`जम्बो प्रॉब्लेम्स` सोडवणारं मोदींचं `स्मॉलर कॅबिनेट`

Last Updated: Monday, May 26, 2014, 12:59

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळ छोटसं असणार आहे. नरेंद्र मोदी यांचं मंत्रिमंडळ जम्बो असेल की लहान, यावर मागील काही दिवसांपासून चर्चा होत होती.

भारतीय मानतात बलात्कार ही राष्ट्रीय समस्या - सर्व्हे

Last Updated: Wednesday, April 23, 2014, 08:17

बलात्कार ही घटना राष्ट्रीय गंभीर समस्या भारतीय मानतात, असे एका सर्व्हेने स्पष्ट केले आहे. पीव संशोधन केंद्राने याबाबत अभ्यास केला. त्यानंतर हा निर्ष्कष काढला आहे.

`तुह्या धर्म कोंचा`ला सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटाचा सन्मान

Last Updated: Wednesday, April 16, 2014, 21:07

आहिराणी चित्रपट `तुह्या धर्म कोंचा` ला सामाजिक समस्यांवर आधारित सिनेमांमध्ये सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.

मतदानासाठी मतदान ओळखपत्र नसेल तर हरकत नाही!

Last Updated: Wednesday, April 9, 2014, 16:11

तुमच्याकडे निवडणूक ओळखपत्र नसेल तर काहीही हरकत नाही. तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावू शकता. मात्र, निवडणूक आयोगाने निवडणूक ओळखपत्राशिवाय अकरा पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. त्यापैकी एक पुरावा असेल तर सहज तुम्हाला मतदान करता येऊ शकेल.

भारतातील ४ पैकी ३ कामकाजी महिलांना आरोग्य समस्या

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 11:01

महिला एकाचवेळी अनेक कामं करतात.. त्या घर सांभाळतात सोबतच ऑफिसही... मात्र त्याचवेळेस त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. नुकताच असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (ASSOCHAM) यांनी केलेल्या सर्व्हेनुसार देशातील कामकाजी महिलांमधील प्रत्येकी ४ पैकी ३ महिलांना आरोग्याच्या समस्या आहेत.

तुमचे केस गळत आहेत...तर हे कराच!

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 15:01

कधी कधी केस गळणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र, दररोज खूप केस गळत असतील तर ती चिंताजनक बाब आहे. जर विचार करा, दर दिवशी केस गळत असतील तर आपल्या डोक्यावर केसच दिसणार नाही. परंतु घाबरून जाऊ नका. ही खरी गोष्ट आहे, केस गळणे हे धोकादायक आहे. यावर लक्ष केंद्रीत केले तर तुमचे केस गळणार नाही. त्यासाठी एक रामबाण औषध आहे. ते म्हणजे कांद्याचा रस.

महायुतीचा 'माढा'चा तिढा सुटला

Last Updated: Sunday, March 2, 2014, 09:48

महायुतीत माढाचा तिढा अखेर सुटला आहे. कारण माढातून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीने घेतला आहे.

पुण्यातील कचराप्रश्न पेटला, शरद पवार मैदानात

Last Updated: Saturday, February 15, 2014, 15:45

पुण्यातील कचरा कोंडीवर अजूनही ठोस तोडगा निघालेला नाही. मात्र, कचऱ्याच्या प्रश्नावरून आता राजकीय पक्षांची स्टंटबाजी सुरु झालीय..सगळेच पक्ष कचऱ्याच्या प्रश्नावर वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करत आहेत. दरम्यान, शरद पवार सध्या पुण्यात आहेत. आज संध्याकाळी त्यांनी त्यांनी अधिकारी आणि ग्रामस्थांची बैठक बोलावलीये.. सर्कीट हाऊसमध्ये पाच वाजता ही बैठक होतीये. गेली अनेक वर्षे प्रलंबीत असलेल्या या कचरा प्रश्नावर पवारांच्या मध्यस्थीनंतर तरी आता तोडगा निघणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय.

कडेवर मुल घेऊन तिचा लढा सुरू

Last Updated: Thursday, February 6, 2014, 15:38

स्त्रियांच्या आयुष्यात संघर्ष असतोच... मग ती एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीची सीईओ असो की गृहिणी... ही आहे एक कहाणी अशाच एका संघर्षाची.. एसटीची एक महिला कंडक्टर रोजच्या जगण्याची लढाई लढतेय... तिच्या लढयाला अद्याप यश आलेलं नाही... पण रोज धावणाऱ्या एसटीच्या चाकांवरचा तिचा लढा सुरुच आहे.

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान झाल्यात हतबल

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 08:20

शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांच्या परभणी जिल्ह्यात शाळांची दूरवस्था झालीय. अधिका-यांच्या कामचुकारपणामुळं खुद्द राज्यमंत्री हतबल झाल्यात. त्यामुळं दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळणार का असा सवाल उपस्थित करण्यात येतोय.

