राज्यावर पुन्हा अस्मानी संकट, जून अखेरपर्यंत पाऊस नाहीच

Last Updated: Monday, June 23, 2014, 19:18

राज्यावर पुन्हा एकदा अस्मानी संकट कोसळण्याची शक्यता आहे. मान्सून केवळ नावापुरताच दाखल झालाय. मात्र अजूनही म्हणावा तसा पाऊस बरसलेला नाहीय. जून अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता नाही, असं पुणे वेधशाळेनं सांगितलंय.

शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे, तर सत्ताधाऱ्यांचे दिल्लीकडे

Last Updated: Monday, June 23, 2014, 14:18

अवघ्या महाराष्ट्रात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागलेले आहेत.

यंदा कांदा रडवणार, करणार सेंच्युरी?

Last Updated: Thursday, June 19, 2014, 19:18

संपूर्ण राज्यात झालेल्या अवकाळी पावसानं कांद्याच्या येत्या हंगामात उत्पादन घटण्याची शक्यता आहे. परिणामी ऑक्टोबर महिन्यात कांदा दुपटीतीपटीनं महागण्याची शक्यता आहे.

वादळी पावसाचा तडाखा, चार जणांचा बळी

Last Updated: Friday, June 13, 2014, 12:20

जळगाव जिल्यात वादळी वा-यासह पाऊसाने हजेरी लावली खरी मात्र या वादळी पाऊसामुळे चार जण ठार झाले. तसच केळीच कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. ३५ ते ४० घराचंही नुकसान झालंय. तर औरंगाबाद जिल्ह्यात पावसाचे नुकसान झालेय.

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 21:22

मुंबई शहरात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. यामुळे उकाळ्याने त्रस्त झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोकणात मान्सून`इलो रे बा इलो`

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 20:37

कोकणात मृग नक्षत्राच्या पावसाने सलामी दिली आहे. दक्षिण कोकण आणि गोव्यात मान्सूनचं आगमन झालं आहे.

पुणे जिल्ह्यात वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचे नुकसान

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये पावसानं जोरदार हजेरी लावली. काल सकाळपासून नागरिक उकाड्यानं हैराण झाले होते. मात्र, पावसानं हजेरी लावल्यानं शहरवासी सुखावले. पावसामुळे चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

नाशिक जिल्ह्यात पावसाचा डाळिंब बागांना फटका

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 09:47

नाशिकमध्येही वादळी-वाऱ्यासह पाऊस पडला. तर गारपिटीमुळे शहरात सर्वत्र बर्फाच्छादीत काश्मीर अवतरलं. वादळी पावसाने नाशिक शहरात अंधाराच साम्राज्य पसरलं होतं.

पाऊस कमी झाला तरी पावसाचे पाणी मुंबईत साठणार

Last Updated: Sunday, May 18, 2014, 20:30

मुंबईत पाणी साठू नये यासाठी मुंबई महानगरपालिका पिपग स्टेशनसारख्या अनेक योजना जरी वापरत असली तरी मुंबईच्या रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठण्याची भीती पावसाळ्यात मुंबईकरांना सतावते. या वर्षीदेखील भरतीच्या वेळी 22 वेळा साडेचार मीटरहून अधिक उंचीच्या लाटा येणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

मान्सून वेळेवर डेरेदाखल होण्याचा अंदाज

Last Updated: Wednesday, May 14, 2014, 22:02

मान्सूनचं देशात तीन दिवसाआधी आगम होण्याची शक्यता आहे. मॉन्सून दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरात सर्वसाधारणपणे 20 मे रोजी दाखल होतो. यंदा तो तीन दिवस आधीच डेरेदाखल होण्याची चिन्हे दिसून आली आहेत.

पंजाबनंतर आता राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस

Last Updated: Tuesday, May 13, 2014, 20:14

पंजाबनंतर आता वायव्य राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. या अवकाळी पावसामुळे जनजीवनमान विस्कळित झाले आहे. छुरूमध्ये 43 मिमी पावसाची नोंद झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

`एल निनो`ने देशाची अर्थव्यवस्था कोसळणार

Last Updated: Sunday, May 11, 2014, 18:27

`एल निनो`ने देशात काळजीचं वातावरण तयार केलं आहे. २०१३ ते २०१४ या वर्षात `एल निनो`च्या कारणाने पावसाचे प्रमाण पाच टक्कयांनी कमी होण्याची भीती आहे. या कारणाने देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका बसेल. तसेच देशाची अर्थव्यवस्था १.७५ टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावर्षी देशात पावसाचं प्रमाण कमी होईल. यामुळे अन्नधान्याच्या तुटवडा जाणवेल तसेच महागाई वाढेल. असा अंदाज `असोचेम`च्या अहवालात वर्तवण्यात आला आहे.

