मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय

Last Updated: Saturday, June 21, 2014, 20:39

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सध्यातरी अभय मिळाल्याचं वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभर दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या समर्थकांनी अनेकाच्या गाठीभेटी घेतल्या.

मी राजीनामा देण्यास तयार, पण... - मुख्यमंत्री चव्हाण

Last Updated: Friday, June 20, 2014, 15:35

राज्यात मुख्यमंत्री बदलाचे वारे वाहत आहेत. मात्र, आज मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा चेंडू टोलावलाय. त्यांनी हाय कमांडच्या कोर्टात हा चेंडू टोलावला. मी आजपर्यंत चांगले निर्णय घेतले. आधीच्या सीएमपेक्षा जास्त निर्णय घेतले, अशी माहिती मुख्यमंत्री चव्हाण यांनी दिली.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह काँग्रेस प्रदेशाध्यक्षही बदलणार

Last Updated: Thursday, June 19, 2014, 22:25

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना बदलण्याचा निर्णय येत्या सोमवारनंतर अपेक्षित आहे, अशी माहिती काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. पृथ्वीराज चव्हाण यांच्या जागी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची निवड केली जाणार असल्याचं समजतं.

कोण आहेत मालमत्ता जाहीर न करणारे मंत्री?

Last Updated: Tuesday, June 17, 2014, 19:19

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तीन-तीनदा आदेश देऊनही, आघाडी सरकारमधील 42 पैकी 18 मंत्र्यांनी अजून आपली मालमत्ता जाहीर केलेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला या मंत्र्यांनी चक्क केराची टोपली दाखवलीय. आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांचं किती वजन आहे, हेच यावरून स्पष्ट दिसतंय...

घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली नव्या मेट्रो मार्गाची घोषणा

Last Updated: Saturday, June 14, 2014, 12:48

आज राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळं सरकारकडून घोषणांचा पाऊस पडतोय. वर्सोवा ते घाटकोपर मेट्रो सुरू झाल्यानंतर आता आज मुख्यमंत्र्यांनी नव्या मेट्रो मार्गाची विधानसभेत घोषणा केलीय. घाटकोपर ते ठाणे-कासारवडवली-घोडबंदर रोड या मार्गाची घोषणा करण्यात आलीय.

मुंबई `मेट्रोसिटी` झाली हो, चला प्रवास करूया मेट्रोचा

Last Updated: Sunday, June 8, 2014, 11:33

`गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया`, असा विघ्नहर्त्याचा गजर सकाळी १०च्या मुहूर्तावर वर्सोवा स्टेशनात झाला आणि पुढच्या काही मिनिटांतच पहिली मेट्रो घाटकोपरच्या दिशेनं सुटली.

‘मेट्रो’ मुंबईची नवी लाईफलाईन आजपासून मुंबईकरांच्या सेवेला

Last Updated: Sunday, June 8, 2014, 09:51

मुंबईत मेट्रो धावणार.. धावणार असं गेले अनेक वर्षापासून बोललं जातंय.. अखेर ते स्वप्न साकार होतंय.. अवघ्या काळी वेळातच मुंबई मेट्रो सुरू होतेय. मेट्रोच्या उदघाटनाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जाणार आहेत. एमएमआरडीएनं मुख्यमंत्र्यांना अधिकृत निमंत्रण पाठवंलय. याच मुद्यावरुन भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा ही साधलाय.

नारायण राणे यांचे मन वळवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न

Last Updated: Thursday, June 5, 2014, 23:06

राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असलेले आणि काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या नारायण राणे यांचे मन वळवण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाने सुरू केला आहे. यासाठी स्वतः मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी नारायण राणेंशी दीड तास चर्चा केल्याचं समजतं.

मुख्यमंत्री राजीनामा द्या, राज्यात मागणी

Last Updated: Sunday, May 18, 2014, 18:55

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आता वाढता रोष समोर येतोय... पराभवाची जबाबदारी स्वीकारत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी पुणे काँग्रेसच्या पदाधिका-यांनी केलीय..

दारूण पराभवानंतर आता मुख्यमंत्री काँग्रेसच्याच ‘टार्गेट’वर!

Last Updated: Sunday, May 18, 2014, 15:36

काँग्रेसची यंग ब्रिगेडही मुख्यमंत्र्यांच्या विरोधात उतरलीय. पुण्यातील काँग्रेसचे उमेदवारल विश्वजित कदम यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पराभव स्वीकारून राजीनामा देण्याची मागणी केलीय.

वेगळ्या विदर्भासाठी मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात गोंधळ

Last Updated: Saturday, February 22, 2014, 19:28

वेगळ्या विदर्भाच्या मागणी करत पुन्हा एकदा आंदोलन सुरु झाले असतानाच आज मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात देखील विदर्भवाद्यांनी गोंधळ घातला. यावेळी उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी केली.

राज ठाकरे काय बोलले पत्रकार परिषद

Last Updated: Thursday, February 13, 2014, 17:37

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली. या बैठकीतील माहिती देण्यासाठी राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर पत्रकार परिषद घेतली.

