लिएंडर पेस विरोधात कौटुंबिक हिंसा खटला दाखल

Last Updated: Monday, June 23, 2014, 11:08

मॉडेल रिया पिल्लईने टेनिस खेळाडू आणि आपल्या पूर्वीच्या लिव्ह इन रिलेशनच्या साथीदार लिएंडर पेसच्या विरोधात कौटुंबिक हिंसा आणि छळवणूक संबंधी तक्रार नोंदविली आहे.

आसामातील हिंसेने दहशत, हजारोंचे स्थलांतर

Last Updated: Sunday, May 4, 2014, 16:56

आसाममधील हिंसा पुन्हा एकदा उफाळून आली असल्याने कोक्राझार आणि बक्सा जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत असतांना दिसतंय. आसाममधील हिसेंत आतापर्यंत 32 जणांचा बळी गेला आहे.

आसाममध्ये बोडो अतिरेक्यांचा हिंसाचार सुरुच, 30 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 10:37

आसाममधील कोक्राझार जिल्ह्यात बोडो अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात 30 नागरिक ठार झाले आहेत. यातील 12 मृतदेह बक्सा जिल्ह्यात आढळले आहेत. या हल्ल्यानंतर क्रोक्राझार, चिरंग आणि बाक्सा या जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आलीय. आसाममध्ये गेल्या 24 तासांत घडलेली ही दुसरी घटना आहे.

कोल्हापुरानं केलं राज्याला जागं... पण, हिंसा असमर्थनीय!

Last Updated: Tuesday, January 28, 2014, 11:20

कोल्हापूर महानगरपालिकेच्या टोल विरोधातल्या विशेष सभेचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. आता हा एका जिल्ह्याचा प्रश्न नाही, तर राज्यात टोल विरोधात आंदोलनाची एक लाट आलीय.

का होतोय जातीय हिंसाचार विधेयकाला विरोध, पाहुयात...

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 12:07

वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आता हे विधेयक संसदेत सादर होणार आहे... पण, हे विधेयक का वादग्रस्त ठरतंय? जातीय हिंसाचार विधेयकातल्या तरतुदी काय आहेत? पाहुयात...

जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयक आज संसदेत?

Last Updated: Tuesday, December 17, 2013, 11:56

वादग्रस्त जातीय हिंसाचार प्रतिबंधक विधेयकाला सोमवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी मंजुरी दिलीय. आज हे विधेयक संसदेत सादर होण्याची शक्यता आहे.

महिलांनो तुमच्यासाठी, नाशिक पोलिसांचा विशेष उपक्रम

Last Updated: Monday, December 16, 2013, 20:21

दिल्ली बलात्कार प्रकरणानंतर देशभरात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्ना संदर्भात ओरड झाल्यानंतर नाशिक पोलिसांनी हेल्पलाईन सुरु केली. या हेल्पलाईनवर आलेल्या महिलांच्या तक्रारी या बहुतेक घरगुती हिंसाचारासंदर्भातल्या आहेत.

जातीय हिंसाचार विधेयक मांडणारच - गृहमंत्री

Last Updated: Thursday, December 5, 2013, 18:18

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनातच हे विधेयक मांडणार असल्याची स्पष्टोक्ती गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेय. या विधेयकाला विरोध एकट्या भाजपचा नाही. राज्य सरकारांच्या अधिकारात केंद्राचा हस्तक्षेप वाढेल, अशी टीका अनेक राज्यांनी केली आहे.

जातीय हिंसाचार विधेयक विरोधात मोदींचं पंतप्रधानांना पत्र

Last Updated: Thursday, December 5, 2013, 12:21

संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जातीय हिंसाचार विधेयक, महिला आरक्षण विधेयकावर चर्चा होणारेय. मात्र भाजपनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच जातीय हिंसाचार विधेयकावर प्रश्न उपस्थित केलेत... नरेंद्र मोदींनी पंतप्रधानांना पत्र पाठवून काही प्रश्न उपस्थित केलेत...