रत्नागिरी - सिंधुदुर्गात वादळी पावसाचा तडाखा

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:44

रत्नागिरी जिल्ह्यातल्या काही भागाला आज सायंकाळी अवकाळी पावसानं झोडपून काढलं. विजांच्या गडगडाटासह रत्नागिरी संगमेश्वर आणि चिपळूण तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. तर संध्याकाळी परत पावसाने हजेरी लावत सिंधुदुर्ग जिल्ह्याला तडाखा दिला.

मुंबई उपनगरांसह पुणे कोकणात वादळी पाऊस, वाहतूक विस्कळीत

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:33

मुंबई उपनगरांसह पुणे आणि कोकणाला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. मुंबईकडे येणारी एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जुन्या हायवेवरील वाहतूकही विस्कळीत असून अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.

ओबामांच्या मुलींचा पाठलाग करणारा जेरबंद

Last Updated: Wednesday, May 7, 2014, 18:07

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या मुलींना घेऊन जाणाऱ्या कारचा पाठलाग केला गेल्यानंतर व्हाइट हाऊस सध्या बंद करण्यात आलंय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अति सुरक्षा असलेल्या परिसरात अधिकाऱ्यांनी पाठलाग करण्याऱ्या कारला रोखलं आणि कार चालकाला ताब्यात घेतलं.

कडक उन्हात घ्या थंडपेयांचा आसरा!

Last Updated: Tuesday, May 6, 2014, 07:51

गेल्या काही दिवसांत कडक उन्हाचा पारा खाली आला असला तरी अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीत. सततच्या तापमानातील चढउतारामुळे मानवी जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अफगाणिस्तानमध्ये मोठे भूस्खलन, 350 ठार

Last Updated: Saturday, May 3, 2014, 14:54

अफगाणिस्तानच्या ईशान्य भागात हाहाकार उडाला आहे. जोरदार पाऊस आणि डोंगर खचण्याचा प्रकार मोठ्याप्रमाणात झाल्याने शेकडो लोक मातीच्या ढिगाऱ्यात अडकून पडले आहेत. मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे सुमारे 350 नागरिक ठार झाले असून, दोन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहेत. दरम्यान, स्थानिक प्रशासन, संयुक्त राष्ट्र आणि नाटो सैन्याच्या मदतीने बचावकार्य सुरु आहे.

पुणे येथे दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टर उडवला, तीन मजूरांचा मृत्यू

Last Updated: Saturday, May 3, 2014, 15:57

सिकंदराबाद दुरांतो एक्स्प्रेसने ट्रॅक्टरला दिलेल्या धडकेत तीन मजूरांचा मृत्यू झालाय तर सात मजूर गंभीर जखमी झालेत. हा अपघाता सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास झाला. क्रॉसिंगवर मजुरांना घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला एक्स्प्रेसने धडक दिली.

लॅम्पमुळे होतोय खाजगी आयुष्यात अडचण

Last Updated: Wednesday, April 30, 2014, 13:29

सावधान! न्यूयॉर्कमधील कायल मॅकडोनाल्ड आणि ब्रायन हाऊस या दोघांनी आवाज रेकॉर्ड करणारा लॅम्प तयार केला आहे.

यंदा देशात सरासरीच्या कमी पाऊस - आयएमडी

Last Updated: Thursday, April 24, 2014, 22:08

यावर्षीच्या मान्सूनवर `एल निनो`चा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. त्याचा पावसावरती विपरीत परिणाम होण्याची चिन्हं असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय.

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

Last Updated: Sunday, April 20, 2014, 15:41

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

राज्यात पाऊस, वीज कोसळून 4 ठार

Last Updated: Saturday, April 19, 2014, 18:56

राज्यात वीज कोसळून चार जणांचा मृत्यू झालाय. बुलडाणा जिल्ह्यात साखरखेडा गावात वीज कोसळून एक जण ठार तर चार जण जखमी झालेत.

रत्नागिरीत अवकाळी पाऊसानं उडविली दाणादाण

Last Updated: Saturday, April 5, 2014, 07:22

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि दापोली तालुक्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावली. संगमेश्वर तालुक्यातील साखरपा, देवरुख भागातही अवकाळी पावसानं हजेरी लावली...

टीम इंडिया फायनलमध्ये, होणार पावसाची मदत

Last Updated: Friday, April 4, 2014, 10:36

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसऱ्या सेमी फायनल होणार आहे. मात्र जर शुक्रवारी पाऊस पडला, तर भारत फायनलमध्ये पोहोचेल. शुक्रवारी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

गारपीटग्रस्तांना मदत करण्यास अचडण - शरद पवार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 16:36

गारपीटग्रस्तांना मदत उपलब्ध करून देण्यालाच प्राधान्य असल्याचं कृषीमंत्री शरद पवारांनी सांगितलंय. मात्र मदत करण्यामध्ये मुख्य अडचण आचारसंहितेचीच असल्याचं त्यांनी म्हटलंय.