विधानसभेत काँग्रेसलाच अशोक चव्हाण यांनी पकडले कोंडीत

Last Updated: Thursday, December 19, 2013, 23:22

मराठवाड्याच्या प्रश्नावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण विधानसभेत अधिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मराठवाड्याचा पैसा जातो कुठे हेच समजत नाही, असा काँग्रेस आघाडी सरकारला अशोक चव्हाण यांनी घरचा आहेर दिला आहे.

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर ‘ऑस्ट्रेलियन’ उत्तर!

Last Updated: Thursday, December 5, 2013, 10:12

मराठवाड्याचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला आहे त्यात समन्यायी पाणीवाटप करण्याची सातत्याने मागणी होतेय. याच प्रश्नावर आता राज्य सरकार ‘आस्ट्रेलियन’ तोडगा काढण्याच्या तयारीत आहे.

काय हे, पवारांच्या सधन बारामतीत २२ गावे पाण्यासाठी वणवण

Last Updated: Thursday, November 21, 2013, 20:03

महाराष्ट्राचे मातब्बर नेते आणि केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या बारामतीतील २२ गावं पिण्याच्या पाण्यासाठी झगडतायत. या २२ गावातील गावकऱ्यांचा लढा आतापासून नाही तर गेल्या ४५ वर्षांपासून सुरू आहे. राज्यासमोर आणि देशासमोर बारामतीचा आदर्श मांडला जातो. पण शरद पवारांच्या बारामतीचं सत्य या २२ गावांच्या आंदोलनामुळे समोर आलं आहे.

वाया पाणी रोखण्याऐवजी कल्याणमध्ये अधिकाऱ्याचा दमदाटी

Last Updated: Friday, October 18, 2013, 14:03

कल्याणच्या पत्री पूल परिसरात गेल्या १० ते १२ दिवसांपासून पाईपलाइन फुटली असल्यानं लाखो लीटर पाणी वाया जातंय. ऑक्टोबर हिटमुळे अनेकजण फुटलेल्या पाईपलाइन जवळ आंघोळीचा आनंद लुटतायेत. असे असताना अधिकाऱ्यांचा ऊर्मटपणा दिसून आला.

चंद्रपूर जिह्यात संकट, कोरपना हादरला

Last Updated: Saturday, September 21, 2013, 11:20

आर्थिक दुर्बल घटकांसाठी डझनभर योजना आणि त्याची जोरदार प्रसिद्धी करूनही कुपोषणाची समस्या जैसे थेच असल्याचं दिससंय. चंद्रपूर जिल्ह्यातल्या कोरपना या अतिदुर्गम भागात कुपोषणाच्या समस्येने आरोग्य विभाग हादरलाय. आतापर्यंत ७ बालकांना कुपोषणाच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शांत झोप घ्या... मेंदूला कार्यरत ठेवा!

Last Updated: Wednesday, September 4, 2013, 14:33

आपल्याला योग्य वेळेपुरती शांत झोप घ्यायला हवी, असं नेहमी सांगितलं जातं. एका संशोधनातून आता हेच म्हणणं अधोरेखित केलंय.

`हरियाली`तले रहिवासी डासांमुळं हैराण!

Last Updated: Thursday, August 22, 2013, 12:30

विक्रोळीमधल्या हरियाली भागातले रहिवासी तापाच्या साथीनं आणि डासांच्या त्रासानं हैराण झालेत. महानगरपालिकेकडे विनंती करुनही धूर फवारणी आणि औषध फवारणी केली जात नसल्याची इथल्या नागरीकांची तक्रार आहे.

मुंबईतही समस्या कुपोषणाची!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 18:29

आदिवासी भागात कुपोषित मुलं आढळणं, हे काही आपल्याला नवं नाही. पण आता आदिवासी भागात नाही तर चक्क देशाच्या आर्थिक राजधानीत... मुंबईत एक दोन नाही तर तब्बल ३० कुपोषित बालकं आढळली आहेत.

तुम्हीच स्वत:ला उंचीवर नेऊ शकता!

Last Updated: Thursday, August 1, 2013, 08:38

एखाद्या शास्त्रीय नर्तिकेचा अपघातात एक पाय निकामी होऊनही तिची नृत्याची जिद्द कमी होत नाही. ती नकली पाय बसवून व्यासपीठावर नाचते.

पोलिसांच्या घरांसाठी मुंडेचा मुंबईत मोर्चा

Last Updated: Monday, July 29, 2013, 18:50

मुंबईतमधील बीडीडी चाळींमध्ये राहणाऱ्या पोलिसांना हक्काचे घर मिळावे, या मागणीसाठी भाजपच्यावतीने वरळीत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व खासदार गोपीनाथ मुंडे यांनी केले.

पालघरमध्ये शिक्षकांची शाळेला दांडी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 23:31

पालघर तालुक्यात सध्या शिक्षण विभागाचा बोजवारा उडालाय. अनेक जिल्हा परीषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षक नाहीत..तर जिथे शिक्षक रुजु केलेत ते शाळेवर जात नसल्यानं 25 हजार विद्यार्थ्याचं भवितव्य अंधारात सापडलय.

