे ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पीककर्ज मिळत नसल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे.

कांदा उत्पादक आक्रमक, मोर्चाचा इशारा

Last Updated: Saturday, May 26, 2012, 18:54

नाशिकमध्ये कांदा उत्पादक पुन्हा आक्रमक झाले आहेत. आठ दिवसांच्या आत शेतक-यांना न्याय मिळाला नाही तर पालकमंत्री छगन भुजबळांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा स्वाभीमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला आहे.

दुष्काळाचे रण पेटले...शेतकरी संतापले...मडके फुटले!

Last Updated: Monday, May 7, 2012, 19:23

राज्यात दुष्काळाचा प्रश्न गंभीर झालेला असताना, आता या मुदद्यावर रस्त्यावरही रण पेटायला सुरुवात झालीय. राज्यात ठिकठिकाणी सरकारविरोधाचा हा उद्रेक व्यक्त होऊ लागलाय. मुंबईत मंत्रालयाबाहेर रिपाईतर्फे मटकाफोड आंदोलन करण्यात आलय

नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव

Last Updated: Saturday, May 5, 2012, 23:07

राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.

शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 25, 2012, 17:31

विविध फळं, भाजी आणि मासाल्यांवरचं नियमन रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचं शेतकरी संघटनांनी स्वागत केलंय. पण सरकारन हा निर्णय घेताल्यानंतर परत त्यावर हरकती मागावाल्यात. त्याला संघटनांनी जोरदार विरोध केलाय. त्याचबरोबर आंदोलनाचा इशारा दिलाय.

दूध उत्पादकांचा आंदोलनाचा इशारा

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 15:25

दूध संकलन करणा-या डेअरींनी कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप दूध उत्पादक शेतक-यांनी केला आहे. यासंदर्भात ग्वाल गद्दी नामक संघटनेनं २१ एप्रिलपासून आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मालेगावात पुन्हा 'कांदोलन'

Last Updated: Tuesday, April 17, 2012, 20:09

कांदा दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं सुरु केलेलं आंदोलनं आता चांगलचं पेटलंय. खासदार राजू शेट्टींसह ३ ते ४ हजार शेतकऱ्यांना अटक करण्यात आलीय. मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनकर्ते जमलेत.

दाम्पत्याची तीन मुलींसह आत्महत्या

Last Updated: Wednesday, April 11, 2012, 12:42

वाढती महागाई, घाट्यातली शेती आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून एका दाम्पत्यानं तीन मुलींसह जीवनच संपवण्याचा प्रयत्न केल्याची ह्रदयद्रावक घटना सांगली जिल्ह्यात घडलीय.... पोटच्या पोरांना विष पाजण्यापर्यंत हतबल झालेल्या या दाम्पत्याच्या कृत्यानं शेतक-याची दयनिय अवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे.

मावळ पोलिसांची अरेरावी वाढतेय?

Last Updated: Monday, April 2, 2012, 21:20

मावळ गोळीबारप्रकरणी पोलिसांनी त्यांच्या कारवाईचा वेग वाढवला आहे. शेतकऱ्यांना चौकशीसाठी बोलावून अचानक अटक करण्याची कारवाई पोलिसांनी सुरु केली आहे. पोलिसांच्या या अटकसत्रामुळे मावळातील शेतकरी धास्तावले आहेत.