थांबा... 'लिव्ह इन रिलेशनशीप'संबंधी कायदेही जाणून घ्या!

Last Updated: Sunday, December 1, 2013, 13:46

सुप्रीम कोर्टानं महिलांना सुरक्षा पुरविण्यासाठी सहजीवन संबंधालाही (लिव्ह इन रिलेशनशीप) लग्नाप्रमाणेच एका चौकटीत आणण्याचा प्रयत्न केलाय.

मुजफ्फरनगर पुन्हा पेटलं; मारहाणीत चार जणांचा मृत्यू

Last Updated: Thursday, October 31, 2013, 10:56

मुजफ्फरनगर जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. जिल्ह्यातील बुढाना भागात बुधवारी रात्री पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेची घटना घडलीय.

शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण

Last Updated: Wednesday, October 9, 2013, 20:24

ब्राझीलमधल्या रिओ दि जानेरो येथील शिक्षकांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पगारवाढीच्या मागणीसाठी तिथल्या पालिका मुख्यालयाबाहेर हजारो शिक्षकांनी आंदोलन सुरू केलं होतं.

मुजफ्फरनगर दंगल : राजकीय नेत्यांविरुद्द अटक वॉरंट

Last Updated: Wednesday, September 18, 2013, 14:14

मुजफ्फरनगर दंगल प्रकरणात एका स्थानिक कोर्टानं १६ जणांविरुद्ध वॉरंट बजावलंय. दंगल भडकावल्याचा आरोप ठेऊन उत्तर प्रदेशचे सहा राजकीय नेत्यांविरुद्ध अटक वॉरंट काढण्यात आलंय. हे सहा नेते भाजप आणि बीएसपीचे नेते आहेत.

उत्तर प्रदेशमध्ये उसळलेल्या दंगलीत २८ बळी

Last Updated: Monday, September 9, 2013, 14:34

उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये उसळलेल्या जातीय दंगलीमध्ये गेल्या दोन दिवसांत 28 जणांचे बळी गेले आहेत. आजही येथ तणावपुर्ण वातावरण असल्यान कर्फ्यू चालूच आहे.

ओम पुरी यांची `हॉलिवूड जर्नी` गोत्यात?

Last Updated: Tuesday, September 3, 2013, 10:33

अभिनेता ओम पुरी यांना हॉलिवूडमधून मिळालेली ‘द हंड्रेड फूट जर्नी’ आता जरा जास्तच लांबणार असं दिसतंय. कारण, या चित्रपटाच्या शुटींगसाठी जाण्यात कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या ओम पुरी यांना बऱ्याच समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.

`बापूं`च्या शिष्यांचंही `खळ्ळ खट्यॅक`!

Last Updated: Monday, September 2, 2013, 17:05

स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या अटकेनंतर देशभरात त्यांच्या समर्थकांनी थयथयाट केला. बापूंचे भक्त म्हणवणारे हे दंगेखोर अक्षरशः बिथरल्यासारखे वागत होते. अहिंसेची शिकवण देणा-या बापूंच्या शिष्यांवर काय त-हेचे संस्कार झालेत, यावर एक दृष्टिक्षेप...

इजिप्त कारवाईचा बराक ओबामांनी केला निषेध

Last Updated: Friday, August 16, 2013, 15:46

इजिप्तचे पदच्यूत अध्यक्ष मोहंमद मोर्सीसमर्थंकांवरील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या हिंसक कारवाईचा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांनी निषेध केलाय.

इजिप्तमध्ये ६२३ ठार, मोर्सी समर्थकांना चिरडले

Last Updated: Friday, August 16, 2013, 08:51

इजिप्तची वाटचाल अराजकतेकडे दिसून येत आहे. या देशात हिंसाचार उफाळून आला आहे. आंदोलन करणाऱ्यांना चिरडण्यात येत आहे. लष्करी कारवाईत तब्बल ६२३ ठार झाल्याचे वृत्त आहे. पदच्युत राष्ट्राध्यक्ष मोहंमद मोर्सी सर्मथक निदर्शकांना हटविण्यासाठी लष्कराने कारवाई केली आहे.

