Last Updated: Tuesday, November 27, 2012, 10:38
२६-११ दहशतवादी हल्ल्यानं मुंबईच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. सुमारे ८० तास दहशतवादी मुंबईला वेठीस धरुन होते. हा हल्ला इतका भीषण होता की, मुंबई पोलीसही हतबल झाले होते. दहशतवाद्यांना संपवण्यासाठी एनएसजीला पाचारण करावं लागलं. या हल्ल्यानंतर सुरक्षेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मात्र आज तरी मुंबईनगरी पूर्णपणे सुरक्षित आहे का, हा प्रश्नच आहे.