गारपिटीचा धोका टळणार, गारांचे रूपांतर पाण्यात शक्य..

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 14:19

राज्यात मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांत गारपिटीने प्रचंड नुकसान झाले. गारपिटीला भविष्यात तोंड देता येईल का, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र, ते आता शक्य आहे. गारांचे रूपांतर पाण्याच्या थेंबात करता येऊ शकणार आहे. तसे संशोधन विकसित करण्यात आले आहे.

गारपिटीनं लालेलाल डाळिंब कुजले... सडले

Last Updated: Saturday, March 15, 2014, 16:12

अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यातल्या डाळिंबांना मोठा फटका बसलाय. गारपिटीच्या तडाख्यानं डाळीबांना तडे गेल्यानं ते फेकून देण्याची वेळ शेतकरी आणि व्यापाऱ्यांवर आलीय.

`गारपीटग्रस्तांना मदतीपोटी पाच हजार कोटी द्या`

Last Updated: Friday, March 14, 2014, 21:21

राज्यातल्या गारपीटग्रस्तांच्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारनं केंद्राकडून पाच हजार कोटींच्या मदतीची मागणी केली आहेत. दरम्यान, गारपिटीग्रस्तांना तातडीनं मदत मिळावी यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कर्ज वसुलीस तत्काळ स्थगिती देण्यासाठी राज्यपालांनी यात लक्ष घालावं अशी मागणी केली.

धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.

गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ, मोदी विदर्भ दौऱ्यावर

Last Updated: Tuesday, March 11, 2014, 20:55

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी २० मार्चला विदर्भाच्या दौ-यावर जाणार आहे. मोदी वर्ध्यात पांढरकवडा इथं चाय पे चर्चा हा कार्यक्रम होणार आहे. लोकसभा निवडणुकीत गुंतलेल्या नेत्यांना आता कुठे खडबडून जाग आलीये. आता सर्वच पक्षांनी आपापल्या प्रचार सभा रद्द केल्या आणि सुरू झाली गारपीटग्रस्तांचे अश्रू पुसण्याची चढाओढ.

एलआयसीमध्ये नोकरीची संधी

Last Updated: Thursday, March 6, 2014, 14:05

एलआयसी हाऊसिंग फायन्सास लिमिटेडमध्ये आपल्याला नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. एलआयसीमध्ये १०० रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. एलआसीमध्ये सहाय्यक पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.

मराठा, विदर्भात वादळासह गारांचा पाऊस

Last Updated: Tuesday, March 4, 2014, 11:19

मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वा-यासह गारांचा पाऊस झाला. गहू, मका, ज्वारीसह रब्बी पिकांसह संत्रा, गहू, चणा सारख्या पिकांना मोठा फटका बसला बसलाय.

उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पावसाचे थैमान

Last Updated: Tuesday, February 25, 2014, 12:25

नाशिक जिल्ह्यानंतर जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा, मुक्ताईनगर, यावल, बोधवड तसंच रावेर तालुक्यात अवकाळी पावसानं रात्री थैमान घातलं. तर विदर्भात अतिवृष्टीचा फटका बसला आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पैशांचा पाऊस आणि लैंगिक शोषण

Last Updated: Wednesday, February 19, 2014, 16:10

रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीत पैशाचा पाऊस पाडण्याचं आमीष दाखवून गरजू, निराधार महिलांना जाळ्यात ओढणा-या टोळीचा पर्दाफाश झालाय.

मुंबई-उपनगरांत अवकाळी पावसाची हजेरी

Last Updated: Saturday, February 15, 2014, 13:04

वीकएन्डला मुंबई आणि उपनगरात अवकाळी पावसानं हजेरी लावलीय. त्यामुळे वातावरणात सुखद गारवा निर्माण झालाय. मुंबई आणि उपनगरात सध्या ढगाळ वातावरण आहे. बोरिवली, मालाड, वसई-विरार, भाईंदर, डहाणू तालुक्यातल्या बोर्डी परिसरातही पावसानं हजेरी लावलीय.

मुंबईसह उपनरांत पावसाच्या सरी

Last Updated: Friday, February 14, 2014, 08:42

मुंबई,ठाणे आणि नवी मुंबईत आज पहाटे अवकाळी पावसानं हजेरी लावली. मुंबईतल्या शहर भागातल्या परळ वरळीसह वांद्रे आणि बोरिवली भागात पावसाच्या सरी कोसळल्या.

मी शिवसेना सोडणार नाही - खासदार वाकचौरे

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 20:12

शिवसेना सोडून आपण काँग्रेसमध्ये जाणार नसल्याचं खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी स्पष्ट केलंय. शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे, अशी चर्चा होती.

कसं तुटलं शिवबंधन? वाकचौरे काँग्रेसच्या वाटेवर?

Last Updated: Tuesday, February 4, 2014, 19:35

शिर्डीचे शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एवढंच नव्हे तर आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देखील मिळणार आहे.