किश्तवाड हिंसाचार : आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या -SC

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:09

किश्तवाड हिंसाचार प्रकरणी आठ दिवसांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं जम्मू-काश्मीरच्या मुख्य सचिवांना दिलेत. परिसरात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी काय पावलं उचलली याची विचारणा कोर्टानं केलीये. जे ऍण्ड के पॅन्थर्स पार्टीचे प्रमुख भीम सिंग यांनी केलेल्या याचिकेवर कोर्टानं हे आदेश दिलेत.

किश्तवाड हिंसाचार, राबर्ट वडेरा प्रकरणावरुन विरोधक आक्रमक

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:02

संसदेत विविध मुद्यांवरुन विरोधकांनी सरकारला धारेवर धरलंय..त्यामुळं गेला आठवडा आणि कालच्या दिवशी संसदेचं कामकाज व्यवस्थित होऊ शकलं नाही. हा तिढा सोडवण्यासाठी आता कमलनाथ यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावलीय.

संसदेत किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद!

Last Updated: Monday, August 12, 2013, 16:02

काश्मीरमधल्या किश्तवाड हिंसाचाराचे पडसाद संसदेत उमटलेत. राज्यसभेत विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांना आधी बोलू देण्यावरून सरकारी बाकांवरून गोंधळ घातला गेला. त्यामुळे कामकाज तहकूब करावं लागलं.

देशात फाटाफुटीचे लोण, आसामात हिंसाचार

Last Updated: Saturday, August 3, 2013, 10:13

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.

'लिव्ह इन'मध्येही घरगुती हिंसाचार कायदा लागू!

Last Updated: Sunday, July 21, 2013, 14:25

आता लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्याऱ्या महिलांनाही मिळणार संरक्षण. आधी फक्त विवाहित महिलांसाठीच असणारा हा संरक्षण कायदा आता लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलांनाही लागू करण्याचा निकाल केरळ उच्च न्यायालयाने दिलाय.

हातात मेणबत्या नाही, तलवारी घ्या- नाना

Last Updated: Thursday, January 3, 2013, 13:59

अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाबद्दल जितका प्रसिद्ध आहे, तितकाच तो आपल्या रोखठोक वक्तव्यांबद्दल प्रसिद्ध आहे. आताही नाना पाटेकर याने चालू घडामोडींबद्दल बोलताना वादळी वक्तव्यं केली आहेत.

प्रिन्सकडून युक्ता मुखीचा शारिरीक छळ...

Last Updated: Friday, September 14, 2012, 12:16

अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्डचा किताब पटकावणाऱ्या युक्ता मुखी हिनं मुंबई पोलीस स्टेशनमध्ये आपल्या पतीविरुद्ध घरगुती हिंसाचाराची तक्रार नोंदवली आहे. एका पोलीस अधिकाऱ्यानं ही माहिती दिलीय.

मुंबई हिंसाचार: मुस्लिम नेत्यांची दुबई आणि पाकवारी

Last Updated: Friday, September 14, 2012, 08:51

मुंबईत सीएसटीवर ११ ऑगस्ट रोजी मोर्चादरम्यान हिंसाचार झाला होता. त्या मोर्चामध्ये प्रक्षोभक भाषण केलेल्या वक्त्यांनी परदेशी दौरा केल्याचं उघड झालं आहे.

मोंगियावर घरगुती हिंसाचार खटला कायम

Last Updated: Thursday, September 13, 2012, 13:27

भारताचा माजी कसोटीपटू नयन मोंगिया याच्याविरोधात दाखल असलेली घरगुती छळासंदर्भातला खटला कायम ठेवण्यात आलाय.