विदर्भात ओला दुष्काळ जाहीर करा...

Last Updated: Monday, July 22, 2013, 23:29

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशाचा आजचा दिवस गाजला तो विदर्भातल्या अतिवृष्टीच्या मुद्यावरून...ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मुद्यावरून विदर्भातल्या सर्वपक्षीय आमदारांनी आज विधानसभेत रणकंदन केलं.

पावसाळ्यात त्वचेची, केसांची काळजी कशी घ्याल...

Last Updated: Wednesday, July 10, 2013, 08:44

पावसाळ्यात मनसोक्त भिजणं कुणाला आवडणार नाही... पण, पावसाळ्यात वारंवार पावसाच्या पाण्यात भिजल्यानं तुम्हाला विविध समस्यांना सामोरं जावं लागत असेल तर...

जीवनातील संकटांचा सामना करण्यासाठी...

Last Updated: Wednesday, June 12, 2013, 08:30

आयुष्यातील खाच-खळगे समजावून घेऊन त्यापासून मार्ग काढणारा व्यक्ती जीवनात यशस्वी होतो. पण, हे खाच-खळगे समजणार तरी कसे?

विद्यापीठाचं सर्व्हर अडकलं... विद्यार्थी लटकले!

Last Updated: Wednesday, June 5, 2013, 11:19

एकिकडे चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी झटत असलेल्या विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या ऑनलाइन प्रक्रीयेनं चांगलच लटकवलंय.

मनसेला पडणार का खिंडार?

Last Updated: Saturday, June 1, 2013, 10:42

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक हेमंत गोडसे यांच्या संभाव्य शिवसेना प्रवेशाच्या चर्चांनी नाशिकचं राजकारण ढवळून निघालं आहे.

पहा लैंगिक समस्येत का होतेय वाढ

Last Updated: Thursday, May 30, 2013, 10:09

लैंगिक समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे आढळून आले आहे. जगभरातील बहुतेक देशांतील पुरुषाच्याबाबतीत लैंगिक समस्येत वाढ झाल्याचे एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे.

मुलीच्या लग्नात अडचणींवर जाणून घ्या हे उपाय

Last Updated: Thursday, May 30, 2013, 08:31

ग्रहांच्या प्रभावामुळे अनेकदा मुलींच्या विवाहास विलंब होत असतो. त्यावर काही तोडगे, विधी सांगितले आहेत.

पहा का येतं लैंगिक नैराश्य...

Last Updated: Wednesday, May 22, 2013, 07:53

स्त्री व पुरुषांना ज्या प्रमाणे जीवन जगण्यासाठी अन्न,पाणी, याची आवश्कता लागते त्या प्रमाणे त्यांना लैंगिक संबंधही आवश्यक आहे.

शरीरदोषांमुळे होणाऱ्या लैंगिक समस्या

Last Updated: Tuesday, May 21, 2013, 07:57

विवाहामुळे मुलींना अकाली शरीरसंबंधाला सामोरे जावे लागते. इजा होणे, अकाली गर्भधारणा, मैथुनाविषयी भीती, इ. दुष्परिणाम त्यामुळे होतात.

लैंगिक जीवनातील होणारे गैरसमज

Last Updated: Friday, May 10, 2013, 08:47

आपण अशा काळात जगत आहोत ज्यामध्ये टिव्ही आणि मुव्ही स्क्रीनद्वारे प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक वेळी आपल्यासमोर लैंगिक चित्र आणि विचार डोक्यात येतात.

मराठवाड्यासाठी सर्व आमदार एकत्र!

Last Updated: Sunday, May 5, 2013, 22:05

मराठवाड्यावरील होणारा अन्याय आता सहन करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेत आज मराठवाड्यातील सर्वच आमदार औरंगाबादेत एकत्र आले.

पुण्यात पाणीबाणी

Last Updated: Saturday, April 27, 2013, 14:43

पुण्यामध्ये लवकरच पाणीबाणी येणार आहे. महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावातील नागरिकांना दरडोई ४० लिटर इतकेच पाणी देण्याबाबतचे धोरण प्रशासनानं तयार केलं आहे. त्याच प्रमाणे अनधिकृत नळजोड दंड भरून नियमित करण्याचा प्रस्तावदेखील सादर करण्यात आला आहे.

महिला आयोगाची दुर्दशा!

Last Updated: Sunday, April 21, 2013, 19:02

दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेसाठी सर्वच राज्यांमध्ये विविध स्तरावर प्रयत्न करण्यात आले. मात्र राज्य महिला आयोगाला 2009 पासून अध्यक्षच नाही.

सिग्नल यंत्रणेत बिघाड; रेल्वे खोळंबली

Last Updated: Saturday, April 13, 2013, 10:35

मध्य रेल्वेच्या मार्गावर आज सकाळी पुन्हा एकदा वाहतूकीचा खोळंबा झालाय. ठाणे स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

चूक अजितदादांची, माफी मागावी पृथ्वीराजांनी?