बोअरमध्ये पडलेल्या १८ महिन्याच्या चिमुरड्याची सुटका

Last Updated: Saturday, February 1, 2014, 11:00

`देव तारी, त्याला कोण मारी` या म्हणीचा प्रत्यय श्रीरामपूर तालुक्यातील नागरिकांना आला... इथल्या खैरी निमगाव शिवारातील एका बोअरवेलमध्ये अडकलेल्या चिमुरड्याला सुखरूपणे बाहेर काढण्यात स्थानिक प्रशासनाला यश आलंय.

हिरव्या पावसाच्या चौकशी, तीन दिवसांत अहवाल

Last Updated: Thursday, January 23, 2014, 11:27

दोन दिवसांपूर्वी संपूर्ण राज्यात अचानक पडलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. तर डोंबिवलीत चक्क हिरवा पाऊस पडला. डोंबिवलीतील एमआयडीसी परिसरात मंगळवारी झालेल्या हिरव्या पावसाच्या चौकशीसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष पथकाची नियुक्ती केली आहे.

राज्यात अनेक भागात पाऊस

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 20:51

गेल्या काही दिवसांपासून राज्यात जाणवणारा थंडीचा कडाका अचानक कमी झालाय.आज सकाळी राज्याच्या अनेक भागात पाऊस झाला. यामुळे किमान तापमनामध्ये सरासरीच्या तुलनेत वाढ झाल्याचं चित्र आहे.

डोंबिवलीत केमिकल लोचा, हिरव्या पावसाने डोंबिवलीकर अवाक

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 19:55

डोंबिवलीच्या एमआयडीसी फेज १ भागात आज हिरवा पाऊस पडला, हा पाऊस पडून गेल्यानंतरही हिरव्या रंगाचे अवशेष जमिनीवर दिसून येत होते.

मुंबईत पावसाचा शिडकावा

Last Updated: Tuesday, January 21, 2014, 10:20

मुंबईत गेली दोन ते तीन दिवस थंडी होती. मात्र, आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील थंडी गायब झाली आहे.

... जेव्हा निवृत्त पोलीस निरीक्षकच अंधश्रद्धेच्या आहारी जातात

Last Updated: Monday, January 20, 2014, 09:21

उस्मानाबादमध्ये काळ्या जादूसाठी खोदकाम करण्याप्रकरणी बार्शीचे निवृत्त पोलीस निरीक्षक भाऊसाहेब आंधळकर आणि त्यांच्या मुलासह ६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसार हा गुन्हा दाखल झालाय.

गरीब 'दगडू' आणि अल्लड 'प्राजक्ता'चं प्रेम ५ कोटींवर

Last Updated: Sunday, January 5, 2014, 13:57

दगडू आणि प्राजक्ताच्या केमेस्ट्रीने प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. यामुळे टाईमपासवर टीका करणाऱ्या चित्रपट विश्लेषकांना हा केमिकल लोचा असल्याचं म्हणून समाधान मानावं लागेल.

नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण हाऊसफुल्ल

Last Updated: Tuesday, December 31, 2013, 08:11

कोकणचा सौंदर्य प्रत्येकाला खुणावतोच. निळा क्षार समुद्र किनारा आणि इथलं सौदर्य अनेक पर्यटकांना आकर्षित करतं. त्यामुळेच यावर्षी नववर्षाचं स्वागत कोकणात करावं याच बेताने. सध्या कोकण पर्यटकांनी हाऊसफुल झालय. एमटीडीसीची सर्व रिसॉर्ट आणि हॉटेल्सची आरक्षण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत फुल्ल झालीयेत.

दिल्ली पुन्हा गँग रेपने हादरली

Last Updated: Wednesday, December 11, 2013, 15:47

दिल्लीतील उच्चभ्रू आणि मध्यवर्ती भाग असलेल्या कॅनॉट प्लेस या भागात आठ डिसेंबर रोजी एका अल्पवयीन मुलीवर चार नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. अत्याचारानंतर नराधम पीडितेला पार्किंग लॉटमध्ये टाकून फरार झाले.

ऊस दरवाढीसाठी कायदा करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

Last Updated: Wednesday, December 4, 2013, 21:50

ऊस दरावरून दरवर्षी होणारे आंदोलन लक्षात घेऊन आता ऊस दर ठरवण्यासाठी कायदा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय आहे. यापुढे ऊसाला कारखान्याच्या उत्पन्नाच्या आधारावर दर देण्यात येणार आहे.

ऋतूचक्राचा केमिकल लोचा, गुलाबी थंडी गेली कुठे?