मुंबई हिंसाचाराची माहिती दिली होती - केंद्रीय गृहमंत्री

Last Updated: Monday, September 10, 2012, 11:45

मुंबईतील सीएसटी हिंसाचार प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा झालाय. या प्रकरणासंदर्भात राज्य सरकारला पूर्वसूचना दिली होती असा गौप्यस्फोट केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, आबांनीही मला माहिती नसल्याचे म्हटल्याने दोघांची जुपल्याचे दिसून आले.

दाऊदने घडवला सीएसटी हिंसाचार- गुप्तचर संस्था

Last Updated: Friday, September 7, 2012, 21:47

सीएसटी हिंसाचाराचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत पोहचले होते. पण आता तेच धागेदोरे हे दुबईपर्यंत पोहचले असल्याचे गुप्तचर संस्थेने सांगितले.

पवार म्हणतात, आबा आमचे गुणाचे...

Last Updated: Wednesday, August 29, 2012, 16:13

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची पाठराखण केली आहे. आर.आर.पाटील एक उत्तम गृहमंत्री म्हणून काम करित आहेत.

`अमर जवान` स्मारकाचे नुकसान, तरूण जेरबंद

Last Updated: Tuesday, August 28, 2012, 12:43

मुंबईतील हिंसाचारावेळी `अमर जवान` स्मारकाचे नुकसान करणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली. या तरूणाची सीसीटीव्ही फुटेज आणि माध्यमांनी केलेल्या चित्रीकरणानंतर ओळख पटली आहे.

मुंबईतील हिंसाचार पूर्वनियोजित - पोलीस

Last Updated: Friday, August 24, 2012, 09:09

मुंबईत ११ ऑगस्ट रोजी करण्यात आलेला हिंसाचार हा पूर्वनियोजित होता, असं आता पोलिसांनी म्हटलं आहे. हिंसाचाराचे हे षड्यंत्र कसे रचले गेले, याची माहिती पोलीस काढत आहेत.

आसाम हिंसा : आमदार अटकेत, पुन्हा कर्फ्यु लागू

Last Updated: Thursday, August 23, 2012, 11:16

आसाम राज्यात नुकत्याच उफाळलेल्या हिंसाचाराबद्दल राज्यातील सत्तारुढ काँग्रेसचा सहयोगी पक्ष असलेल्या ‘बोडोलँड पीपल्स फ्रंट’ या पक्षाच्या एका आमदाराला अटक करण्यात आलीय.

मुंबईतील हल्लेखोरांना पकडा, पाच लाख मिळवा

Last Updated: Thursday, August 23, 2012, 09:19

मुंबईत १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारण्यात आलेल्या ‘अमर जवान’ क्रांतिस्तंभावर हल्ला करणाऱ्या धर्मांध आंदोलकांची पोलिसांना माहिती देणाऱ्याला पाच लाख रुपयांचे बक्षिस देण्याची घोषणा अपक्ष खासदार राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.

xxx अबू आझमी निवडून येतोच कसा? - राज

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 17:04

भाषणामध्ये राज ठाकरेंनी पुन्हा एकदा परप्रांतियांचा मुद्दा खास ‘ठाकरी’ शैलीत लोकांसमोर मांडला. अर्थातच टार्गेट होतं... अबू आझमी.

मनसे `सुसाट`, मोर्चाने कोणाची लागणार `वाट`?

Last Updated: Monday, August 20, 2012, 18:07

मनसेनं उद्याच्या मोर्चासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यासाठी मनसेच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सर्वच जण तयारीला लागले आहेत.

मोर्चा काढणारच; मनसे व्यूहरचनेत दंग

Last Updated: Monday, August 20, 2012, 12:46

गृहमंत्री आर. आर. पाटील आणि मुंबईचे पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मनसे मंगळवारी म्हणजेच उद्या मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी मनसे विशेष व्युहरचना करण्यात व्यस्त आहे.

हिंसाचाराची बनावट क्लिप; दोघांना अटक

Last Updated: Monday, August 20, 2012, 09:55

आसाम आणि म्यानमार हिंसाचाराची बनावट व्हिडिओ क्लिप ‘ब्लू टूथ’च्या माध्यमातून पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन समाजकंटकांना सोलापूर पोलिसांनी अटक केली आहे.