Last Updated: Tuesday, April 9, 2013, 17:12

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आतापर्यंत ४ वेळा माफी मागूनही विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम आहे. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातल्यामुळं विधानसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.

विवाहात अडचणी, करा या मंत्राचा जाप

Last Updated: Thursday, April 4, 2013, 08:07

आपल्या विवाहात अनेक बाधा येतात. अनेक वेळेस विवाह जुळतात, मात्र अनेक अडचणींमुळे पुन्हा विवाहात अडथळा निर्माण होतो.

`आयपीएल` तुमच्यासाठी कायपण....

Last Updated: Tuesday, April 2, 2013, 16:12

चारशे वर्षातल्या भीषण दुष्काळामुळं आदिवासींवर भीक मागून खाण्याची वेळ आली असताना पुरोगामी महाराष्ट्रातच आयपीएलचा घाट घातला जातोय.

महिलांनो लठ्ठ व्हाल, तर सारं काही गमावून बसाल...

Last Updated: Tuesday, March 26, 2013, 09:11

महिला आपल्या लठ्ठपणा विषयी खूपच चिंतेत दिसून येतात. महिलांनी लठ्ठ असल्यास त्यांना अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते.

... तर माझा प्रकल्पांना विरोध - राज ठाकरे

Last Updated: Saturday, March 23, 2013, 19:49

मरावतीतल्या इंडियाबुल्सच्या वीज प्रकल्पाला शेतीचं पाणी देण्यास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केलाय.

घोटभर पाण्यासाठी सख्या भावालाच फेकले विहिरीत

Last Updated: Sunday, March 17, 2013, 13:45

विहिरीतून पाणी घेण्याच्या वादावरून सख्या भावाला विहिरीत फेकून हत्या केल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीये. पाराजी पुंड यानं आपल्या दोन मुलांच्या आणि सुनेच्या मदतीने सख्या भावाचा खून केलाय.

`चमकोगिरी` सुरूच, कधी थांबणार चमकोगिरी?

Last Updated: Sunday, March 17, 2013, 00:08

होर्डिंग काढण्याबाबत कोर्टाने आदेश दिल्यानंतर अनेक शहरात त्याचा परिणामही दिसून आला. दोन दिवसांपूर्वीच सर्व पालिकांनी शहरातील होर्डिंग आणि पोस्टर काढून टाकण्याचे आदेश कोर्टाने दिले होते.

व्यापारी संकुलासाठी शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट

Last Updated: Tuesday, March 12, 2013, 19:06

उत्पन्न वाढीसाठी चंद्रपूर जिल्हा परिषदेने आता शाळांवर नांगर फिरवण्याचा घाट घातलाय. शाळांच्या भूखंडावर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेनं ठेवलाय. त्यामुळं पालकांमध्ये संतापाची भावना निर्माण झालीय.

हार्बर रेल्वे खोळंबली, पत्रे उडून ओव्हरहेड वायर तुटली

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:40

ठाणे ते वाशी ट्रान्सहार्बर रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. रबाळे स्टेशनमध्ये छताचे पत्रे रेल्वे रुळांवर पडल्यानं ओव्हरहेड वायर तुटली आहे.

मनसेचा लढा सुरू, मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी

Last Updated: Thursday, March 7, 2013, 16:22

प्राध्यापकांचे आंदोलन सुरु असताना युवासेना आणि मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी राहिलीये. महाविद्यालयीन परीक्षांसाठी विद्यापीठानं पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी मनसेनं केलीये.

आता महाराष्ट्रातील रेल्वे समस्या मार्गी?

Last Updated: Monday, March 4, 2013, 10:01

महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत फेरविचार व्हावा यासाठी शुक्रवारी सर्वपक्षीय खासदारांनी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेऊन समस्या दूर करण्याची विनंती केलीय. यावेळी समस्या मार्गी लावण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.

स्थूल महिलांच्या बाळाला हृद्यरोगाची शक्यता

Last Updated: Friday, March 1, 2013, 17:58

स्थूल मातेपासून जन्मास येणाऱ्या बाळाला जन्मत: हृदयरोगाची शक्यता जास्त असते. तसेच हृदयाची रचना गुंतांगुंतीची होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात असते.

आधार कार्डसाठी ज्येष्ठ नागरिकांना `आधारच नाही`

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 10:54

मुंबईतील आधार कार्ड काढण्यासाठी जाणा-या अनेक जेष्ठ नागरिकांना सध्या त्रासाला सामोरं जावं लागतंय... अनेक ठिकाणी जेष्ठ नागरीकांच्या बोटांचे ठसे एनरॉलमेंट मशीनवर उमटतच नाहीत...

पश्चिम रेल्वेचे प्रवाशी रखडले...

Last Updated: Monday, January 28, 2013, 09:50

पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. मध्यरात्रीच्या सुमारास कारशेडमध्ये जाणाऱ्या लोकलचा एक डबा रुळांवरुन घसरलाय. त्यामुळे पश्चिम मार्गावरील वाहतुकीवर सकाळ पासूनच परिणाम दिसून येतोय.

तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत

Last Updated: Thursday, January 24, 2013, 08:46

गुरुवारी पहाटेच्या थंडीतच बदलापूरजवळ रेल्वेचा तांत्रिक बिघाड झालाय. त्यामुळे अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांची वाहतूक खोळंबलीय.

कलानगरीत नाट्यगृहांची दूरवस्था

Last Updated: Thursday, January 24, 2013, 13:24

महाराष्ट्रातल्या नाट्य, संगीत कला वाढीस लागण्यासाठी कलेचं भोक्ते आणि आश्रयदाते असलेल्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी रोमच्या धर्तीवर कोल्हापुरात पॅलेस थिएटरची बांधणी केली होती. 1 मे 1979 पासून कोल्हापूर महानगरपालिका नाट्यगृहाची देखभाल करतं.

वैवाहिक जीवन सुखी राहण्यासाठी हे करा!

Last Updated: Wednesday, January 23, 2013, 17:35

आपलं वैवाहिक जीवन अत्यंत सुखी असावं अशी प्रत्येक पुरूषाची भावना असते. मात्र काही कारणास्तव या अनेक वेळेस अनेकजण सुखी आणि जीवन जगण्यासाठी झगडत असतात.

`आधार`ला निर्माण झालीय आधाराची गरज!

Last Updated: Monday, January 14, 2013, 16:59

केंद्रसरकारच्या 'आधार' योजनेमुळं गरिबांना ‘आधार’ मिळणं तर सोडाच पण आधारकार्ड काढण्यासाठी सामान्यांच्या डोक्याचा ताप मात्र नक्कीच वाढलाय.

झोप येत नसेल, तर...

Last Updated: Sunday, January 6, 2013, 17:39

आजकालच्या दगदगीच्या जीवनात शांत निवांत झोप मिळणं दुरापास्त झालं आहे. डोक्यामधली अनेक टेन्शन्स, ताण-तणाव यामुळे डोक्यामध्ये नाना चिंता असतात आणि त्याचा परिणाम झोपेवर होतो. गंमत म्हणजे अशा झोपेवर एक गमतीशीर इलाज आहे.

लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, राष्ट्रवादीची मागणी

Last Updated: Saturday, January 5, 2013, 19:50

लातूर जिल्ह्यात प्रचंड दुष्काळ आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागतेय. त्यामुळे लातूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी राष्ट्रवादीने केली आहे.

म.रे. ढेपाळली, प्रवाशांची तोडफोड, मारहाण

Last Updated: Thursday, January 3, 2013, 10:07

मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे हाल अद्याप सुरूच आहेत. आजही लोकल लेट असल्यानं संतापलेल्या प्रवाशांनी सकाळी आसनगाव स्थानकावर तोडफोड केली.

बीएमसीचा निर्धार, विना`आधार` नाही पगार!

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 17:21

मुंबई महापालिकेने २० हजार कर्मचाऱ्यांना चांगलाच दणका दिलाय. हा दणका आधार कार्डमुळे कर्मचाऱ्यांना बसणार आहे. आधार कार्ड काढण्याकडे कानाडोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार रोखला जाणार आहे. त्यामुळे विना आधार कार्ड, नाही पगार अशी भूमिका पालिकेने घेतली आहे.

रेल्वे समस्या : पाठवा प्रतिक्रिया, फोटो आणि ब्लॉग

Last Updated: Wednesday, January 2, 2013, 14:31

मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे आणि ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर तुम्हाला फेस कराव्या लागलेल्या समस्या. काही अडचणी तसेच तुम्ही काढलेले फोटो. तुम्हाला आलेला अनुभव. तुम्ही रेल्वे समस्यांवर लिहिलेला ब्लॉग असेल. तर तो आम्हाला पाठवा. आम्ही निवडक फोटो, प्रतिक्रिया, ब्लॉग प्रसिद्ध करू.

पैसा नाही टिकत हाती, ही गोष्ट करा घराच्या दाराशी

Last Updated: Tuesday, December 4, 2012, 17:14

पैसा हा माणसाच्या आयुष्यात फारच महत्त्वाचा असतो. पैसा नसला की माणसाची समाजात किंमत केली जाते. आणि त्यामुळेच पैशासाठी आयुष्यभर आपण झगडत असतो.

नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:15

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

मराठवाड्याला पाणी, नगर, नाशिक आक्रमक

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 20:01

मराठवाड्याला पाणी सोडण्याच्या सरकारच्या निर्णयामुळे अहमदनगर आणि नाशिकमधील शेतकरी तसंच राजकीय नेते चांगलेच आक्रमक झालेत. हक्काच्या पाण्यासाठी आज त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय.

अहमदनगरमध्ये पाणी पेटले, आमदारांचे आत्मदहन?

Last Updated: Tuesday, November 27, 2012, 15:37

अहमदनगरमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पाण्याच्या प्रश्नावर भाजप आमदार राम शिंदे यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करुन राम शिंदे यांना ताब्यात घेतलं यावेळी पोलीस आणि शिंदे यांच्यात जोरदार धक्काबुक्की झाली.पाणीप्रश्न चांगलाच पेटलाय. शेतक-यांनी मुळा प्रकल्पाच्या दोन्ही कालव्यांचे दरवाजे उघडून पाणी सोडलयं.