Last Updated: Monday, December 2, 2013, 22:19

डिसेंबर महिना म्हणजे गुलाबी थंडी… पण हा अनुभव यंदा मात्र खोटा ठरलाय... राज्यभरात गारठ्याचा पत्ता नाही, उलट सूर्य आग ओकत असल्याचंच चित्र आहे... त्यामुळं नक्की कोणता ऋतू सुरू आहे. असा प्रश्न पडला असतानाच या कनफ्युजनमध्ये आणखी भर टाकलीय ती पावसानं.

उसाला २६५० रुपये पहिली उचल घ्यायला मान्यता

Last Updated: Friday, November 29, 2013, 19:49

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी यांनी एक पाऊल पाठिमागं घेत २६५० रुपये उसाला पहिली उचल घ्यायला मान्यता दिली असली तरी कोल्हापुरात सकाळपासून ठिकठिकाणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी हिंसक आंदोलन केलं.

ऊस आंदोलन पेटले, कराड-चिपळूण मार्ग रोखला

Last Updated: Thursday, November 28, 2013, 11:24

ऊस दरासाठी आंदोलकांनी अनेक ठिकाणी दुधाचे टँकर अडवले गेले आहेत. त्यामुळे दूध संकलनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कराड - चिपळूण रस्त्यावर तांबवे फाट्यावर रास्तारोको करण्यात आल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. कराडबंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

ऊस दराचं गुऱ्हाळही पोहचलं दिल्लीत, उत्तर नाहीच!

Last Updated: Tuesday, November 26, 2013, 23:32

ऊस दराच्या मुद्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळानं आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतली.

ऊसाची भरपाई छातीवर बसून काढून घेऊ - राजू शेट्टी

Last Updated: Friday, November 8, 2013, 22:50

यावर्षी ऊसाला पहिली उचल ३ हजार रुपये विनाकपात मिळाली पाहिजे, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केलीय. अन्यथा छातीवर बसून भरवाई घेऊ, असा इशारा देत शेतकरी संघटनेनं यासाठी राज्य सरकारला १५ नोव्हेंबरपर्यंत मुदत दिलीय. मागणी मान्य न झाल्यास १५ नोव्हेंबरपासून कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी आंदोलनाचा इशारला शेट्टी यांनी दिलाय.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी `काळी दिवाळी`?

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 18:33

देशात दिवाळीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असताना ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र काळी दिवाळी साजरी करण्याची वेळ आलीय.

बेबोला लंडनमध्ये मिळालं ‘सोनेरी मानपत्र’!

Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:23

बॉलिवूड सूपरस्टार करिना कपूरचा ब्रिटनच्या ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये गौरव करण्यात आलाय. एशिया सनडे न्यूजपेपर या वर्तमानपत्राच्यावतीनं भारतीय वंशाचे मेंबर ऑफ पार्लमेंट किथ वाझ यांच्या हस्ते बेबोला सोनेरी मानपत्र प्रदान करण्यात आलं.

धो धो पावसामुळे कटक वन डे सामना रद्द

Last Updated: Friday, October 25, 2013, 23:35

तेलंगणा क्षेत्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं तिथं गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय. पुढच्या दोन दिवसांत पावसाचा वेग आणखी वाढेल, असा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे.

८० रूपयांत भिंत? मात्र, अधिकाऱ्यांनी ते शक्य केलंय!

Last Updated: Wednesday, October 23, 2013, 15:26

सरकारी अधिकारी किती निगरगट्ट असू शकतात, याचा जिवंत अनुभव वर्ध्यातील एका शेतक-याला आलाय... मुसळधार पावसामुळं या शेतक-याच्या घराची भिंतच वाहून गेली. सरकारकडून त्यासाठी नुकसान भरपाईही मिळाली... किती? ८० रूपये फक्त...

शनी, गुरू या ग्रहांवर हिऱ्यांचा पाऊस

Last Updated: Tuesday, October 15, 2013, 14:58

तुम्ही गारांचा पाऊस, अॅसिड रेन, लाल पाऊस, पिवळा पाऊस पाहिला असेल किंवा ऐकला असेल. मात्र, आता ग्रहांवर पाऊस पडणार आहे. तोही गारांचा नाही तर चक्क हिऱ्यांचा असणार आहे. हिऱ्यांच्या पावसाचा दावा अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी केला आहे.

भारत X ऑस्ट्रेलिया : मॅचवर पावसाचं सावट

Last Updated: Thursday, October 10, 2013, 12:04

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान आज राजकोट इथ होणाऱ्या एकमेव टी-२० मॅचवर पावसाचं सावट कायम आहे. राजकोटमध्ये आगामी २४ तासांमध्ये पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलीय.

पावसाचा कोकण-बुलडाणा जिल्ह्याला तडाखा, एकाचा बळी

Last Updated: Saturday, October 5, 2013, 13:26

परतीच्या पावसाने राज्यात धुमाकूळ घातला आहे. रत्नगिरी जिल्ह्यीतील खेड तालुक्यात या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे पावसाने बुलडाणा जिल्ह्यात हाहाकार माजवला आहे.