आत्तापर्यंतचं सर्वात मोठं देशांतर्गत स्थलांतर!

Last Updated: Monday, August 20, 2012, 15:24

आसाम हिंसाचारानंतर देशभरातलं सर्वात मोठं स्थलांतर घडून आलयं. गेल्या काही दिवसांत जवळपास पाच लाख ईशान्य भारतीय नागरिकांनी आपल्या घरची वाट धरली आहे.

फेसबुकमुळे पाकिस्तान माजवतेय हिंसाचार

Last Updated: Sunday, August 19, 2012, 19:45

पाकिस्तानातील काही घटक सोशल साईट्सचा गैरवापर करुन भारतातला सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रय़त्न करत आहेत.

`राज ठाकरे तुमची वेळ चुकीची....`

Last Updated: Sunday, August 19, 2012, 18:46

राज्यात सण ऊत्सव आणि तणावाची परिस्थिती असताना ही मोर्चा काढण्याची वेळ योग्य नसल्याचं गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी अप्रत्यक्षपणे राज ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

आसाम हिंसाचार : बांगलादेशी घुसखोर मुख्य कारण

Last Updated: Saturday, August 18, 2012, 16:11

आसामसह ईशान्य राज्यांमधील विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा मुद्दा संसदेत १८ ऑगस्टला गाजला. दोन्ही सभागृहांनी प्रश्नो्त्तराचा तास स्थगित करून या विषयावर केलेल्या चर्चेअंती, ईशान्येकडील राज्यांतील विद्यार्थ्यांना अफवांच्या माध्यमातून घाबरविणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा दिला.

संसदेत उमटले आसाम हिंसाचाराचे पडसाद

Last Updated: Friday, August 17, 2012, 16:44

ईशान्येकडील भारतीय नागरिकांच्या स्थलांतराच्या मुद्याचे आज संसदेतही प़डसाद उमटले. स्थलांतर रोखण्यासाठी सरकारनं ठोस कारवाई करण्याची मागणी सुषमा स्वराज यांनी केली. देशातल्या अनेक शहरांमध्ये शिकत असलेल्या विद्यर्थ्यांना सरकारनं सुरक्षेची हमी द्यावी तसंच त्यांच्यासाठी ठिकाठिकाणी हेल्पलाईनही सुरू करावी अशी मागणी स्वराज यांनी केली.

आसाममध्ये पुन्हा हिंसाचार उफाळला

Last Updated: Friday, August 17, 2012, 10:03

आसाममध्ये गुरुवारी पुन्हा एकदा हिंसाचार उफाळून आला आहे. ताजी घटना ही बक्शा जिल्ह्यातील आहे. येथे बलवाई आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत अनेकजण जखमी झाले आहेत.

मुंबई हिंसाचारप्रकरणी सलीम चौकियाला अटक

Last Updated: Thursday, August 16, 2012, 17:01

आझाद मैदानातल्या हिंसाचारप्रकरणी मुंबई पोलिसांनी सलीम चौकिया याला अटक केलीय. आशिवरा भागातल्या आनंद नगरमधील रहिवासी असलेल्या सलीम चौकियाला पोलिसांकडून एसएलआर हिसकावल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

सीएसटीचे दंगेखोर सीसीटीव्हीत कैद

Last Updated: Thursday, August 16, 2012, 15:05

गेल्या आठवड्यात मुंबईतल्या सीएसटी परिसरात झालेल्या हिंसक आंदोलनातील दंगलखोर सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेत. हातात बंदुका घेऊन धुडगूस घालणारे काही तरुण सीसीटीव्हीत कैद झाल्याने दंगेखोरांचा पर्दाफाश झालाय.

सोशल नेटवर्किंगचा हिंसेसाठी वापर!

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 16:25

सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून भावना भडकवून मुंबईत ‘सीएसटी’वर हिंसाचार घडवण्यात आल्याची माहिती गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिलीय.