राज्यातील हे २५ टोलनाके बंद होणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 13:28

खासगीकरणांतर्गत दुपदरी करणाच्या प्रकल्पांची प्रादेशिक विभाग निहाय मार्गावरील राज्यातील आणि एमएसआरडीसीसह राष्ट्रीय महामार्गावरील (नॅशनल हायवे) एकूण २५ टोलनाके बंद होणार आहेत.

राज आणि बाबांमध्ये या मुद्यांवर ‘चर्चा झालीच’

Last Updated: Thursday, February 13, 2014, 12:59

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात आज सकाळी सह्याद्री अतिथीगृहावर टोलनाक्यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा झाली.

राज चर्चेचे फलित : राज्यातील २५ टोलनाके बंद होणार

Last Updated: Thursday, February 13, 2014, 13:38

राज्यातील ज्या मार्गावर रस्ते प्रकल्पांचा खर्च १० कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. अशा रस्त्यांवर सुरू असलेले जवळपास २५ टोलनाके लवकरच बंद करण्यात येईल, असा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे.

टोल धोरणात बदल करण्याची मुख्यमंत्र्यांची तयारी

Last Updated: Thursday, February 13, 2014, 10:26

सह्याद्री अतिथीगृहावर टोल प्रश्नावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा झाली. यावेळी रस्त्यांबाबतची दाहकता दाखवून दिली. त्यानंतर टोल धोरणात बदल करण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दाखवली.

राज ठाकरे - मुख्यमंत्री चव्हाण यांच्यात आज चर्चा

Last Updated: Thursday, February 13, 2014, 08:22

टोल प्रश्नावर आज सकाळी नऊ वाजता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करणार आहेत. काही मोजक्या संपादकांसह ही चर्चा होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेत टोलप्रश्नावर काय तोडगा निघतो का याकडे लक्ष लागलंय. ज्या टोल नाक्यांवर टोल वसुली पूर्ण झालीय ते टोल नाके सरकार बंद करणार का तसंच टोल धोरणासंदर्भात काय निर्णय होतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

शिवाजी महाराजांचे समुद्रातील स्मारकासाठी १०० कोटींची तरतूद

Last Updated: Wednesday, February 5, 2014, 20:05

राज्य मंत्रिमंडळाने आज काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मंत्रिमंडळाने हा एक बंपर धमाका केलाय. निवडणुकीच्या तोंडावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे घोषणांचा पाऊस झालाय. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची टोकन म्हणून तरतूद करण्यात आलीय. गिरगाव चौपाटीपासून साडे किलोमीटरवर अरबी समुद्रात १६ हेक्टरची जागा निश्चित करण्यात आलीय.

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन; निरुपमांचे उपोषण मागे

Last Updated: Monday, January 27, 2014, 14:41

काँग्रेस खासदार संजय निरुपम यांनी मुंबईतल्या वीज दराच्या कपातीच्या मुद्यावर सुरु असलेलं उपोषण अखेर मागे घेतलंय. मुख्यमंत्र्यांनी वीज दर कपातीबाबत आश्वासन दिल्यानंतर निरुपम यांनी आपलं उपोषण मागे घेतलंय.

काँग्रेसला राष्ट्रवादीचा निर्वाणीचा इशारा...तर सरकारमधून बाहेर पडू

Last Updated: Wednesday, January 8, 2014, 21:00

राज्य सरकारच्या संथ कारभारावर उपमुख्यमंत्री अजित पवार संतप्त झालेत. आधी सुधारणा करा नाहीतर आम्ही सरकारमधून बाहेर पडू असा गंभीर इशारा अजित पवार यांनी काँग्रेसला दिला आहे.

आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांचा - अजित पवार

Last Updated: Thursday, December 26, 2013, 13:36

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या अहवालावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत जुंपली आहे. आदर्श अहवाल फेटाळण्याचा निर्णय़ मुख्यमंत्र्यांचा होता, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केला आहे.

आदर्श अहवालाचे आमदारांनी केलेत तुकडे, विरोधक न्यायालयात जाणार

Last Updated: Friday, December 20, 2013, 22:15

आदर्श अहवालावरून विरोधक आक्रमक झालेत. राज्य सरकारने आदर्श अहवालाबाबत घेतलेल्या चालढकल भूमिकेनंतर विरोधकांनी या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा विचार सुरू केला आहे. सरकारनं मांडलेला आदर्श अहवाल फाडून विरोधकांनी सरकारचा निषेध केला. नागपूरला विधानभवनाच्या आवारातच विरोधी पक्षाच्या आमदारांनी या अहवालाचे तुकडे केले.

आदर्श घोटाळाः तीन माजी मुख्यमंत्र्यांवर ताशेरे

Last Updated: Friday, December 20, 2013, 15:24

वादग्रस्त आदर्श घोटाळा प्रकरणाचा अहवाल आज अखेर विधीमंडळात सादर करण्यात आला. विधीमंडळाच्या नागपूर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकारने कृती अहवालसह आदर्शचा अहवाल सभागृहात मांडला.

`विक्रांत`चा मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टीकरणानंतर लिलाव बाकी...