व्हाईट हाऊसजवळ थरार, फायरिंग करून कारमधील महिलेला टिपले

Last Updated: Friday, October 4, 2013, 12:04

हॉलिवूड चित्रपटातील थरार पाहावा, अशी घटना प्रत्यक्ष रस्त्यावर घडली. व्हाईट हाऊसपासून कॅपिटल हिलकडे जाणाऱ्या रस्त्यावर पोलिसांनी फायरिंग करून कार रोखली नाही तर एका महिलेलाही टिपले. त्यामुळे व्हाईट हाऊसजवळ भीतीचा गोळा नागरिकांच्या पोटात उठला.

मुंबईत चार मजली इमारत कोसळली, ५० जण अडकल्याची भीती

Last Updated: Friday, September 27, 2013, 15:25

मुंबईतील डॉकयार्ड रोड स्टेशनजवळ आज सकाळी ५.४५ वाजता चार मजली इमारत कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली ५० ते ६०जण दबल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

पावसाचा जोर तीन दिवस राहणार, मच्छिमारांना इशारा

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 12:45

सप्टेंबरमध्ये परतीच्या पावसाला सुरुवात होते. उत्तर भारतातून तशी सुरुवातही झाली होती. मात्र पूर्व भारतात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरात पाऊस, पश्चिम- मध्य रेल्वे उशिरा

Last Updated: Thursday, September 19, 2013, 09:13

मुंबई आणि उपनगरांना पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह रात्रभर पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वेला बसला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या गाड्या १० ते १५ मिनिटांनी उशिराने धावत आहेत.

उन्हाळी कांद्याला सोन्याचा भाव!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 11:35

उन्हाळी कांद्याची घटत चाललेली आवक आणि पावसामुळं लाल कांद्याचं बाजारात लांबलेलं आगमन यात सापडलेल्या घाऊक बाजारात उन्हाळी कांद्याचे भाव चढेच आहेत.

नागपूर-मुंबई रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated: Monday, September 16, 2013, 10:54

अकोल्याजवळील पारस इथं रेल्वे रुळ खचल्यानं नागपूर-मुंबई मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. जोरदार पावसामुळं रुळ खचलाय. त्यामुळं नागपूरकडे जाणाऱ्या गाड्या विस्कळीत झाल्या असून एकाच रुळावरून वाहतूक सुरू आहे.

चला गणपती गावाकडं चला...

Last Updated: Sunday, September 8, 2013, 11:15

गणेशोत्सव आणि चाकरमानी यांच्यामध्ये एक अतूट असं नातं आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखोंच्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असतात. दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं चाकरमानी कोकणात दाखल होत असल्यानं कोकण गजबजून गेलाय.

विघ्नहर्त्याच्या मूर्तीकामात वरुणदेवाचं `विघ्न`!

Last Updated: Sunday, September 1, 2013, 20:19

सतत कोसळणाऱ्या पावसाने गणेश मूर्तीच्या निर्मितीला अडथळे येत असल्याने नागपूरच्या मुर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

नाच रे मोरा...

Last Updated: Sunday, August 18, 2013, 21:41

पावसाच्या सरींनी शेतीशिवारात सगळीकडे आनंद पसरलाय... मोरही अशा वातावरणात नृत्य करुन आनंदोत्सव साजरा करतायत...

चंद्रपुरात पावसाचा पुन्हा धुमाकूळ

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:31

आठवडाभर विश्रांती घेतलेल्या पावसानं चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एकदा धुमाकूळ सुरु केलाय. मध्यरात्रीपासून विजांच्या कडकडाटासह कोसळत असलेल्या पावसानं जिल्ह्याला झोडपून काढलं आहे.

गैरव्यवहारांमुळे गृहनिर्माण संस्था होणार बंद?

Last Updated: Thursday, August 15, 2013, 17:58

दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड...1960 पासून राज्यातील 35 जिल्हा कार्यालयांमार्फत घरबांधणीसाठी गृहनिर्माण संस्था आणि वैयक्तिक सभासदांना कर्जपुरवठा करणारी सहकार क्षेत्रातील एकमेव संस्था. एकेकाळी सहकारातील नावाजलेली ही संस्था संचालक मंडळाच्या गैरव्यवहारांमुळे आणि धोरणांमुळे शेवटचे आचके देतंय.

कर्जवसुलीत गेलं मल्ल्यांचं `किंगफिशर हाऊस`!

Last Updated: Tuesday, August 13, 2013, 13:51

किंगफिशर एअरलाइन्सच्या विमानांनी कायमचं लॅन्डींग केलं असताना या कंपनीकडे असलेल्या ६,०७२ कोटी रुपयांच्या थकीत कर्जवसुलीसाठी मुंबई विमानतळावर असलेलं ‘किंगफिशर हाऊस’ बँकांनी आपल्या ताब्यात घेतलंय.

