Last Updated: Tuesday, December 24, 2013, 18:05
‘झालं गेलं गंगेला मिळालं’ असं म्हणत राज ठाकरेंनी अमिताभ बच्चन यांच्याशी पुन्हा कालच्या कार्यक्रमात मनोमिलन केलं. पण इतके वर्ष राज ठाकरे यांनी मराठी तरुणांची माथी भडकवली, उत्तर भारतीयांना मारहाण करून त्यांचे संसार उद्धवस्त केले, हे सर्व गंगेला मिळालं का? असा सवाल करत काँग्रेसने गंगेला काय मिळालं हे राज ठाकरे यांनी स्पष्ट करावं, असा जोरदार टोला लगावला आहे.