Last Updated: Thursday, December 5, 2013, 22:10

विक्रांत जहाजाचं म्युझियमही शक्य नाही आणि त्यावर हेलिपॅडही उभारता येणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. विक्रांतचा लिलाव होणं आता निश्चित झालंय.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सभाच उधळली

Last Updated: Friday, November 8, 2013, 19:37

यवतमाळमध्ये बेंबळा प्रकल्पावर आयोजित सिंचन परिषदेत सुरु असलेली मुख्यमंत्र्यांचं भाषण बंद पाडून शेतक-यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची सिंचन परिषद सभा उधळून लावली.

मुख्यमंत्री चव्हाण यांचा राजकीय फटाका, शरद पवारांवर कोटी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 13:06

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहेत. यापुढे आपण निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा दस्तुरखुद्द शरद पवारांनी केली आहे. परंतु शरद पवारांना निवडणूक लढवण्यास भाग पाडू, असे त्यांच्या निकटवर्तियांचे म्हणणे आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा गौप्यस्फोट केलाय.

नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान

Last Updated: Thursday, October 24, 2013, 13:21

उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर पुन्हा शरसंधान साधलंय. मी मुख्यमंत्री असताना फाईल पेंडिंग ठेवत नव्हतो. मी एका दिवसात फाईल क्लियर करायचो. चांगल्या अधिका-यांचा वापर करुन घ्यायला हवा असा टोला मारून माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे यांनी राजकीय खळबळ उडवून दिली आहे. राणे यांनी हा टोला मुख्यमंत्र्यांना लगावलाय. मागच्या मंत्रिमंडळ बैठकीतही राणे यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती.

सचिन तेंडुलकर होईल महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, October 19, 2013, 10:52

काँग्रेसकडून राज्यसभेचा खासदार असलेला मास्टर ब्लास्टर सचिन आता महाराष्ट्राचा ब्रँड अँम्बेसेडर व्हावा यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. एमसीए निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री चव्हाण यांचा फ्लॅट अनधिकृतरित्या महिलेला भाड्याने

Last Updated: Friday, October 11, 2013, 13:47

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वडाळ्याच्या एका सोसायटीतला फ्लॅट अनधिकृतरित्या एका महिलेला भाड्याने दिला आहे. सध्या ती महिला त्या सोसायटीतल्या लोकांना त्रास देत असल्याची माहिती आहे.

आव्हाडांच्या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर परिणाम नाही

Last Updated: Monday, October 7, 2013, 22:06

ठाण्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी उपोषण केलं असलं तरी या उपोषणाचा मुख्यमंत्र्यांवर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही.

डॉकयार्ड इमारत दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री चव्हाण, उद्धव यांची भेट

Last Updated: Saturday, September 28, 2013, 08:27

दुर्घटनेनंतर डॉकयार्डमधल्या बाबूगेनू इमारतीला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भेट दिली. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बचाव कार्याची माहिती घेतली. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही भेट दिली. चौकशी करून कारवाई करण्यात येईल, असे ते म्हणालेत.

मुंडे, मुख्यमंत्र्यांचं `क्रिकेट`, की पवारांना `चेकमेट`?

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 17:49

पृथ्वीराज चव्हाण ज्या माझगाव क्रिकेट क्लबकडून मैदानात उतरले त्याच क्लबचे सेक्रेटरी शाहआलम हे स्टायलो क्रिकेट क्लबचेही मालक आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण आणि गोपीनाथ मुंडे यांना क्रिकेटच्या मैदानात उतरवणारा समान दुवा एकच आहे.

MCAच्या रिंगणात मुख्यमंत्री वि. शरद पवार सामना

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 00:14

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या रिंगणात उतरले आहेत. माझगाव क्रिकेट क्लबचे सदस्य होत मुख्यमंत्र्यांनी एमसीएमध्ये एंट्री घेतली आहे.

शरद पवारांचा `यू टर्न`!

Last Updated: Sunday, September 15, 2013, 20:38

अतिवृष्टीग्रस्तांसाठी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेले पॅकेज अद्याप मिळालेलं नाही या प्रश्नाच्या उत्तरात पवारांनी मुख्यमंत्र्यांवर पूर्ण विश्वास व्यक्त केलाय.. शिवाय मुख्यमंत्री जे वक्तव्य करतात त्यावर ते विलंब झाला तरी अंमलबजावणी करतात असं पवारांनी म्हटलंय. ते यवतमाळमध्ये बोलत होते.

पैसे मिळवणे हाच सेनेचा अजेंडा – मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, September 14, 2013, 22:28

पैसे मिळवणे हाच शिवसेनेचा एकमेव अजेंडा असल्याचा आरोप मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. डीएनएचे एस. बालकृष्णन यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं.

मुख्यमंत्र्यांचा पवारांवर पलटवार!

Last Updated: Wednesday, September 11, 2013, 17:52

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कालच्या शरद पवारांच्या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. नियमबाह्य कामं असल्यानं विचार करावा लागतो असं सांगत त्यांनी पवारांना टोला हाणलाय.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या : तर तपास सीबीआयकडे - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, September 7, 2013, 09:00

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या मारेक-यांचा शोध घेण्यासाठी अन्य तपास यंत्रणांची मदत घेतली जाते. या प्रकरणात गरज पडली तर सीबीआयकडेही हे प्रकरण सोपवण्याची तयारी असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय. ते कोल्हापुरात बोलत होते. या प्रकरणी अद्याप एकाही व्यक्तीला अटक केली नसल्याचं त्यांनी सांगितलं.

मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषद `भलत्याच` विषयावर!

Last Updated: Tuesday, August 27, 2013, 21:06

मुख्यमंत्र्यांची एक पत्रकार परिषद सध्या पुण्यात चर्चेचा विषय ठरलीय. दाभोलकर हत्या प्रकरण आणि मुंबई बलात्कार प्रकरण याविषयी महत्त्वाची माहिती मिळेल, अशी अपेक्षा होती.... पण घडलं वेगळंच....

गांधी हत्या करणाऱ्या शक्तीने केले कृत्य- मुख्यमंत्री

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 20:39

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या ही राजकीय हत्या आहे. ज्या शक्तींनी महात्मा गांधींची हत्या केली, त्याच शक्तींनी आज डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपला निषेध नोंदवला. त्यामुळे त्यांचा रोख कोणाकडे आहे, हा प्रश्न होतं आहे.

खड्ड्यावरून मनसेचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

Last Updated: Saturday, August 17, 2013, 18:30

नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण पुन्हा एकदा झोकात सुरु झालंय. कालपर्यंत खड्डे बुजत नाहीत म्हणून बोटं मोडणारी मनसे आता खड्डे बुजविले जातायेत म्हणून आपल्याच अधिका-यांविरोधात शंका उपस्थित करतेय.

विठुराया अशीच कृपा ठेव, मुख्यमंत्र्याचे साकडे

Last Updated: Friday, July 19, 2013, 12:00

यंदा राज्यात सर्वदूर झालेल्या पावसामुळे वारकरी समाधानी आहेत. त्यामुळे ‘विठुराया, अशीच कृपा असू दे’ असे गाऱ्हाणे घालणाऱ्या वारकऱ्यांप्रमाणे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विठुरायाला साकडं घातलं.

डान्सबारवरून आघाडीमध्ये ब्लेमगेम!

Last Updated: Thursday, July 18, 2013, 22:41

डान्सबार बंदीवरून आता सत्ताधारी आघाडीमध्येच ब्लेमगेम सुरू झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यानिमित्ताने थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अखत्यारीतील विधी व न्याय खात्यावरच तोफ डागलीय.

सरकारचं डोकं फिरलं, दुष्काळी भागात २० कोटींचं गेस्ट हाऊस

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 19:02

साता-यात दुष्काळाची स्थिती गंभीर होती..... दुष्काळाच्या या भयाण स्थितीतही तब्बल २० कोटींचं गेस्ट हाऊस क-हाडमध्ये बांधलं जातंय

राज्यात अलिबाबा आणि ४० चोरांचे राज्य – मुंडे

Last Updated: Friday, July 5, 2013, 17:14

राज्यात अलिबाबा आणि त्यांच्या चाळीस चोरांचे राज्य आहे, यांना घरी घालवल्या शिवाय राहणार नाही, असा निर्धार भाजप नेते गोपीनाथ मुंडेंनी सांगलीच्या सभेत व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी केलं विद्यार्थ्यांचे स्वागत

Last Updated: Monday, June 17, 2013, 15:37

पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण शाळेतल्या विद्यार्थ्यांना आज पहिल्याच दिवशी सुखद आश्चर्याचा धक्का बसला. राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी शाळेत येणा-या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत के्लं.

इस्टर्न फ्रीवे वाहतुकासाठी खुला

Last Updated: Thursday, June 13, 2013, 20:27

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते इस्टर्न फ्रीवेचं उदघाटन करण्यात आलं. सीएसटी ते चेंबूरपर्यंतच्या साडे तेरा किलोमीटरचा हा मार्ग मुंबईकरांना वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय.

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता

Last Updated: Sunday, May 12, 2013, 19:34

एलबीटीचा तिढा सुटण्याची शक्यता आहे. कारण एलबीटीवर तोडगा काढण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरु झाले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एक बैठक पार पडली.

एलबीटीवर तोडगा काढा – शरद पवार

Last Updated: Thursday, May 9, 2013, 13:28

मुंबईच्या बाजारपेठा बंद राहणं हे अयोग्य आहे. एलबीटी प्रश्नी राज्य सरकारने लवकरात लवकर तोडगा काढावा, अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलाय.

मुजोर व्यापाऱ्यांनी सीएम, राज, उद्धव यांना धुडकावले

Last Updated: Thursday, May 9, 2013, 12:48

एलबीटी कर रद्द करण्याच्या मागणीसाठी राज्यभरात व्यापाऱ्यांनी संप पुकारलाय. याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांनी जनतेला वेठाला न धरण्याचं आवाहन वारंवार केलंय. असं असतानाही व्यापाऱ्यांनी संप सुरूच ठेवलाय. आता मनसे आणि शिवसेना याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलंय.

पुन्हा राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांवर शाब्दिक हल्ला

Last Updated: Thursday, May 2, 2013, 20:11

गेले काही महिने शांत झालेलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं शाब्दिक युद्ध आता पुन्हा सुरू होण्याची चिन्हं आहेत. या संघर्षाला आणखी नवं निमित्त झालं ते मेट्रो चाचणीचं...