संसदेतही गाजला... मुंबई हिंसाचार

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 15:58

मुंबईतल्या मुंबई हिंसाचाराचे संसदेत तीव्र पडसाद उमटले आहेत. शिवसेनेनं आक्रम पवित्रा घेत हिंसाचार रोखण्यात सरकारला अपयश आल्याचा आरोप शिवसेना नेते अनंत गिते यांनी लोकसभेत केला.

ठाकरे बंधूंनी घेतलं गृहमंत्र्यांना फैलावर

Last Updated: Tuesday, August 14, 2012, 07:48

सीएसटी हिंसाचाराच्या मुद्यावरुन आता ठाकरे बंधूंनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.. उद्धव आणि राज ठाकरे यांनी गृहखातं आणि सरकारवर सडकून टीका केलीय. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनीही गृहखात्याचा कारभार टफ मंत्र्यांच्या हातात देण्याची मागणी राज्यपालांकडे केलीय.

पोलिसांना मिळाली होती हिंसेची सूचना

Last Updated: Monday, August 13, 2012, 22:39

मुंबई हिंसाचाराबद्दल आता एक धक्कादायक माहिती पुढे येतेय. आसाम मुद्यावरून मुंबईच्या कायदा आणि व्यवस्था बिघडण्याची सूचना अगोदरच मिळाली होती.

मालेगावात दंगलीचा प्रयत्न फसला

Last Updated: Sunday, August 12, 2012, 20:23

गेल्याच आठवड्यात आसामच्या चित्रफिती दाखवून जातीय तणाव भडकाविणाऱ्या एका तरुणाला मालेगावात ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यामुळे राज्यात दंगली घडविणे सुनियोजित होतं, हे आता स्पष्ट झालंय.

सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित

Last Updated: Sunday, August 12, 2012, 17:00

सीएसटी हिंसाचार पूर्वनियोजित असल्याची शक्यता क्राईम ब्रांचच्या तपासात पुढे येतेय. त्यामुळं आता या दिशेनं तपास सुरु आहे. घटनास्थळी हॉकी स्टिक्स, इंधनाचे डबे आणि मोठे दगड सापडल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

हल्ला पूर्वनियोजीत, सरकार बरखास्त करा - ठाकरे

Last Updated: Sunday, August 12, 2012, 14:38

सीएसटी हिंसांचारानंतर आता त्याचे राजकीय पडसाद मटण्यास सुरुवात झालीय.. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार अपयथी ठरल्याची टीका करत, हे सरकार बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनेनं केलीय.

राज ठाकरेंचा गृहमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated: Sunday, August 12, 2012, 09:29

मुंबईत सीएसटी परिसरात शनिवारी अशांतता निर्माण झाली होती. आज मात्र मुंबईतलं जनजीवर सुरळीत सुरूय..कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय. मात्र, राज ठाकरे यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबईच्या रस्त्यावरही धर्मांधांचं आव्हान!

Last Updated: Monday, August 13, 2012, 16:02

मुंबईतल्या रस्त्यांवर पाकिस्तानप्रमाणे धर्मांध मुस्लिम उतरल्याचं चित्र पुन्हा एकदा दिसलं. धर्मांध मुस्लिमांनी थेट पत्रकार आणि पोलिसांवरच हल्ला चढवला. आसाम आणि म्यानमारमधल्या हिंसाचाराचा निषेध करण्यासाठी हजारो मुस्लिम आझाद मैदानात जमा झाले होते. मात्र त्यांना फक्त निषेधच करायचा होता, असं नव्हतं. त्यांच्या हिंसक कृतीतून ते स्पष्ट झालं.

मुंबईत `हाय अलर्ट`

Last Updated: Sunday, August 12, 2012, 06:41

मुंबईतल्या सीएसटी परिसरात हिंसक जमावानं घातलेल्या गोंधळात 2 ठार तर 47 जण जखमी झालेत. मुंबईत पुन्हा एकदा अशांतता. पुन्हा एकदा हिंसक जमावाकडून धुडगूस.