पैशाच्या चणचणीने बेहाल, दारावर लावा घोड्याची नाल

Last Updated: Tuesday, October 30, 2012, 13:08

घोड्याच्या नालेचा घराच्या आर्थिक परिस्थितीशी काय संबंध? असा प्रश्न पडेल.. पण काही गोष्टींची उत्तरं आकलनापलिकडे असतात आणि परिणाम मात्र आपल्या समोर असतात.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर अस्मानी-सुलतानी संकट

Last Updated: Wednesday, October 17, 2012, 08:48

औरंगाबाद जिल्ह्यात ऊस उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात अडकलाय. एकीकडे कारखाना उसाचे पैसे देत नाही तर दुसरीकडे अस्मानी संकटही मोठं आहे.. त्यामुळे जगावं कसं असा प्रश्न आता शेतक-यांना पडलाय.

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर `पाणी`...

Last Updated: Friday, October 5, 2012, 18:29

सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील शाळांमध्ये मुलभूत सोयी येत्या सहा महिन्यांत पुरवण्याचे आदेश दिलेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे विद्यार्थी सध्या डोक्यावरून पाणी वाहून शाळेत आणतात... पाण्याच्या टाक्या आहेत पण, रिकाम्या...

कालव्याद्वारे सोडवला शेतकऱ्यांचा प्रश्न

Last Updated: Sunday, September 30, 2012, 08:24

दुष्काळात सगळीकडे ओरड होत असली तरी वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील शेतकरी मात्र सुखावलाय. इथल्या पूर्ती साखर कारखान्याच्या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी विधायक कामाचा दाखला देत अवघ्या तालुक्यातील शेतकऱ्यांना पाण्याचा विवंचनेतून मुक्त केलंय.

दुसरी बायको करायची आहे... अडचणीत याल !!!

Last Updated: Friday, September 28, 2012, 12:26

दुसरं लग्न केलं तरी पहिल्या बायकोला तुम्हांला पोटगी ही द्यावीच लागणार आहे. दुसरे लग्न केले म्हणून मुस्लिम पुरुषाला कोणत्याही परिस्थितीत पहिल्या बायकोची पोटगी थांबवता येणार नाही.

मुंबईकरांचे पाणी कपात टळले

Last Updated: Thursday, September 13, 2012, 09:36

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबईतील१० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलाय. शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष राहूल शेवाळे यांनी दिलीय.

पुण्यात पासपोर्टसाठी `त्रास`पोर्ट

Last Updated: Wednesday, September 12, 2012, 23:55

पुणे विभागात पासपोर्टसाठी अनेकदा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे नागरिक चांगलेच वैतागलेत. सरकारी कारभारापेक्षा टाटा कन्सलटन्सी सर्विसेस चांगलं काम करेल अशी अपेक्षा होती. मात्र आधीचाच कारभार बरा होता असं म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.

बस चालकांची गुर्मी; विद्यार्थी करतायत भरपाई

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:31

विद्यार्थ्यांची ही तोबा गर्दी.... बस थांब्यावर न थांबता सुसाट धावणाऱ्या बस... बसमागे दप्तराचं ओझं सांभाळत धावणारे विद्यार्थी... नाशिकमध्ये कुठल्याही बसस्टॉपवर दिसणारं हे दृश्यं... चालक बसस्टॉपच्या आधी तरी बस थांबवतो किंवा नंतर तरी... पण बस स्टॉपच्या ठिकाणी बस कधीच थांबत नाही...

पाणीटंचाईमुळे वीजनिर्मिती केंद्र पडणार बंद!

Last Updated: Wednesday, July 25, 2012, 09:43

पाणी टंचाईनं त्रस्त असलेल्या राज्यावर आता विजेचं संकट निर्माण झालंय. कोयनेपाठोपाठ परळी वीज केंद्र पडण्याची शक्यता निर्माण झालीय. केवळ आठ दिवस पुरेल एवढाच पाणी साठा शिल्लक असल्यानं परळी वीज निर्मिती केंद्र बंद पडण्याचं संकट ओढवलंय.

बँकेने ठोकलं शाळेला सील, विद्यार्थी शाळेबाहेर

Last Updated: Thursday, July 19, 2012, 22:36

नाशिकमधल्या दरी गावच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सध्या शाळेबाहेरच धडे गिरवावे लागतायत. कर्जाची परतफेड न झाल्यानं बँकेनं शाळेला सील ठोकलंय. बँक आणि शाळेच्या वादाची शिक्षा विद्यार्थ्यांना मिळतेय.

लॉजवर राहणार कॅमेऱ्याची नजर- आबा पाटील

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 12:33

राज्यात असणाऱ्या लॉजवर फार मोठ्या प्रमाणात अनेक अनैतिक गोष्टी घडत असतात. आणि यालाच पायबंद घालण्यासाठी आर. आर. पाटील यांनी काही उपाययोजना सुचविल्या आहेत.