मेट्रो धावणार सुसाट, आज होणार चाचणी

Last Updated: Wednesday, May 1, 2013, 11:41

महाराष्ट्र दिनाचं अवचित्य साधून मुंबईतील पहिल्या मेट्रो रेल्वेची चाचणी घेतली जाणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण वर्सोवा येथे या चाचणीला हिरवा कंदील दाखवणार.

काँग्रेस सरकार नसेल तर देशाचं विघटन होईल- मुख्यमंत्री

Last Updated: Sunday, April 28, 2013, 22:19

देशाला मजबूत सरकारची आवश्यकता आहे, आणि ते फ़क़्त काँग्रेसच देऊ शकते, जर स्थिर सरकार मिळालं नाही, तर देशाचे विघटन होण्याची भीती असल्याचं धक्कादायक विधान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलंय.

मुख्यमंत्र्यांनी फटकारले प्राध्यापकांना

Last Updated: Monday, April 22, 2013, 16:35

गेल्या ७८ दिवसांपासून संपावर गेलेल्या प्राध्यापकांना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी फटकारलयं. संप करुन विद्यार्थी आणि सरकारला वेठिस धरु नका अन्यथा कठोर कारवाई करु असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिलाय.

सरकार निगरगट्ट आणि गेंड्याच्या कातडीचं- राज

Last Updated: Sunday, March 24, 2013, 23:23

राज ठाकरेंनी सभेच्या सुरूवातीलाच मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. त्यांच्याच वक्तव्याचे दाखले देत राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारले.

मुख्यमंत्री हे वागणं बरे नव्हे - पवार

Last Updated: Sunday, March 17, 2013, 11:36

पुन्हा एकदा केंद्रीय कृषीमंत्री शरद पवारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसाच आघाडी सरकारमधील घटक पक्ष काँग्रेसलाही डिवचलंय. पृथ्वीराज चव्हाण यांना पवार म्हणालेत, मुख्यमंत्री हे वागण वागणं बरे नव्हे.

योजनांसाठी आधारकार्डबाबत काही अंशी शिथिलता

Last Updated: Wednesday, March 13, 2013, 17:06

आधारकार्ड देशाच्या प्रत्येक नागरिकाला अनिवार्य केले आहे. मात्र ज्या जिल्ह्यात ८० टक्के आधार कार्डची नोंदणी झाली नाहीये. त्या जिल्ह्यात योजनांचे लाभ आधार क्रमांकांशी संलग्न करण्याची घोषणा करणार नाही.

शिक्षक संप: आदित्य ठाकरे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

Last Updated: Tuesday, February 26, 2013, 21:26

शिक्षक संघटनांच्या विविध आंदोलनांमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षेवर परिणाम होत असल्याने आता याप्रश्नी युवा सेना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना भेट घेणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:53

राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. काँग्रेसचे राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश हे मुंबईत दाखल झाले आहेत. ते मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आज मुख्यमंत्र्याची भेट घेणार आहेत.

बहिष्कार मागे; बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 09:21

विविध मागण्यांसाठी खाजगी शिक्षण संस्थांनी 12 वीच्या परीक्षेवर टाकलेला बहिष्कार मागे घेण्यात आला आहे. मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने बहिष्कार मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

जितेंद्र आव्हाड यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

Last Updated: Wednesday, February 13, 2013, 21:19

दुष्काळग्रस्तांच्या निधीसाठी सिडको, म्हाडा आणि एमएमआरडीएने 50 टक्के निधी द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ठाण्यातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. याबाबत आव्हाड यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवलंय.

श्वेतपत्रिकेवरून राष्ट्रवादीने केलं मुख्यमंत्र्यांना टार्गेट

Last Updated: Thursday, February 7, 2013, 21:00

MMRDA ची श्वेतपत्रिका काढण्याच्या मुद्दावरुन राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना पुन्हा टार्गेट केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात चिमटा काढला आहे.

निर्णय घेतला `बाबां`नी, श्रेय घेतलं अजित `दादां`नी!

Last Updated: Friday, February 8, 2013, 11:48

पिंपरी चिंचवडचे ‘दबंग’ आपणच असल्याचं अजित पवारांनी पुन्हा सिद्ध केलं आहे. पिंपरी चिंचवडमधल्या अनधिकृत बांधकामांना अभय देण्याचा निर्णय खरं तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत पार पडला. पण मुख्यमंत्री शहरात येण्यापुर्वीच दादांच्या आदेशानं राष्ट्रवादीच्या आमदारांनी याची घोषणा करुन टाकली आणि काँग्रेसला नुसतंच बघत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.

शरद पवार, अजित पवार आणि मुख्यमंत्री पिंपरी-चिंचवडमध्ये!

Last Updated: Wednesday, February 6, 2013, 19:57

पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शरद पवार असे तिघेही एकत्र येत आहेत. निमित्त आहे सायन्स पार्कच्या उद्घाटनाचं... 8 तारखेला हा कार्यक्रम होत आहे. या तीनही नेत्यांकडून पिंपरी-चिंचवडमधल्या नेत्यांच्या आणि नागरिकांच्या ब-याच अपेक्षा आहेत.