सेनेचं टार्गेट पुन्हा एकदा `पाक कलाकार`

Last Updated: Thursday, August 8, 2013, 14:35

आता शिवसेनेचा मोर्चा पुन्हा एकदा पाकिस्तान कलाकारांकडे वळला आहे. ‘पाक कलाकारांना घ्याल तर याद राखा’ असा इशारा शिवसेनेच्या चित्रपट सेनेनं दिलाय.

पाऊस थांबवण्यासाठी देवीला गाऱ्हाणं

Last Updated: Sunday, August 4, 2013, 19:09

एरवी पाऊस पडत नाही म्हणून देवाला साकडं घालतात. आता गोंदिया जिल्ह्यातल्या शेतक-यांनी चक्क पाऊस थांबवण्यासाठी देवीला साकडं घातलंय.

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पूराची परिस्थिती कायम

Last Updated: Saturday, August 3, 2013, 19:08

चंद्रपूर जिल्ह्यात पूराची परिस्थिती कायम आहे. मात्र या पूरपरिस्थितीला पाऊस कारणीभूत नाही. वर्धा , पैनगंगा आणि वैनगंगा या नद्यांना आलेला पूर आणि त्यांच्या दबावामुळे इरई नदीचं बॅक वॉटर शहरात घुसल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

ऊस दराचा तिढा सुटणार!

Last Updated: Saturday, August 3, 2013, 16:59

राज्यात दरवर्षी निर्माण होणारा ऊसदराचा तिढा सोडवण्यासाठी रंगराजन समितीच्या शिफारशीनुसार ऊस नियंत्रण मंडळाची स्थापना केली जाणार आहे. ऊस, साखर, गाळप हंगाम, नैसर्गिक परिस्थितीचा आढावा घेण्याचे कामही हे मंडळ बघणार आहे. ऊस दरावरील तोडग्याबरोबरच शेतकरी संघटनेची ऊर्जा कमी करण्याचा प्रयत्नही या निर्णयातून होणार आहे.

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

Last Updated: Friday, August 2, 2013, 19:00

मुंबईबरोबरच किनाऱ्यालगत असणाऱ्या कोकण भागात आणि महाराष्ट्रातील उत्तर भागात येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने आज वर्तवला आहे. ओरिसाच्या किनारपट्टीवरील मान्सूनचा दबाव वाढल्यामुळे आणि तो पश्चिमेकडे सरकत असल्यामुळे हवामानात हा बदल झाला आहे.

रायगड, ठाण्यात नद्यांना पूर

Last Updated: Friday, August 2, 2013, 13:04

रायगडमध्ये रात्रीपासून पावसाचा जोर वाढलाय. सावित्री, गांधारी नद्यांना पूर आला असून महाड शहरात पाणी शिरण्यास सुरुवात झालीय. सुकटगल्ली, मच्छिमार्केट, दस्तुरी नाका, गांधारी पुलावर पाणी आलंय.

राज्यात पावसाचं धुमशान, पुराचा तडाखा

Last Updated: Friday, August 2, 2013, 12:27

राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. कोकणातील महाडमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. नाशिकमधील गोदावरी नदीला पूर आला असून चंद्रपूर जलमय झाले आहे. तर जळगावात पुरामुळं शेतीचं नुकसान झाले आहे. ८ दिवसांनंतर सुरू झालेला माळशेज घाट पुन्हा बंद झालाय.

बाटला हाऊस एन्काऊंटर : शहजाद अहमदला जन्मठेप!

Last Updated: Tuesday, July 30, 2013, 18:09

२००८ मध्ये झालेल्या बाटला हाऊस प्रकरणात एकमेव दोषी असणारा इंडियन मुजाहिदीन मधला शहजाद अहमद याला आज जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि इस्पेक्टर मोहन चंद शर्मा यांना न्याय मिळाला.

ओबामांची व्हाइट हाउसमध्ये रंगली इफ्तार पार्टी

Last Updated: Saturday, July 27, 2013, 10:25

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी व्हाईट हाऊसमध्ये इफ्तार पार्टी आयोजित केली होती. निमित्त होते ते रमजानचे. यावेळी खास पाहुण्यांचे स्वागत ओबामा यांनी केले.

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

कोयना, वारणा परिसरातील गावांना धोका

Last Updated: Friday, July 26, 2013, 09:05

राज्यातल्या वेगवेगळ्या भागात पावसाचा जोर कायम आहे. कोयना आणि वारणा धऱणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पातळीत वाढ झालीय. सांगलीत आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी ३४ फुटांवर गेलीय.

रायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:56

रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.

बाटला हाऊस प्रकरणात शहझाद दोषी

Last Updated: Thursday, July 25, 2013, 16:46

2008 साली झालेल्या दिल्लीतल्या बाटला हाऊस प्रकरणाचा आज निकाल लागण्याची शक्यता आहे.

