Last Updated: Wednesday, December 21, 2011, 11:44
अर्जुन डांगळे, (आरपीआय आठवले गट)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी आंदोलन करावं लागतं ही एक शरमेची आणि खेदजनक गोष्ट आहे. यासाठी केवळ आंबेडकरी जनता रस्त्यावर उतरली आहे, याची पण खंत वाटत आहे. बाबासाहेब केवळ दलित जनतेचे नाही ते सर्व भारताचे आहेत. त्यांच्यासाठी रिपाइं किंवा आंबेडकर चळवळीच्या लोकांनी आंदोलन करावे आणि इतरांनी गंमत पाहावी ही गोष्ट मनाला पटत नाही.