मुख्यमंत्र्यांचं विधान चुकीचं - अजित पवार

Last Updated: Sunday, January 27, 2013, 19:22

मुख्यमंत्री खोटं बोलत असल्याची जोरदार टीका करत अजित पवारांनी खळबळ उडवून दिली आहे. राज्य बँकेवर प्रशासकांची नियुक्ती झाल्यानंतरच लायसन्स मिळालं, असं मुख्यमंत्री म्हणाले होते. याचा समाचार घेताना, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांना खोटं ठरवलं.

...तर ढोबळेंना पूर्वीचे पोस्टींग - मुख्यमंत्री

Last Updated: Thursday, January 17, 2013, 13:07

फेरीवाल्याचा कारवाई दरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप ठेवण्यात आलेले वाकोला पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत ढोबळे हे जर दोषी नसतील तर त्यांचे पोस्टींग पूर्वीच्याच ठिकाणी केले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेय.

अजित दादांच्या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्र्यांना आमंत्रण!

Last Updated: Wednesday, January 9, 2013, 21:21

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पिंपरी-चिंचवड या बालेकिल्ल्यात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विकास कामांच्या उद्घाटनाला येणार आहेत. तेही खुद्द अजित पवार यांच्या सांगण्यावरून....

दादा-बाबांचे मानापमान ‘नाट्य’ तर पवारांचा तडका

Last Updated: Sunday, December 23, 2012, 14:12

अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या ९३वे नाट्यसंमेलन हे जणू मानापमानाचे व्यासपीठ ठरल्याचे दिसून आले. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या उपस्थित दादा-बाबांचे बोलनाट्य दिसले. यावेळी दादांनी मागितले आणि बाबांनी देऊन टाकले, अशी कुजबूज कवी मोरोपंत नगरीत कुजबूज ऐकायला मिळाली.

मुख्यमंत्र्यांना महिलांनी घातला घेराव

Last Updated: Monday, December 17, 2012, 16:14

चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी करत महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घातला. महिलांचा हा रुद्रावतार बघून मुख्यमंत्र्यांनी एका महिन्याच्या आत निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. दरम्यान, डॉ. अभय बंग यांनी सरकारवर टीका केलीय.

बाबा-दादांमध्ये पवारांच्या वाढदिवसाने ‘गोडवा’

Last Updated: Wednesday, December 12, 2012, 20:09

केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसाचं नागपूर विधान भवन परिसरात सेलिब्रेशन करण्यात आलं.. यावेळी १२ वाजून १२ मिनिटांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केक कापून पवारांचा वाढदिवस साजरा केला. यावेळी गोडवा वाढला तो बाबा आणि दादांमध्ये.

शिवसेना नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Last Updated: Tuesday, December 11, 2012, 23:46

शिवाजी पार्कवरील चौथरा हटविणार नाही, या भूमिकेवर शिवसेना ठाम आहे. मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीत शिवसेना नेत्यांनी ही भूमिका स्पष्ट केलीय. शिवसेना नेत्यांनी दोन प्रस्ताव मुख्यमंत्र्यांसमोर ठेवले आहेत.

अजित दादा बिनखात्याचे मंत्री!

Last Updated: Sunday, December 9, 2012, 20:56

कोणत्याही मुद्द्यावर विधीमंडळात चर्चा करण्यास सरकार तयार असल्याचं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटलंय. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असली, तरी त्यांच्याकडे अद्याप कोणती खाती देण्यात आलेली नाहीत.

मुख्यमंत्र्यांची प्रशासकीय अधिकाऱ्यांवर टीका

Last Updated: Sunday, December 2, 2012, 23:46

प्रशासकीय अधिकारी जायला तयार नसल्यामुळे मराठवाडा, विदर्भ, खानदेश या विभागातील विकास रखडल्याची टीका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. अधिका-यांची अशी रिक्त राहणारी पदं हे या विभागांचा विकास न होण्यामागील महत्वाचं कारण असल्याचं त्यांनी म्हटलंय.

कायदा हातात कोणी घेऊ शकत नाही - मुख्यमंत्री

Last Updated: Monday, November 26, 2012, 13:46

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाबाबत कोणताही वाद नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलंय. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊ शकत नाही, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचे नेते मनोहर जोशी यांना लगावला आहे.

आंदोलन करून नुकसान का करता?- मुख्यमंत्री

Last Updated: Wednesday, November 14, 2012, 10:11

ऐन दिवाळीमध्ये ऊसदराचा वाद पेटला आहे. यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय रंगही चढू लागला आहे आणि एकीकडे हे आंदोलन हिंसक वळणावरही आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकरी संघटनेच्या शिष्टाचाऱ्यांकडे हे आंदोलन ताबडतोब थांबवावं अशी विनंती केली आहे.