बुलडाण्यात दोघांचा मृत्यू, चंद्रपुरात पूर

Last Updated: Thursday, July 25, 2013, 14:21

बुलडाण्यात अतिवृष्टीमुळे आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालाय.. लोणार तालुक्यातल्या गुंदा धरणावर मासेमारीसाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात वाहून मृत्यू झालाय. तर चंद्रपुरात नद्यांना पूर आलाय. दहा दिवसांपासून कोसळतच आहे.

कोकणात भरती... जळगावात पावसाचे आकडे वरती

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 18:44

सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवबागमधल्या माडबागायतीसह सुमारे १० घरांना आजच्या हायटाईडचा फटका बसलाय. समुद्राचं पाणी थेट घरांमध्ये घुसलंय.

कोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 14:11

कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.

ठाण्यात पावसाचा बळी, २५ गावांचा संपर्क तुटला

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 13:59

ठाण्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. जिल्ह्यात पावसाचा एक बळी गेलाय तर पुरामुळे २० ते २५ गावांचा संपर्क तुटलाय. ट्रॅफिक जाम ठाण्यात झालंय. मुंब्रा बायपास रस्ता खचलाय. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालीय. ठाणे, कल्याण, डोंबिवलीत संततधार सुरु आहे.

मुंबईत ट्राफिक जॅम, कोठे तुंबलय पाणी?

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 16:31

गेल्या दोन दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसानं मुंबईची घडी विस्कटून टाकलीय. शहर आणि उपनगरात बरसणा-या पावसामुळं हिंदमाता, परेल, दादर टीटी, गांधीमार्केट, सायन रोड नंबर 24, महेश्वरी उद्यान भागात पाणी साचलंय.

मुंबई जलमय, वाहतुकीची कोंडी

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 16:58

मुंबईसह संपूर्ण राज्यात सलग दुसऱ्या पावसाने धुमाकुळ घातलाय. मुंबई आणि उपनगरात पाणीच पाणी रस्त्यावर दिसत आहे. पावसाचा फटका पश्चिम रेल्वेला बसलाय. त्यामुळे मुंबई लोकल आणि फास्ट लेट झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. कोसळणा-या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मध्य आणि हार्बरवरील गाड्या वेळेवर धावत आहेत.

मराठवाड्यावर वरुणराजा रुसलेलाच!

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:24

राज्यात सगळीकडेच पावसानं थैमान घातलं असताना मराठवाडा अजूनही कोरडाच आहे. मराठवाड्यात अजूनही पुरेसा पाऊस पडलाच नाही.

`मुंबईकरांनो गरज असली तरच घराबाहेर पडा`

Last Updated: Wednesday, July 24, 2013, 10:03

मुंबई आणि उपनगरात रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरुच आहे. पावसाचा जोर कायम असला तरी कोणत्याही भागात पाणी साचलं नसल्याचा दावा मुंबई महापालिकेनं केलाय.

महाराष्ट्रभरात वरूणराजा असाच बरसत राहाणार!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:51

गेल्या काही दिवसांपासून वरूणराजानं राज्यावर कृपादृष्टी दाखवलीय. आणी येत्या काही दिवसांत वरूणराजा असाच बरसणार असल्याची शक्यता वेधशाळेनं वर्तवली.

पावसामुळे मुंबापुरीला ब्रेक !

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 19:16

मुंबई दिवसभर मुसळधार पावसाचा फटका सेंट्रल,वेस्टर्न आणि हार्बर अशा तिन्ही लोकल लाईन्सला बसला...त्यामुळे लोकलने प्रवास करणा-यांचे चांगलेच हाल झाले...दिवसभर पावसाने जराही उसंत न घेतल्यामुळे रस्ते वाहतूकीवरही त्याचा परिणाम झाला.

कोकणात धुव्वाधार, रेल्वे वाहतूक विस्कळीत

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 17:39

कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस कोसळत आहे. दोन्ही जिल्ह्यातील प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. रत्नागिरीत खेड,चिपळूण, राजापूर आणि संगमेश्वर येथील नद्यांना पूर आलायं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय.

पाऊस : गडचिरोली अंधारात; धरणांतून विसर्ग!

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:29

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पावसानं एकच धुमाकूळ घातलाय. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा-विदर्भ या भागांतही पाऊस मनसोक्तपणे कोसळतोय. पाहुयात महाराष्ट्रातील विविध भागांतील सध्याची पावसाची स्थितीवर एक नजर टाकुयात...

मुंबई मुसळधार, हार्बर रेल्वे बंद

Last Updated: Tuesday, July 23, 2013, 16:11

मुंबई काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीबरोबरच रस्ता वाहतुकीला बसला आहे. चुनाभट्टी ते कुर्ला दरम्यान मार्गावर पाणी साचल्याने हार्बरची वाहतूक बंद पडलेय. तर मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या गाड्या उशिराने धावत आहेत. तर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने ट्राफिक जामचा सामना सहन करावा लागत.