सलमानची तब्येत बिघडली, नाही करणार अॅक्शन

Last Updated: Monday, June 25, 2012, 19:13

कोट्यवधी तरुणींच्या हृदयावर राज्य करणाऱ्या सलमान खानची तब्येत सध्या बिघडली आहे. तब्येत बिघडल्यामुळे सलमानला मारधाडचे सीन करण्यास मनाई करण्यात आली आहे. सलमानची न्युरोलॉजिकल समस्या पहिल्याच्या तुलनेत अधिक वाढल्याचे बोलले जात आहे.

पाणीप्रश्नावर राष्ट्रवादीची 'बंद'ची हाक

Last Updated: Tuesday, May 22, 2012, 13:29

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या सीना कोळेगाव प्रकल्पाचे पाणी सोलापूरला देण्याच्या निर्णयावरून पुन्हा एकदा संघर्ष पेटलाय. सोलापूरला एक टीमसी पाणी देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसनं परांडा तालुका बंदी हाक दिली आहे.

विलासरावांच्या लातुरात दुष्काळ

Last Updated: Thursday, May 17, 2012, 15:56

राज्याच्या इतर भागाप्रमाणे मराठवाड्याला दुष्काळाचा झळा बसतायेत. लातूर जिल्ह्यातल्या औसा तालुक्यात तर दुष्काळाची तीव्रता जरा जास्तच आहे. मात्र तिथल्या नेत्यांना दुष्काळाची फारशी चिंता असल्याचं दिसत नाही.

पाणीप्रश्नावर आंदोलन - अण्णा हजारे

Last Updated: Thursday, May 17, 2012, 10:24

राज्यातल्या पाणीप्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सराकारने योग्य कारवाई न केल्यास मोठं आंदोलन उभारलं जाईल अंसही अण्णा म्हणाले.

झी २४ तासमुळे डेंगनमाळमध्ये पाणी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 16:14

ठाणे जिल्ह्यातल्या शहापूर तालुक्यातील डेंगनमाळसह इतर गावातील पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे. डेंगनमाळमधील पाण्याच्या प्रश्नाची व्यथा झी 24 तासनं प्रथम मांडली होती. त्यानंतर जाग आलेल्या सरकारनं 5000 लीटरच्या पाण्याच्या दोन टाक्या गावात बसवल्यात.

'झी २४ तास'ची करणी, जत तालुक्याला पाणी

Last Updated: Saturday, May 12, 2012, 21:06

सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनचे पाणी दुष्काळी जत तालुक्याला देण्याऐवजी, हे पाणी तासगावला पळवल्याचे वृत्त 'झी २४ तास' वरून प्रसारित केल्यावर, म्हैसाळ उपसा जलसिंचन विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे.

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

Last Updated: Friday, May 11, 2012, 20:46

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

आर.आर.आबा, हे वागणं बरं नव्हं !

Last Updated: Thursday, May 10, 2012, 13:09

गृहमंत्री आर. आर. पाटला यांनी जतचे पाणी तासगावला पळवल्याने जत तालुक्यात दुष्काळाची तीव्र स्थिती निर्माण झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जतच्या सहाव्या टप्यातील मुख्य कालव्याचे काम पूर्ण असून हे पाणी मध्येच वळवल्याने हा भाग पाण्यापासून वंचित राहिला आहे.एक तर कायम दुष्काळी असा हा जत तालुका आहे, त्यातच जतचे पाणी पळवल्यानं येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.

पाण्यासाठी जीव गेला

Last Updated: Thursday, May 10, 2012, 09:22

राज्यात पाणी टंचाईनं आणखी एक जीव गेला आहे. नाशिक जिल्हात विहिरीवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या रखुबाई सोनावणे या पन्नास वर्षांच्या महिलेचा मृत्यू झालाय. मालेगाव वळवाडे गावात ही घटना घ़डली.

पाण्यासाठी पायपीट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 21:31

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

मुंबईत दोन दिवस पाणीकपात

Last Updated: Friday, May 4, 2012, 11:42

मुंबई शहरात दोन दिवस पाणी कपातीचे संकट आहे. त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरातील पाणीपुरवठ्यामध्ये विस्कळीतपणा होणार आहे. दि. ७ आणि ८ मे रोजी पाणी कपात करण्यात येणार आहे.

तहानलेले प्राणी, पुणेकर पाजतायत पाणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 20:57

अंगाची लाही-लाही करणाऱ्या उन्हाचा त्रास माणसांबरोबर प्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. कात्रजच्या जंगलात पाण्याचे स्त्रोत आटल्यानं प्राण्यांचीही परवड होतेय. या प्राण्यांना पाणी मिळावं, यासाठी पुणेकरांनीच पुढाकार घेतलाय.