`पुळचट मुख्यमंत्री, अजितदादा मुख्यमंत्री होणारच`

Last Updated: Tuesday, November 6, 2012, 09:10

`असले पुळचट मुख्यमंत्री काय कामाचे, त्यापेक्षा आमच्या अजितदादांकडे पाहा`. `निर्णय घेण्याची क्षमता नसलेले पुळचट मुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री पदावर बसले आहेत.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण देणार एक `गोड बातमी`

Last Updated: Wednesday, October 24, 2012, 16:52

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे एक गोड बातमी देणार आहेत. काय असणार ही गोड बातमी याबाबत आपल्यालाही उत्सुकता असेलच की,

मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना `दे धक्का`

Last Updated: Thursday, October 18, 2012, 19:42

मुख्यमंत्र्यांनी अजित पवारांना पुन्हा एकदा मोठा धक्का दिलाय. राज्य सरकारनं पुणे महापालिकेला विश्वासात न घेता महापालिकेची हद्द वाढवली आहे. राज्य सरकारनं परस्पर २८ गावांचा समावेश महापालिका हद्दीत केलाय.

उद्धव ठाकरेंनी केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन

Last Updated: Sunday, October 7, 2012, 20:29

आज शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सिंचन घोटाळ्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला. याच वेळी त्यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागावरील वादावरही भाष्य केलं. मात्र रॉबर्ट वढेरा यांच्याबद्दल बोलणं टाळलं

दादा-बाबांच्यामध्ये दरी, फोन घेण्यास टाळाटाळ

Last Updated: Wednesday, September 26, 2012, 13:32

अजित पवार हे गेल्या आठ दिवसांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या संपर्कातच नव्हते,अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या आठ दिवसांत अजितदादांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा फोनच उचलला नव्हताही अशी माहिती आहे.

६४वा मराठवाडा मुक्तिदिन

Last Updated: Monday, September 17, 2012, 15:51

आज 64 वा मराठवाडा मुक्तीदिन सोहळा साजरा कऱण्यात येतोय. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत औरंगाबादेत हा सोहळा पार पडला. हैदराबादच्या निजामाच्या क्रूर राजवटीतून मुक्तीसाठी शेकडो जणांनी आपल्या प्राणांची आहूती दिली. या हुतात्म्यांना मुख्यमंत्र्यांनी अभिवादन केलं.

सेना-मनसे समाजात फूट पाडताहेत - सीएमचा टोला

Last Updated: Friday, September 7, 2012, 17:12

काही पक्षांनी समाजात फूट पाडू नये. फूट पाडणा-यांना सरकार कायदा हातात घेऊ देणार नाही असा इशारा मुख्यमंत्र्यांनी नाव न घेता शिवसेना-मनसेला दिलाय.

शिवाजी पार्कच का? भेंडीबाजार का नाही?- उद्धव

Last Updated: Sunday, September 2, 2012, 11:33

मुंबईतल्या दादरच्या शिवाजी पार्क परिसर आणि निवासी भागाला हेरिटेज दर्जा देण्याप्रकरणी हेरीटेजचा दर्जा मराठी वसाहतींनाच का? असा सवाल उद्धव यांनी केला आहे. शिवाजी पार्क परिसर हेरिटेज झाल्यास त्याचा फटका या भागात राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी माणसाला बसणार आहे.

राज्याला केंद्राकडून मिळेल मदत - मुख्यमंत्री

Last Updated: Saturday, August 25, 2012, 11:59

दुष्काळ निवारणासाठी राज्याला सर्वोतोपरी मदत दिली जाईल, असं आश्वासन दिल्लीत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देण्यात आलय. यासंदर्भात राज्य सरकारच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत बैठक दिल्लीत पार पडली.

राज करतोय सेनेकडचं हिंदुत्व हायजॅक- मुख्यमंत्री

Last Updated: Tuesday, August 21, 2012, 15:50

‘आझाद मैदान येथे 11 ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसेच्या निषेधार्थ राज ठाकरे यांनी काढलेला मोर्चा म्हणजे शिवसेनेच्या हिंदुत्वाच्या अजेंड्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न आहे’, असं वक्तव्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पोलिसांची सहानुभूती मिळवण्यासाठीच राज ठाकरेंचा हा प्रयत्न आहे.

पवारांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री दिल्ली दरबारी

Last Updated: Monday, July 30, 2012, 16:44

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज दिल्लीदरबारी दाखल झाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची त्यांनी भेट घेतली. दहा जनपथवर सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर त्यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांच्यावर शरद पवारांनी टीका केली होती.

पवारांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Last Updated: Saturday, July 28, 2012, 21:58

राज्यातलं सरकार दोन्ही पक्षांचे आहे. त्यामुळं एकतर्फी निर्णय चालणार नाही अशा कडक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना सुनावले आहे. मुख्यमंत्री बदलण्याबाबत राष्ट्रवादी आग्रही नसल्याचं सांगत काँग्रेसचा मुख्यमंत्री चालणार असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.

दिल्लीत NCPची महत्वाची बैठक

Last Updated: Sunday, July 22, 2012, 19:22

दिल्लीत काँग्रेसवर नाराजी व्यक्त करणा-या आणि राज्यात मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणा-या राष्ट्रवादी काँग्रेसची उद्या महत्वपूर्ण बैठक होत आहे. दिल्लीत होणा-या बैठकीत शरद पवार यांच्यासह सर्वच प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

निचरा पैशाचा की कचऱ्याचा...

Last Updated: Tuesday, July 17, 2012, 10:28

मुंबई महापालिकेनं राबवलेल्या ‘ब्रिमस्टोवॅट’ प्रकल्पाचा खर्च कसा वाढला याबद्दल चौकशी करण्यात येईल, असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विधानसभेत दिलंय.

