Last Updated: Saturday, April 14, 2012, 08:28
परिवहन विभागाने १९ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून १ रुपयाची रिक्षाभाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे मुंबईत रिक्षाचे भाडे आता १२ रूपये झाले आहे. रिक्षाचालक संपावर गेले तर परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे. त्यामुळे रिक्षाचालकांचा संप होणार की नाही, याची चर्चा आहे.