पाण्याची तहान ठरली जीवघेणी

Last Updated: Monday, April 23, 2012, 18:13

वणवण करतांना ठाणे जिल्ह्यात घरासाठी पाण्याचे हंडे भरणाऱ्या पार्वती जाधव हिचा पाणी भरताना मृत्यू झाला आहे. विहिरीजवळच झालेल्या या मृत्यूने शासनाच्या टँकरने पाणीपुरवठा करणारी योजनेतील फोलपणा उघड झालाये

दूध भेसळीवर कारवाईचं मंत्र्यांचं अश्वासन

Last Updated: Thursday, April 19, 2012, 23:30

दुधात होत असलेल्या भेसळीचा पर्दाफाश झी 24 तासनं केल्यानंतर सरकारही आता या भेसळखोरांविरोधात कडक कारवाईचे पाऊल उचलणार आहे. तर दुसरीकडं दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधाला भाव कमी मिळत असल्याचा प्रश्नाही ऐरणीवर आलाय.

रेल्वेचा खोळंबा, विद्यार्थ्यांना फटका

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 16:05

कुर्ला येथे सिग्नल यंत्रणा कक्षाला आग लागल्याने विस्कळीत झालेल्या रेल्वे सेवेचा मुंबई विद्यापीठच्या विद्यार्थ्यांना फटका बसला. मात्र, याची दखल घेऊन विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी वेळ वाढवून देण्याची तयारी दर्शविली आहे. तर ज्यांची परीक्षा चुकली त्यांची नव्याने घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 14:10

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:13

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.

विदर्भात पाण्यासाठी वणवण

Last Updated: Tuesday, April 10, 2012, 13:11

वाढत्या पाऱ्यासोबतच विदर्भात पाण्यासाठीची वणवणही वाढीस लागली आहे. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात, पाणीप्रश्न गंभीर झालाय. एप्रिलमध्येच ही परिस्थिती असताना, संपूर्ण मे महिन्यात काय होणार, याची भीता साऱ्यांनाच वाटतेय.

कोल्हापूरकर 'गॅस'वर

Last Updated: Friday, March 30, 2012, 21:00

कोल्हापूर जिल्ह्यात घरगुती गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे. गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांच्या संपामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रीया उमटत आहेत.

Exclusive - रेल्वे बजेट- २०१२

Last Updated: Wednesday, March 14, 2012, 15:52

केंद्रीय रेल्वेमंत्री दिनेश त्रिवेदी यांचे हे पहिले रेल्वे बजेट आहे. आपल्या पहिल्या वहिल्या रेल्वे बजेटमध्ये त्रिवेदी सर्वसामान्य प्रवाशांना खूश करतात की निराश हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्रातील सात विभागात कोण कोणत्या मागण्या आहेत. याचा हा एक्स्ल्युझिव्ह आढावा...

रेल्वेचे सावत्र अपत्य 'हार्बर रेल्वे'

Last Updated: Sunday, March 11, 2012, 18:41

१६ मार्चला रेल्वे बजेट सादर होणार असल्याने सर्व मुंबईकराचं त्याकडे लक्ष लागून राहिलं आहे. समस्यांचा रेल्वे मार्ग म्हणून हार्बर रेल्वे मार्गाची ओळख आहे. रेल्वेचे सावत्र अपत्य असल्यासारखी वागणूक हार्बर रेल्वेला आणि पर्यायाने तिथल्या रेल्वे प्रवाशांना मिळत असल्याची टीका प्रवासी संघटना करत आल्या आहेत.

कल्याणवासियांना तबेल्यांचा त्रास

Last Updated: Thursday, January 5, 2012, 14:10

कल्याणमध्ये घाणीचं साम्राज्य दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. त्यातच भर म्हणजे कल्याण पूर्वेला असणारे गायी म्हशीचे असणारे तबेले यामुळे घाणीच्या साम्राजात वाढ होते आहे. पण त्यावर कोणत्याही प्रकारची उपाययोजना ही महानगरपालिकेकडून केली जात नाही.

मुंबईत २५% पाणी कपात

Last Updated: Thursday, January 5, 2012, 09:49

मुंबईकरांसाठी हा विकेंड पाणीकपातीचा असणार आहे. मध्य वैतरणा प्रकल्पाचे जलवाहिनी जोडण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं मुंबईच्या कुलाबा, मलबार हिल, भेंडीबाजार, नळबाजार, माझगाव, खार, माहीम, वरळी आणि दादर या भागात शुक्रवार, शनिवार आणि रविवारी २५ टक्के पाणीकपात होणार आहे.

मुंबई सीएसटीची सुरक्षा धोक्यात

Last Updated: Wednesday, November 30, 2011, 03:32

मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) स्थानकाची सुरक्षा पुन्हा धोक्यात आली आहे.

नागपूर विमानतळावर जिवंत काडतुसं!

Last Updated: Monday, November 7, 2011, 07:10

नागपूर विमानतळावर बांधकाम विभागाच्या एका अभियंत्याला ४३ जिवंत काडतुसाहसह अटक करण्यात आली आहे. कार्डो रिबा असं या अभियंत्याचं नाव असून तो अरुणाचल प्रदेशच्या बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत आहे.