अशोक चव्हाण समर्थकांची धाव प्रभारीपर्यंत

Last Updated: Wednesday, July 11, 2012, 18:38

माजी मुख्यमंत्री आणि आदर्श घोट्याळ्यात आरोप ठेवण्यात आलेले अशोक चव्हाण यांची कैफियत मांडण्यासाठी दिल्लीत गेलेल्या अशोक चव्हाण समर्थक आमदारांना सोनिया गांधींनी भेट नाकारलीय. त्यामुळं आता चव्हाण समर्थक आमदार महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडणार आहेत.

आदर्श घोटाळा : विलासराव हाजीर हो...SSS

Last Updated: Wednesday, June 27, 2012, 12:52

मुंबईतील आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांची आज पुन्हा साक्ष होणार आहे. त्यासाठी ते चौकशी आयोगासमोर हजर झाले आहेत.

विलासरावांनी फोडले अशोक चव्हाणांवर खापर!

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 19:02

वादग्रस्त 'आदर्श'च्या इमारतीसाठी जमीन देण्याचा आदेशाच्या फाईल्स मुख्य सचिवांनीच तपासल्या होत्या, असे सांगून राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनीही या प्रकरणी महसूल खात्याकडे बोट दाखवत मी नाही त्यातला असे दाखवून दिले आहे.

मोरे कुटुंबियांचे मुख्यमंत्र्यांकडून सांत्वन

Last Updated: Sunday, June 24, 2012, 19:31

मंत्रालयात लागलेल्या आगीत मुख्यमंत्र्यांचे जमादार मोहन मोरे आणि तुकाराम मोरे यांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोघांच्या घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केलं.

पवारांच्या प्रस्तावानं भुजबळांना दणका

Last Updated: Saturday, June 23, 2012, 07:46

मंत्रालयाच्या जागी सरकारनंच नवी इमारत बांधावी अशी सूचना करत शरद पवारांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळांच्या जुन्या प्रस्तावाला मूठमाती दिलीय.

मुख्यमंत्री बदलाचा प्रश्नच नाही – पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:57

मंत्रालयातील आगीपासून आता सामान्य स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. यात मुख्यमंत्री बदलाचा मुद्दा काढणे चुकीचे आहे. असा मुद्दा काढून स्थिती सामान्य व्हायला दिरंगाई होईल, त्यामुळे असा मुद्दा काढू नये, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिपदेत सांगितले.

मंत्रालयाची पाडा इमारत, बांधा नवीन- पवार

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:17

मुंबई ही राज्याची राजधानी आहे. राजधानीच्या ठिकाणी असलेले मंत्रालय हे प्रशासकीय कार्याचं मुख्यालय आहे. आगीचा प्रकार पाहता या ठिकाणी कायम स्वरुपाची प्रशासनासाठी एक उत्तम स्वरूपाची इमारत हवी, आणि या इमारतीचे काम सरकारने केले पाहिजे, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ही इमारत पाडा आणि त्याची पुनर्बांधणी करण्याचा सल्लाच पवारांनी यावेळी दिला आहे.

मंत्रालयात स्प्रिंकलर यंत्रणाच नाही

Last Updated: Friday, June 22, 2012, 16:27

राज्यातील इमारतींमध्ये आगीपासून बचाव होण्यासाठी कोणती यंत्रणा हवी, याचे नियम ठरवणारे मंत्रालय. मात्र, काल लागलेल्या आगीमुळे या मंत्रालयातील इमारतीत आग लागल्यानंतर आवश्यक असलेली यंत्रणा नसल्याने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे

मुख्यमंत्र्यांनी केलं सहकार्याचं आवाहन

Last Updated: Friday, June 22, 2012, 14:36

ज्या मंत्रालयातून संबंध राज्यातल्या जनतेची कामं हाताळली जाताता ते मंत्रालयचं सुरक्षित नाही, याची प्रचिती गुरुवारच्या आगीमुळे सगळ्यांनाच आली. त्यानंतर आज सकाळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीनं कॅबिनेटची बैठक बोलावली होती. मंत्रालयाचं स्ट्रक्चरल ऑडिट होईपर्यंत मंत्रालय बंद राहील, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कॅबिनेट बैठकीनंतर स्पष्ट केलय.

'शरद पवारांनी अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं'

Last Updated: Friday, June 15, 2012, 22:09

उद्योगांच्या धोरणाबाबत टीका करण्याआधी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राज्याच्या अर्थमंत्र्यांशी बोलायला हवं होतं, असं मुख्यमंत्र्यांनी म्हंटलं आहे. राज्यातले उद्योग बाहेर जात असल्याबाबतची टीका गैरसमजातून होते आहे.असं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे.

पवार-चव्हाणांमध्ये तू तू... मै मै

Last Updated: Sunday, June 3, 2012, 08:43

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रसमध्ये मागील काही महिन्यांपासून सुरू असलेल्या शाब्दिक युद्धात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी उडी घेतली आहे. पवारांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना टार्गेट केलंय. तर मुख्यमंत्र्यांनीही पवारांच्या टीकेला चोख उत्तर दिलंय.

दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

Last Updated: Wednesday, May 16, 2012, 20:47

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.