Last Updated: Tuesday, March 20, 2012, 08:55
आपल्या अफलातून खेळीच्या जोरावर टीम इंडियात अढळ स्थान मिळवणारा विराट कोहली हा भारतीय फॅन्सच्या गळ्यातील ताईत बनला आहे. मीरपूरमध्ये झालेल्या पाकिस्तानविरूद्ध अटीतटीच्या मॅचमध्ये तर आपल्या विस्फोटक सेंच्युरीमुळे विराट प्रतिस्पर्ध्यांकरता डोकेदुखी आणि टीम इंडियासाठी संकटमोचक ठरलाय आहे. त्याच्या याच अफाट खेळीमुळे भारताच्या एशिया कपची फायनल गाठण्याच्या आशा जिवंत आहेत.