मतांसाठी घुसखोरीला उत्तेजन – अडवाणी

Last Updated: Thursday, August 9, 2012, 01:26

‘आसाममधला वाद हिंदू-मुस्लिमचा असा जातीयवादी नाही तर आसाममध्ये घुसखोरीमुळेच हिंसाचार सुरु आहे. आणि मतांसाठी या घुसखोरीला उत्तेजन मिळत असल्याचा’ घणाघाती आरोप अडवाणींनी सरकारवर केलाय. संसदेचं पावसाळी अधिवेशनात ते बोलत होते. अडवाणींच्या या आरोपांमुळे सोनिया गांधी मात्र चांगल्याच तापल्या.

आजपासून संसदेचं मान्सून अधिवेशन

Last Updated: Wednesday, August 8, 2012, 22:31

राजधानीत संसदेच्या मान्सून अधिवेशनाला आजपासून सुरुवात होतेय. आसाम हिंसेचा प्रश्न आपण पहिल्याच दिवशी दोन्ही सभागृहात उठवणार असल्याचं भाजपानं आधीच स्पष्ट केलंय. आसाम हिंसेच्या प्रश्नावर भाजपाकडून स्थगन प्रस्तावाची मागणीदेखील करण्यात येणार असल्याचं समजतंय. चिंदबरम यांच्यासोबतच महागाई, आर्थिक संकट आणि दुष्काळ यांसारख्या प्रश्नांवरही सरकारला घेरण्याचा चंग विरोधकांनी बांधलाय.

आसाममध्ये दंगलीचा भडका कायम; ४१ ठार

Last Updated: Thursday, July 26, 2012, 13:43

आसाममध्ये दंगलीचं सत्र पेटलंय. आत्तापर्यंत या दंगलीत ४१ जणांना आपल्या प्राणाला मुकावं लागलंय. जवळजवळ दोन लाख लोक बेघर झालेत अनेक जण बेपत्ता आहेत, अनेक गावं आगीत भस्मसात झाली आहेत आणि हजारो जणांना आपलं घराला पारखं व्हावं लागलंय.

हिंसाचाराचा दुष्परिणाम होतो 'सेक्स'वर

Last Updated: Wednesday, July 4, 2012, 18:51

गुन्हेगारी, शिवीगाळ आणि हिंसाचार वाट्याला आलेल्या स्त्रियांमध्ये सेक्सबद्दल एक प्रकारची रानटी भावना निर्माण होते. यामुळेच अशा स्त्रियांना एड्स होणयाचं किंवा अकाली गर्भार राहाण्याचं प्रमाण वाढतं.

सिरियातील हिंसाचार थांबवा - संयुक्त राष्ट्रे

Last Updated: Monday, May 28, 2012, 13:29

सिरियामध्ये एका गावात झालेल्या ९२ नागरिकांच्या हत्याकांडाचा संयुक्त राष्ट्रांनी तीव्र निषेध केला. सिरियातील वाढता हिंसाचार थांबविण्याचे आवाहन करताना मानवतेला काळिमा फासणा-या अशा नरसंहाराला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्या विरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी संयुक्त राष्ट्रांनी केले आहे.

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार

Last Updated: Friday, March 2, 2012, 12:05

मालदीवमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला आहे. याला निमित्त होते ते राष्ट्रपती मोहम्मद वहीद मजलिस यांचे भाषण. या हिंसाचारामुळे पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, माजी राष्ट्रपती मोहम्मद नाशिद यांच्या समर्थकांनी पोलिसांवरच हल्ला केल्याने वातावरण बिघडले आहे. पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले आहे.

मणिपुरात हिंसाचार, ५ ठार

Last Updated: Saturday, January 28, 2012, 15:44

मणिपूर विधानसभा निवडणुकीत मतदानादरम्यान हिंसाचारात वाढ झाली आहे. या हिंसाचारात पाच जण ठार आणि अनेक जखमी झाल्याचे वृत्त आहे.